Skip to main content
From Autobiography : My Struggle, My Life
Author : Ananymous
माझा संघर्ष, माझे जीवन या आत्मचरित्रातून
लेखक: अनामिक
अनुवाद : ©के. राहुल

आमचं घर गावाकडे तर नातेवाईक सगळे शहरी. शिकले आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडले आणि तिकडेच स्थायिक झालेले.  मम्मीच्या माहेरीपन तसेच. मग गावाकडे किणीतरी रहायला हवे म्हणून आणि गावात व्यवसायात चांगला जम बसलेला म्हणून नोकरी मिळत असतानाही पप्पांनी गावी रहायचा निर्णय घेतलेला. त्या निर्णयाने मम्मी नाखूष होती. नाही म्हटले तरी ती शहरातील होती आणि तितकीच कर्तृत्ववान होती.  पण नवऱ्याला कधी विरोध करायची नाही. मग शाळांना सुट्ट्या पडल्यावर दोन्हीकडच्या जत्रा आमच्या घरी यायच्या आणि एकच धमाल उडायची. नाही म्हटलं तरी मम्मीवर त्याचा खूप ताण पडायचा ।मला तिच्याबद्दल कणव यायची. मग मी ठराविक वेळ खेळायला देऊन तिला घरकामात मदत करायचो. तिलाही बरे  वाटायचे. त्याचा मला एक फायदा असाही झाला दहावीत जाईपर्यत मला सगळा स्वयंपाक आणि घरकाम व्यवस्थित जमू लागले होते आणि पप्पांच्या धंद्यातील समजही होती त्यामुळे त्यांच्या दृष्टीने माझी उपयुक्तता जास्त होती.  माझ्या या चौफेर कौशल्याचे नातेवाईक आणि मित्र मंडळींना कौतुक वाटायचे. सगळे मला "कॉलेजला गेलास की चल आमच्याकडे शिकायला!" असे म्हणायचे. मी म्हणायचो बघू पुढचे पुढे!

दरम्यान शाळेत असताना मी अत्यन्त सामान्य दर्जाचा मुलगा होतो. शिवाय इतका वांड की मी दहावीला पास होईन हे मम्मी सोडून कोणालाच वाटायचे नाही. पप्पा तर पास नापास ची फिकीरच करायचे नाही. ते एक माझ्या दृष्टीने बरे होतो. ही सगळी असली बोंबाबोंब सुरू असताना एक जमेची बाब म्हणजे मी आमच्या सगळया घरात दिसायला देखणा आणि तितकाच चॉकलेटी होतो. पण शाळेत हुशार नसल्याने कोणतीच मुलगी भाव देत नसायची आणि मला मात्र थेट दरवर्षी पहिला नंबर येणारी मुलगी आवडायची. तिने पाचवी पासून दहावीला येईपर्यंत माझ्याकडे कधी चुकूनही पाहिले नव्हते हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.  मित्र म्हणायचे, "आपण आपल्या मापातली पोरगी बघायची असते, ही तुला कधी पटायची. आपले तर पास व्हायचे वांदे". पण मी ठरविले होते हिलाच पटवायची. मग त्यासाठी काय करावे लागेल. मग दहावीच्या सहामाही परीक्षेत तीन विषय गेल्यावर पहिल्यांदा कळले 'आपल्याला अभ्यास करावा लागेल'. आणि तिथून पुढे अभ्यासाला सुरुवात झाली. रोज चारपाच तास अभ्यास केल्यावर मी जेमतेम मार्क्स घेऊन पास झालो आणि ही बया थेट मेरिलिस्टमद्ये राज्यात तिसरी आली. आता आली का पंचाईत. मी सोडून सगळ्या गावाला मी पास झाल्याचा आनंद झाला होता. पप्पा एकदा बोलता बोलता मम्मीला, '१० किलो पेढे वाटले तरी माणसे अजून मागत आहेत' असे म्हणल्याचे मी ऐकले होते. पण माझे लक्ष मात्र ती कुठे ऍडमिशन घेणार यावरच होते. तिला डॉक्टर व्हायचे होते त्यामुळे तिने science ला प्रवेश घेतला. तिच्या वर्गात जायला मिळावे म्हणून तिने ज्या ज्या कॉलेज ला अर्ज केले तिथे मीही अर्ज केले पण मला मार्क्स बघून सायन्स तर दूर पण कला शाखाही मिळाली नाही. तरीही पप्पांना राजकीय वजन वापरून तिने ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्याच कॉलेजमध्ये दुसऱ्या शाखेत मी प्रवेश मिळाला. सतत राहिले किमान दिवसातून एखादा तोंड बघायला मिळावे हा पवित्र उद्देश त्यामागे होता.

