Skip to main content

लघुकथा : भूक


उमाकाकू आपली दुपार शिफ्टची ड्युटी संपवून घरी   चालल्या होत्या . आज अचानक त्यांची नेहमीची  लोकल चुकली होती म्हणून त्यांनी सीएसटीवरून रात्रीची ११.३० ची महालक्ष्मी एक्सप्रेस पकडली होती. कल्याणजवळ आले कि  एक्सप्रेस स्लो होते हा त्यांचा नेहमीच अनुभव गाठीशी होता तेव्हा आपण कल्याण स्टेशन जवळ आले की उतरू असा विचार करून त्या आत चढल्या. गाडीत गर्दी होती त्यामुळे त्या दरवाज्यात उभ्या राहून विचारत गढून गेल्या. शिवाय थोडे मागे उतरावे लागत असल्याने त्यांना अंधारात थोडे अंतर चालावे लागनार होते. रस्ता ओळखीचा आणि पायाखालचा असला तरी मनात थोडी भीती आणि धाकधूक होतीच. विचारात गढून गेल्या असतानाच त्यांना आतील प्रवाशांच्या गडबडीने कल्याण जवळ आल्याची चाहूल लागली आणि त्यांनी गाडी स्लो झाली की गाडीतुन खाली उडी मारली उतरल्यावर त्यांना आपण नेहमीपेक्षा थोडे मागेच उतरल्याने लक्षात आले . आणि त्या पदर सावरत लगबगीने चालू लागल्या. चालता चालता त्यांचे लक्ष रेल्वेरुळाच्या  बाजूला पडलेल्या एक 25 ते 30 वर्षाच्या मुलीकडे गेले. ती विव्हळत होती आणि मधून मधून भूक भूक असे म्हणत होती. तिची अवस्था अत्यंत वाईट होती आणि हाडांचा सापळा झाला होता त्यामुळे हिला बरेच दिवस अन्न मिळाले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिचे बरेच शारीरिक आणि लैंगिक शोषण झाले असावे असे वाटून उमकाकूंना तिची दया आली. बाईनेच बाईची कदर केली पाहिजे असा विचार करून काकूंनी तिला हात दिला आणि उठून बसविले. आपल्या पर्समधील पाण्याची बाटली तिला दिली. पाणी प्याल्यावर तिला जरा हायसे वाटले. काकूंनी नुकतीच घेतलेली आपल्या आवडीची दही कचोरी तिला दिली. खाऊन जरा तरतरी आल्यावर काकूने तिला विचारले, "काय गं, किती दिवस झाले तू उपाशी आहेस?" तिने काकूंच्या पदर हातात घेऊन आपले तोंड पुसले आणि खो खो हसत म्हणाली, झाले असतील चांगले तीस पस्तीस वर्षे!" आता  ती आणि काकू रोज कोणीतरी आपल्याला जेवण देणारे भेटेल का? याची वाट पाहत असतात.
©के. राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...