Skip to main content

संघ भाजप आणि काँग्रेस

4 एप्रिल 2018 रोजी संजय पवार याचा लेख प्रसिद्ध झाला होता त्यावरची हि प्रतिक्रिया:
संजय पवार यांनी या लेखात संघ भाजपच्या प्रवृत्तीचे अतिशय वास्तवदर्शी आणि सखोल विवेचन केलेले असले तरी माझ्या मते फक्त भाजपचं असा आहे असे मुळीच नाही. काँग्रेस आणि भाजपमध्ये फारसा फरक नाहीच म्हणून तर ते एकमेकाला पर्याय म्हणून काम करतात. खरे तर याविषयावर अभ्यास व्हायला हरकत नाही किंवा तसा कुणी इतिहासकाराने केला आहे किंवा नाही हेही सांगता येणार नाही कारण तो केला असला तरी प्रकाशात आणला जात नाही कारण त्यामुळे संघ भाजपबरोबर आपणही उघडे पडू अशी भीति काँग्रेसच्या धुरिणांना वाटणे स्वाभाविक आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस सामाजिक सुधारणा अगोदर कि स्वातंत्र्य अगोदर याविषयावर  फुटल्यानंतर मवाळ आणि जहाल अश्या दोन गटात तिची विभागणी मवाळ गटाला आपसूकच सत्तेच्या जवळ घेऊन गेली तर काँग्रेसने स्वतःला राजकीय पक्ष म्हणून स्थिरस्थावर केल्यानंतर मवाळ गट सत्तेचे आणि संपूर्ण स्वातंत्र्याचे स्वप्न पाहत असतानाच जहालगट सत्ता आणि स्वातंत्र्य चळवळ यापासून लांबच गेला म्हणजे निर्वाणीचा स्वातंत्र्य लढ्यात या गटाचे कोणीच नव्हते पण मवाळ गटाला उठसुठ अपशकुन करायची संधी हा गट सॊडत नव्हता. या गटाला धार्मिक चौकटीतच समाजसुधारणा हव्या होत्या त्यामुळे काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना सतत खिंडीत गाठण्याची संधी या गटाने सोडली नाही त्यातीलच एक उपद्रवी पण काँग्रेसजनांना मानवणारे नाव म्हनजे हेगडेवार.  विदर्भ काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष असलेल्या हेगडेवार याना हाताशी धरून संघाची रुजवात घातली ती काँग्रेसनेच. हा काँग्रेसने आपण होऊन निर्माण केलेला पहिलावहिला विरोधक.  त्यानंतर  आपल्या उथळ वागण्यामुळे हा गट सतत काँग्रेसला विरोध करत राहिला पण काँग्रेसकडे असलेले कोणताही धोरणीपणा यागटाकडे नसल्याने आपला जुनाच मुद्दा या गटाने पुन्हा उचलायला सुरुवात केली आणि तो म्हणजे धर्माधीष्टीत  राजकारण. यासाठी अगोदर जनसंघ आणि नंतर भाजप हे संघाचे राजकीय सेल राजकारणात सक्रिय झाले.  त्यांच्या उथळ राजकारणाचा काँग्रेसलाही फायदा होत गेला, त्यामुळे त्याचा उपद्रव होत असूनही काँग्रेसने त्यांना कायमचा पायबंद घातला नाही.  सरदार पटेलांनी संघावर घातलेली बंदी उठविण्याची घोडचुकही त्यातूनच झाली. काँग्रेस सतत भाजपने देशासाठी काय केले हा प्रश्न विचारत असल्यामुळे आनी भाजप संघाने देशासाठी खरेच काहीही न केल्याने त्यांना सतत कोणीतरी हिरो आपल्या गोटात घ्यावा लागतो त्यातूनच पटेलांना आपल्या गोटात घेतल्यांनंतर त्यांनी राजगुरू यांच्याकडे मोर्चा वळविला. खरेतर भगतसिंग यांचेकडे त्यांचा डोळा हित पण त्यांनी "मी नास्तिक आहे" असे जाहीर सांगितल्याने देवप्रेमी संघभाजपची गोची झाली.  