*डिफॉल्ट मोड म्हणजे काय?*
(अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येकाने वाचा!)
डॉ. यश वेलणकर
*तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??*🤔🤔
तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!
*आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!*
कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!
डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!
आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!
आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!
*मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??*🤔🤔
माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. *त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!*
कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!
बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??
सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. *माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!*
आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!
*विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!*
*त्यासाठीचा एक साधा उपाय हे 👇करून पहा..!!*
शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!
ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!
असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??
*अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!*
फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि कळवा मला...!!
👍👍👍
#####################################
My reply
छान माहिती.
पण असे असले तरी तुम्ही जितक्या लवकर तुम्ही डिफॉल्ट मोड मध्ये जाता तितक्याच लवकर तुम्ही डीफ्यूज मोड मध्ये जायची दाट शक्यता असते. कोणकोणत्या कारणाने मेंदू डीफौल्ट मोड वरून डी फ्यूज मोड मध्ये जातो ते पाहण्या अगोदर डीफ्युज मोड म्हनजे काय ते पाहुया!
डिफ्युज मोड म्हणजे ज्याक्षणी तुमचा मेंदू डीफ़ौल्ट मध्ये जातो आणि रिलॅक्स होतो त्याक्षणीच भूतकाळातील एखादी त्या घटनेची जागा घेते तेव्हा त्याला डीफ़ौल्ट मोड असे म्हणतात. या भूतकाळातील घटना कश्या आहेत यावरुन मेंदूची विश्रांती निश्चित होते. भूतकाळात आपल्याशी घडलेल्या घटना आनंदी असतील तर डिफ्युज मोड बऱ्याचदा चांगला वाटतो पण या घटना मानसिक त्रास देणाऱ्या किंवा दुःखद असतील तर मात्र डीफौल्ट मोड आणखी त्रासदायक ठरू शकतो. संबंधित व्यक्ती शारीरिक श्रमाची कामे करणारी असेल किंवा घडलेल्या घटनांचा अजिबातच विचार करत नसेल तर डिफ्युज किंवा डीफौल्ट मोड मध्ये जाण्याची शक्यता फारच कमी असते पण बौद्धिक श्रमाची कामे करणारी किंवा ताणतणावाच्या ठिकाणी कामा करत असेल तर घडलेल्या प्रत्येक घटनेचा किंवा कृतीचा मेंदूवर खोल परिमाण होत असतो. त्यामुळे मेंदूला आलटून पालटून या घटनांचा विचार करावा लागतो. डिफ्युज मोड नेमकी हीच संधी साधतो आणि एक गोष्ट विसारण्याच्या प्रयत्नात अनेक जुन्या घटनांची क्रमबद्ध मालिका सुरू होते. या घटना चांगल्या असतील तर दोन्ही मोड मध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा समाधान किंवा हास्य दिसते. (अशी माणसे पाहून आपण त्यांना हसलेलो असतो). पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही कारण एकवेळ भूतकाळ सतत दुःखाचा असू शकतो पण सतत आनंदाचा (बालपण वगळता) कधीच असत नाही आणि त्यातून ताणतणावात भरच पडत जाते. त्यामुळे डीफ्यूज मोड मध्ये जाताना त्या व्यक्तीचे मेंदूवर आणि शरीरावर प्रचंड नियंत्रण असावे लागते. जे रोजच्या ताणतणावात रहात नाही. त्यामुळे ताणतणाव रहित जीवन जगणे आवश्यक आहे.
डीफौल्ट मोड मधून डीफ्यूज मोडमध्ये मेंदूला घेऊन जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटना:
** *चांगल्या घटना:*
१. यश
२. शुभ कार्ये
३.चांगले सह आणि समूहजीवन
४.सण, उत्सव.
५. सामाजिक प्रतिष्ठा
६. आणि इतर वैयक्तिक समाधान देणाऱ्या गोष्टी
* *वाईट घटना**
१. चुका
२. अपघात
३. अपयश
४. विस्कळीत समूह आणि सहजीवन
५. मृत्यू
आणि बरेच काही
© के.राहुल 9096242452
(अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येकाने वाचा!)
