Skip to main content

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुरस्कर्ते

चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे पुरस्कर्ते:

       सूर्य मावळतीला गेला की खुज्या लोकांच्या सावल्या लांब लांब पडायला लागतात. ही खुजी माणसे मग स्वतःला खूप मोठी  आणि महान समजायला लागतात. जेव्हा सुमारांच्या सद्दीचा काळ येतो तेव्हा अशा लोकांचे फावते. आम्ही म्हणू तेच सर्व बरोबर आहे आणि मला फार कळते असा या लोकांचा भ्रम असतो त्यामुळे आम्ही म्हणू तेच त्रिकालाबाधित सत्य आहे असे या लोकांना वाटते आणि मग ते आपल्याला वाटेल तसे बरळत सुटतात. त्यांच्या या वागण्याला जर कोणीच विरोध केला नाही तर त्यांना असे वाटते की आपण जे बोलतोय ते बरोबर आहे आणि लोकांनी ते स्वीकारले आहे असाही या लोकांचा समज होतो आणि तोंडाला येईल  ते  ही लोकं बोलतात. कारण आपण चुकीचे बोलतोय हे त्यांना सांगणारे समाजात कोणीच नसते.
            आपल्या आजूबाजूला रोज अनेक चुकीच्या गोष्टी घडत असताना समाजातील कोणताच जबाबदार घटक काहीच बोलत नसतो तेव्हाचा काळ सुमारांच्या सद्दीचा आहे असे समजले जाते. महाराष्ट्र देशी सध्या अशा सुमाराचा सुकाळ झालेला आहे. जो तो उठतो आणि आपल्याला वाटेल ते बोलत सुटतो. अशी वक्तव्य करताना आपण बोलतोय त्यामुळे कोणाची अवहेलना, अपमान किंवा विटंबना होते आहे किंवाआपले बोलणे हसण्याचा विषय होतो आहे याचेही भान या लोकांना नसते. बऱ्याच वेळा त्यांना याचे भान असते पण ते जाणून-बुजून अशी वक्तव्ये करत असतात. त्याचा एक फायदा होतो त्याचासारखाच सुमार विचार असणारे आणि  त्यांच्या विचारांचे पाईक असणारे लोक असल्या विधानाने सुखावतात. पण ज्यांना त्यांची वक्तव्ये समाज हित विरोधी आणि समाजात दुफळी माजवणारी आहेत असे वाटते अशी लोक अस्वस्थ होतात. यातून समाज आणि पर्यायाने देश दोन गटात दुभंगण्याची भीती निर्माण होते. सुमारांच्या सद्दीच्या काळात या लोकांना  अशी वक्तव्य करण्यास पाठबळच मिळत राहते. त्यांच्या अशा वागण्याला जर राजकीय पाठबळ मिळाले सामाजिक अरिष्ट ओढवण्याचीच शक्यता असते. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात सध्या अशा सुमारांची सद्दी असून त्याला राजकीय पाठबळ लाभल्याने समाज स्वास्थ्य बिघडवणारी आणि शास्त्रीय सिद्धांत यांना आव्हान देणारी वेगवेगळ्या महाभागांची रोज नवनवीन वक्तव्य ऐकायला आणि वाचायला मिळत आहेत. अगदी महाभारत काळापासून इंटरनेट अस्तित्वात होते इथपाासून  मानवाला जातींमध्ये विभागून त्यांच्यामध्ये जाती, वर्ण आणि लिंगाच्या आधारे सामाजिक विषमता  घट्ट करणारे शास्त्र सांगणाऱ्या मनूला सर्वश्रेष्ठ ठरविण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या मातीत होतो ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे.
          ज्याने आपल्याच धर्मातील लोकांना जातींमध्ये  विभागून त्यांचे चार वर्ण केले आणि ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णांची उतरंड तयार केली आणि तिला कायदेशीर स्वरूप दिले. यामुळे नैसर्गिक विषमतेत आणखी भर घालणारी आणि कधीही भरुन न येणारे दरी निर्माण केली . याने वरच्या तीन वर्गांचे काहीही नुकसान झाले नसले तरी शुद्र म्हणून पिढ्यानपिढ्या जीवन जगणाऱ्या लोकांना शतकानुशतके याचा त्रास सहन करावा लागला आणि आजही ते त्रास सहन करत आहेत. असे असताना मनुचे हे कुटील कारस्थान आणि बुरसटलेले  तत्त्वज्ञान ज्यांनी आपल्या लेखनाने, समाज प्रबोधनाने आणि कर्तुत्वाने मोडीत काढले त्या ज्ञानोबा - तुकोबा आणि त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शुल्लक आणि कमी लेखून मनुची तळी उचलणे अत्यंत गंभीर आहे.
 त्याही पेक्षा गंभीर बाब कोणती असेल तर या लोकांना मिळणारे कायदेशीर संरक्षण, राजाश्रय आणि लोकांचा पाठिंबा. कोणीतरी कवडीमोल माणूस काहीतरी तत्वज्ञान सांगतो आणि समजतील मोठा वर्ग त्यावर कोणताही विचार न करता विश्वास ठेवतो. ही बाबच समाजाचे नैतिक अध:पतन अधोरेखित करणारी आहे. सध्याच्या काळात विचारांची लढाई विचारांनी लढावी असे शिकवण देणाऱ्या गुरूची गरज असताना लोकांचे विचार मारून त्यांच्या हाती शस्त्रे देण्याचा ह्या कवडीमोल लोकांचा उद्योग समाजस्वास्थ्य बिघडवणारा आहे.
 याला राजाश्रय का?
अशी समाजस्वास्थ्य बिघडवणारी लोक साधी राहतात. आम्हाला कशाची आस नाही आसे दाखवून अगोदर आपला प्रभाव निर्माण करतात. धर्माचा आधार घेऊन समाजातील साध्याभोळ्या,अशिक्षित आणि अज्ञानी लोकांना गोड बोलून भुलावतात. एखादा हे लोक आपले भक्त झाले की मग आपले समाज प्रदूषित करणारे विचार त्यांच्या मनावर बिंबवतात. आपली प्रत्येक कृती धर्माच्या रक्षणासाठी आहे असा कवा करतात आणि आपल्या भक्तांना हिंसा करायला प्रवृत्त करतात. राजकीय व्यवस्थेवर  दबाव निर्माण करतात. राजकारण्यांना आपली व्होट बँक टिकवून ठेवायची असते त्यासाठी तेही त्यांच्या कृत्यांना पाठीबा देतात आणि त्यातून ही लोकं राजकीय सत्तेला आव्हान निर्माण करतात. शिवाय राजकीय व्यवस्था धर्माने प्रेरित असेल तर ती अश्या लोकांना पाठबळच देते. महाराष्ट्रात सध्या अशीच परिस्थिती ओढवली असून समाजस्वास्थ्य धोक्यात आले आहे.
©के. राहुल ९०९६२४२४५२



Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...