कविता - बलात्कार
आता रोज निघेल कुठे ना कुठे मोर्चा,
आणि झडत राहतील चर्चा,
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
तुला ओरबडून जिवंत जाळल्याच्या.
सो कॉल्ड उच्चभ्रू काढतील कॅडल मार्च,
येतील वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आणि दिले जातील मीडिया बाईट,
तुझ्या देहावर झालेल्या अत्याचाराच्या वर्णनांनी भरून जातील वृत्तपत्रांची पाने.
चौका चौकात होईल रोष व्यक्त गुन्हेगारांचे पुतळे जाळून,
म्हणतील सगळे त्यांना तात्काळ फासावर चढवा किंवा मरेपर्यत बडवा.
दिल्या जातील मुलाखती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या,
म्हणेल कुणी त्या पुरुषांचे लिंग छाटून टाका,
त्यांनाही जाळा जिवंत भर चौकात.
परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा राजकारणी घेतील दखल आणि करतील नराधमांना अटक,
पहिल्याच तारखेला मिळेल त्यांना जामीन,
चालू होतील कोर्ट कचेऱ्या आणि पडत राहतील तारखा,
सामान्यांना विस्मरण होईपर्यंत.
हळू हळू पहिल्या पानावरची बातमी शेवटच्या पानावर जाऊन विरून जाईल.
थकून जातील तुझ्या घरचे न्यायाची प्रतिक्षा करून,
कदाचित न्याय मिळण्याअगोदर जातील मरून.
एवढे करूनही त्यांना मरेपर्यत फाशीची शिक्षा होईल की नाही सांगता येत नाही,
कारण कायद्याला लागतात पुरावे प्रत्यक्षदर्शींचे,
तेही आता शक्य नाही कारण एकमेव साक्षीदार तू आता हयात नाहीस.
तरीही झाली शिक्षा तर तू परत येणार आहेस का? हा न्याय पाहायला.
मला वाटते, असह्य वेदना सहन करून,
यातून तू कायमची सुटलीस तरी.
पण बलात्काराचे डाग घेऊन जगणाऱ्या कित्येक आहेत,
लोकांच्या भेदक नजरा त्यांना रोज टोचत असतात टाचन्यांसारख्या.
समाज त्यांना किती घाण वागवतो तुला आता कळणार नाही,
ही पण आपलीच आहे तिला आधार द्यावा असे कुणाला वाटणार नाही.
आणि हो पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव म्हणून का असेना,
स्त्रियाही असतात आघाडीवर त्यांना रोज जिवंतपणी मरणयातना देताना.
त्यांचा स्वीकार कराच असे मी म्हणणार नाही,
पण सन्मानाची वागणूक देणे शक्य आहे.
'बलात्कार होईल बाहेर जाऊ नकोस', असे म्हणून मुलीला बंधनात ठेवण्यापेक्षा,
आपल्या मुलाला माणूसपण शिकवायला हवे,
त्याला ही आता सांगायला हवे,
आदर कर प्रत्येक स्त्रीचा एवढंच मागणं मागायचंय,
तुझ्या घरातही मुली आणि स्त्रिया आहेत आणि त्यांनाही निर्भयपणे जगायचंय.
©के. राहुल 9096242452
आता रोज निघेल कुठे ना कुठे मोर्चा,
आणि झडत राहतील चर्चा,
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
तुला ओरबडून जिवंत जाळल्याच्या.
सो कॉल्ड उच्चभ्रू काढतील कॅडल मार्च,
येतील वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आणि दिले जातील मीडिया बाईट,
तुझ्या देहावर झालेल्या अत्याचाराच्या वर्णनांनी भरून जातील वृत्तपत्रांची पाने.
चौका चौकात होईल रोष व्यक्त गुन्हेगारांचे पुतळे जाळून,
म्हणतील सगळे त्यांना तात्काळ फासावर चढवा किंवा मरेपर्यत बडवा.
दिल्या जातील मुलाखती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या,
म्हणेल कुणी त्या पुरुषांचे लिंग छाटून टाका,
त्यांनाही जाळा जिवंत भर चौकात.
परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा राजकारणी घेतील दखल आणि करतील नराधमांना अटक,
पहिल्याच तारखेला मिळेल त्यांना जामीन,
चालू होतील कोर्ट कचेऱ्या आणि पडत राहतील तारखा,
सामान्यांना विस्मरण होईपर्यंत.
हळू हळू पहिल्या पानावरची बातमी शेवटच्या पानावर जाऊन विरून जाईल.
थकून जातील तुझ्या घरचे न्यायाची प्रतिक्षा करून,
कदाचित न्याय मिळण्याअगोदर जातील मरून.
एवढे करूनही त्यांना मरेपर्यत फाशीची शिक्षा होईल की नाही सांगता येत नाही,
कारण कायद्याला लागतात पुरावे प्रत्यक्षदर्शींचे,
तेही आता शक्य नाही कारण एकमेव साक्षीदार तू आता हयात नाहीस.
तरीही झाली शिक्षा तर तू परत येणार आहेस का? हा न्याय पाहायला.
मला वाटते, असह्य वेदना सहन करून,
यातून तू कायमची सुटलीस तरी.
पण बलात्काराचे डाग घेऊन जगणाऱ्या कित्येक आहेत,
लोकांच्या भेदक नजरा त्यांना रोज टोचत असतात टाचन्यांसारख्या.
समाज त्यांना किती घाण वागवतो तुला आता कळणार नाही,
ही पण आपलीच आहे तिला आधार द्यावा असे कुणाला वाटणार नाही.
आणि हो पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव म्हणून का असेना,
स्त्रियाही असतात आघाडीवर त्यांना रोज जिवंतपणी मरणयातना देताना.
त्यांचा स्वीकार कराच असे मी म्हणणार नाही,
पण सन्मानाची वागणूक देणे शक्य आहे.
'बलात्कार होईल बाहेर जाऊ नकोस', असे म्हणून मुलीला बंधनात ठेवण्यापेक्षा,
आपल्या मुलाला माणूसपण शिकवायला हवे,
त्याला ही आता सांगायला हवे,
आदर कर प्रत्येक स्त्रीचा एवढंच मागणं मागायचंय,
तुझ्या घरातही मुली आणि स्त्रिया आहेत आणि त्यांनाही निर्भयपणे जगायचंय.
©के. राहुल 9096242452
Comments
Post a Comment