असे असले तरी ती बिचारी भलतीच सरळमार्गी. घरची चांगलीच श्रीमंत आणि त्यात हुशार व देखणी. मी बारावीत जाईपर्यंत तिने चुकूनही स्वतःहून माझ्याकडे पाहिल्याचे मला आठवत नाही. आणि मी मात्र त्याच्या उलट. अश्यात बारावीत ति मेरिट काही सोडणार नाही हे मला कळून चुकले होते. त्यामुळे आपल्याला पुढे काही चांगले करायचे असेल तर किमान मार्क्स मिळविले पाहिजेत याची जाणीव मात्र मला झाली आणि ती बारावीला बोर्डात दुसरी आनि मी माझ्या शाखेत आमच्या कॉलेजमध्ये पहिला इथपर्यंत माझी प्रगती झाली.  त्याचे किती पेढे घरच्या लोकांनी वाटले याची गणतीच नाही. कुणीही पेढे मागायचे. मम्मी तर महिनाभर मॉर्निग वॉकच्या निमित्ताने रोज गावातून एक चक्कर टाकायची. सगळी माणसं कौतुक करायची आणि ती ताठ मानेने घरी यायची. आयुष्यात पहिल्यांदा पप्पांनी माझा निकाल त्यावेळेस हातात घेऊन पहिला असावा. पण मला त्याचे सोयर सुतक नव्हते. मी मात्र ही आता पुढे कुठे जाणार? या विचारात. एव्हाना तिचे मेडिकल इन्ट्रान्सचे मार्क्स आले होते आणि तिला थेट बोस्टनला मेडिकलसाठी प्रवेश मिळाला. मीही मग degree साठी बोस्टन ला जायचा हट्ट धरला. सगळे माझ्या विरोधात इथे इतकी चांगली कॉलेज असताना  एवढया लांब कशाला? अश्या वेळेस नेहमी विरोधात असनारे पप्पा माझ्या बाजूने उभे राहिले. "पहिला आलाय तो, काहीतरी वेगळे नक्की करेल. तुला जिकडे जायचे तिकडे जा!" असे पप्पा म्हणाले. आणि मी नकळत जाऊन त्यांना शेवटची मिठी मारली. मी खुश झालो पण मी इतक्या लांब जाणार म्हणून मम्मी रडायला लागली. मी तिला समजावले. मग ती शांत झाली. नाही म्हणायला बोस्टनला अंकल आणि आंटी होतेच. शिवाय ते सारखे "आमच्याकडे राहायला ये असा आग्रह करून म्हणायचे". पण पप्पा म्हणाले,"बोस्टन खूप महागडे शहर आहे. ,त्यांच्या पगारात तुला पोसणे त्यांना जमणार नाही. तुला होस्टेल वर ठेवू. मी म्हणालो, "ठीक आहे, पण होस्टेल सुरू व्हायला अजून दीड दोन महिने अवकाश आहे. कॉलेज बुडायला नको म्हणून मी अंकल कडे राहीन तेवढे दिवस.  तेही आनंदाने हो म्हणाले. आणि मी बोस्टनकडे रवाना झालो.
