Skip to main content

वैचारिक पंढरीची वारी


**********
🚩 *|| वैचारिक पंढरीची वारी ||* 🚩
*। आप आपल्या घरी ।*
🍁🌾🍁🌾🍁🌾🍁🌾🍁
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षाची या वारीला परंपरा आहे, राज्यात कोरोना महामारीची वर्तमान स्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, देहू आणि आळंदीहून पंढरपूर ठिकाणी पायीवारी जाणार नाही हा वैचारिक निर्णय घेणार्या सर्व वारकरी संप्रदायाचे अभिनंदन•••••

पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य मानले जाते. हजारो वर्षांचा प्राचीन इतिहास आणि वैभवशाली परंपरा जपणार्‍या वारीत टाळ, मृदंग गर्जत आणि मुखी पांडुरंगाचे नाव घेत, नाचत लाखो वारकरी सहभागी होतात. आषाढी वारीचा हा आनंद सोहळा बहुजनांच्या आयुष्यांला धन्य धन्य झाल्याचा अनुभव देतो
पंढरीची वारी, संताच्या दिंड्या, ज्ञानदेव व तुकाराम पालख्या ह्या सोहळ्याची सुरवात नेमकी कोणत्या काळात झाली तसेच वारी, दिंड्या, पालख्याचा आरंभ कोणी केला या सारख्या प्रश्नात न पडता आपण सरळसरळ पाहणार आहोत•••••

पंढरपूरला जाणार्या दिंड्या किंवा वारीचा गाभा हा नक्कीच समाजभिमुख आहे आणि वारीचा *संदेश जितका धार्मिक आणि अध्या‌त्मिक आहे, तसेच संताच्या वारीचा संदेश त्याग आणि बलिदानाचा देखील आहे.* अध्यात्मिक धार्मिक दृष्टीने पाहता सर्वसामान्य माणसा मध्ये मान-सन्मान, काम- क्रोध, मद-मस्तर, अहंकार, निंदा, तृष्णा हे मानवी मनोविकार आहेत.दैनंदिनी व्यवहारात मणुष्य ह्या मनोविकारचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वापर करतो.आपल्या कडे धार्मिक आणि अध्यात्मिक साधनेच्या क्षेत्रात जसा "साक्षात्कार " हा शब्द वारंवार वापरला जातो. साक्षात्कारचा अर्थ प्रत्यक्ष अनुभव असाच आहे आणि हा प्रत्यक्ष अनुभव घ्यायला जेव्हा वेगवेगळ्या जातीचे वारकरी प्रत्यक्ष पंढरीच्या वारीत येतो तेव्हा•••••
*त्याचा काम, क्रोध, मद, मस्तर, अहंकार, निंदा, तृष्णा हे मानवी मनोविकार वारीच्या वारकर्याचे नाहीसं होतात का?*

*वारी संपल्यावर वारकरी जेव्हा आपआपल्या घरी जातात तेंव्हा स्वतःच्या जातीची घंमेड बाळगतो का?*

*आपल्या जतिला इतर जातीपेक्षा श्रेष्ठ समजून खालच्या जातीवर अन्याय अत्याचार करतो का ?*
वर्णाचा अभिमान बाळगून, संपत्तीचा गर्व करतो का ?

आपन वैचारिक वारीत समजावून घेणार आहोत की•••••

पंढरीच्या वारीच्या परंपरेचा इतिहास पाहता संपूर्ण महाराष्ट्रातून वारीत सामिल होण्यासाठी ज्या दिंड्या येतात त्या *दिंड्याचा सामुहिक उद्देश नक्कीच एक असेल,* तर आपण पाहणार आहोत की, तो *उद्देश काय आहे ?*
पंढरपूरच्या वारीचा उद्देश जर एक आहे तर त्या *उद्देशाला पुर्ण करणारी नक्कीच एक विशिष्ट विचारधारा असेल* तर आपण पाहणार आहोत, त्या उद्देशाला पुर्ण करणारी *विचारधारा कोणती आहे ?*

पंढरीच्या वारी ला उद्देश आहे. वारीला विचारधारा आहे म्हणजे *वारीत सामील होणार्या दिंड्यात सहभागाची प्रेरणा देणारा नक्कीच कोणी तरी एक असा महापूरूष असेल*, तर आपण पाहणार आहोत तो *महापूरूष कोण होता ?*

 तसेच आपन बौद्धिक वारीत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत*••••••••••••••••

पंढरीच्या वारीच्या दिंड्या आणि त्यामध्ये सहभागी होणारा वारकरी हा बहुजनांचे प्रतिनिधित्व करणारा आहे कारण हे *वारीकरी सामाजीक व्यवस्थेत तळागाळातील आहेत.जर हा वारीकरी तळागळातला आहे* तर तो *निश्चितच धार्मिक व्यवस्थेचा बळी आहे*.जर हा सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेचा बळी आहे तर तो दु:खी आहे, कष्टी आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या *वारकर्याचे दुखः, कष्ट, वेदना एकसारख्या नाहीत त्या असमान आहेत.*

तेंव्हा आपण पाहणार आहोत की, *बहुजनांच्या सामाजिक आणि धार्मिक संस्कार संस्कृतीच्या दहशतवादाच्या दुखः, कष्ट-वेदनांचा निर्माता जर एक आहे तर त्यांच्या दुखः, कष्ट- वेदने मध्ये असमनता कशी असू शकते?*
*बहुसंख्या बहुजनांच्या सामुहिक दुखःचा, वेदनेचा निर्माता कोण आहे ?*

*संत कबीरा पासून ते संत तुकारामांनी ह्या दुखःतुन बाहेर पडण्याचा कोणता मार्ग बहुजनांना सांगितला होता ?*

*ह्या वेदनेतून, ह्या दुख:तून बाहेर पडण्याचा जो मार्ग संतानी सांगितला त्या मार्गाचा मार्गदाता कोण होता ?*

*मार्गदात्याने सांगितलेली दुखः निवारण्याची संसाधने कोणती होती आणि ह्या मार्गदात्यास संत संप्रदाय कोणत्या वेगवेगळ्या नावांनी ओळखत होता ?*

अर्थातच आपण ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा जो तर्क संगत प्रयत्न करणार आहोत त्या मध्ये स्पष्टपणे एक साम्य दिसून येते की,
*बहसंख्याक बहुजनांचे दुखः त्यांच्या वेदना ह्या समान आहेत परंतु त्या वेदनेची, दुखा:ची, कष्टाची तीव्रता कमी जास्त आहेत* अर्थात कोणाला जास्त तर कोणाला कमी म्हणजे दुखः, कष्ट वेदनेतही असमानता आहे.

