Skip to main content

सिकंदर ते मोदी

लेख नक्की वाचा
श्रीकृण्णा घरडे
भारत पाकिस्तान विभाजन.
गांधींच्या हत्येमागचे रहस्य.
आणि आर्टिकल ३७०

आपण नेहमी एक म्हण ऐकतो, "जो जीता वही सिकंदर".
 के. अब्बास निर्मित अमीर खानचा या नावाचा चित्रपट सुद्धा येऊन गेला आहे.
"सिकंदरच" खर नाव "सिकंदर" नव्हत तर अलेक्झांडर होत. आता अलेक्झांडरच भाषांतर सिकंदर कस झाल ? हा संशोधनाचा विषय आहे.
शब्द, वाक्य, पॅरा, पुस्तक याच भाषांतर होत पण नावाच सुद्धा भाषांतर फक्त भारतातच होत असाव.
" *जो जीता वही सिकंदर"* , ही म्हणच खोटी आहे.
 युनानचा राजा अलेक्झांडर भारतात आला, त्यान पुरु नावाच्या काश्मिरी ब्राह्मण राजाचा पराभव केला इथपर्यंत इतिहास ठीक आहे पण चंद्रगुप्त मौर्याने अलेक्झांडर उर्फ सिकंदरचा पराभव केला होता हा इतिहास ब्राह्मणांनी खूपच षडयंत्रपूर्वक दडवला.
ब्राह्मण राजा पुरुचा ज्या अलेक्झांडरने पराभव केला त्याचा पराभव एक शुद्र सम्राट चंद्रगुप्त मौर्याने केला ही गोष्ट ब्राह्मणांच्या वर्ण अहंकाराची नांगी ठेचणारी होती.
 ब्राह्मण पुरु राजाचा पराभव मान्य करण ब्राह्मणी इतिहासकारांना मान्य आहे पण  नागवंशी सम्राट चंद्रगुप्त मौर्याने जगजेत्त्या अलेक्झांडरला हरवल ही गोष्ट ते वंश श्रेष्ठत्वाच्या आधारे मान्य करायला तयार नाहीत.
त्यांनी ही गोष्ट मान्य केली असती तर *"जो जीता वही चंद्रगुप्त",* अशी म्हण प्रस्थापित झाली असती.पन
इतिहास लपवण्याची, खोटा इतिहास लिहण्याची ही हजारो वर्षांची ब्राह्मणी परंपरा भारत-पाकिस्तान फाळणीच्या बाबतीतही लागू आहे.
गांधीजींच्या हत्येवर RSS, समाजवादी, कम्युनिस्ट,पुरोगामी अशा सर्वच ब्राह्मणी इतिहासकारांनी लिहिले आहे पण   या विषयावर बहुजन समाजातील  कुणीही त्यावर  संशोधनात्मक असं काही लिहिले नाही.
गांधीजींच्या हत्येनंतर बाबासाहेब आंबेडकरांची केवळ दोन वाक्यांची प्रतिक्रिया उपलब्ध आहे.

अखेर जाती व्यवस्थेने गांधीजींचा बळी घेतला.
देशाला लागलेले एक ग्रहण सुटले.

१४ ऑगस्ट १९४७ ला भारताच विभाजन होऊन पाकिस्तान निर्माण झाला तर १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला तथाकथित स्वातंत्र्य मिळाल.
३० जानेवारी १९४८ नथुराम गोडसे या ब्राह्मणाने तथाकथित स्वातंत्र्याच्या साडेपाच महिन्या नंतर गांधीची हत्या केली.
"गांधींच्या हत्येनंतर भारतात सर्वत्र चर्चा सुरू झाली की गांधींची हत्या का झाली ?
वर्तमानपत्रात या विषयी लेख येऊ लागले.
त्यामध्ये दोन कारणे प्रामुख्याने सांगितली जात होती व आजही तीच कारणे सांगितली जातात.
त्यापैकी पाहिले म्हणजे,'भारताचे विभाजन मुस्लीम आणि गांधींनी केले व दुसरे, ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत म्हणून गांधींजींनी सरकारवर दबाव आणला.

