Skip to main content

लघुकथा : आस


वयाच्या नव्वदीला टेकलेल्या पुष्पाताई आज कधी नव्हे त्या रात्रिच्या अकरा वाजून गेल्या तरीही जाग्या होत्या.  तश्या त्या रोज दहा वाजण्याच्या आतच झोपी जात असत. लवकर झोपून लवकर उठावे हा त्यांचा शिरस्ता त्यांनी आजही कटाक्षाने पाळला होता. त्याचे यजमान रिटायर झाले की एका वर्षातच निवर्तले होते. हा दिनक्रम त्यांनीच घालून दिला होता.  अगदी त्यांच्या एकलुत्या एका मुलाला गिरीषलाही ते कटाक्षाने या गोष्टी पाळायला लावत असत.  त्याचे फायदेही त्यांनी अनुभवले होते. गिरीष आता आपल्या बायकोबरोबर परदेशी वास्तव्यास असला तरी त्याने ती legacy पुढे आपला एकुलत्या मुलगा अद्वय आणि पत्नी रियाकडे सुद्धा pass on केली होती.अश्या या आपल्या मुलाचे आणि सूनेचे होणारे आगमन आज या वयातही इतका उशीर जागण्यासाठी त्यांना वेगळीच उर्मी देऊन गेलं होतं. गिरीशला अमेरिकेला जॉबसाठी जाऊन आता चांगली 35 वर्षे होऊन गेली होती. पण याकाळात तो फक्त दोनदा आला होता भारतात. एकदा बाबा गेले तेव्हा आणि दुसऱ्यांदा त्याच्या स्वतःच्या लग्नाच्या वेळेस. नाही म्हणायला तो पैसे पाठवायचा लागतील तेवढे पण प्रत्यक्ष भेटीची सर त्या नोटांच्या पुडक्याला थोडीच येणार आहे. त्यांनी वारंवार आग्रह करूनही तो आला नव्हता. त्यामुळे त्याचे येणे त्यांना वेगळेच सुखावून गेले होते. या विचारात त्या असतानाच दरवाज्यावरची बेल वाजली. त्या धावतच दरवाज्याकडे गेल्या तर दारात रिया एकटीच उभी होती. त्यांनी थोड्या नाराजीनेच गिरीष ची चौकशी केली. रियाने टॅक्सी मधेच बंद पडल्याने ती रिक्षाने पुढे आल्याचे आणि थोड्याच वेळात तोही येईल असे सांगितले आणि आत आली. समोर tv चालू होता आणि TV ला आहट मालिका चालू होती. रिया म्हणाली,"आई मलातर भुतांची खूप भीती वाटते. तुम्ही या वयातही न घाबरता कश्या काय बघता या मालिका?".  "अगं सुरुवातीला वाटायची भीती, पण सद्या तीच असतात माझ्या सोबतीला", पुष्पाताई सिरीयल पाहत म्हणाल्या. रिया कपडे बदलण्यासाठी बाथरूममध्ये गेली तर तिला बाथरूममध्ये मोठा फ्रीझर दिसला तिने उत्सुकतेने तो फ्रीझर उघडला तर आतमध्ये तिला पुष्पाताईची डेडबॉडी preserve करून ठेवली दिसली. भितिने घामाघूम झालेल्या रियाने सहज हॉलमध्ये डोकावून पहिले तर पुष्पाताईचे भूत आहट सिरीयल पाहत होते. रिया जोराने दरवाज्याकडे धावली पण दरवाजा लॉक झाला. पुष्पाताई रियाला म्हणाल्या, "घाबरू नकोस, 15 वर्षे झाली वाट बघत्येय गं मी तुमच्या येण्याची. एकदा माझ्या मुलाच्या हातून माझे अंत्यसंस्कार झाले की मी कायमची जाणार आहे". त्यासाठीतर मीच माझ्या हाताने माझा मृतदेह सांभाळून ठेवला आहे फ्रीझरमध्ये.
© के. राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...