Skip to main content

आणीबाणी आणि दलितहीत

आणीबाणीकडे बघायचा एक दलित दृष्टिकोनही आहे. त्याबद्दल चर्चा होत नसते. पण आणीबाणी दलितांसाठी एक मुक्तीचा मार्ग होता. तो त्यांचासाठी सुवर्णकाळ होता. दलित खर्या अर्थाने सामाजिक राजकीय नी आर्थिक स्वातंत्र्यचा अनुभव घेऊ लागले होते. दलितांना मिशा वाढवून फिरण सुद्धा ज्या देशात बंदी होती त्या देशात ते मिशा वाढवून अभिमानाने कोणतीही भिती वा तमा न बाळगता फिरू लागले होते. त्यांना आता गावातल्या धनदांडग्यांची, जमिनदारांची, जातपंचायतीची कसलीही भिती वाटतं नव्हती. कारण आणीबाणीचा काळात व्यवस्था एकदम शिस्तीत काम करत होती. प्रस्थापित वर्ग इंदिरा गांधीना घाबरत होता. दलितांवरचे अत्याचार अचानक कमी झाले होते.

एवढचं नाही तर त्याकाळात इंदिरा गांधीनी दलित अदिवासी हिताचे अनेक निर्णय घेतले होते.इ इंदिरा गांधीं विरोधी गट हा इंदिराजींचा राजकीय आणीबाणीला विरोध करत असताना त्यांचा सामाजिक व आर्थिक निती काय होत्या? दलित वंचितांसाठी निती काय होत्या याकडे मात्र दुर्लक्ष करतात. इंदिरा गांधी विरोधी गट मुख्यतः आरक्षण नी बँकांचा राष्ट्रीयकरणा विरोधात होता. तो गट प्रस्थापित उद्योगपतींचा बटिक होता. काँग्रेस मध्ये फुट पडण्यास 1969 मध्येच इंदिराजींनी घेतलेल्या बँकांच्या राष्ट्रीयकरणाच्या निर्णयानंतर सुरूवात झाली होती.

आणीबाणी काळात पाचव्या पंचवार्षिक योजनेत दलितांच्या कल्याणासाठीचं बजेट 150 कोटींवरून 1360 कोटींवर गेलं. Growth with Stability ऐवजी Growth with Social Justice ही घोषणा पुढे जाऊन गरीबी हटाव ही झाली.

72 मध्ये सगळ्या मुख्यमंत्र्यांची राष्ट्रीय बैठक घेउन Land Ceiling Act चा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय झाला. 78 लाख एकर जमीन अतिरिक्त होती, त्यातील 50% जमीन दलितांना देण्याचा निर्णय झाला.

75 मध्ये UGC ने विद्यापीठांमध्ये दलित शिक्षकांना आरक्षण देऊन त्यांच्या नियुक्त्या करण्यास सुरूवात केली. एवढचं नाही तर सरकारी फंड घेणाऱ्या खाजगी संस्थांना देखील दलितांना आरक्षण देण्यास आवश्यक बनवलं.
याच वर्षी केंद्र सरकारने IITs मध्ये दलितांचा कोटा भरला जात नसेल तर 50% गुण प्राप्त विद्यार्थींनाही प्रवेश देण्यासाठीचं एक सर्कयुलर काढल होतं. याचा परिणाम मेडिकल कॉलेजांवरही झाला. इतिहासात प्रथमच दलितांना खर्या अर्थाने उच्च शिक्षणाचे दरवाजे खुले झाले. केंद्रीय शाळांमध्येही दलितांना आरक्षणाची सोय केली गेली.

76 मध्ये Higher and Lower Judiciary मध्ये दलितांना आरक्षणाचा निर्णय घेतला गेला. इंदिरा गांधीनी याच काळात खाजगी क्षेत्रात दलित आरक्षणावर उच्च स्तरीय बैठक घेऊन चर्चा सुरू केली.

केंद्र सरकारमध्ये 67 हजार दलितांची नियुक्ती 74 ते 77 या तीन वर्षांत झाली तर राज्य सरकारांमध्ये लाखोंनी. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री बहुगुणा यांनी उत्तर प्रदेशातल्या 10% पोलिस चौकींचं प्रमुख म्हणून दलित पोलिस अधिकार्यांना नेमण्याचा निर्णय घेतला, पण पोलिस प्रशासनात तेवढी दलित पोलिस अधिकार्यांची संख्या नव्हती म्हणून Police Sub Inspector पदावर दलितांसाठी 30% जागा राखीव ठेवल्या.

इंदिरा गांधींवर टिका करत असताना लिबरल विचारवंत व पत्रकार इंदिराजींचा या व्यक्तीमत्वाकडे दुर्लक्ष करतात. त्यांचा सामाजिक नी दलित वंचित समाजाच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्णयांवरती फार कुणी चर्चा करताना दिसत नाही. दलित हा विषय आजही अस्पृश्यच आहे. *आणीबाणीचा काळ इंदिरा गांधीच्या राजकीय विरोधकांसाठी "काळा" दिवस असेल, पण दलितांसाठी तो "सुवर्णकाळच" होता*

Sagar Waghmare

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...