Skip to main content

सत्य सत्याच्या पलीकडचे

सत्य सत्याच्या पलीकडचे

२६ मार्च २०१८ पाकिस्तानच्या लाहोर येथील उच्च न्यायालयात एका याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्ते होते. लाहोर स्थित इम्तियाज रशीद कुरेशी. यांची लाहोर मध्ये एक संस्था आहे. त्या संस्थेचे नाव आहे. भगतसिंग फाऊंडेशन.  याचिकेचा विषय होता ८३ वर्षापूर्वी क्रांतीवीर भगतसिंग यांना ब्रिटिश सरकारने दिलेली फाशी ही ज्या हत्या करण्यासाठी दिली आहे. त्या त्यामध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा हात नसून ते निर्दोष असून याबाबत त्यांना सबळ पुरावे मिळाले असून न्यायायाने लवकरात लवकर सुनावणी घ्यावी यासाठी विनंती करण्यात आली.
कुरेशी यांनी यावर युक्तीवाद करताना खालील मुद्दे मांडले:
१. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग आणि सहकाऱ्यांना ब्रिटिश अधिकारी जॉन पी सॉंडर्स याच्या हत्येला कारणीभूत ठेवून फाशीची शिक्षा दिली होती. पण या खटल्यात भगतसिंग आणि सहकाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच नव्हती. न्यायलयाने त्यांना फाशी ऐवजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती असा सप्रमाण युक्तीवाद कुरेशी यांना केला.

२. ही शिक्षा सुनावल्यानंतर त्यांना परत एका खोट्या प्रकरणात अडकविण्यात आले. हे प्रकरण म्हणजे दिल्लीतील ब्रिटिश न्यायालयाच्या असेंबलीमध्ये बॉम्ब टाकल्याची. यात भगतसिंग यांचेबरोबर आणखी एका क्रांतिकारक नाव आले होते ते म्हणजे बटूकेश्र्वर दत्त.  कुरेशी यांच्या मते या प्रकरणात भगतसिंग यांचे नाव गोवण्यासाठी भारतातील काही स्वार्थी लोकांनी ब्रिटिश न्यायालयात खोट्या साक्षी दिल्या. या लोकांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. शोभा सिंह
२. शादीलाल
३. दिवाण चंद फोगाट
४. जीवन लाल
५. भगत फुल सिंग हुडा
६. नवीन जिंदाल यांचा दाजीचे आजोबा.

न्यायालयाने भगतसिंग आणि सहकाऱ्यांना दिलेल्या शिक्षेवर सरकार खुश नव्हते त्यांना काहीही करून भगतसिंग  यांना फासावर लटकवायचे होते. ती संधी त्यांना शोभा सिंह  आणि शादी लाल यांनी मिळवून दिली. त्यांनी न्यायालयात खोटी साक्ष दिल्यामुळे भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ही  साक्ष दिल्याबद्दल शोभा सिंह आणि शादी लाल या दोघांना ब्रिटिश सरकारने सर ही पदवी बहाल केली.

शोभा सिंह याला करोडो रुपयांची मालमत्ता दिल्ली येथे मिळाली तसेच सरकारी कामांचे मोठे ठेके मिळाले. दिल्लीतील कॅनॉट प्ले स भागात भागात त्यांच्या नाव आज शोभा सिंह स्कूल ही नामांकित शाळा आहे. शोभा सिंह यांच्या या कृत्याबद्दल जनतेकडून त्याला अपमानास्पद वागणूक मिळाली पण तो नशीबवान निघाला. याच शोभा सिंह चा मुलगा म्हणजे खुशवंत सिंग.  याच खुशवंत सिंग यांनी शोभा सिंह यांचे वडील a आपले आजोबा सुजाण सिंह यांच्या नावाने याच इनामी जमिनीवर पंजाबातील कोट मध्ये व दिल्ली सुजाण सिंह पार्क उभारले.  याच खुशवंत सिंग यांनी संघाच्या मदतीने पत्रकारिता सुरू केली. हेच खुशवंत सिंह अगोदर संघाचे मुखपत्र असलेल्या "पांचजन्य" साठी पत्रकार म्हणून काम करत होते असे याचिका कर्त्याने नमूद केले आहे.

शादी लाल मात्र याबाबत कमनशिबी निघाला. त्याला त्याच्या गावातील लोकांनी या कृत्यासाठी कधीच माफ केले नाही. अगदी मरेपर्यंत त्याच्याशी गावातील कोणीही बोलले देखील नाही. हा तिरस्कार इतका टोकदार होता की शादी लाल मेल्यानंतर त्यासाठी लागणारे कफन चे कापड सुद्धा त्याला कोणी दुकानदाराने दिले नाही. त्याच्या मुलाने दिल्लीला जाऊन हे कापड आणल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तिसरा साक्षीदार दिवाण सिंह फोगट डी.एल. फ. ही कंपनी स्थापन केली. याला एकच मुलगी होती जीचा विवाह
के.पी.सिंह यांच्या मुलाशी झाल्यावर के.पी.सिंह तिचे मालक झाले. त्या मुलीलाही एकच मुलगी आहे जिचा विवाह कांग्रेस नेते गुलाम नबी  आझाद यांचा मुलगा सज्जद नबी आझाद याचाशी झाला आहे.
जीवन लाल याने एटलास ही सायकल कंपनी स्थापन केली असून अटलास या कंपनीचा तो मरेपर्यंत मालक होता. आता त्याचा मुलगा ही कंपनी सांभाळत आहे.
भगत फुल सिंह हुडा हा हरियाणाचे दोन वेळचे माजी मुख्यमंत्री भपिंदर सिंग हुडा यांचे आजोबा आणि रणबीर सिंग हुडा यांचे वडील आहेत.

या सगळ्यांनी मिळून भगतसिंगांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याने त्यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली असून याबाबत न्यायालयाने लवकरात लवकर योग्य निर्णय घेऊन भगतसिंग यांची शिक्षा माफ करून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देऊन सन्मानित करावे. अशी मागणी कुरेशी यांनी केली आहे.


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...