Skip to main content

लघुकथा : बीच



रवी आणि प्रिया आज पाच वर्षानंतर बाहेर फिरायला गेले होते. तसे ते लग्नाच्या अगोदर खूप फिरले होते पण लग्न झाल्यावर मात्र घर संसार आणि आयटी क्षेत्रातील जॉब यामुळे त्यांना कोठेच जात आले नव्हते. त्यातच त्यांचा आंतरजातीय प्रेमविवाह. समाजापुढे काहीतरी आदर्श घालून द्यायचा म्हणून दोघांनी आपापल्या  नातेवाईकांचा विरोध फाट्यावर मारून बंड केले आले आणि प्रेमविवाह केला. पण लग्नानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन दोघांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी बाकी सगळ्या गोष्टींचा त्याग केला. अगदी सर्व काही सेट झाल्याशिवाय मुलही  होऊ दिले नाही. तसे त्यांनी एकमताने ठरविले आणि त्यावर ते कायम राहिले. याला आता पाच वर्षे पूर्ण झाली होती. आता त्यांना आपल्याला बाळ असावे असे वाटू लागले होते. त्याच्या आगमनानंतर आपण परत पाच वर्षे तरी अडकून पडू याची जाणीव होऊन त्यांनी यंदा चार दिवस फिरायला जायचा बेत आखला. पण कोठे जायचे यावरून पुन्हा नेहमीप्रमाणे मतभेद झाले. दोघांनाही बीचवर फिरायला जायचे आवडायचे पण बीच मात्र वेगवेगळा.  प्रियाला लाडघर तर रवीला वेळणेश्वर. यावरून त्यांचं कित्येकवेळा याअगोदरही भांडण झाले होते तसेच यावेळीही झाले. पण प्रिया मात्र हाटून बसली होती की गेलो तर लाडघरलाच जायचे म्हणून. तसा रवी नेहमी पडती बाजू घेत असायचा त्यामुळे एकदातरी तिने आपले ऐकावे असे  त्याला वाटायचे. पण प्रियाला मात्र याची जाणीव नव्हती. याचा रवीला यावेळेस खूपच  राग आला होता. पण तो सहसा प्रियाचे मन मोडत नसे म्हणून यावेळेसही नाईलाजाने लाडघरला जायला तयार झाला आणि दोघे लाडघरला पोहचले. प्रियाने अगोदरच लॉज बुक करून ठेवला होता. रवीने तीन तासाच्या प्रवासात एक शब्दही उच्चारला नव्हता. त्याने बॅग रूमवर टेकवली आणि हातात सिगारेटचे पाकीट आणि लायटर घेऊन तो थेट बीचवर जाऊन आडवा झाला. प्रियाने रवीची वाट पाहून बेडवर अंग टाकले. रात्रीचे बारा वाजून गेले तरी रवी आला नाही म्हणून ती बीचवर गेली तर रवी आकाशातील चंद्र बघत आडवा झाला होता. प्रिया त्याच्या हाताची उशी करून शेजारी आडवी झाली . त्यांच्या तोंडातला सिगारेट तिने फेकून दिली. रवी उठून जाऊ लागला.  तिने त्याचा हात धरून त्याला थांबविले आणि त्याच्या गळीत पडून रडु लागली. रवीने तिचे डोळे पुसले आणि तिला शांत केले. गोघानी राग निवळे पर्यंत अस्प्ल्या भूतकाळातील आणि वर्तमान काळातील गप्पा मारल्या.  शेवटी रविचा राग निवळला. तो तिला म्हणाला, " चल रूमवर जाऊ. बरीच रात्र झाली आहे". "तू पुढे हो मी पाचच मिनीटात आले", असे प्रियाने म्हटल्यावर रवी रूमवर आला तर प्रिया बेडवर गाढ झोपेत होती. रवी धावतच परत बीचवर गेला पण तिथे कोणीच नव्हते.

© के.  राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...