ही आता डॉक्टर होंणार म्हणजे आपल्याला हिच्या तोडीचे काहीतरी करावे लागणार हे माझ्या लक्षात आले होते. आणि त्यासाठी मी कसून तयारी चालू केली होती. ,सॉफ्ट स्किल, communication स्किल, भाषा , कपडे, बॉडी language याकडे मी विशेष लक्ष देत होतो. तिला ज्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता त्याच्या समोरच मी एक लायब्ररी शोधून काढली. मेट्रोचा पास ही काढून घेतला. लायब्ररीच्या खिडकीतून बाहेर बघत अभ्यास करायचो.  ती कॉलेज मधून बाहेर पडली की मीही पडायचो. आणि तिच्यामगोमाग मेट्रोला जायचो. एव्हाना टुकार पोरगा कॉलेजमध्ये पहिला आलाय तो कोण हे तिने एखादा पाहुण घेतले होते. त्यामुळे तिने मला ओळखले होते. हळूहळू आमची बोलचाल चालू झाली होतीB. मी आनंदात होतो. मी CFA करतोय ही एकूण तिलाही बरे वाटले होते. कारण CFA ला खूप scope होता आणि गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्याही उपलब्ध होत्या.  आमच्यात एव्हाना चांगलीच मैत्री झाली होती. अंकल आंटी कडे माझे मुळीच लक्ष नव्हाते. मी फक्त जेवण आणि झोपण्यापूरता घरी असायचो. तशीही त्यांची माझ्यामुळे आर्थिक ताणताण व्हायची. शिवाय मी त्यांना काहीतरी आर्थिक हातभार लावावा अशी अपेक्षा असावी गेला बाजार मी किमान आंटी ला किचनमध्ये मदत करावी असे वाटत होते पण मला ते लक्षात आले नाही. त्यामुळे मी घरी गेलो की दोघाचे पराकोटीचे वाद चालू व्हायचे. बऱ्याच वेळा मी जाई पर्यत ते जेवण करून बसलेले असायचे. आणि मला उपाशी झोपावे लागायचे नाहीतर मी जेवायला बसलो की भांडणे चालू व्हयची. होस्टेल सुरू न झल्याने माझ्याकडे पर्याय नव्हता. आणि प्रेमप्रकरण निर्णायक वळणावर होते. त्यातही प्रेमात असून आपण अगोदर कबुली द्यायची नाही अशी खुणगाठ मी मनाशी बांधली होती.
तो माझ्या वाढदिवसाचा आदला दिवस होता. ती मला "उद्या मी तुला वाढदिवसाचे सरप्राईज देणार आहे!"असे म्हणाली होती. मला खात्री पटली होती की आता उद्या आपल्याला अपेक्षित बातमी मिळणार. त्या आनंदातच मी रात्रीच्या दहा वाजता घरी गेलो तर अंकल आंटीची जोरदार भांडणे चालू होती. आंटीना मी घरात नको होतो म्हणून अंकल त्यांना मारत होते आणि त्या मला घराबाहेर व्हायला सांगत होत्या. बाहेर कुठे जाणार याचा विचार न करता मी रात्री अकराच्या सुमारास माझी कपडे, पुस्तके आणि document ची फाईल घेऊन घराबाहेर पडलो होतो. लॉज बुक करावा इतपत पैसे नव्हते.  मेट्रो स्टेशनला जायला टॉक्सिही मिळत नव्हती. मम्मी पप्पांना फोन करून सांगावे तर नात्यात वितुष्ट येईल म्हणून तेही करता येईना. अंगातून घामाच्या आणि डोळयातून अश्रू च्या धारा घेऊन मी सगळा बाढ बिस्तरा घेऊन चालतच मेट्रो स्टेशनला चाललो होतो. मी पोहचे पर्यत शेवटची मेट्रो निघून गेली होती. हताश पणे मी स्टेशनच्या बाहेर येऊन बसलो. आता कशीबशी येथेच रात्र काढावी असा विचार करून मी शेजारील ब्रीजखाली जाऊन आढावा झालो. रात्रीचे दोन वाजल्यानंतर माझा डोळा लागला पन डोळे उघडले तेव्हा मी एक विचित्र अवस्थेत होतो. चार जणांनी माझे हात आणि पाय करकचून धरले होते। आणि एकजण माझे कपडे काढत होता. मी ओरडू नये म्हणून माझ्या थोडात एकाने त्याचा टाय कोंबला. आणि आळीपाळीने त्या पचजनांनी माझे संपूर्ण शरीर चाटून काढले. कितीतरी वेळ ते माझ्या अवयवांशी खेळत होते. माझा प्रतिकार संपल्यावर त्यांनी माझ्या तोंडातील टाय काढला. मी हात जोडून मला जाऊद्या, मी तसा नाही अश्या विनवण्या करत राहिलो.  