भगत सिंह, बोस और नेहरू
अपूर्वानंद
https://satyagrah.scroll.in/article/18009/netaji-bose-or-nehru-who-was-the-greater-revolutionary-according-to-bhagat-singh?fbclid=IwAR3Rpx10wRnIdtPxqrGKQP43vggqf7M3CZf6VG79NczJgAGoUbYZe8mwLXU
====================================
भगत सिंह की नजर में बोस संकीर्ण और नेहरू दूरदृष्टि वाले क्रांतिकारी थे
सुभाष चंद्र बोस को एक भावुक बंगाली मानने वाले भगत सिंह, जवाहरलाल नेहरू को एक अंतरराष्ट्रीय सोच वाले नेता के तौर पर देखते थे
लेकिन खुद भगत सिंह, बोस और नेहरू के बारे में क्या सोचते थे? अगर उन्हें फांसी नहीं हुई होती तो उन्होंने कौन सी राह पकड़ी होती? क्या सुभाष चंद्र बोस के कांग्रेस छोड़ने और आजाद हिंद फौज बनाने के बाद भगत सिंह उनके साथ मिल गए होते? भगत सिंह के आदर्श कौन थे? बोस या नेहरू?
1928 में भगत सिंह ने किरती नामक एक पत्र में ‘नए नेताओं के अलग-अलग विचार’ शीर्षक से एक लेख लिखा था. तब वे सिर्फ 21 साल के थे. इस लेख में उन्होंने बोस और नेहरू के नजरिये की तुलना की है. उन दिनों असहयोग आंदोलन की असफलता के चलते हर तरफ निराशा का माहौल था. ऐसे में भगत सिंह ने यह लेख इस मंतव्य के साथ लिखा था कि वे कोई राजनीतिक राह चुनने में पंजाब के युवाओं की मदद कर सकें.
भगत सिंह न कांग्रेस के नेता थे और न ही वे भारतीय कम्युनिस्ट पार्टी के सदस्य थे. सांप्रदायिक विचार रखने के लिए तो उन्होंने आजादी की लड़ाई के प्रतिष्ठित नामों में गिने जाने वाले लाला लाजपत राय को भी नहीं बख्शा था. ऐसे में यह जानना दिलचस्प हो सकता है कि भगत सिंह इन दो राष्ट्रवादी नेताओं के बारे में क्या सोचते थे.
अपने लेख में भगत सिंह बोस को एक भावुक बंगाली बताते हैं. उनके मुताबिक सुभाष चंद्र बोस भारत की प्राचीन संस्कृति के भक्त हैं जबकि जवाहरलाल नेहरू अंतर्राष्ट्रीय दृष्टि वाले नेता. भगत सिंह के मुताबिक बोस कोमल दिल और रूमानी सोच वाले नेता हैं. दूसरी ओर वे नेहरू को परंपराओं से बगावत करने वाले नेता के तौर पर देखते हैं. अमृतसर और महाराष्ट्र में हुए कांग्रेस के सम्मेलनों में दोनों नेताओं के भाषण का अध्ययन करने के बाद भगत सिंह कहते हैं कि भले ही बोस और नेहरू, दोनों पूर्ण स्वराज के समर्थक हैं, लेकिन उन दोनों की सोच में जमीन-आसमान का अंतर है.
अपने लेख में भगत सिंह बॉम्बे में हुई एक बैठक का उदाहरण देते हैं जो नेहरू की अध्यक्षता में हुई थी और जिसमें बोस ने भाषण दिया था. अपने लेख में भगत सिंह ने बोस के उस भाषण को एक सनक भरा प्रलाप कहा है जिसमें टिप्पणी की गई थी कि विश्व के लिए भारत के पास एक विशेष संदेश है. अपनी टिप्पणी में भगत कहते हैं कि पंचायती राज से समाजवाद तक बोस हर चीज की जड़ प्राचीन भारत में देखते हैं और मानते हैं कि भारत का अतीत महान था. भगत सिंह को बोस का राष्ट्रवाद संकीर्ण और आत्ममुग्धता से भरा लगता है. वे बोस की इस बात से इत्तेफाक नहीं रखते कि दूसरे देशों की तरह भारत का राष्ट्रवाद संकीर्ण नहीं है.
