Skip to main content

कथा: कपाट

कथा : कपाट
रमेश सकाळीच गोव्याला जायला निघाला  होता. पण मध्येच ट्रेनची ओवरहेड वायर तुटल्याने ट्रेन चांगली सात आठ तास उशिराने म्हणजे रात्रीचे एक वाजता मडगाव स्टेशनला पोहचली . त्यातच सुनिलला सरप्राइज़ ध्यावे म्हणुन त्याने त्याला काहीही कळविले नव्हते. एवढ्या रात्री रिक्षा पकडुन तो त्याच्या रूमवर पोहोचला. पण सुनिल चार दिवसासाठी कंपनीच्या कामाने बाहेरगावी गेला होता. हे सगळे कळेपर्यंत रिक्षावालाही  तिथुन निघुन गेला होता. डोक्याला हात लावत तो रात्रीच्या  दोन वाजता फ़ूटपाथवरच्या दिव्याखाली एखादा रिक्षावाला मिळेल आणि आपल्याला स्टेशनला सोडेल या आशेने वाट बघत बसला. बराच वेळ गेल्याने त्याला डुलका लागला होता. अशातच कोणितरी  हात लावल्याने त्याला जाग आली आणि तो दचकून उभा राहिला. समोर एक समवयस्क तरुण उभा होता. जरासा घाबरत आणि बिचकतच त्याने त्याला सगळी हकीकत सांगितल्यावर तो म्हणाला,"मी अनिल, इथे जवळचा माझा फ्लैट आहे. तुझा मित्र येईपर्यंत तू माझ्याकडे राहू शकतोस. त्याचे आश्वासक बोलने आणि काळाची गरज लक्षात घेऊन रमेश त्याच्या फ्लैटवर गेला.
तोंडावर थोडे पानी मारुन त्याने आपली बैग कपाटात ठेवण्यासाठी कपाटाला हात लावला.  ते बघून तो धावतच आला आणि बंद कपाटाला पाठ लावत म्हणाला, "हे माझे खाजगी कपाट आहे. इथे आहेस तो पर्यंत कधिही त्याला हात लावायचा नाही. मला ते मुळीच आवडणार नाही". हे सांगत असतानाचे त्याच्या चेह-यावरचे भाव बघुन रमेश जरा घाबरतच मागे सरकला आणि सॉरी म्हणाला.  नक्की त्या कपाटात काय असेल? आणि अनिल असा का वागला? आणि बोलत असताना तो असा का वेगळा दिसला? असा विचार करतच तो जो झोपी गेला ते थेट सकाळी 10 वाजताच उठला. तो फ्रेश होईपर्यंत अनिलने नाश्ता तयार करुन ठेवला होता. आंघोळ उरकून तो नाश्ता घेऊ लागला. अनिल म्हणाला, "मी  कॉलेजला आहे पण नाइट शिफ्टचा जॉब असल्याने सकाळी नियमित कॉलेजला जाने होत नाही. आज खरे तर तू आल्यामुळे मी सुट्टीच घेणार होतो पण बॉसने रजा दिली नाही. मी दुपारी तीन वाजता जाईन आणि रात्री येईन तू निवांत झोप जेवून .
अनिल कामावर निघुन गेला. रमेश एकटाच घरी होत. रोज राहणारा माणुस तरी एवढा चांगला फ्लैट किती घाण केलाय. हा इथे रोज राहत असेल असे मुळीच वाटत नाही. असे म्हणुन त्याने सगळा फ्लैट स्वच्छ केला.  रात्रीचे आठ वाजले तरी त्याचे काम चालुच होते. तो बाहेर गेला आणि जेवन करुन परत आला तेव्हा त्याला आठवले की "कपाटात असे काय आहे?" की अनिलने  आपल्याला कपाटाला हात लावून दिला नाही. आपण पहावं की नको असा विचार करत तो टि .व्ही. बघत होता पण त्याचे मन लागत नव्हते.  अनिलला यायला चार तास शिल्लक होते. तो तिथेच सोफ्यावर आडवा झाला पण कपाटात काय असेल? यविचाराने त्याला झोप येईना . एकदाचे बघावे? त्याला थोडेच कळणार आहे. असा विचार करुन तो दरवाज्याला कडी लावून कपाटाकडे गेला. कपाटाचा हैण्डरूफ त्याने फिरवला पण लॉक केलेले नसुन ही कपाट उघडत न्हवते. तो आपली सगळी ताकत लावून कपाट उघडायचा अपयशी  प्रयत्न करत होता. शेवटी तो घामाघुम झाला. शर्टाच्या बाहीने घाम पुसत तो सोफ्याकडे जाऊ लागला आणि कपाट उघडल्याच्या त्याला भास झाला. तो परत तोंड फिरवून कपाटाकडे गेला. कपाटाचे हैण्डरूफ फिरवून त्यांने कपाटाचा एक  दरवाजा उघडला.  कपाटात त्याला  बूट घतलेले दोन पाय दिसले. याने कपाटात कोणाची तरी डेडबॉडी लपवून ठेवलेली दिसते आणि आपल्या परस्पर तिची व्हिलेवाट लावायची असावी आणि म्हणुन तो आपल्याला कपाटाकडे जाऊ देत नव्हता. आपल्याला पोलिसांना हे कळवायला हवे पण त्या अगोदर ते कोन आहे? आणि त्याचा पुरावा म्हणुन आपल्या मोबाईलमध्ये त्याचा फोटो घ्यावा असे म्हणून त्याने जवळ जाऊन कपाटाच दुसरा दरवाजा उघडला आणि तो पुन्हा दुर जाऊन पडला.  कारण आतील डेडबॉडी स्वत: अनिलचिच होती. तो घाबरतच आपली बैग घेउन दरवाजाकडे पळाला. कसेबसे दाराची कडी उघडून त्याने दार उघडले तर दारात अनिलच उभा होता. आता त्या कपाटात दोन डेडबॉडी असतात आणि अनिल आणि रमेश रात्री अपरात्री मडगावच्या रस्त्याने नविन डेडबॉडीच्या शोधत फिरत  असतात.
©के. राहुल 9096242452.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...