Skip to main content

अर्थसंकल्प २०२०-२१


अर्थसंकल्प २०२०-२१: तरतूदी आणि अपेक्षा!


             महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी मार्च २०२० रोजी महाराष्ट्राचा ,९०,००० कोटी रुपयांचाS अर्थसंकल्प जाहीर केला. मंदीसदृश्य परिस्थिती, वाढत्या कर्जाचा डोंगर, उत्पन्नात झालेली लक्षणीय घट आणि केंद्र सरकारने राज्याचा उत्पन्नाचा वाटा देताना घेतलेला आखडता हात या पार्श्वभूमीवर अर्थमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प मांडला. त्यामुळे अर्थसंकल्पातून आपल्या हाती काय येणार याकडे शेतकरी, नोकरदार वर्ग आणि महागाईने भरडलेली सामान्य जनता डोळे लावून बसली होती. त्यामुळे सामान्य जनतेच्या आणि शेतकरी-नोकरदार आणि उद्योजक वर्गाच्या दृष्टीने या अर्थसंकल्पाकडे पाहायला हवे:

# महत्वाच्या आणि जमेच्या बाजू:
. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी  संपूर्ण कर्ज भरावे म्हणून एकरकमी तडजोड योजना राबविणे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल शिवाय बँका आणि पतसंस्थांच्या अनुत्पादक कर्जात घट होईल.
. ३० सप्टेंबर २०१९ पर्यत ज्या शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची कर्जे घेतली आहेत त्यांचेही दोन लाखांचे कर्ज माफ होईल.
. ज्या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली कर्जे भरली आहेत त्यांना प्रोत्साहन राशी म्हणून त्यांच्या बँक खात्यात थेट पन्नास हजार रुपये जमा केले जातील. त्यामुळे नियमित कर्जे भरणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल.
. औद्योगिक वापराच्या विजेवरील कर .% वरून .% इतका कमी केला आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनांचा खर्च कमी होऊन ती कमी किंमतीत उपलब्ध होतील.
. शहरी भागातील गरिबांना अल्पदरात भोजन उपलब्ध व्हावे म्हणून सुरू केलेल्या शिवभोजन योजनेसाठी १५० कोटींचे अनुदान देणे. त्यामुळे जास्त संख्येने गरीब लोकांना त्याचा फायदा होईल.
. सामाजिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांच्या विकासासाठी ९६६८ कोटी रुपयांची तरतूद.
. तृतीयपंथीय आणि तत्सम वर्गासाठी वेगळे महामंडळ स्थापन करण्यासाठी पाच कोटींची तरतूद.
. महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी महिला आणि बालकल्याण विभागाला २१०० कोटीची तरतूद
. महाराष्ट्रातीलसर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील मुलींना शाळेतच सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.
१०. प्रत्येक तालुक्यात उच्च गुणवत्ता आणि सर्व सोयी सुविधांयुक्त किमान चार शाळा शाळा उभारणे.
११. आरोग्य विभागासाठी पाच हजार कोटींची तरतूद केली आहे त्यापैकी २५०० कोटी वैद्यकीय शिक्षणासाठी, नवीन दवाखाने उभे करण्यासाठी, अगोदर असलेली रुग्णालये अद्ययावत करण्यासाठी आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यासाठी वापरले जातील.
१२.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि मुंबई विद्यापीठ, मुंबई यांच्या कार्यक्षेत्रात ५०० विद्यार्थी क्षमतेची मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे उभारणे.
१३. उच्च शिक्षणासाठी १३०० कोटींची तरतूद.
१४. राज्य परिवहन महामंडळाला नवीन १६०० बस खरेदी करण्यासाठी ४०१ कोटींची तरतूद.
१५. शेतकऱ्यांना दर वर्षी लाख सोलर पंप खरेदीसाठी ६७० कोटी तर पशुधन मत्स्य विकास आणि संवर्धनासाठी ३२५४ कोटींची तरतूद.
१६. सार्वजनिक बांधकाम खात्यासाठी १०,५०० कोटींची तरतूद.

# खर्चाच्या आणि  कमकुवत बाजू:
. पेट्रोल आणि डिझेलवरील करात एक रुपया वाढ केल्याने वाहतूक आणि प्रवास महाग होणार आहे.
. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने कोणतीही ठोस उपाययोजना सादर केलेली नाही.
. केंद्र सरकार राज्य सरकार दोन्हींच्या उत्पन्नात घट झाल्याने यासाठी लागणारा निधी कोठून आणि कसा उभा करणार यावर अर्थसंकल्पात ठळक भाष्य नाही.

अपेक्षा:
. गावोगावी वाचन संस्कृती रुजण्यासाठी गाव तेथे ग्रंथालय सारख्या योजना सुरू करून त्यांना निधी पुरविणे आवश्यक.
. वह्या आणि पुस्तक छपाई आणि विक्रीवर २८% इतका जीएसटी असल्याने त्यांच्या किमती जास्त आहेत त्यामुळे त्यावरील करकपात अपेक्षित आहे.
. मागासवर्गीय, महिला, बालकल्याण आणि पायाभूत सुविधावरील खर्च भागविण्यासाठी भरघोस निधीची तरतूद करणे आणि तो इतरत्र वळविला जाणार नाही यासाठी ठोस पावले उचलणे अपेक्षित आहे.
.प्रत्येक शेती उत्पादनासाठी जिल्हानिहाय उत्पादन खर्च अधिक नफा हे सूत्र लक्षात घेऊन  हमीभावाची योजना जाहीर करणे अपेक्षित आहे.
. राज्याचे उत्पादन आणि रोजगार वाढीसाठी लघु मध्यम आकाराच्या उत्पादनाधारीत उद्योगांना उभारणी आणि स्थिरतेसाठी निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे.
६. केंद्र सरकारची वाट न बघता शिक्षण हक्क कायदा, २००९ ची इयत्ता १२ वी पर्यत अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तरतूद करणे अपेक्षित आहे. 
प्रा. डॉ. राहुल सदाशिव खरात
९०९६२४२४५२.



Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...