*बहुजनांच्या कष्टदायक दुखःची वेदनामय निर्मिती करणार्या अशा कोणत्या सामाजिक-धार्मिक, संस्कार- संस्कृतीच्या विरोधात संताचा संघर्ष होता आणि ह्या अमानवी संस्कार संस्कृतीचा निर्माता कोण आहे ?*

*भूतकाळातील हा सांस्कृतिक धार्मिक संघर्ष काय होता ? आजहि वर्तमानात हा संघर्ष चालू आहे काय?*
*जर हा संघर्ष वर्तमानात ही चालू आहे तर आपल्याला काय बदलायचे आहे ?*
*हा बदल घडवायाचा मार्ग कोणते ?*
*या मार्गा वरील वाटचालीचे छोटे , मध्यम व दिर्घ टप्पे कोणते ?*

*जर बदलच घडवून आणायचा तर बदलांना सामावुन घेण्याच्या दिशा कशा निश्चित कराव्यात ?*

तसेच आपन हेही समजून घेण्याचा प्रयत्न करनार आहोत की•••••••••••••••

*तुमचे आमचे पुर्वज हजारो वर्षे अशा कोणत्या आणि कोणाच्या धार्मिक दहशतवादाच्या शोषणाला बळी पडले होते ?*

*आज देखील ही धार्मिक व्यवस्था कोणत्या हत्याराने बहुजनांचे मानसिक व बौद्धिक खच्चीकरण करते आहे.*

सनातनी धार्मिक दहशतवादाच्या विरोधात आमच्या बहुजन महापूरूषांची वैचारिक लढाई *तथागताच्या काळापासून ते वारीच्या संता पर्यंत तुमच्या आमच्या वेदनेचा सहवेदनेचा तसेच सहकार्यशील संवदनशील "समातामुलक समाज" निर्माण करण्याचा संघर्ष चालू आहे•*
ह्या सर्व प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपन ह्या *बौद्धिक वैचारिक वारीत* करणार आहोत•

वैचारीक वारीच्या प्रवासात आपण जे विचार मांडणार आहोत त्यावर *कोणी ना कोणी टिका करणार, निंदा करनार* म्हणून विवेकच्या आधारेच आपण हे समजून घेतलं पाहिजे की *जैसी बोलणाराची निंदा होते तैसी न बोलणार्याची देखील निंदा होते.*

*नेतं अज्जतनामिव |*
*निन्दन्ति तुण्हीमासीनं निन्दन्ति बहुभाणिनं |*
*मितभाणिनम्पि निन्दन्ति नत्थि लोके अनिन्दितो ||*

अर्थात, *ही पुरातन गोष्ट आहे, ही काही आजकालची गोष्ट नाही. लोक गप्प बसणाराची निंदा करतात ते खूप बोलणाराची निंदा करतात तसेच ते मोजके बोलणाराची देखील निंदा करतात.ज्याची निंदा केली जात नाही असा जगात कोणी नाही*.
बुद्धांनी हे जे सामाजिक वास्तव मांडले आहे ते वास्तव संत तुकारामांनी देखील, बोलणाराची आणि न बोलणाराची निंदा कशी होते, याविषयी ते म्हणतात•••

*ऐसा हा लौकिक कदा राखवेना |*
*बहु बोलो जाता म्हणति हा वाचाळ |*
*न बोलता सकाळ म्हणती गर्वी ||*
कोणी आपली निंदा करीत असेल, तर त्याच्या निंदा किंवा टिके मध्ये काही तथ्य आहे का हे पाहावे तत्थ असेल तर ते घ्यावे कारण आपल्या विचारावर झालेली निंदा किंवा टिका ही आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी असते•

*तेव्हा सुरू करूया आज पासून(१२ जून) ते पंढरपुर यात्रा आषाढी एकादशी(१ जुलै) पर्यंतचा वारीचा प्रवास*•••••
*बहुजनांची "वैचारिक" वारी |*
*होऊनी " बौद्धिक" वारी करी ||*
••••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
*टिप* : वैचारिक वारीचे लेख तुम्ही OBC बहुजन मित्र, हितचितंक, नातेवाईक आणि आपआपल्या WhatsApp group वर पाठवू शकता•••••
****************
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: २ रा दिवस
*********
⛳|| *पंढरीची वारी आहे घरी* ||⛳
।। *आणिक न करी तीर्थव्रता* ।।
*************************
सर्वसाधारण पणे भारतात *संत संप्रदायाचे दोन समुह* पडतात पहिला म्हणजे धार्मिक दैविक चमत्काराची ओळख असलेला, धर्मव्यवस्था जैसे थे ची बांधिलकीचा स्विकार कलेला साधूसंत संप्रदाय आणि दुसरा सामाजिक समतावादी सिद्धांताची बांधिलकीचा स्विकार केलेला संत संप्रदाय. सामाजिक समतावादी बांधिलकीचा स्विकार केलेल्या संत संप्रदायाचाच आपण इथं विचार करणार आहोत.
तसेच *संत संप्रदायाचे प्रमुख दोन प्रादेशिक विभाग* पडतात एक म्हणजे उत्तर भारतातिल संत संप्रदाय ज्यांची भाषा हिंदी ज्यांचे प्रतिनिधित्व संत कबीर, संत रविदास, संत नानक करतात आणि दक्षिण विभाग म्हणजे महाराष्ट्र ज्यांची भाषा मराठी ज्यांचे प्रतिनिधित्व संत नामदेव, संत *ज्ञानदेव*(ज्ञानेश्वर नव्हे), संत तुकाराम करतात.
सर्व प्रथम आपण पाहणार आहोत•••••
••••••••••••••••••••••••
*संत नामदेव महाराज*
••••••••••••••••••••••••
संत नामदेव महाराजांचा जन्म परभणी जिल्ह्यातील नरसीबामणी या गावी झाला.संत नामदेव स्वतः आपल्या अभंगात आपल्या *शिंपी जातीचा* उल्लेख जाणीवपूर्वक करतात कारण शिंपी म्हणजे क्षुद्र (OBC) त्याच्यां शिंपी जातीवरुन वैदिक ब्राह्मण त्यांना हिनवत असत. तेंव्हा संत नामदेव महाराजांनी अभंगात आपल्या शिंपी जातीचा उल्लेख करताना तुळस, पिंपळ आणि दासी पुत्र यांची उदाहरण देऊन ते सिद्ध करतात की मी जातीने क्षुद्र आहे परंतु मी चारित्र्याने अर्थात आचार-विचाराने ब्राह्मणा पेक्षा निर्मळ आहे स्वच्छ आहे•••••