ती ही अशीच टुकार पोरं होती. ती म्हणाली, आम्ही ही तसे नाहीत. आम्ही तुझा बलात्कार करणार नाही. फक्त शरीराची मजा घेणार. फक्त शांत रहा. तरच इथून नीट जाशील. माझी documents, आणि पुस्तके वाचवयची असतील तर मला शांत राहण्याशिवाय पर्याय नव्हता. त्या रात्री लागोपाठ पंधरा वेळा ते पाचजण प्रत्येकी तीनवेळा असे माझ्यावर स्वार झाले पण मला काही करता आले नाही. तिसऱ्या वेळेस मलाही त्यात थोडा आनंद मिळाला. ते माझ्या आयुष्यातील पाहिले विर्यासक्खलन होते. पहाटे पाचच्या सुमारास माझे कपडे माझ्या अंगावर फेकून "हवे असल्यास पुन्हा ये, आम्ही हे मजेसाठी करतो. तुझ्यासारखी माणसे आवडतात आम्हाला", असे म्हणून हासत खिदळत निघून गेले. कोणी पाहू नये म्हणू  मी चटकन कपडे घालून स्टेशनमध्ये गेलो तोंड धुवून ब्रश केला. आणि तिथेच हताशपणे बसून राहिली. नेहमीप्रमाणे पहिल्या मेट्रोच्या लायब्ररी कडे निघालो. खाली उतरताच ती तिच्या सगळ्या मित्र मैत्रिणींना घेऊन माझ्या स्वागताला उभी होती. वाढदिवसाचे स्पेशल गिफ्ट घेऊन. तिने गिफ्ट माझ्या हातात दिले आणि गालावर ओठ टेकवून "I Love You!" म्हणाली
"थँकू अँना! फॉर मेकिंग माय दे मोअर स्पेशल!" अरे नुसते थँकू काय? "तिने तुला प्रपोज केलंय आणि तू फक्त शुभेच्छा स्वीकारणार का?" लीला लाडात म्हणाली. मी जरा जास्तच उदास होत म्हणालो, मला कळतंय तर पण सध्या माझी मानसिकता ठीक नाही. मला जरा वेळ आणि अँनाची एकटीची सोबत हवीय.
काय झालंय रेमो तुला तब्येत ठीक नाही का?
तसं काही नाही अँना, माझी मानसिकता ठीक नाही सध्या. मला तुला काही सांगायचंय.
तरी मला जरा शंका आलीच होती तुझ्याबरोबर हा सगळा बाढ बिस्तरा बघून.  अंकल आंटीशी भांडून घर सोडून आलास की काय?
हो, पण त्याहीपेक्षा काही गंभीर घडलंय आणि मला ते तुला सांगायला हवं.
ठीक आहे आम्ही जातो सगळे आता पण आम्हांला बिर्थडे ची पार्टी हवी आहे परत.
देणार नक्की! मग तर झालं.
च्या मायला खाया पिया कुछ नहीं, गिलास तोडा बारा आना' असे म्हणत सगळे निघून गेले.
हा आता सांग जरा नीट काय झाले ते?
इथे नको आपण लिंकन ब्रिजवर जाऊया का?
चल माझी काहीच हरकत नाही. आम्ही लिंकन एंड ला जाऊन बसलो. सकाळची वेळ असल्याने फार कोणी नव्हतेच. ही आमची नेहमीची जागा.
अँना मांडीवर हात ठेऊन म्हणाली," सांग आता नीट काय झाले ते. तू घर सोडलंय ते माझ्या लक्षात आलंय कधीच. पण चार पाच दिवसात हॉस्टेलचे ऍडमिशन होतील. आणि भांडणं तर सारखीच व्हयची हे तूच मला सांगायचा ना!
हो अँना पण यावेळेस बरेच काही रामायण घडलंय. मला त्या भांडणाचे फार काही वाटत नाही.  पण अंकले ने आंटी  ला खूप मारलं!
पण का?
कारण रागाच्या भरात आंटीने मी त्यांच्या कुटूंबातील नाही याचा माझ्यासमोर पुनरुच्चार केला.
म्हणजे काय? तू त्या घरातील सदस्य नाहीस असे काही आहे का?
असा मलाही लहान पणा पासून संशय आहे.
तू ना जरा कमी विचार करत जा म्हणजे असले विचार तुझ्या मनात येणार नाहीत.
नाही अँना, हे खरे आहे असे वाटते
कशावरून!
अँना! मला वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून सगळे आठवते. तो घटनाक्रम डोळ्यासमोर आला की, हे सगळे खरे वाटायला लागते.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...