इसके बाद अपने लेख में भगत सिंह नेहरू के अध्यक्षीय भाषण की तरफ बढ़ते हैं. नेहरू बोस की बात काटते हैं. उनके मुताबिक हर देश को यह लगता है कि उनके पास दुनिया को देने के लिए कुछ विशेष और अनूठा संदेश है. वे कहते हैं, ‘मुझे अपने देश में कुछ विशेष नहीं लगता. ऐसी बातों में सुभाष बाबू यकीन रखते हैं.’
बोस और नेहरू की सोच में फर्क है. सुभाष चंद्र बोस इसलिए अंग्रेजों से आजादी चाहते हैं कि वे पश्चिम के हैं और हम पूरब के. जवाहरलाल नेहरू इसलिए आजादी चाहते हैं कि स्वशासन के जरिये हम अपनी सामाजिक व्यवस्था बदल सकते हैं. नेहरू के अनुसार हमें पूर्ण स्वतंत्रता और स्वशासन सामाजिक बदलाव के लिए चाहिए.
भगत सिंह कहते हैं कि बोस के लिए अंतर्राष्ट्रीय राजनीति का महत्व सिर्फ उस हद तक है जहां तक इससे भारत की सुरक्षा और विकास का सवाल जुड़ा हो. जबकि दूसरी तरफ नेहरू राष्ट्रवाद के संकीर्ण दायरों से बाहर निकलकर अंतर्राष्ट्रीयतावाद नाम के खुले मैदान में आ चुके हैं.
दोनों नेताओं की सोच की तुलना करने के बाद अपने लेख में भगत सिंह सवाल करते हैं, ‘अब जबकि हम उनके विचार जान चुके हैं, हमें अपना विकल्प चुनना होगा.’ भगत सिंह के मुताबिक बोस के पास ऐसा कुछ भी नहीं है जिससे युवाओं की बौद्धिक प्यास बुझ सके. भगत सिंह बोस के राष्ट्रवाद के नारे से प्रभावित नहीं थे. बौद्धिक रूप से उन्हें नेहरू ज्यादा चुनौतीपूर्ण और तृप्तिदायक लगते थे. उनके मुताबिक पंजाब के युवाओं को बौद्धिक खुराक की शिद्दत से जरूरत है और यह उन्हें सिर्फ नेहरू से मिल सकती है. भगत लिखते हैं, ‘क्रांति का सही अर्थ समझने के लिए पंजाबी युवाओं को उनके पास जाना चाहिए...युवाओं को अपनी सोच मजबूत करनी चाहिए ताकि हार और निराशा के इस माहौल में वे भटकें नहीं.’
यह देखकर आश्चर्य होता है कि भगत सिंह ने बोस के संकीर्ण और उग्र राष्ट्रवाद के खतरों को कितने साफ तरीके से देख लिया था. यही चीज उन्हें दूसरे क्रांतिकारियों से अलग करती है. इस लेख के छपने के तीन साल बाद भगत सिंह को फांसी हो गई थी. इसके करीब 12 साल बाद बोस ने भारत छोड़ दिया था और सबसे बड़े युद्ध अपराधियों में से कुछ के साथ हाथ मिला लिया था. सुभाष चंद्र बोस के बारे में भगत सिंह की आशंका सही साबित हो गई थी, लेकिन वे यह देखने के लिए मौजूद नहीं थे. लेकिन ऐसा कैसे है कि हम आज भी इसे नहीं देखना नहीं चाहते?
====================================
** काय केले नेहरूंनी? ***
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरूंची वल्लभभाईंसह सर्व जाणकारांनी केलेली निवड पंडितजींनी अनेक अर्थांनी सार्थ ठरवली आहे. आज पं. नेहरूंची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने...
'काय केलं त्या नेहरूंनी?, भारताचं वाटोळंच केलं, या देशाच्या ऱ्हासाला जबाबदार फक्त नेहरू आणि नेहरूच' किंवा 'जर आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी पटेल असते तर आज देश कुठल्या कुठे पोहोचला असता', असे बिनदिक्कत उद्गार काढणारा तरुणवर्ग आज जो दिसतो, त्याला या देशाचा इतिहास एकतर माहिती नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीत वाहवत जाऊन नेहरूंना नावे ठेवण्यासाठी तो पुढे येत असतो. सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याने तर आता नेहरू हे कायमचे खुजे ठरतील अशी व्यवस्थाच केली गेली आहे! इथे वल्लभभाई पटेल पंतप्रधानपदाला पात्र होते की नाही, हा सवालच नाही, पण तेच पात्र होते असे ठासून सांगत त्यांना पंडितजींवर अन्याय करायचा असतो. त्यावेळची ती निवड गांधीजींची आणि अर्थातच वल्लभभाईंसह सर्व काँग्रेसजनांची होती आणि त्यातल्या कुणालाच काही कळत नव्हते, असा दावा करण्याजोगी स्थिती नाही.
पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान जर कोणते असेल, तर या देशाला त्यांनी लोकशाहीचा भक्कम आधारस्तंभ लाभू दिला. स्वतंत्र भारताच्या परराष्ट्र धोरणाला अतिशय योग्य असा आकार दिला. भारताने तटस्थतेचे धोरण स्वीकारले, त्याचे प्रणेते हे केवळ नेहरूच आहेत. त्या वेळच्या परिस्थितीत अमेरिकेच्या बाजूने जाणे योग्य ठरले नसते आणि तेव्हा कम्युनिस्ट असलेल्या सोव्हिएत युनियनच्या गटात जाऊन बसणे आत्मघाती ठरले असते. नेहरूंनी स्वत:चा स्वतंत्र अलिप्त गट तयार केला, ज्याला तेव्हा इजिप्तचे गमाल अब्दुल नास्सेर, इंडोनेशियाचे नेते सुकार्नो, घानाचे नेते एनक्रुमा, तेव्हाच्या युगोस्लाव्हियाचे मार्शल टिटो यांनी तसेच इतरांनी पाठिंबा दिला. परराष्ट्र राजकारणातले नेहरूंचे हे स्थान भल्याभल्यांनी मान्य केले आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांनी १९७७ मध्ये परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेतली, तेव्हा परराष्ट्रमंत्रालयात प्रवेश करताना तिथल्या अधिकाऱ्यांना पहिला प्रश्न केला, की त्यांच्या त्या कार्यालयाच्या मार्गावर असलेले पंडित नेहरूंचे भव्य तैलचित्र कोठे आहे? त्यावेळी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. त्यांनी ते चित्र काढून ठेवले असल्याचे सांगितले. तेव्हा अस्वस्थ बनलेल्या वाजपेयी यांनी ते पुन्हा जिथल्या तिथे लावण्यास त्यांना बजावले आणि आपण आज जगात मान उंच करून चालू शकतो, त्यास नेहरूंचे परराष्ट्र धोरणच कारणीभूत आहे असे सांगितले. यापेक्षा मोठी पावती ती आणखी कोणती हवी? चीनविषयी पटेलांनी बऱ्याच आधी धोक्याचा इशारा दिला होता ही वस्तुस्थिती आहे, पण तेवढीच सांगितली जाते. चीनविषयी नेहरूंनीही आधीपासून सावधता कशी बाळगलेली होती हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना उद्देशून १ ऑक्टोबर १९५९ रोजी लिहिलेल्या पत्रातून स्पष्ट कसे होते ते मात्र दडवून ठेवले जाते. तेव्हाच्या 'नेफा'त भारतीय सैन्याला पराभव पत्करावा लागला हे सांगितले जाते, पण त्याच वेळी लडाखमध्ये चिनी सैन्याशी भारतीय सैन्य अतिशय जिद्दीने लढले आणि चिनी चढाई रोखली गेली हे सांगितले जात नाही.
