Skip to main content

कविता - नेहरू-पटेल भेट

एकदा मला स्वप्नामध्ये नेहरू-पटेल दिसले,
एकमेकांना पाहून क्षणभर थोडे हसले,
आनंदाने मिठी मारून मग निवांत झाडाखाली बसले.
सरदारजी भेटत नाहीत आजकाल, खरंच माझ्यावर रुसलात काय?
गैरसमज नको पंडीतजी,
दीड दमडीच्या लोकांना तूम्ही सुद्धा फसलात काय?
कधी न घडलेल्या गोष्टी मनाला लावून बसलात,
जिवंत असतो आता तर यांची लावली असती वासलात.
तुमच्या माझ्या वादाची हल्ली असते गरमागरम चर्चा.
मी तुमच्याशी कसा वाईट वागलो यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यत मोर्चा.
म्हणूनच सरदारजी सांगा मला, मी कधी चुकीचा वागलोय?
खरं सांगतो दिल्या वचनाला शेवटपर्यंत जागलोय!
तुम्हांला कमीपणा यावा असं माझ्या हातून काही घडलंय का?
निर्णय घेताना कधी तुम्हांला मी तोंडघशी पाडलंय का?
पंडितजी, देश चालवताना असलं कधी मनावर घ्यायचं नसतं.
बैचेन होईल मन त्या वाटेनं जायचं नसतं,
आपलं राजकारण होतं विकासाचं आणि समतेचं.
देशाबद्दलच्या माया आणि ममतेचं!
आपल्यासमोर आव्हान होतं देश उभा करण्याचं,
जात धर्म विसरून देशासाठी मरण्याचं.
तुच्छ यांच्या राजकारणात कित्येक गांधी मरतील,
नथुरामच्या पिलावळी अश्याच देशभक्त ठरतील.
आपली पाटी कोरी असली की माणसं दुसऱ्याची उणीदुणी काढत बसतात,
लोकशाहीचा संकोच झाला की सामान्य लोकंही मग त्याला फसतात.
स्वातंत्र्य मिळाले की मी काढता पाय घेतला,
लोकशाही रुजण्याआधीच काळ जीवावर बेतला.
अजून थोडं आयुष्य मला मिळायला हवं होतं,
तुमच्या बदनामीचं राजकारण माझ्यासाठी नवं होतं.
धर्मांधांच्या माना मी कधीच मुरगळल्या असत्या,
मनुस्मृतीच्या पाऊलखुणा कधीच उरगळल्या असत्या.
धर्मांधांवरची बंदी उठवून तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसलात,
माणुसकीचा भाग म्हणून चक्क लादेन पोसलात.
फासावर ज्यांना द्यायचे त्यांचे पाय चेपत बसलो,
कावा त्यांचा कळला नाही तिथंच आपण फसलो.
निराश नका होऊ पंडितजी, चांगल्या गोष्टीं बाहेर यायला बराच काळ लागेल,
जनताच मग या भोंदूना हिशोब सगळा मागेल.
जे जे होईल ते पहात राहणे, एवढंच आपल्या हाती आहे.
आपल्याच डाव उलटण्याची त्यांनाही भीती आहे.
आपण आता शांत राहू,
नव्या भारताचे स्वप्न पाहू.
नेहरूंनाही मग बरे वाटले,
मलाही मग स्वप्न माझे खरे वाटले.
©के.राहुल ९०९६२४२४५२.





Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...