खरतर नथुराम गोडसेने फाळणीच्या अगोदर सुद्धा गांधीजींच्या हत्येचे प्रयत्न केले होते. त्यामुळे वरील दोन्ही कारणे खोटी होती.
 *मुख्य मुद्दा आहे भारताचे विभाजन होऊन पाकिस्तान का निर्माण झाला* ?

१५ ऑगस्ट १९४७ नंतर भारताच्या विभाजनाची चर्चा तर सुरु झाली होती पण त्या चर्चेचा तर्कसंगत शेवट ब्राह्मण धर्मासाठी धोकादायक होता.
या चर्चेचा खरच तर्कसंगत शेवट झाला तर...?
या चर्चेचा तर्कसंगत शेवट होऊ नये
 म्हणून भारत-पाकिस्तान फाळणीची चर्चा बंद करणे शासक ब्राह्मण वर्गासाठी आवश्यक बनले होते.

भारत-पाकिस्तान फाळणीची घटना भारताच्या इतिहासात खुप मोठी होती.
या घटनेची चर्चा जर बंद करायची असेल तर तेवढीच मोठी घटना घडवणे आवश्यक होते.
ब्राह्मण नथुराम गोडसे व त्याच्या ब्राह्मण सहकाऱ्यांनी गांधीजींची हत्या करून ही मोठी घटना घडवून आणली व भारत पाकिस्तानच्या फाळणीची चर्चा बंद झाली.
गांधीजी हिंदूंचे विरोधक होते, ते मुस्लिमांचे ,अस्पृश्यांचे समर्थक होते अशी बनावट व खोटी चर्चा समाजवादी ब्राह्मणी इतिहासकारांनी सुरू केली व याच चर्चेमुळे डॉ. आंबेडकरवादाच्या प्रचार प्रसारात मोठा अडथळा निर्माण झाला.
आज हा चर्चेचा विषय नाही. आपला मुख्य विषय आहे भारत-पाकिस्तान फाळणी का झाली ?
आर्टिकल ३७० ही नंतरची गोष्ट आहे.
भारताची फाळणी करण्याचे निश्चित झाल्यावर फाळणीचे एक सुत्र,एक सिध्दांत ठरविण्यात आला.
भारताच्या ज्या भागात ५१ % हिंदू आहेत तो भाग भारताचा भाग असेल व ज्या भागात ५१ % मुस्लिम असतील तो भाग पाकिस्तान असेल.
आजच्या पाकिस्तानात तक्षशिला, विक्रमशीला ह्या बौद्ध विश्वविद्यालयांचे अवशेष आहेत.
त्याच्याही पलीकडे अफगाणिस्तानात बुद्धाच्या अनेक मूर्त्यांना तालिबानने २००१ ला क्षेपणास्त्रे लावून उध्वस्त केल्याचा इतिहास ताजा आहे.
आजचा जो अफगाणिस्तान, पाकिस्तानचा भूभाग आहे तो कधी काळी बौद्ध बहुल प्रदेश होता.
चंद्रगुप्त मौर्याचा नातू सम्राट अशोकाने बौद्ध धम्म स्विकारल्यानंतर भारताच्या या भूभागात ९० % बौद्ध व १० % जैन लोक रहात होते.
ज्या भागात ९० % बौद्ध व १० % जैन रहातात तो भूभाग १९४७ पर्यंत मुस्लिम बहुल झाला होता.
आता प्रश्न हा आहे की या भूभागतील बौद्ध व जैन मागच्या २००० वर्षात गायब झाले काय ?
 ज्या वेळी ब्राह्मण धर्मातील गैरबराबरी, भेदभाव , अस्पृश्यता, अन्याय-अत्याचार, ब्राह्मणांच्या कडून धर्माच्या नावाखाली होणारे बहुजन समाजातील महिलांचे शोषण हे चरणसीमेला होते त्यावेळी भारतात इस्लामचे आगमन झाले.
 धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या या छळाला कंटाळून तत्कालीन बौद्ध  लोकांनी इस्लाम स्वीकारला. आजचा अफगाणिस्तान व पाकिस्तान मधील बौध्द बहुल भूभाग मुस्लीम बहुल झाला.
मुस्लीम बहुल भूभाग झाल्याने १९४७ ला फाळणीच्या वेळी याच भागात पाकिस्तान झाला.
आणखीन एक तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस महासमितीने भारताच्या विभाजनाचा ठराव १५७ विरुद्ध १५  मतांनी मंजूर केला.
काँग्रेस महासमितीचे वैशिष्ट्य हे होते की यामध्ये बहुसंख्य ब्राह्मण होते व यावर ब्राह्मणांचा कब्जा होता.
भारताच्या विभाजनाला व पाकिस्तानच्या निर्मितीला ब्राह्मणधर्म कारणीभूत आहे. काँग्रेसच्या ब्राह्मणांनी काँग्रेस महासमितीमध्ये फाळणीचा ठराव बहुमताने मंजूर करून घेतला म्हणजे भौगोलिक व राजकीय दृष्टीने सुद्धा फाळणीला जबाबदार ब्राह्मण धर्म आहे. हा निष्कर्ष या चर्चेचा तर्कसंगत शेवट होता.
भारताच्या फाळणीच्या चर्चेचा शेवट या पद्धतीने होऊ नये . असे झाले तर ब्राह्मणधर्म धोक्यात येईल म्हणून शासक जातींना ही चर्चा बंद करण्यासाठी गांधीजींची हत्या करावी लागली.
 मुस्लिम व गांधींंनी भारताचे विभाजन केले, गांधींनी ५५ कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत म्हणून सरकारवर दबाव आणला, म्हणून गांधीजींची हत्या झाली अशी चर्चा नंतर RSS ने सुरू केली.
आज हाच खोटा इतिहास राष्ट्रवादाच्या नावाखाली बहुजन समाजातील तरुणांना सांगून त्यांना हिंदू बनवले जात आहे.

