Skip to main content

परमाणू आणि पोखरण


परमाणू आणि पोखरण: 

काल जॉन अब्राहम निर्मित आणि अभिनीत परमाणू हा चित्रपट पाहिला. चित्रपट भारताने 1998 साली केलेल्या अणुचाचण्यांवर आधारित असल्यामुळे त्याबाबत उत्सुकता होतीच. ज्यांना साधारण  1990 नंतरचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय राजकारण आठवत असेल त्यांना याचे महत्व आणि गांभीर्य निश्चितच जाणवत असेल. ते महत्त्व आणि गांभीर्य कायम राखत जॉनने हा चित्रपट बनवला असून एक निर्माता आणि अभिनेता म्हणून कामगिरी अत्यंत चोख बजावलेली आहे. मुळात हा  विषय संवेदनशील असल्याने  त्याबाबतची चित्रपट म्हणून मांडणी करणे अत्यंत कठीण आणि जबाबदारीची गोष्ट होती ती जॉन आणि त्याच्या संपूर्ण टीमने यशस्वीपणे पेलली आहे. एक ठोकळा अभिनेता ते उत्कृष्ट निर्माता आणि अभिनेता हि जॉनची वाटचाल खूपच विस्मयकारक आहे. याअगोदर त्याने राजीव गांधींच्या हत्येवर आधारित "मद्रास कॅफे" या चित्रपटातून याची झलक दाखविली होती. त्यामुळे तो आणि त्याची संपूर्ण टीम अभिनंदनास पात्र आहे.

जॉनच्या "परमाणू" चित्रपटाने 1998 च्या अणुबॉम्ब चाचण्यांची  आठवण ताजी झाली. तसा भारत हा 1974 पासून अणूवस्त्रधारी देश आहे. १९६२ भारत-चीन युद्धातील मानहानीकारक पराभवानंतर आपण स्वतःच्या बळावर युद्धनिपुण असले पाहिजे ही भावना बळावली आणि त्या भावनेला  कृतीत उतरविण्याची क्षमता असलेला पंतप्रधान 1966 साली इंदिरा गांधीच्या रूपाने देशाला मिळाला. आणि "बुध्द हसला" या संकल्पनेला घेऊन राजस्थानमधील पोखरण येथे पाहिली अणु चाचणी केली.  हि चाचणी करतानाही अत्यंत गुप्तता पाळली गेली होती आणि अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा डोळा चुकवून केली होती पण त्यामुळे आवश्यक ती संरक्षण सिद्धता प्राप्त झाली नव्हती. 1971 च्या बांग्लादेशच्या निर्मितीमुळे चवताळलेल्या पाकिस्तनाच्या कुरापती वाढत चालला होत्या आणि त्याला अमेरिका आणि इस्रायलची खुली साथ मिळत होती. शिवाय चिनही पाकिस्तानच्या मदतीला होताच. या सगळ्यांना जरब बसवायची असेल तर आणखी सरंक्षण सिद्धता आणि वेळ आल्यास उपद्रवमूल्य वाढणे आवश्यक होते. हि बाब इंदिरा गांधी जाणून होत्या त्यासाठी त्यांनी आणखी अणुचाचण्या घेण्यासाठी राजा रामण्णा यांना पाचारण केले आणि अन्वस्त्रचाचणी कार्यक्रमाला सुरुवात झाली पण मध्येच 1975 साली आणीबाणी लागू झाली आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला. नंतर सत्तेवर आलेल्या विश्वनाथ प्रतापसिंह सरकारने शांततेच्या कारणावरून हा कार्यक्रम गुंडाळला आणि नंतर राजीव गांधींची दुसरी टर्म येईपर्यँत तो तसाच बासनात राहिला. पण शास्त्रज्ञांनी यावरचे संशोधन चालूच ठेवले आणि नंतर सत्तेवर आलेल्या पी. व्ही. नरसिह राव यांनी मिसाईल मॅन डॉ ए. पी.जे.अब्दुल कलाम, यांच्याकडे दिले. काहीही झाले तरी भारताला अन्वस्त्रसज्ज बनावायचेच हा ध्यास घेऊन 1995 मध्ये  मिशन "शक्ती" या संकल्पनेला घेऊन  पोखरण-2 अंतर्गत अणुचाचण्याची तयारी केली पण अमेरिकेने अवकाशात सोडलेल्या हेरगिरी उपग्रहाने पोखरणमधील संशयास्पद हालचाली टिपल्या आणि अमेरिका सावध झाली . अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारताला सज्जड दम देऊन तसेच आर्थिक नाकेबंदीचा आदेश देऊ असे सांगून हा कार्यक्रम थांबविण्यास बाध्य केले.  अगोदरच आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या भारताला नाईलाजाने हा कार्यक्रम गुंडाळावा लागला. शिवाय त्यानंतर आलेली आघाड्यांची सरकारे फार काळ टिकली नाहीत. तीन वर्षातील भारतातील हि राजकीय गुंतागुंत 1998 मध्ये सुटली आणि अटल बिहारी वाजपेयी याच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत आघाडीचे सरकार सत्तेवर आले.

