Skip to main content

लघुकथा : फोटो



मिराला कृष्णकुंज सोसायटीत रहायला येऊन आठ दिवस झाले होते. त्यामुळे ती आता स्थिरावली होती. कामावरून आठ दिवसाची काढलेली सुट्टी आता संपणार होती. उद्या तिला कामावर हजर व्हावे लागणार होते. त्यातच ती आयटी कंपनीत कामाला असल्याने इतकी मोठी सुट्टी तिला फारच प्रयासाने मिळाली होती त्यामुळे आता तिला अजून करणे सांगता येणार नव्हती. तसे तिने आपल्या आईला तिच्या कडे रहायला बोलाविले होते पण आईला यायला अजून  चार पाच दिवस अवकाश होता. पण मिराला एकटेपण खायला उठले होते त्यामुळे तिच्या आईने तिच्या दहा वर्षाच्या मुलाला अनय ला पुढे पाठवून दिले. अनय दहा वर्षाचा असला तरी खूपच हुशार होता. तिच्या आईने त्याला एकट्यालाच ट्रेनने बसवून दिले होते. पण ट्रेनला मध्येच अपघात झाल्याने ती चिंतेत होती. तिने रेल्वेच्या आपतकालीन हेल्पलाईनला फोन करून माहिती घेतली होती. शेवटी आज तिने कामाला दांडी मारून रेल्वे हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलमधील जखमी प्रवासाच्या बेडवरील एका बेडवर अनयला बगून तिला हायसे वाटले. त्याला किरकोळ लागले होते. पण त्याच्या मनात अपघाताची भीती बसल्याने तो बेशुद्ध झाला होता. एकमेकांना पाहून दोघे रडू लागले. मिराने त्याला मिठीत घेतले आसनी सगळ्या formality कम्प्लिट करून ती त्याला घरी घेऊन आली. पण ती कामावर हजर ना झाल्याने कंपनीतून अर्जेन्ट कॉल आला होता. दुपारून का होईना कामावर हजर व्हा नाहीतर उद्या कामावर येऊ नका असा दमच वरिष्ठ अधिकाऱ्याने दिल्याने तिला अनय ला एकट्याला घरात सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी गेलीतर खाण्या पिण्याचे वांधे तर होतीलच पण एकदा सोडलेल्या नवऱ्याकडे पुन्हा जायची वेळ येऊ नये यासाठी तिने मोठ्या कष्टी मनाने अनय ला एकट्याला घरी सोडले आणि कामावर निघून गेली.
दुपारची शिफ्ट असल्याने तिला घरी यायला रात्रीचे बारा एक तरी वाजणार होते.  शिवाय सकाळी लवकर पुन्हा फर्स्ट शिफ्ट ला जावे लागणार होते. शेवटी रात्री साडेबाराच्या सुमारास ती घरी आली तर तिला अनय कोणाबरोबर तरी घरात खेळतोय असे जाणवले. तिने बेल वाजवली तर घरातून दुसऱ्याच मुलाने दरवाजा उघडला. त्याला बघून तिने 'तू कोण?' अशी चौकशी केली. तो म्हणाला, मी अमर, तिसऱ्या मजल्यावर राहतो. हा एकटाच दिसला म्हणून याच्या सोबतीला थांबलोय. अरे पण तुझे आई बाबा..... बाबा नाहीत मला आई आणि मी, आम्ही दोघेच असतो. अरे पण आईला माहित आहे ना तू इथे आहेस ते. हो तर मी तिला सांगूनच आलोय. ठीक आहे बरं झालं तू थांबलास त्याच्या सोबतीला. चल तुला घरी सोडते. नको काकू मी जाईन एकटा.  असे म्हणून अमर झटक्यातच घरातून बाहेर गेला . मिराने दार लावून घेतले आणि दोघे झोपी गेले. सकाळी परत मीरा कामावर गेल्यावर अमर अनय बरोबर खेळायला हजर. मिरालाही आपल्या गैरहजेरीत अनय च्या सोबतीला अमर आहे हे पाहून बरे वाटले. आज मिरची विकली ऑफ होत त्यामुळे ती घरीच होती. शिवाय आज तिची आईपण येणार होती त्यामुळे आज ती आणि अनय फारच खुशीत होते. मीरा  अनय ला घेऊन बाहेर फिरायला चालली होती. सोबत तिने आपला नविनच घेतलेला kodak digital कॅमेराही घेतला होता. तिने घराला टाळा लावला आणि ते निघाले तर अमर बाहेर जिन्यात बसलेला दिसला. तिने त्याला बाहेर फिरायला येणार का? असे विचारले तर तो लगेच तयार झाला. तिघांनी मिळून खूपच धमाल केली. सगळं पुणे फिरून घेतले आणि आपल्या नवीन कॅमेऱ्यातून फोटोही काढले. येत येता लक्ष्मी रोडला तिने फोटो developing साठी दिले आणि घरी आली तर तिची आई बाहेर वाट बघत उभी होती. तिला बघून अनय आणि मिराला खूप आनंद झाला दार उघडून तिघे घरात गेले आणि अमर अनयला टाटा करत आपल्या घरी निघून गेला.  मिराच्या आईंने मिराला विचारले की, अनय कोणाला टाटा करतोय मला तर कोणीच दिसले नाही. त्यावर मीरा म्हणाली, "काहीतरी काय आई, मी पण पहिले अमरला, तुलाच कसे कोणी दिसले नाही". पण मिराच्या आईला चैन पडेना. दुसऱ्या दिवशी मीर कामाला गेल्यावर ती अमरच्या घरी गेली. घराचा दरवाजा उघडाच होता. आत अमरची अशी मरणासन्न अवस्थेत अंथरुणाला खिळली होती. तिने अमरच्या आईकडे चौकशी केली असता अमर चार वर्षांपूर्वी वारला असल्याचे सांगितले. तिने मीरा कामावरून आली की ही गोष्ट मिराला सांगितली शिवाय आज ती दिवसभर अनय कडे खेळायला आला नसल्याचे सांगितले पण मिराला विश्वास वाटला नाही. पण आई ऐकत नाही हे बघून तिने अनय ला घरी ठेवले आणि आईला घेऊन थेट जिथे फोटो develop करण्यासाठी दिले होते तिथे गेली.  फोटो develop करून झाले होते. मिराने बिल चुकते केले आणि फोटो बाहेर काढून आईला दाखविले. ते बघून आई म्हणाली, "हे काय? एकटीचेच फोटो काढलेस, आणि यातून काय सिद्ध करणार आहेस?" आईचे बोलणे ऐकून मिराने स्वतः फोटो पहिले तर तिला धक्काच बसला. अमर च काय पण अनय चेही फोटो आलेले नव्हते. कॅमेऱ्यामध्येच काही तरी प्रॉब्लेम आहे असे म्हणून ती घरी आली अनय घरात नव्हता पण तिचे त्याच्याकडे लक्ष नव्हते. तिने कपाटातून कॅमेरा काढला आणि open करून पहिले तर अमर आणि अनय फोटोतून तीच्याकडे पाहून खदाखदा हसत होते.
©के.राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...