एकीकडे नेहरू संघातही होते, असे त्यांचे अर्ध्या विजारीतले छायाचित्र दाखवायचे आणि ते हिंदूही नव्हते, असा प्रचार करायचा, असे तंत्र गेली अनेक वर्षे राबवले जात आहे. उत्तर प्रदेशात अलाहाबादला नेहरूंच्या जन्मगावी असलेल्या त्यांच्याच मालकीच्या आनंद भवनासमोर उभारलेला त्यांचा पुतळा हलवला गेला आहे. १९७० मध्ये आनंद भवनाची वास्तु पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केंद्र सरकारला बहाल केली होती. उद्या या आनंद भवनाचेही कोणी अन्य नामकरण करू पाहील तर ते हास्यास्पद होईल. अलाहाबादच्या त्याच भागात असलेला गांधीजींचा पुतळाही हलवायचे प्रयत्न आहेत. लालबहादूर शास्त्रींच्या पुतळ्याचेही स्थलांतर होत आहे. येणाऱ्या कुंभ मेळ्यापूर्वी अलाहाबादचे सुशोभीकरण करण्यासाठीची ही योजना आहे असे सांगण्यात आले, पण त्याच भागातला पंडित दिनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा हलवायची तयारी नाही. पश्चिम बंगालमध्ये तर नेहरूंच्या पुतळ्याला काही दिवसांपूर्वी डांबर फासले गेले. सत्ताबदल होताच त्रिपुरात लेनिनचा पुतळा पाडला गेला. वातावरण इतके दूषित का बनले त्याचा विचार केला जाण्याची आवश्यकता नक्कीच आहे. नेहरूंच्या सहीची रोज दोन हजार पत्रे रवाना होत. रात्रीचे चार तास ते त्यासाठी राखून ठेवायचे. ग्रामीण भारताच्या विकासाचे स्वप्न (खेडेकेंद्रीत अर्थव्यवस्था) गांधीजींनी पाहिले, तर नेहरूंनी त्याविरोधात जाऊन औद्योगिक व्यवस्थेत प्रशासकीय सहभागाच्या आवश्यकतेवर भर दिला. सार्वजनिक उद्योगांची त्यांनी साखळी निर्माण केली. विज्ञान, तंत्रज्ञानावर भर दिला आणि अणुशक्तीची पायाभरणी केली. भारतीय अर्थव्यवस्थेची पवित्र मंदिरे, असे ज्याविषयी नेहरूंनी लिहिले, ते बोकारो, भिलई, दुर्गापूर, राऊरकेला हे पोलाद प्रकल्प उभे करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. तेव्हाच्या मध्यप्रदेशात आणि आताच्या छत्तीसगढ राज्यात भिलईला तेव्हाच्या सोव्हिएत युनियनच्या मदतीने प्रकल्प निश्चित केला गेला, तेव्हा भूमीपूजन समारंभास त्यांच्यासमवेत जे पत्रकार होते. त्यांनी त्या जागेवर टीका केली आणि पुढल्या कित्येक वर्षात तिथे काही घडण्याची शक्यता नसल्याचे भाकित केले. तिथे ना कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था होती, ना पुरेसे पाणी. त्यानंतर वर्षभराने पुन्हा त्याच पत्रकारांना नेहरूंसमवेत जाण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांचा डोळ्यांवर विश्वाासच बसला नाही. ही किमया नेहरूंच्या धडाडीची होती.
धर्मनिरपेक्ष भारताची संकल्पना पुढे आली, तेव्हा नेहरू पटेलांना म्हणाले की, आपल्या मुस्लिम बांधवांवर त्यामुळे पडणाऱ्या जबाबदारीची जाणीव त्यांना द्या. याचा अर्थ ते मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे होते किंवा हिंदूद्वेष्टे होते असा होत नाही. नेहरूंची १२५ वी जयंती होऊन गेली, त्याला चार वर्षे झाली. २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूदही केली होती. त्या वीस कोटी रुपयांचे काय झाले? आणखी एका वर्षाने लोकमान्य टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. नेहरूंनी हॅरोत शिक्षण घेताना आपले वडील मोतीलाल यांना टिळकांविषयी लिहिलेली पत्रे वाचनीय आहेत. मोतीलाल हे गोखले यांच्या बाजूचे होते, म्हणजेच ते नेमस्त बाजूचे होते आणि त्यावेळच्या राजकारणात ते टिळकांच्या विरोधात होते, तरी अलाहाबादेत टिळकांच्या आगमनप्रसंगी टिळक नको म्हणत असतानाही त्यांना रथात बसवून तो हाताने ओढणाऱ्यांमध्ये मोतीलाल नेहरू होते. तरुण जवाहरलाल मात्र टिळकांच्या जहाल धोरणाच्या बाजूचे होते. हे मी मुद्दाम अशासाठी स्पष्ट केले की, राजकारणात हे असे घडले तरी कोणीही कायमचा शत्रू किंवा मित्र असत नाही. सध्याचे चित्र मात्र वेदनादायी आहे. आपल्याकडे संस्कार आहेत असा ज्यांचा दावा असतो, ते कधीही आपल्या पूर्वसूरींबद्दल वाईट बोलत नसतात, त्यात पत्रकार ते पंतप्रधान असे सर्वचजण येतात. सुज्ञास काय सांगणे?
>> अरविंद व्यं. गोखले
(लेखक परराष्ट्रसंबंधांचे तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक आहेत.) https://www.facebook.com/mitesh.take/posts/2683396778346149
(लेखक परराष्ट्रसंबंधांचे तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक आहेत.) https://www.facebook.com/mitesh.take/posts/2683396778346149
=================================================
Comments
Post a Comment