अटलबिहारी वाजपेयी आणि नरसिंहराव यांचे घनिष्ठ संबंध होते. शिवाय भारताचा गुपचूप चाललेला अणुचाचण्याचा कार्यक्रम उघडकीस आल्यावर पाकिस्तान पीपल पार्टीच्या तत्कालीन अध्यक्ष युसूफ रझा गिलानी (नंतर हे महोदय 2008 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान झाले) आणि तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांनी भारताच्या या कृतीविरुद्ध संयुक्त राष्ट्र संघात आवाज उठवला आणि भारत आशियातील शांतता भंग करतोय अशी बोंबाबोंब सुरु केली. ती अमेरिकाप्रेमी संयुक्त राष्ट्र संघाने मान्य केली. तेव्हा भारताचे म्हणणे ऐकून न घेताच संयुक्तराष्ट्र संघ निर्णय घेणार असे दिसताच नरसिंह रावांनी एक शिष्ठमंडळ युनोत पाठविले त्याचे अध्यक्ष होते अटलबिहारी वाजपेयी. वाजपेयींनी युनोच्या या भूमिकेचा आणि पाकिस्तानने उठविलेल्या आवईचा चांगला समाचार घेतला आणि युनोला आपली भूमिका बदलावी लागली. तेव्हापासूनच अणुचाचण्याचा विषय त्यांच्या कार्यक्रमपत्रिकेवर प्राधान्याने होता. पंतप्रधान होताच त्यांनी डॉ. कलाम , आर. चिदंबरम आणि त्याच्या संशोधकाच्या टीमला सर्व सहकार्य देऊन अणुचाचणी कार्यक्रम वेगाने पुढे रेटला.