डॉ. यश वेलणकर
*तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??*🤔🤔
तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!
*आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’असे नाव दिले आहे..!!*
कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!
डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!
आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!
आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!
*मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??*🤔🤔
माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. *त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!*
कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!
बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??
सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. *माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!*
आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!
*विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!*
*त्यासाठीचा एक साधा उपाय हे 👇करून पहा..!!*
शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!
ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!
असा गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??
*अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!*
फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि कळवा मला...!!
👍👍👍
#####################################
My reply
छान माहिती.
पण असे असले तरी तुम्ही जितक्या लवकर तुम्ही डिफॉल्ट मोड मध्ये जाता तितक्याच लवकर तुम्ही डीफ्यूज मोड मध्ये जायची दाट शक्यता असते. कोणकोणत्या कारणाने मेंदू डीफौल्ट मोड वरून डी फ्यूज मोड मध्ये जातो ते पाहण्या अगोदर डीफ्युज मोड म्हनजे काय ते पाहुया!
डिफ्युज मोड म्हणजे ज्याक्षणी तुमचा मेंदू डीफ़ौल्ट मध्ये जातो आणि रिलॅक्स होतो त्याक्षणीच भूतकाळातील एखादी त्या घटनेची जागा घेते तेव्हा त्याला डीफ़ौल्ट मोड असे म्हणतात. या भूतकाळातील घटना कश्या आहेत यावरुन मेंदूची विश्रांती निश्चित होते. भूतकाळात आपल्याशी घडलेल्या घटना आनंदी असतील तर डिफ्युज मोड बऱ्याचदा चांगला वाटतो पण या घटना मानसिक त्रास देणाऱ्या किंवा दुःखद असतील तर मात्र डीफौल्ट मोड आणखी त्रासदायक ठरू शकतो. संबंधित व्यक्ती शारीरिक श्रमाची कामे करणारी असेल किंवा घडलेल्या घटनांचा अजिबातच विचार करत नसेल तर डिफ्युज किंवा डीफौल्ट मोड मध्ये जाण्याची शक्यता फारच कमी असते पण बौद्धिक श्रमाची कामे करणारी किंवा ताणतणावाच्या ठिकाणी कामा करत असेल तर घडलेल्या प्रत्येक घटनेचा किंवा कृतीचा मेंदूवर खोल परिमाण होत असतो. त्यामुळे मेंदूला आलटून पालटून या घटनांचा विचार करावा लागतो. डिफ्युज मोड नेमकी हीच संधी साधतो आणि एक गोष्ट विसारण्याच्या प्रयत्नात अनेक जुन्या घटनांची क्रमबद्ध मालिका सुरू होते. या घटना चांगल्या असतील तर दोन्ही मोड मध्ये त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर बऱ्याच वेळा समाधान किंवा हास्य दिसते. (अशी माणसे पाहून आपण त्यांना हसलेलो असतो). पण हा आनंद जास्त काळ टिकत नाही कारण एकवेळ भूतकाळ सतत दुःखाचा असू शकतो पण सतत आनंदाचा (बालपण वगळता) कधीच असत नाही आणि त्यातून ताणतणावात भरच पडत जाते. त्यामुळे डीफ्यूज मोड मध्ये जाताना त्या व्यक्तीचे मेंदूवर आणि शरीरावर प्रचंड नियंत्रण असावे लागते. जे रोजच्या ताणतणावात रहात नाही. त्यामुळे ताणतणाव रहित जीवन जगणे आवश्यक आहे.
डीफौल्ट मोड मधून डीफ्यूज मोडमध्ये मेंदूला घेऊन जाण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटना:
** *चांगल्या घटना:*
१. यश
२. शुभ कार्ये
३.चांगले सह आणि समूहजीवन
४.सण, उत्सव.
५. सामाजिक प्रतिष्ठा
६. आणि इतर वैयक्तिक समाधान देणाऱ्या गोष्टी
* *वाईट घटना**
१. चुका
२. अपघात
३. अपयश
४. विस्कळीत समूह आणि सहजीवन
५. मृत्यू
आणि बरेच काही
© के.राहुल 9096242452
Comments
Post a Comment