Skip to main content

पीग्मॅलिन आणि गोलेम सिद्धांत

व्यवस्थापन शास्त्रात पीग्मॅलिन आणि गोलेम सिद्धांत नावाचे दोन सिद्धांत आहेत ते व्यवस्थापन शास्त्रातील असले तर लहान मुलांच्या शिक्षणाचे व्यवस्थापन आणि संगोपन करत असताना हे दोन्ही सिद्धांत महत्वाची भूमिका बजावतात. कसे ते खालील माहितीवरून पाहूया!
  *पीग्मॅलिन सिद्धांत* हा अपेक्षा सिद्धांत असून त्यानुसार जर तुम्ही एखाद्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. उदाहरण म्हणून पहायचे तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमता, जमेच्या बाजूवर विश्वास ठेवत असेल आणि तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुमचे कौतुक करून तुम्हांला काही बक्षीस देत असेल तर तुम्हांला प्रेरणा मिळून तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
हाच सिद्धांत विद्यार्थ्यांच्या बाबतीतही लागू होतो. जर पालक आणि शिक्षक म्हणून तुम्ही तुमचा प्रत्येक विद्यार्थी किंवा मूल हुशार आणि कार्यकुशल आहे असा आशावाद व्यक्त केला तर सामान्यातील सामान्य विद्यार्थी आणि मूल काहीही शिकू शकते आणि अगोदरच्या पेक्षा अधिक चांगली कृती करू शकतो. शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रामाणिक अपेक्षा विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि क्षमतांना आकार देऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आणि पालकाने विध्यार्थ्यांना खालील प्रमाणे प्रेरणा दिली पाहिजे:
@ तू हुशार आहेस.
@ तू हे सहज करू शकतोस किंवा थोडा प्रयत्न केला तर तुलाही जमेल.
@  मला तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक आणि अभिमान वाटतो.
@ तू बुद्धिमान आहेस.
@ तू हे लवकर शिकणार आहेस याची मला खात्री आहे.

 *गोलेम सिद्धांत* हा याच्या उलट असून तुमच्याकडून तुमचा बॉस जर कमी अपेक्षा ठेवत असेल तुमची कार्यक्षमता आपोआप ढासळते. यात बॉस तुमच्या क्षमतांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिक्षणाच्या क्षमता आपोआप नष्ट होत जातात आणि आपण चांगले कर्मचारी नाही आहोत अशी त्यांची धारणा होत जाते.  हाच सिद्धांत शाळांमध्येही लागू होतो. शिक्षक आणि पालक जर आपल्या विध्यार्थ्यांच्या आणि मुलांच्या क्षमतेबाबत शंका घेऊ लागले किंवा   उभ्या आयुष्यात तू काहीच करू शकणार नाही अशी भविष्यवाणी करू लागले तर ती मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत.  कारण शिक्षक आणि पालक जसे आपल्याकडे पाहतात त्याच नजरेतून मुले स्वतःकडे पाहायला लागतात. या सिद्धांताबाबत तुम्हांला शंका वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू आळशी आणि मंद आहेस" असे म्हणत रहा आणि एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू हुशार आणि बुद्धिमान आहेस" असे म्हणत रहा. तुम्हांला या दोन विद्यार्थ्यांच्या सामान्य वागणुकीत आणि शालेय प्रगतीमध्ये जमीन-आसमानचा फरक दिसून येईल.

जे शिक्षक आणि पालक आपल्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना
* तू मूर्ख आहेस.
* तू बावळट आहेस.
* तू बेअक्कल आहेस.
* त्या अमुक मुलासारखे तुला कधीच जमणार नाही.
* तू आळशी आहेस.
* तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस.
* तू 'ढ' आहेस.
* नाही, तुझ्यासारख्या मंदबुद्धी मुलाला हे शक्य नाही.
* संपूर्ण वर्गात अमुक मुलगाच फक्त हे करू शकतो.

मुलांना शाळेत किंवा घरी वारंवार हे शब्द वापरतात ती मुले अभ्यासात प्रगती करू शकत नाहीत किंवा ते शिक्षक  आणि पालक उत्कृष्ट विद्यार्थी आणि मूल घडवू शकत नाहीत. कारण सतत असा अपमान झेलणाऱ्या मुलांमध्ये न्यूनगंड तरी येतो किंवा ती आतून पूर्णपणे उध्वस्त झालेली असतात.

म्हणून,
 *प्रिय शिक्षक आणि पालक*,
आपण आपल्या विध्यार्थ्यांना आणि मुलांना कसे समजून घेतो आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवितो यावरून आपण त्यांना घडवत किंवा बिघडवत असतो.
म्हणून, प्रत्येकाने आपल्या नवशिक्या मुलांकडे आणि विध्यार्थ्यांकडे ते जे देतील आणि करतील ते चांगलेच असेल या अपेक्षेने पाहण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे.
© के.राहुल

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...