*कुश्चळ भुमिवरी उगवली तुळसी।*
*अपवित्र तियेसी म्हणों नये,*
*काकविष्ठेमाजि जन्मे तो पिंपळ।*
*तया अमंगळ म्हणों नये,*
*दासिचिया पुत्रा राज्यपद आलें।*
*उपमा मागील देऊं नये,*
*नामा म्हणे तैसा जातीचा मी शिंपी ।*
*उपमा जातिची देऊं नये.*
संत नामदेव महाराज वर्णाने शुद्र आणि जातीने शिंपी असल्याने वैदिक ब्राह्मणाने त्यांचा अपमान केलेला एक प्रसंग आहे. परभणीत औढा नागनाथ मंदिर आहे.ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे.या मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर संत नामदेव किर्तन करीत असत.मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका क्षुद्राने किर्तन करावे (नामदेव जातीने शिंपी होते) तेथिल ब्राह्मण पुरोहिताला आवडलं नाही त्याने नामदेवाला मंदिराच्या मागं किर्तन करायला सांगताले.नामदेवाने ब्राह्मण पुरोहिताला विरोध केला तेव्हा नामदेवाला मंदिरातून हाकलले.नामदेव मंदिराच्या मागं किर्तन करायला लागले.नामदेवाचे किर्तन ऐकण्यासाठी लोक मंदिराच्या मागं जमू लागले आणि इथं एक मिथक प्रसिद्ध झाले की देवाने मंदिराचे तोंड फिरवले.
*ह्या मिथकाच्या नोंदीतून व्यक्त होणारा आशय बहुजनांच्या दृष्टीने फार मोलाचा आहे. देवाने ब्राह्मणी सोवळ्यात अडकलेल्या ब्राह्मण पुरोहिता कडे पाठ केली आणि क्षुद्र (OBC)म्हणून हिणवलेल्या एका निष्ठावान निष्कपट भक्ताकडे तोंड केले. याचा अर्थ असा की माणूसकीवर आधारित खरी नैतिकता वैदिक ब्राह्मण पुरोहिताच्या अभिषेकात नसून संत नामदेवा सारख्यांच्या निर्मळ भावनेत आहे.*

संत नामदेव महाराजांनी वैदिक ब्राह्मणाचे जाप - तप, होम - हवन उपवास- उध्दापण, योग - याग पुराण, ब्राह्मज्ञान शाश्त्रबोध, तिर्थक्षेत्रे हि वैदिक ब्राह्मणी कर्म-कांड नाकारली आणि या ब्राम्हणी वैदिक संस्कार आणि संस्कृतीच्या विरोधात "अभंगवृत्ताची"* निर्मती केली.
किर्तनाच्या माध्यमातुन सर्व सामान्य बहुजनांचे वैचारिक प्रबोधन करून वैदिक ब्राह्मणी मनुवादि धार्मिक विषमतेच्या विरोधात *वारीकरी संप्रदाय* अर्थात् वारकरी संगठन निर्माण केले.
*"नाचू कीर्तनाच्या रंगी, न्यानदीप लावू जगी"*
आम्ही हे समजून घेतले पाहिजे की••••••••
इथं हे.आवर्जुन नमूद करावेसे वाटते की,
*वारीकरी हा पंथ नाही.पंथात जन्मलेल्याची संतती बापाच्या पंथाची मानली जाते.जसे महानूभाव पंथ,लिंगायत पंथ, शीख पंथ इत्यादी, वारीकरी करणार्याची संतती वारिकरी असतेच असे नाही, आणि वारीकरी नसलेल्यांची संतती वारिकरी होऊ शकते.अर्थात वारीकरी हि पंरपरा आहे आणि ह्या पंरपरेचा प्रणेता " संत नामदेव महाराज " आहेत*

संत नामदेवाला जेव्हा वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यानी वैदिक धर्मशास्त्राच्या नियमानुसार महाराष्ट्रातुन हद्दपार( तडिपार) केले तेव्हा संत नामदेव उत्तर प्रदेशात संत कबीर, संत रोहीदास, संत नानक यांच्या संपर्कात आले.संत कबीर, संत रविदास यांच्या वाणीतून समता, स्वतंत्रता, बंधूता व न्यायाची शिकवण मिळाली म्हणूनच संत नामदेव महाराजांनी वारकर्याच्या संप्रदाया मध्ये *संत गोरा कुंभार, संत सावता माळी, संत नरहरी सोनार, संत तुकाराम कुनबी, संत सेना नाव्ही, संत चोखा महार* या समस्त बहुजन संताना वारकरी संप्रदायात संघटित केले.
वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेने *संत चोखा* सारख्या *महाराला* शिवले तर विटाळ होतो, हा *अमानवीय धर्मशास्त्रीय कायदा* सांगितला होता अशा वैदिक ब्राम्हणी धर्मशात्राच्या विरोधात, त्याकाळात संत नामदेव महाराजांनी सर्व बहुजन जातीच्या संताना एकत्रीत जेवायाला बसवले अर्थात् हे *आजच्या वर्तमान काळातील जाती तोडो समाज जोडो* अभियानच आहे.याचाच अर्थ असा होतो की *संत नामदेव महाराज एक कूशल संघटक तर होतेच त्याच बरोबर ते वैदिक ब्राम्हणी धर्माच्या विशमतावादी व्यवस्थेच्या विरोधातील विद्रोही संत होते.* कारण सनातनी व्यवस्थेच्या विरोधात जाणं  म्हणजे वैदिक ब्राम्हणी विषामतावादी व्यवस्थेच्या विरोधी *विद्रोहच होता*

