Skip to main content

लघुकथा : बदला



बंडोपंतांच्या सुलेखचा आज सकाळी सकाळी अमेरिकेत जोरदार ऍक्सिडेंट झाला होता. सुलेख तसा शिस्तप्रिय आणि नियमाने चालणारा मुलगा होता आणि तितक्याच शिस्तीच्या बॉस्टन शहरात त्याने आपले निवासस्थान वसवले होते. अश्या आपल्या शिस्तप्रिय मुलाचा शिस्तप्रिय शहरात असा अचानक अपघात झाला तरी कसा याचा विचार करतच बंडोपंत पहाटेच्या flight ने बॉस्टन ला रवाना झाले.  बंडोपंतांच्या भाग्याने प्रवासात कोणताही अडथळा न आल्याने ते ठरल्या वेळेला बॉस्टनला पोहचले खरे पण अंकिता काही त्यांना एअरपोर्टवर recieve करायला आली नव्हती. आपली लाडकी आणि होतकरू सून आपल्याला न्हायला आली नाही म्हणून त्यांना जरा काळजी वाटली. त्यांनी घरगड्याला तिच्या न येण्याचे कारण विचारले तर त्याने रडत रडत तिलाही अपघात झाल्याचे तर सांगितलेच पण सुलेखचा अपघाती मृत्यू झाला असून त्याचे पार्थिव आपल्या हवाली करण्यासाठी आपल्याला बोलावले असल्याचे स्पष्ट केल्यावर बंडोपंतांना रडू कोसळले.  त्याच्याबरोबर अंकितालाही उपचारासाठी भारतात घेऊन जावे असा विचार करून बंडोपंत अंकिताला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले.  ती शुद्धीवर आल्याचे पाहून त्यांनी तिला अपघाताबद्दल विचारले तेव्हा ती म्हणाली, "चंदूकाकांनी आपला शब्द खरा केला बाबा, त्यांनी आपल्यावर शेवटी सूड उगवलाच. त्यांच्या कोपातून वाचण्यासाठी तुम्ही आम्हांला इकडे पाठवून दिले तरी त्यांनी आम्हांला शोधून काढलेच". म्हणजे काय बेटा... होय बाबा चंदुकाकांच्या गाडीने आमच्या दोघांना उडवलंय. "हे कसं शक्य आहे बेटा, चंदूने तुमच्यावर वाकडी नजर टाकू नये म्हणून गेल्या आठवड्यातच मी माझ्या ह्या हातांनी त्याचा गळा दाबून खून केलाय". 'हे कसं शक्य आहे बाबा, चंदुकाका हि अपघातात जखमी झालेत. माझे खोटे वाटत असेल तर तुम्ही शेजारच्या स्पेशल रूममध्ये जाऊन पहा'. हे प्रियाचे बोलणे ऐकुन बंडोपंत घाबरत घाबरत शेजारच्या रूममध्ये गेले तर चंदुकाका बेडवर बसून दरवाज्याकडे पाहत होते. बंडोपंतांना पाहून ते म्हणाले, "बंड्या माझा खून करताना तू हे विसरलास की, मी ठरवलेली कोणतीच गोष्ट अर्धवट ठेवत नाही." बंडोपंत रागाने चंदूकाकाकडे धावले पण चंदुकाका आपले पाठीवरील अक्राळविक्राळ पंख पसरवत आपल्या धारदार चोचीने रूमची काच तोडून आकाशाकडे झेपावले.
®के. राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...