अणुचाचण्या घेण्याइतपत क्षमता भारताने विकसित केली होतीच पण प्रमुख अडचण होती ती अमेरिकेची. अमेरिकेने आपला हेरगिरी उपग्रह भारताच्या दिशेने वळविल्याने भारताला चाचणीस्थळावर काहीच हालचाल करता येत नव्हती .  शिवाय पाकिस्तानच्या आय . एस. आयचे एजंटही राजस्थानमध्ये 1995 पासून  सक्रिय होते. तेव्हा ही चाचणी करायची असेल खुद्द उपग्रहाला चकवा देणे याशिवाय पर्याय नव्हता.  पण त्यावरही कलामांनी उपाय शोधून काढला. अवकाशात भ्रमण करत असताना आपली प्रदक्षिणा पूर्ण करून नवीन प्रदक्षिणा सुरु करताना उपग्रहाला मध्ये जो कालावधी घ्यावा लागतो तो साधारण दिवसातून दोन वेळा एक तास इतका असायचा. रात्री एक तास आणि दिवसा एक तास. त्यातही दिवसा प्रचंड ऊन आणि धुळीची वादळे यामुळे दिवसा काही काम करणे शक्य नसायचे म्हणजे रात्रीच्या एका तासातच हे काम पूर्ण करून पुन्हा परिस्थिती जैसे थे करणे हे काम आव्हानात्मक होते, कारण हेरगिरी उपग्रह अत्यंत आधुनिक होता. चाचणी स्थळावरील थोडीही हालचाल लगेच टिपली जायची अगदी माणसांचे चेहरे सुद्धा. अश्या परिस्थितीवरही मात करण्यात आली आणि हे काम रात्रीच्यावेळी चालू रहायचे. त्यामुळे उपग्रहाला चकवा देण्यात आपण यशस्वी झालो पण स्थनिक पातळीवर मात्र नवीन त्यातही वयस्कर असूनही सैनिकांच्या वेशात वावरणाऱ्या शास्त्रज्ञाबद्दल संशय निर्माण झाला. लष्करी वाहनांची आणि जवानांची वर्दळ वाढल्यामुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांचे गुप्तहेर सतर्क झाले आणि याचे रिपोर्टींग त्यांनी अमेरिकेला केले आणि भारत पुन्हा गुप्तपणे अणुचाचणीसाठी हालचाली करतोय हे अमेरिकेने मान्य केले. त्यामुळे भारताला परत दम देऊन त्यांनी हेरगिरी उपग्रह पुन्हा भारतावर जास्तकाळ राहिल याची व्यवस्था केली, त्यामुळे रात्री मिळणारा वेळ बंद झाला आणि काम पुन्हा थांबले.
पण काही झाले तरी अणुचाचणी घायचीच  याबाबत पंतप्रधान, डॉ कलाम, आणि सैन्यदलाचे colonel इंजिनिअर गोपाळ कौशिक यांनी ठरविल्याने अमेरिकेचे ध्यान इतरत्र वळविण्याची रणनीती आखण्यात आली. भारतीय गुप्तहेरसंस्थेला मदतीला घेऊन अमेरिकी आणि पाकिस्तानी गुप्तहेर आणि त्याचे स्लीपर सेलचे सदस्य जेरबंद केले. इकडे अमेरिकी हेरगिरी यंत्रणेला फसविण्यासाठी भारतीय सैन्याला काश्मीरकडे तैनात करण्यात आले, भारत -पाक काश्मीर सीमेवर सैन्याची कुमक वाढविली गेली, हवाई दलाच्या सुसज्जत आणि कवायती सुरु केल्या, आणि भारत पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया सहन करणार नाही आता आम्ही पाकिस्तानवर आक्रमण करायला सज्ज झालो आहोत असे जाहीर केले गेले. साहजिकच पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधाम नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे लक्ष तिकडे वेधले आणि आमेरिकेने आपल्या हेरगिरी उपग्रहाला त्याभागात जास्तकाळ ठेवले. त्यामुळे  अणुचाचन्यांची तयारी करण्यासाठी रोज आठ तासाहून अधिक वेळ मिळाला आणि तीन दिवसात सर्वांनी मिळून तयारी पूर्ण केली. पण शेवटी अमेरिकेला त्याचीही भनक लागली. अमेरिकेने याबाबत काही कारण्यागोदरच भारताने पाच अणुचाचण्या केल्या आणि मिशन "शक्ती" पूर्ण केले.

भारताने या चाचण्या केल्यानंतर अमेरिकेने भारतावर अत्यंत कडक निर्बंध घातले आणि भारताची कोंडी करायचा प्रयत्न केला पण त्यातून आपण सहीसलामत बाहेर आलो. पण त्यामुळे आपल्याला निर्माण केलेल्या युद्धज्वराची किंमत कारगिल युद्धाने मोजावी लागली. आपण तेही युद्ध  जिंकले. आज भारत त्यामुळे एक सशक्त आणि जबाबदार अणूशक्ती म्हणून समोर आला.

जॉनच्या परमाणू ने ह्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या म्हणून हा खटाटोप.
© के. राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...