*वैदिक मनुवादि ब्राह्मणी विषमतावादी व्यवस्थेच्या विरोधातिल समतावादी बहुजन संतांची अभंग रचना*•••••

|| *संत नामदेव* ||
आमुचा विठ्ठल प्रचंड।
इतरा देवांचे न पाहू तोंड।
एका विठ्ठला वाचून न करू आणिक भजन।
आम्हा एक विध भाव। कदा न म्हणू इतरा देव।

|| *संत तुकाराम* ||
करी आणिकांचा अपमान।
खल छल वादी ब्राह्मणll
तया देता मान l नरका जाय निश्चये ll

आम्ही विठ्ठलाचे वीर ।
कळी काराचे फोडू शीरll

|| *संत गोरा कुंभार* ||
मुकिया साखर चाखाया दिधली। बोलतं हे बोली बोलवेना॥ १॥
तो काय शब्द खुंटला अनुवाद। आपुला आनंद आधाराया॥ २॥
आनंदी आनंद गिळूनि राहणें। अखंडित होणें न होतिया॥ ३॥
म्हणे गोरा कुंभार जीवन्मुक्त होणें। जग हें करणें शहाणें बापा॥ ४॥

|| *संत सावता माळी* ||
कांदा मुळा भाजी । अवघी विठाबाई माझी
लसूण मिरची कोथिंबिरी । अवघा झाला माझा हरी
मोट नाडा विहीर दोरी । अवघी व्यापिली पंढरी
सांवता म्हणे केला मळा । विठ्ठल पायी गोविला गळा

|| *संत नरहरी सोनार* ||
देवा तुझा मी सोनार । तुझे नामाचा व्यवहार
देह बागेसरी जाणे । अंतरात्मा नाम सोने
त्रिगुणाची करूनी मूस । आत ओतिला ब्रह्मरस

जीव शीव करूनी फुंकी । रात्रंदिवस ठोकाठोकी
विवेक हातवडा घेऊन । काम क्रोध केला चुर्ण
मनबुद्धिची कातरी । रामनाम सोने चोरी
ज्ञान ताजवा घेउन हाती। दोन्ही अक्षरे जोखिती
खांद्या वाहोनी पोतडी । उतरला पैलथडी
नरहरी सोनार हरीचा दास । भजन करी रात्रंदिवस

|| *संत सेना न्हावी* ||

हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ।
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ।।
आम्ही वारीक वारीक । करू हजामत बारीक
विवेक दर्पण आयना दाऊ । वैराग्य चिमटा हालऊ
उदक शांती डोई घोळू । अहंकाराची शेंडी पिळू
भावार्थाच्या बगला झाडू । काम क्रोध नखे काढू
चौवर्णा देऊनी हात । सेना राहिला निवांत

|| *संत चोखामेळा* ||
हीन याती माझी देवा । कैसी घडे तुझी सेवा ।
मज दूर दूर हो म्हणती । तुज भेटू कवण्या रीती ।।
जातीने महार. त्यांचे सारे कुटुंब-पत्नी सोयरा, बहिण निर्मला, मुलगा कर्ममेळा व मेहूणा बंका-विठ्ठलभक्त होते. तथापि चोखामेळा ह्यांच्या अभंगांतून सामाजिक विषमतेमुळे त्यांना बसत असलेले चटके स्पष्टपणे दिसुन येतात. चातुर्वर्ण्य, जातपात, सोवळेओवळे, विटाळ ह्यांतून पदरी येणारी मानहानी सोसत असतानाच त्यांनी त्याबद्दल आपला निषेधही व्यक्त केला. ज्यालात्याला लाभलेला जड देह आणि चैतन्यमय आत्मा हे मुळातच भिन्न आहेत. पंचभूतात्मक देहामुळे विटाळ निर्माण होतो. त्यामुळे प्रत्येक माणसाच्या देहात जन्मापासून मरेपर्यत विटाळच साचून राहिलेला असताना•••
'सोवळा वोवळा तो कोण?'
आणि ‘विटाळापरते आहे कोण ?’ असा मार्मिक प्रश्न त्यांनी एका अभंगात  विचारला आहे.'
*आत्मा तो निर्मळ शुद्धबुद्ध ।*
*देहाचा विटाळ देहीच निर्धारी ।*
*म्हणतसे महारी चोखियाची ।।*
असे उद्‌गार चोखामेळ्यांच्या पत्नी सोयराबाई यांनी एका अभंगात काढले आहेत.
( *आषाढ पौर्णिमेच्याच* दिवशी सकाळी पंढरपूरच्या दक्षिणेस, पंढरपूरपासून जवळच असलेल्या गोपाळपूर येथे *सामुहिक काल्याचा* कार्यक्रम असतो•••••)
•••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ••••••••••••
🍁 ।। *३ रा दिवस* ।। 🍁
•••••••••••••
*एक शुद्र (OBC) शिंपी !!!* वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेला आव्हान देतो !! चिकित्सा करतोय !!  हे पाहून संत नामदेव महाराजांना वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यानी *धर्मशास्त्राच्या नियमानुसार* कीर्तनावर बंदी घातली आणि *महाराष्ट्रातुन हद्दपार केले* (तडिपार केले) तेव्हा संत नामदेव उत्तर प्रदेशात *संत कबीर, संत रोहीदास, संत नानक* यांच्या संपर्कात आले.संत कबीर, संत रविदास यांच्या वाणीतून
|| *समता, स्वतंत्रता, बंधूता व न्यायाची* ||
शिकवण संत नामदेव महाराजांना मिळाली. तेव्हा ह्याचा अर्थ हाच निघतो की•••••
*संत कबीर, संत रविदास आणि संत गुरू नानक हे संत संप्रदायाचे प्रथम वारसदार आहेत*
हे सर्व संत समकालीन होते तसेच त्यांनी विषमतावादी वैदिक ब्राह्मणी धर्माचा अस्विकार केला आणि गुरु नानकांनी तर वैदिक ब्राह्मणी धर्माचा त्याग करून शीख धर्माची स्थापना केली. म्हणूनच महाराष्ट्रातील संतांच्या शिकवणी बरोबरच आपण उत्तरेतिल संत कबीर, संत रविदास आणि गुरू नानक यांच्या *वैचारिक सतसंग* देखिल करणार आहोत.
••••••••••••••
*संत कबीर*
••••••••••••••
वे कर्ता नहिं बौद्ध कहावै नहीं असुर को मारा |
ज्ञानहीन कर्ता भरमें माया जग संहारा ||

संत कबीर वाराणसीत राहत असत.वाराणसी पासून 7 k.m. सारनाथ *"बुद्ध विचारधारेचे"* केंद्र होते.संत कबीर सारनाथ येथे बौद्धभिक्खू संघाच्या संपर्क आणि संवादाच्या सानिध्यात असल्याने संत कबीराने बुद्धाची समता- बंधूता- न्याय व स्वतंत्रताची समता मुलक "बुद्ध विचारधारा" समजून घेतली आणि बुद्धाच्या विचारधारेच्या प्रचार आणि प्रसारा करिता " दोह्या " ची रचना केली. संत कबीराचे अतिशय सुहद व्यक्तीमत्व,सखोल चिंतन आणि मार्मिक दोह्याच्या व्यंजना-शैलीच्या काव्या मुळे फार कमी वेळेत ते संपूर्ण उत्तर भारता मध्ये प्रसिद्ध झाले.
संत कबीराने काशीच्य पंडितांना आणि वैदिक विद्धाना शास्त्रार्थ समोर सरळसरळ बौद्धिक अव्हाण उभे केले.

काहे को कीजै *पांडे* छूत विचार |
छूत ही ते उपजा सब संसार ||
हमरे कैसे लोहू तुम्हारे कैसे दूध |
तुम कैसे *बाह्मन पांडे*, हम कैसे सूद ||
(शुद्र)

संत कबीर समता मुलक विचारधारेचे अर्थात तथागत बुद्धांच्या विचारांचे संत संप्रदाया मधील सर्व प्रथम प्रचारक आणि प्रसारक होते.
*वहा है वही जात है*
*कर गहिये चहुं ओर* ।
*जो कहा नहि मन तभी*
*दे धक्का हुइ ओर* ।।

संत कबीर सर्व बहुजन समाजाला स्पष्ट आदेश देतात की, *ब्राह्मण जर भेदभावाची नीति सोडुन समजदारीने वागावयास तयार नसतील तर त्यांना धुतकारुन द्या*
संत कबीर हे स्वतंत्र समता बाह्य कर्मकांडा पेक्षा मनाची, शुद्धता तथागत बुद्धापासून चलत आलेल्या सांस्कृतिक प्रवाहाचेच घटक असुन कबीराने बुद्धाचा हा वैचारिक प्रवाह अधिक बळकट करून तो प्रवाह पुढील संतांच्या स्वाधीन केला.

पोथी पढि-पढि जग मुआ, *पण्डित* भया न कोय।
ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पण्डित होय।।

बड़ी बड़ी पुस्तकें पढ़ कर संसार में कितने ही लोग मृत्यु के द्वार पहुँच गए, पर सभी विद्वान न हो सके। कबीर मानते हैं कि यदि कोई प्रेम या प्यार के केवल ढाई अक्षर ही अच्छी तरह पढ़ ले, अर्थात प्यार का वास्तविक रूप पहचान ले तो वही सच्चा ज्ञानी होगा !
आणि संत कबीर सोवळे-ओवळे करणार्या भक्तांना विचारतात•••
*मल मल न धोएं शरीर का,*
*धोया न मनका मैल* |
*नहाये गंगा गोमती रहे बैल के बैल* ||

*काशीहून संत कबीराची पालखी पंढरपूरला येत असे, देहू संस्थानने काढलेल्या पुस्तिकेतही त्याचा उल्लेख आहे. वैदिक ब्राम्हणांनी काशीहून येणार्या पालख्याला बंदी घातल्याने संत कबीर यांच्या अनुयायांनी कबीरांचे प्रतीक म्हणून पांढरा झेंडा त्यांनी पालखी सोहळ्यात दिला. पालखीत भगव्या पतकांबरोबर ही पांढरी पताका म्हणून फडकवली जाते.*
याचा अर्थ असा होतो की, कबीर पंथीय ईश्वराला मानत नाही तरीही ते जेव्हा पंढरपूरच्या विठ्ठलाच्या वारी मध्ये सामील होतात हा फार महत्वाचा विचारकरण्या योग्य मुद्दा आहे कारण संत कबीराच्या विचारांचा प्रभाव संतनामदेव महाराजांवर होता हे आपण पाहणार आहोत तसेच संत कबीरावर कोणत्या महामानवाचा प्रभाव होता हे.देखील आपण वैचारीक वारीच्या प्रवासात पाहणार आहोत*•••••
•••••••••••••••••••
*"संत रोविदास"*
•••••••••••••••••••
संत कबीराचे समकालीन संत रविदास यांना बुद्धांची समता मुलक विचारधारा संत कबीरा कडून मिळाली.
संत रविदास यांनी वैदिक ब्राह्मणी मनुवादि अंधविस्वास, पाखंड, कर्मकांड, जातिवादावर जोरदार प्रहार केले.
*कहें रैदास सुनो भाई सन्तों, *ब्राह्मण* के है गुण तीन ।*
*मान हरे, धन सम्पत्ति लुटे और मति ले छीन ।।*

जीवन चारि दिवस का मेला रे।
*बांभन* झूठा, वेद भी झूठा, झूठा ब्रह्म अकेला रे।।

पत्थर मूरति कछु न खाती, खाते *बांभन* चेला रे।
जनता लूटति *बांभन* सारे, प्रभु जी देति न अधेला रे।।

पुन्य -पाप या पुनर्जन्म का , *बांभन* दीन्हा खेला रे।
स्वर्ग -नरक, बैकुंठ पधारो, गुरु शिष्य या चेला रे।।

जितना दान देवे गे जैसा , वैसा निकरै तेला रे।
*बांभन* जाति सभी बहकावे , जन्ह तंह मचै बबेला रे।।
छोड़ि के *बांभन* आ संग मेरे , कह विद्रोहि अकेला रे।

*जात जात के फेर में उलझ रहे सब लोग ।*
*मनुष्यता को खा रहा, रैदास जात का रोग ।।*
*जात-जात में जात है, ज्यो केले में पात ।*
*रैदास मानस न जुड़ सके, जब तक जात न जात ।।*

••••••••••••••••
*गुरु नानक*
••••••••••••••••
शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी नाममहात्म्याची प्रेरणा संत कबीर, संत नामदेवा पासून घेतली.
गुरू नानकजी शीख समाजाचे प्रथम गुरु होते, परंतु त्यांनी कधिही जातिवाद पाळला नाही. ते नेहमी म्हणत ईश्वर एक आहे आणि *ईश्वराला प्रसन्ना करण्यासाठी बाहेरच्या पुजा आडम्बराची जरुरी नाही.आतंरिक शुद्धतेची जरुरी आहे* .

