एकदा मला स्वप्नामध्ये नेहरू-पटेल दिसले,
एकमेकांना पाहून क्षणभर थोडे हसले,
आनंदाने मिठी मारून मग निवांत झाडाखाली बसले.
सरदारजी भेटत नाहीत आजकाल, खरंच माझ्यावर रुसलात काय?
गैरसमज नको पंडीतजी,
दीड दमडीच्या लोकांना तूम्ही सुद्धा फसलात काय?
कधी न घडलेल्या गोष्टी मनाला लावून बसलात,
जिवंत असतो आता तर यांची लावली असती वासलात.
तुमच्या माझ्या वादाची हल्ली असते गरमागरम चर्चा.
मी तुमच्याशी कसा वाईट वागलो यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यत मोर्चा.
म्हणूनच सरदारजी सांगा मला, मी कधी चुकीचा वागलोय?
खरं सांगतो दिल्या वचनाला शेवटपर्यंत जागलोय!
तुम्हांला कमीपणा यावा असं माझ्या हातून काही घडलंय का?
निर्णय घेताना कधी तुम्हांला मी तोंडघशी पाडलंय का?
पंडितजी, देश चालवताना असलं कधी मनावर घ्यायचं नसतं.
बैचेन होईल मन त्या वाटेनं जायचं नसतं,
आपलं राजकारण होतं विकासाचं आणि समतेचं.
देशाबद्दलच्या माया आणि ममतेचं!
आपल्यासमोर आव्हान होतं देश उभा करण्याचं,
जात धर्म विसरून देशासाठी मरण्याचं.
तुच्छ यांच्या राजकारणात कित्येक गांधी मरतील,
नथुरामच्या पिलावळी अश्याच देशभक्त ठरतील.
आपली पाटी कोरी असली की माणसं दुसऱ्याची उणीदुणी काढत बसतात,
लोकशाहीचा संकोच झाला की सामान्य लोकंही मग त्याला फसतात.
स्वातंत्र्य मिळाले की मी काढता पाय घेतला,
लोकशाही रुजण्याआधीच काळ जीवावर बेतला.
अजून थोडं आयुष्य मला मिळायला हवं होतं,
तुमच्या बदनामीचं राजकारण माझ्यासाठी नवं होतं.
धर्मांधांच्या माना मी कधीच मुरगळल्या असत्या,
मनुस्मृतीच्या पाऊलखुणा कधीच उरगळल्या असत्या.
धर्मांधांवरची बंदी उठवून तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसलात,
माणुसकीचा भाग म्हणून चक्क लादेन पोसलात.
फासावर ज्यांना द्यायचे त्यांचे पाय चेपत बसलो,
कावा त्यांचा कळला नाही तिथंच आपण फसलो.
निराश नका होऊ पंडितजी, चांगल्या गोष्टीं बाहेर यायला बराच काळ लागेल,
जनताच मग या भोंदूना हिशोब सगळा मागेल.
जे जे होईल ते पहात राहणे, एवढंच आपल्या हाती आहे.
आपल्याच डाव उलटण्याची त्यांनाही भीती आहे.
आपण आता शांत राहू,
नव्या भारताचे स्वप्न पाहू.
नेहरूंनाही मग बरे वाटले,
मलाही मग स्वप्न माझे खरे वाटले.
©के.राहुल ९०९६२४२४५२.
एकमेकांना पाहून क्षणभर थोडे हसले,
आनंदाने मिठी मारून मग निवांत झाडाखाली बसले.
सरदारजी भेटत नाहीत आजकाल, खरंच माझ्यावर रुसलात काय?
गैरसमज नको पंडीतजी,
दीड दमडीच्या लोकांना तूम्ही सुद्धा फसलात काय?
कधी न घडलेल्या गोष्टी मनाला लावून बसलात,
जिवंत असतो आता तर यांची लावली असती वासलात.
तुमच्या माझ्या वादाची हल्ली असते गरमागरम चर्चा.
मी तुमच्याशी कसा वाईट वागलो यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यत मोर्चा.
म्हणूनच सरदारजी सांगा मला, मी कधी चुकीचा वागलोय?
खरं सांगतो दिल्या वचनाला शेवटपर्यंत जागलोय!
तुम्हांला कमीपणा यावा असं माझ्या हातून काही घडलंय का?
निर्णय घेताना कधी तुम्हांला मी तोंडघशी पाडलंय का?
पंडितजी, देश चालवताना असलं कधी मनावर घ्यायचं नसतं.
बैचेन होईल मन त्या वाटेनं जायचं नसतं,
आपलं राजकारण होतं विकासाचं आणि समतेचं.
देशाबद्दलच्या माया आणि ममतेचं!
आपल्यासमोर आव्हान होतं देश उभा करण्याचं,
जात धर्म विसरून देशासाठी मरण्याचं.
तुच्छ यांच्या राजकारणात कित्येक गांधी मरतील,
नथुरामच्या पिलावळी अश्याच देशभक्त ठरतील.
आपली पाटी कोरी असली की माणसं दुसऱ्याची उणीदुणी काढत बसतात,
लोकशाहीचा संकोच झाला की सामान्य लोकंही मग त्याला फसतात.
स्वातंत्र्य मिळाले की मी काढता पाय घेतला,
लोकशाही रुजण्याआधीच काळ जीवावर बेतला.
अजून थोडं आयुष्य मला मिळायला हवं होतं,
तुमच्या बदनामीचं राजकारण माझ्यासाठी नवं होतं.
धर्मांधांच्या माना मी कधीच मुरगळल्या असत्या,
मनुस्मृतीच्या पाऊलखुणा कधीच उरगळल्या असत्या.
धर्मांधांवरची बंदी उठवून तुम्ही त्यांच्या जाळ्यात फसलात,
माणुसकीचा भाग म्हणून चक्क लादेन पोसलात.
फासावर ज्यांना द्यायचे त्यांचे पाय चेपत बसलो,
कावा त्यांचा कळला नाही तिथंच आपण फसलो.
निराश नका होऊ पंडितजी, चांगल्या गोष्टीं बाहेर यायला बराच काळ लागेल,
जनताच मग या भोंदूना हिशोब सगळा मागेल.
जे जे होईल ते पहात राहणे, एवढंच आपल्या हाती आहे.
आपल्याच डाव उलटण्याची त्यांनाही भीती आहे.
आपण आता शांत राहू,
नव्या भारताचे स्वप्न पाहू.
नेहरूंनाही मग बरे वाटले,
मलाही मग स्वप्न माझे खरे वाटले.
©के.राहुल ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment