व्यवस्थापन शास्त्रात पीग्मॅलिन आणि गोलेम सिद्धांत नावाचे दोन सिद्धांत आहेत ते व्यवस्थापन शास्त्रातील असले तर लहान मुलांच्या शिक्षणाचे व्यवस्थापन आणि संगोपन करत असताना हे दोन्ही सिद्धांत महत्वाची भूमिका बजावतात. कसे ते खालील माहितीवरून पाहूया!
*पीग्मॅलिन सिद्धांत* हा अपेक्षा सिद्धांत असून त्यानुसार जर तुम्ही एखाद्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. उदाहरण म्हणून पहायचे तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमता, जमेच्या बाजूवर विश्वास ठेवत असेल आणि तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुमचे कौतुक करून तुम्हांला काही बक्षीस देत असेल तर तुम्हांला प्रेरणा मिळून तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
हाच सिद्धांत विद्यार्थ्यांच्या बाबतीतही लागू होतो. जर पालक आणि शिक्षक म्हणून तुम्ही तुमचा प्रत्येक विद्यार्थी किंवा मूल हुशार आणि कार्यकुशल आहे असा आशावाद व्यक्त केला तर सामान्यातील सामान्य विद्यार्थी आणि मूल काहीही शिकू शकते आणि अगोदरच्या पेक्षा अधिक चांगली कृती करू शकतो. शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रामाणिक अपेक्षा विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि क्षमतांना आकार देऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आणि पालकाने विध्यार्थ्यांना खालील प्रमाणे प्रेरणा दिली पाहिजे:
@ तू हुशार आहेस.
@ तू हे सहज करू शकतोस किंवा थोडा प्रयत्न केला तर तुलाही जमेल.
@ मला तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक आणि अभिमान वाटतो.
@ तू बुद्धिमान आहेस.
@ तू हे लवकर शिकणार आहेस याची मला खात्री आहे.
*गोलेम सिद्धांत* हा याच्या उलट असून तुमच्याकडून तुमचा बॉस जर कमी अपेक्षा ठेवत असेल तुमची कार्यक्षमता आपोआप ढासळते. यात बॉस तुमच्या क्षमतांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिक्षणाच्या क्षमता आपोआप नष्ट होत जातात आणि आपण चांगले कर्मचारी नाही आहोत अशी त्यांची धारणा होत जाते. हाच सिद्धांत शाळांमध्येही लागू होतो. शिक्षक आणि पालक जर आपल्या विध्यार्थ्यांच्या आणि मुलांच्या क्षमतेबाबत शंका घेऊ लागले किंवा उभ्या आयुष्यात तू काहीच करू शकणार नाही अशी भविष्यवाणी करू लागले तर ती मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत. कारण शिक्षक आणि पालक जसे आपल्याकडे पाहतात त्याच नजरेतून मुले स्वतःकडे पाहायला लागतात. या सिद्धांताबाबत तुम्हांला शंका वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू आळशी आणि मंद आहेस" असे म्हणत रहा आणि एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू हुशार आणि बुद्धिमान आहेस" असे म्हणत रहा. तुम्हांला या दोन विद्यार्थ्यांच्या सामान्य वागणुकीत आणि शालेय प्रगतीमध्ये जमीन-आसमानचा फरक दिसून येईल.
जे शिक्षक आणि पालक आपल्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना
* तू मूर्ख आहेस.
* तू बावळट आहेस.
* तू बेअक्कल आहेस.
* त्या अमुक मुलासारखे तुला कधीच जमणार नाही.
* तू आळशी आहेस.
* तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस.
* तू 'ढ' आहेस.
* नाही, तुझ्यासारख्या मंदबुद्धी मुलाला हे शक्य नाही.
* संपूर्ण वर्गात अमुक मुलगाच फक्त हे करू शकतो.
मुलांना शाळेत किंवा घरी वारंवार हे शब्द वापरतात ती मुले अभ्यासात प्रगती करू शकत नाहीत किंवा ते शिक्षक आणि पालक उत्कृष्ट विद्यार्थी आणि मूल घडवू शकत नाहीत. कारण सतत असा अपमान झेलणाऱ्या मुलांमध्ये न्यूनगंड तरी येतो किंवा ती आतून पूर्णपणे उध्वस्त झालेली असतात.
म्हणून,
*प्रिय शिक्षक आणि पालक*,
आपण आपल्या विध्यार्थ्यांना आणि मुलांना कसे समजून घेतो आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवितो यावरून आपण त्यांना घडवत किंवा बिघडवत असतो.
म्हणून, प्रत्येकाने आपल्या नवशिक्या मुलांकडे आणि विध्यार्थ्यांकडे ते जे देतील आणि करतील ते चांगलेच असेल या अपेक्षेने पाहण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे.