धनु धरनी अरु संपति सगरी जो मानिओ अपनाई।
तन छूटै कुछ संग न चालै, कहा ताहि लपटाई।।

अर्थात: धन सम्पति और जो भी हैं जिसे टीम अपना कहते हो वो सब यही छुट जाता हैं यहाँ तक तुम्हारा शरीर भी यही छुट जाता हैं तो फिर तुम किस बात के मोह में पड़े हो.

दीन दयाल सदा दु:ख-भंजन, ता सिउ रुचि न बढाई।
नानक कहत जगत सभ मिथिआ, ज्यों सुपना रैनाई॥

अर्थात : नानक जी कहते हैं इस जगत में सब झूठ हैं जो सपना तुम देख रहे हो वो तुम्हे अच्छा लगता हैं. दुनियाँ के संकट प्रभु की भक्ति से ही दूर होते हैं तुम उसी में अपना ध्यान लगाओ.

मेरो मेरो सभी कहत हैं, हित सों बाध्यौ चीत।
अंतकाल संगी नहिं कोऊ, यह अचरज की रीत॥

अर्थात: इस जगत में सब वस्तुओं को, रिश्तों को मेरा हैं मेरा हैं करते रहते हैं लेकिन मृत्यु के समय सब कुछ यही रह जाता हैं कुछ भी साथ नहीं जाता हैं. यह सत्य आश्चर्यजनक हैं पर यही सत्य हैं.

*संत कबीर आणि संत रोविदास यांनी वैदिक ब्राम्हणी जाती व्यवस्थेवर प्रहार केले पण त्याच बरोबर ब्राम्हणाच्या विद्वतेला ही वैचारिक कडवे आव्हान दिले.वैदिक मनुवादि ब्राह्मणी व्यवस्थाला हादरे बसू लागले त्यातूनच संत पंरपरेचे आद्यसंत कबीर, रविदास ह्या दोघांची हत्या करण्यात आली. संत कबीराचे प्रेत देखील सापडलं नाही तर संत रविदासाला जीवंत जाळण्यात आले.*
*बहुजन संतानी आपल्या जीवाचे बलिदान देऊन वैदिक मनुवादि ब्राह्मणी व्यवस्थेच्या धार्मिक दहशतवादा पासून बहुजनांचा मुक्तीचा मार्ग मोकळा केला त्याच मार्गाने जाणार्या महाराष्ट्रातील संत संप्रदायाचा प्रवास आपण पाहणार आहोत*
कारण
*वैदिक ब्राह्मणी मनूस्मृतीच्या दिर्घकालिन संघर्षातिल संत कबीर, संत रविदास, संत नामदेव आणि गूरू नानक हे सर्व मुलनिवासी महापुरुष आधुनिक भारतातील समता मुलक क्रांतीचे आम्हा सर्व बहुजनाचे प्रेरणास्थाने आहेत*
•••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ***********
🌸 *४ था दिवस*🌸
***********
संत नामदेव महाराज उत्तर भारतातून जेव्हा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात,
*"पंढरपुरचा विठ्ठलाला " संघर्षाच्या प्रतिकाचे रूप दिले*•••
*कारण पंढरपूरचा विठ्ठल अब्राम्हणी आहे अर्थात तो "देव" नाही. कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात विठ्ठलाचा उल्लेख नाही*. *स्मृती - श्रृती, वेद - पुराण, - उपनिषद - अरण्यक - मनूस्मृती या तमाम वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही*. तसेच *विठ्ठल रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही,*
*विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही* अर्थात
*विठ्ठल हा देव, ईश्वर, परमेश्वर नाही तर तो एक महामानव आहे* कारण *विठ्ठलाच्या हातात शस्त्र नाही भाला, बरची, तलवार नाही*. *चक्र गदा धनुष्य नाही* तेव्हा संत नामदेव महाराजांनी हातात कोणतेही शश्त्र, आयुधे, हत्यार नसलेल्या फक्त आणि फक्त, *महामानव असलेल्या "विठ्ठलाचा" स्विकार करून "वारीकरी संप्रदायाची स्थापना केली.*

संत नामदेव महाराजांनी वारीकरी संप्रदायात प्रवेश देण्या करीता पंचसुत्री नियमांची अट घातली•••••
*पंचसुत्री शिकवण*
•••••••••••••••••••••
आजही वारकरी दिक्षा घेताना जे *शपत* घेतात त्या मध्ये *तथागत बुद्धांचे पंचशील* जसेच्या तसे आहे•••••
१ मी प्राणी हिंसा करणार नाही.
*पाणातीपाता वेरमणी*
२ मी चोरी करणार नाही.
*अदिन्नदाणा वेरमणी*
३ मी व्यभीचार करणार नाही
*कामेसुविच्छाचारा वेरमणी*
४ मी दारु पिनार नाही.
*सुरा मेरयमज्ज पमाद्ठाना वेरमणी*
५ मी मांसाहार करणार नाही

|| *तसेच वारकरी संप्रदाय काही महत्वाचे मुद्दे* ||

■ वारकरी संप्रदायात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना•••••
*पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम | पंढरीनाथ महाराज की जय!* असा जयघोष केला जातो.

■ वारकरी संप्रदायाच्या परंपरेत सर्व *प्रतिके* आणि *संकल्पना* ठरलेल्या आहेत. *काकड्यात गणपतीची आरती होत नाही* वारकरी परंपरेला *सरस्वती* मान्य नाही.
*चोखा आमचा गणपती l*
*सोयरा आमची सरस्वती ll*
••••••••संत तुकाराम महाराज
पंढरपूरातिल विठ्ठल मंदिरात गेल्यावर आधी *चोखोबांच्या समाधीचे दर्शन* घेतल्याशिवाय विठ्ठलाचे दर्शन पुर्ण होत नाही. म्हणून *वारकऱ्यांचा गणपती हे संत चोखा महार* होत. वारकरी परंपरेत *गणपतीला स्थान नाही,* म्हणून मंदिरात होणाऱ्या भजनांत, काकडा आरतीच्या अभंगामधे *गणपतीची आरती गाईली जात नाही.*

■ वारकरी सांप्रदायात•••••
*ज्ञानियांचा राजा गुरु महाराव l*
*म्हनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे ll*
हा अभंग घेतला जात नाही. किर्तनकाराने हा अभंग किर्तनासाठी घेतल्यास *टाळकरी टाळ खाली ठेवतात* या अभंगाची रचना वारकरी संप्रदायास मान्य नाही कारण संत तुकाराम महाराज स्वताला पायाची वहान म्हणतात असे सांगितले जाते हा संत तुकाराम महाराजांचा सरळसरळ अपमान आहे.

■ वारकरी सांप्रदायात *रामेश्वर भटाने* लिहीलेली संत तुकाराम महाराजांची *आरती घेतली जात नाही*. त्या आरतीवर बंदी आहे. कारण तुकोबारायांना ह्याच भटाने त्रास दिला होता. गाथा बुडवली होती आणि हत्या करण्यात आली होती.

■ अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा l*
*माझिया सकळा हरिच्या दासा l|*
संत नामदेव महाराज
हा संत नामदेवांचा अभंग पुर्वी वारकऱ्यांचे *पसायदान* होते. नंतर आपेगावच्या ज्ञानेश्वरीचे पसायदान घुसवून, नामदेव महाराजांचा अभंग बंद करण्यात आला.

■ वारकरी संप्रदायात कोणत्याही विधी मध्ये ब्राम्हणाचा सहभाग नसतो. संत तुकाराम महाराज म्हनाले होते *"आपली आपन करा सोडवन"* म्हणजे आपले भले आपन करायचे भटजी कशाला पाहिजे ?

■ *आरती ह्या संकल्पनेचे जनक* संत नामदेव महाराज आहेत कारण नामदेवांच्या आधी आरती गाईली गेल्याचे नोंद नाही.वारकरी परंपरेत आरती तर वैदिक परंपरेत होमहवन यज्ञ( परंतु वारकरी लग्न, वास्तूपुजेला होमहवन करतो.)

समाजातील भेद भाव दूर करून समाजाला एकात्मतेच्या दिशेने नेणारा विचार संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिला. *मानवता हाच खरा धर्म* हा संदेश जनमनात भरवला. भोळ्या- भाबड्या अडाणी बहुजन समाजाला जागे करून त्यांचा मध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला.या करिता त्यांनी *" कीर्तन"* या प्रभावी साधनांचा वापर केला. *"नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदिप लावू जगी"* अशी सिहगर्जना केली. अन्यायग्रस्त समाजाला ज्ञानी बनवुन त्यांचे *जीवन प्रकाशमान* करण्याचा प्रयत्न संत नामदेव महाराजांनी केला.
*" स्वयं ज्ञानदिप "* लावण्याची प्रेरणा अर्थातच•••
|| *स्वयं प्रकाशीत* || *अत्त दीप भव* || *Be They Own Light* || होण्याची विचारधारा संत नामदेव महाराजांना ज्या *महामानवा कडून मिळाली त्या विचारधारेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वारकरी संप्रदायाची वृत्ती समाजमुखी, लोकमुखी* असावी याकरिता वारकरी संप्रदायाची दिक्षा घेतलेल्या वारकर्याने रात्रंदिवस *लोकांत राहून बहुजन समाजात नवचैतन्य ओतण्याचा सफल प्रयत्न केला पहिजे*. वारकरी संप्रदायाची दिक्षा घेतलेल्याने *ज्ञानाचे महत्त्व मान्य करुन सामाजिक हिताला अग्रस्थान* देऊन व त्यासाठी *नामसकीर्तना* सारखे सोपे साधन लोकांपुढे आणले पाहिजे असा आदेश संत नामदेव महाराज देतात. *परमार्थासाठी प्रपंच सोडून जंगलात जाण्याची व व्यावहारिक कर्मांना फाटा देऊन संन्यास घेण्याची आवश्यकता नाही* हे नामदेव महाराजांनी संत संप्रदायाची स्थापना करून दाखवून दिले. *व्यावहारिक कर्तव्यनिष्ठेला व समाजिक नितीमत्तेला पोषक अशी कर्मे करावीत*; असे सांगून वारकरी संप्रदायाने प्रपंच व परमार्थ यात समन्वय साधला पाहिजे ह्यावर संतनामदेव महाराजांचा आग्रह होता.

*संत नामदेव महाराजांनी स्थापन केलेला वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्तीसंप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सांस्कृतिक केंद्र आहे*.
वारकरी संप्रदायाचे प्रवेशद्वार सर्व जाती पंथाच्या स्त्रीपुरुषांना खुले आहे. त्यात उच्चनीच, गरीब, श्रीमंत असा भेदभाव नाही. ब्राह्मणांपासून हरिजनापर्यंत सर्वांना सारखेच स्थान त्यात आहे. संत नामदेव महाराजांनी निर्माण केलेल्या वारकरी संप्रदायाने, *धर्मशास्त्र वेदप्रामाण्याला व मनूच्या जातिव्यवस्थेला उघडपणे आव्हान देऊन स्त्री व शूद्रांना आत्मविकासाचा मार्ग खुला करून दिला. मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेवर अवलंबून नसून वैयक्तिक चारित्र्यावर आहे* ही गोष्ट वारकरी संप्रदायाने लोकांना पटवून दिली. स्वातंत्र्य व समतेचे वातावरण निर्माण केले. *वर्तमान परिस्थीती ही पूर्व कर्मानुसार प्राप्त होत नही.ह्याच जन्मात चांगले कर्म केलायानेच आपले जीवनमिन बदलू शकते*. भक्ती पंथाच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापांचिक दु:खावर मात करता येईल असा विश्वास संत नामदेव महाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना करून लोकांच्या मनात निर्माण केला. लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन झाला पाहिजे असा विश्वास आणि आशा वारकरी संप्रदाया कडून संत नामदेव महाराजांनी व्यक्त केली आहे, परंतु *आजचा वारकरी संप्रदाय संतानी दाखविलेल्या मार्गावर आहे का* ? ज्या *वैदिकब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संतानी त्याग, बलिदान देऊन संघर्ष केला त्या मनुवादि व्यवस्थेला आजचा वारकरी संप्रदाय विरोध करतो आहे का* ?
की वैदिकब्राह्मणी मनुवादि व्यवस्थेचे अनुकरण करतो आहे ?
•••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: <><><><><>
*५ वा दिवस*
<><><><><>
🌹|| *संत तुकाराम महाराज* || 🌹