२००१ नंतर बहुजनांनी  जाती निहाय जनगणनेचा विषय लाऊन धरला
 या माध्यमातून ओबीसीच्या  जातीनिहाय जनगणनेसाठी  आंदोलन सुरु झाले  त्याचा परिणाम भारतातील सर्वच ओबीसी नेत्यांनी या मुद्द्यावर संसद बंद पाडली.
हा मुद्दा सुद्धा ब्राह्मणधर्म व शासक जातींच्या राजकीय अस्तित्वासाठी धोकादायक होता.
या मुद्द्यावरील चर्चा बंद करण्यासाठी अण्णा हजारेंना गांधी बनवून भ्रष्टाचाराच्या मुद्यावर राष्ट्रीय चर्चा घडवून आणण्यात आली व ओबीसींच्या हक्क अधिकारांची चर्चा बंद करण्यात आली.

EVM च्या मुद्द्यावर सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. ९ ऑगस्ट २०१९ पासून या मुद्द्यावर राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू होणार आहे. या आंदोलनाचा परिणाम राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर होऊ शकतो.  या आंदोलनाचा परिणाम म्हणून सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो. भारतीय मतदारांच्या मतावर दरोडा टाकून सरकार बनवणाऱ्या दरोडेखोरांना तुरुंगात जावे लागेल व इंदिरा गांधींच्या पेक्षाही वाईट अवस्था या सरकारची होईल असा अहवाल गुप्तचर यंत्रणेने सरकारला दिला असेल त्यामुळेच EVM घोटाळ्या वरील चर्चा बंद करणे आवश्यक झाले होते.
संविधानाचे आर्टिकल ३७० रद्द करावे अशी काही देशात परिस्थिती निर्माण झाली नव्हती, त्या संदर्भात काही चर्चा सुरू नसताना कोणतीही प्रासंगिकता नसताना अचानक संसदेच कामकाज दोन दिवस वाढवून आर्टिकल ३७० बाबत जो निर्णय सरकारने घेतला आहे तो EVM ची चर्चा बंद करण्यासाठीच घेतला आहे.
 गझनी मेंटयालिटीच्या बहुजन समाजातील लोकांच्यावर दलाल, भडव्या व देशद्रोही मीडियातील चर्चेचा हा परिणाम दिसून येत आहे.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...