© के.राहुल
*पीग्मॅलिन सिद्धांत* हा अपेक्षा सिद्धांत असून त्यानुसार जर तुम्ही एखाद्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या तर त्याच्या कार्यक्षमतेत वाढ होते. उदाहरण म्हणून पहायचे तर तुमचा वरिष्ठ अधिकारी तुमच्या क्षमता, जमेच्या बाजूवर विश्वास ठेवत असेल आणि तुमच्या चांगल्या कामाबद्दल तुमचे कौतुक करून तुम्हांला काही बक्षीस देत असेल तर तुम्हांला प्रेरणा मिळून तुमच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
हाच सिद्धांत विद्यार्थ्यांच्या बाबतीतही लागू होतो. जर पालक आणि शिक्षक म्हणून तुम्ही तुमचा प्रत्येक विद्यार्थी किंवा मूल हुशार आणि कार्यकुशल आहे असा आशावाद व्यक्त केला तर सामान्यातील सामान्य विद्यार्थी आणि मूल काहीही शिकू शकते आणि अगोदरच्या पेक्षा अधिक चांगली कृती करू शकतो. शिक्षकांच्या आणि पालकांच्या प्रामाणिक अपेक्षा विध्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि क्षमतांना आकार देऊ शकतात. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाने आणि पालकाने विध्यार्थ्यांना खालील प्रमाणे प्रेरणा दिली पाहिजे:
@ तू हुशार आहेस.
@ तू हे सहज करू शकतोस किंवा थोडा प्रयत्न केला तर तुलाही जमेल.
@ मला तुझ्या बुद्धिमत्तेचे कौतुक आणि अभिमान वाटतो.
@ तू बुद्धिमान आहेस.
@ तू हे लवकर शिकणार आहेस याची मला खात्री आहे.
*गोलेम सिद्धांत* हा याच्या उलट असून तुमच्याकडून तुमचा बॉस जर कमी अपेक्षा ठेवत असेल तुमची कार्यक्षमता आपोआप ढासळते. यात बॉस तुमच्या क्षमतांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. त्यामुळे तुमच्या स्वयंप्रेरणा आणि स्वयंशिक्षणाच्या क्षमता आपोआप नष्ट होत जातात आणि आपण चांगले कर्मचारी नाही आहोत अशी त्यांची धारणा होत जाते. हाच सिद्धांत शाळांमध्येही लागू होतो. शिक्षक आणि पालक जर आपल्या विध्यार्थ्यांच्या आणि मुलांच्या क्षमतेबाबत शंका घेऊ लागले किंवा उभ्या आयुष्यात तू काहीच करू शकणार नाही अशी भविष्यवाणी करू लागले तर ती मुले चांगले शिक्षण घेऊ शकत नाहीत. कारण शिक्षक आणि पालक जसे आपल्याकडे पाहतात त्याच नजरेतून मुले स्वतःकडे पाहायला लागतात. या सिद्धांताबाबत तुम्हांला शंका वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कोणत्याही एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू आळशी आणि मंद आहेस" असे म्हणत रहा आणि एका विध्यार्थ्यांला किंवा मुलाला सतत "तू हुशार आणि बुद्धिमान आहेस" असे म्हणत रहा. तुम्हांला या दोन विद्यार्थ्यांच्या सामान्य वागणुकीत आणि शालेय प्रगतीमध्ये जमीन-आसमानचा फरक दिसून येईल.
जे शिक्षक आणि पालक आपल्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना
* तू मूर्ख आहेस.
* तू बावळट आहेस.
* तू बेअक्कल आहेस.
* त्या अमुक मुलासारखे तुला कधीच जमणार नाही.
* तू आळशी आहेस.
* तू आयुष्यात काहीच करू शकणार नाहीस.
* तू 'ढ' आहेस.
* नाही, तुझ्यासारख्या मंदबुद्धी मुलाला हे शक्य नाही.
* संपूर्ण वर्गात अमुक मुलगाच फक्त हे करू शकतो.
मुलांना शाळेत किंवा घरी वारंवार हे शब्द वापरतात ती मुले अभ्यासात प्रगती करू शकत नाहीत किंवा ते शिक्षक आणि पालक उत्कृष्ट विद्यार्थी आणि मूल घडवू शकत नाहीत. कारण सतत असा अपमान झेलणाऱ्या मुलांमध्ये न्यूनगंड तरी येतो किंवा ती आतून पूर्णपणे उध्वस्त झालेली असतात.
म्हणून,
*प्रिय शिक्षक आणि पालक*,
आपण आपल्या विध्यार्थ्यांना आणि मुलांना कसे समजून घेतो आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवितो यावरून आपण त्यांना घडवत किंवा बिघडवत असतो.
म्हणून, प्रत्येकाने आपल्या नवशिक्या मुलांकडे आणि विध्यार्थ्यांकडे ते जे देतील आणि करतील ते चांगलेच असेल या अपेक्षेने पाहण्याची स्वतःला सवय लावून घेतली पाहिजे.
© के.राहुल
Comments
Post a Comment