त्यामुळे राजगुरूंना शाखेत आणायचे पिल्लू नवख्या कार्यकर्त्याने सोडायचे आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया येताहेत असे वाटले तर हद्दपारीच्या उंबरठ्यावर असलेल्यांनी ते नाकारायचे असे धोरण सध्या चालू आहे. हाही तसा काँग्रेसचाच जुना खेळ आहे. मध्यप्रदेशातून राजकीयदृष्ट्या  हद्दपार झालेल्या दिगविजय सिहांकडे काँग्रेस सत्तेत असताना हि पिल्लू सोडायची जबाबदारी होती. ते अंगलट आले की त्याचा पक्षाशी काही संबंध नाही असे म्हणून अंग झाडायचे. हा काँग्रेस आणि भाजपच्या राजकारणाचा एक पैलू असला तरी त्याच्या जोडीला आणखी एक पैलू आहे तो म्हणजे सवर्णाचे आणि त्यातही ब्राह्मण्याचे राजकारण आणि त्याच्यावर सनातनी, पुरोगामी, डावे, उजवे आणि  अतिउजवे यांच्यातील ब्राह्मण्यवादि यांचे एकमत असते. म्हणजे सत्ता कोणत्याही पक्षाची आली तरी  सत्ता तर ब्राह्मन्यवादि टोळ्यांच्या हातात राहीलच पण विरोधाची सूत्रे ही त्यांच्याकडेच राहतील म्हणजे पुरीगामी काँग्रेस सत्तेत आली काय आणि कडवा धर्मवादी भाजप सत्तेत आला काय फक्त पक्ष बदल होतो पण थोड्याफार फरकाने सत्ता मात्र याच विचारांच्या लोकांच्या हातात राहते. त्यातली त्यात काँग्रेसचा थिंक टॅंक हुशार, धोरणी आणि चाणाक्ष. तो राजकारण मात्र बहुजनांच्या आणि समतेच्या नावाने करतो पण हेतू मात्र अभिजन आणि ब्राह्मण्यवादी लोकांचे वर्चस्व टिकविण्याचे करतो. त्यामुळे बहुजनांच्या विकासाची क्षमता आणि संधी असतानाही काँग्रेसने त्या दवडल्या. एकाद्या काँग्रेसच्या नेत्याला किंवा भाजपच्या नेत्याला पक्ष सोडायचा असला तरी आपला समविचारी पक्ष म्हणून ते अगोदर भाजप आणि आणि काँग्रेस यांना प्राधान्य देतात. त्यामुळे कोणत्याच पक्षात बहुजन किंवा त्यातील शूद्र किंवा अतिशूद्र किंवा आदिवासी समाजातील नेतृत्व पुढे येऊ शकले नाही.  सर्व गुण आणि क्षमता  असूनही बाबासाहेबांसारख्या धुरीण नेत्याला अपेक्षित सन्मान आणि राजकीय पद मिळाले नाही कारण प्रश्न जेव्हा पद देण्याचा येतो त्यावेळेस सर्वपक्षीय नेत्यांची त्याबाबत एकी होती.
पुरोगामी चळवळीच्या बाबतीतही चळवळीचे नेत्रुत्व आणि विरोधक हेही बाबा आढाव यांच्यासारखा एखादा अपवाद वगळल्यास ब्राह्मण समाजाकडे केंद्रित झालेले दिसते. या ब्राह्मण्यवादी धोरणातूनच पुरोगामी चळवळींची हि वाताहत झाल्याचे दिसून येते.
थोड्याफार फरकाने पत्रकारिता आणि न्यायव्यवस्थेतही असेच अनुभव येतात म्हणून तर एकाच गुन्ह्यासाठी लालूप्रसाद यादव जेलमध्ये आणि जगन्नाथ मिश्र निर्दिष्ट सुटतात किंवा छगन भुजबळ जेलमध्ये आणि निरव मोदी सारखे अनेकजण राजरोस भारताबाहेर पसार होतात. संसदेत प्रसन्न विचारण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदारामधील दलित बांगर लक्ष्मण वगळता सर्व सवर्ण खासदारांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन जगल्याचे दिसून येते.
©के. राहुल 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...