Skip to main content

कविता - बलात्कार

कविता - बलात्कार

आता रोज निघेल कुठे ना कुठे मोर्चा,
आणि झडत राहतील चर्चा,
गल्लीपासून दिल्लीपर्यंत,
तुला ओरबडून जिवंत जाळल्याच्या.
सो कॉल्ड उच्चभ्रू  काढतील कॅडल मार्च,
येतील वर्तमानपत्रात त्यांचे फोटो आणि दिले जातील मीडिया बाईट,
तुझ्या देहावर झालेल्या अत्याचाराच्या वर्णनांनी भरून जातील वृत्तपत्रांची पाने.
चौका चौकात होईल रोष व्यक्त गुन्हेगारांचे पुतळे जाळून,
म्हणतील सगळे त्यांना तात्काळ फासावर चढवा किंवा मरेपर्यत बडवा.
दिल्या जातील मुलाखती स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाच्या,
म्हणेल कुणी त्या पुरुषांचे लिंग छाटून टाका,
त्यांनाही जाळा जिवंत भर चौकात.
परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा राजकारणी घेतील दखल आणि करतील नराधमांना अटक,
पहिल्याच तारखेला मिळेल त्यांना जामीन,
चालू होतील कोर्ट कचेऱ्या आणि पडत राहतील तारखा,
सामान्यांना विस्मरण होईपर्यंत.
हळू हळू पहिल्या पानावरची बातमी शेवटच्या पानावर जाऊन विरून जाईल.
थकून जातील  तुझ्या घरचे न्यायाची प्रतिक्षा करून,
कदाचित न्याय मिळण्याअगोदर जातील मरून.
एवढे करूनही त्यांना मरेपर्यत फाशीची शिक्षा होईल की नाही सांगता येत नाही,
कारण कायद्याला लागतात पुरावे प्रत्यक्षदर्शींचे,
तेही आता शक्य नाही कारण एकमेव साक्षीदार तू आता हयात नाहीस.
तरीही झाली शिक्षा तर तू परत येणार आहेस का? हा न्याय पाहायला.
मला वाटते, असह्य वेदना सहन करून,
यातून तू कायमची सुटलीस तरी.
पण बलात्काराचे डाग घेऊन जगणाऱ्या कित्येक आहेत,
लोकांच्या भेदक नजरा त्यांना रोज टोचत असतात टाचन्यांसारख्या.
समाज त्यांना किती घाण वागवतो तुला आता कळणार नाही,
ही पण आपलीच आहे तिला आधार द्यावा असे कुणाला वाटणार नाही.
आणि हो पुरुष प्रधान संस्कृतीचा प्रभाव म्हणून का असेना,
स्त्रियाही असतात आघाडीवर त्यांना रोज जिवंतपणी मरणयातना देताना.
त्यांचा स्वीकार कराच असे मी म्हणणार नाही,
पण सन्मानाची वागणूक देणे शक्य आहे.
'बलात्कार होईल बाहेर जाऊ नकोस', असे म्हणून मुलीला बंधनात ठेवण्यापेक्षा,
आपल्या मुलाला माणूसपण शिकवायला हवे,
त्याला ही आता सांगायला हवे,
आदर कर प्रत्येक स्त्रीचा एवढंच मागणं मागायचंय,
तुझ्या घरातही मुली आणि स्त्रिया आहेत आणि त्यांनाही निर्भयपणे जगायचंय.
©के. राहुल 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...