नामदेवे केले स्वप्नामाजी जागे |
सवे पांडुरंगे येऊनिया ||
सांगितले काम करावे कवित्व |
वावगे निमित्य बोलो नको ||
(संत तुकाराम महाराज यांचा जन्म 1608 चा तर मृत्यू 1650 सालचा म्हणजे ते फक्त 42 वर्षे जगले..)

*बुडता हे जन न देखवे डोळा* ।
*यतो कळवळा म्हणउनि* ।।
संत तुकाराम देहूजवळच्या भंडारा आणि भांबनाथ या डोंगरांवर जाऊन ध्यान करीत असत, हे प्रसिद्धच आहे. या डोंगरांवर ते ज्या ठिकाणी ध्यान करीत, ती ठिकाणे ही *बौद्ध लेणी* आहेत, हे अगदी स्पष्ट आहे . आजही भंडारा डोंगराच्या उतारावर कपाट म्हटल्या जाणा-या ठिकाणी *बौद्ध लेण्यासमोर बौद्ध स्तूप आहे*, अन्यत्र स्तूपांसमोर असतो तसा जलकुंड आहे.संत तुकाराम यांनी भांबनाथाच्या डोंगरावर *बौद्ध लेण्यातच सात दिवस ध्यान केले होते*.संत तुकाराम यांचे भाऊ कान्होबा संत तुकाराम यांना घेऊन देहूकडे येत असता, तुकाराम इंद्रायणीच्या डोहा जवळ बसले. कान्होबाला कर्जखते आणायला लावली आणि वाडवडिलांनी लोकांना दिलेल्या कर्जाची कर्जखते इंद्रायणी डोहात बुडवून लोकांना कर्जमुक्त केले. वयाच्या केवळ विसाव्या वर्षी, *सामाजिक न्यायाच्या, उच्च नैतीकतेच्या जाणिवेतून संत तुकाराम महाराजांनी उचलेले पाऊल होते आणि त्यांनी आपल्या सर्वोच्च ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली.*
कर्जखते बुडवली ह्याचा अर्थ असा होतो की संत तुकाराम यांनी स्वतःच्या अंतकरणात जपलेले उच्च कोटीचे मानवी मुल्य आहे.
*वैदिक ब्राम्हणी धर्माच्या नावाखाली बहुजनांवर होणारा अन्याय, शोषण संत तुकाराम यांच्या ध्यानात आल्याने त्यांनी व्यक्तीगत कर्जाच्या वसुलीऐवजी बहुजनांच्या अधिकाराची वसुली करणे हे आपले सामाजिक उत्तरदायीत्व मानले* त्या करिता त्यांनी कर्जखते इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडवली.
कर्जखते बुडविण्याची कृती ही क्रांतिकारी घटना आहे.कारण *कार्ल मार्क्सने साम्यवाद आणि समाजवाद जगाला सांगण्याच्या दोनसे वर्षे आधि ह्या विशीतल्या तरुणाने समतेचा सिद्धांत प्रत्यक्ष कृतितून सिद्ध केला* हे तेच करु शकतात *ज्याच्या नैतिक जाणीवा* विकसित झालेल्या असतात अशिच माणसं असा निर्णय घेऊ शकतात.

*वैदिक ब्राम्हणी गैरबराबरीच्या धार्मिक गुलामितुन सोषित-पिडितांना बाहेर काढायच तर स्वतःमध्ये वैचारिक स्पष्टता आणि नैतिक पारदर्शकता असलीच पाहिजे. संत तुकाराम महाराज यांनी ह्याच प्रेरणेतुन गोरगरिब सोषित पिडिताची कर्जखते इंद्रायणी नदिच्या पाण्यात बुडवून संत तुकारामाने सर्व प्रथम स्वतःचे शुद्धीकरण केला,आणि समाज व्यवस्थेचे शुद्धिकरण कराण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले*

संत तुकाराम कुनबी अर्थात वैदिक ब्राह्मणी धर्मशाश्त्र नियमानुसार ते शुद्र (OBC) होते.तुकाराम शुद्र ठरल्यामुळे त्यांना वेद ऐकण्याचा, वेद शिकण्याचा, वेद बोलण्याचा धार्मिक अधिकार नव्हता. *वैदिक ब्राम्हणी समाज व्यवस्थेत एखाद्याला उच्च किंवा निच ठरवण्याची कसोटी म्हणून त्या व्यक्तीचे चारित्र्य, शील, वर्तन, आचार-विचार पाहण्या ऐवजी त्या व्यक्तीची जात पाहिली जाते. वैदिक ब्राह्मणांची ही अमानवी मूल्यांची प्रथा बहुजनांच्या विकासाला अतिशय घातक ठरलेली आहे.*
संत तुकाराम महाराज खालील अभंगात वैदिक ब्राह्मणांच्या ज्ञाना बाबतीत सांगतात•••

पंडीत म्हणता थोर सुख। परितो पाहता अवघा मुर्ख ।।

काय करावे घोकिले । वेदपठण वाया गेले ।।

वेदि सांगितले ते न करी । सम ब्रह्म नेणे दुराचारी ।।

तुका देखे जीवी शिव । हाचि तेथीचा अनुभव ।।

*वैदिक ब्राम्हण पंडित तुकारामांच्या काळात बहुजन समाजात सन्मान आणि प्रतिष्ठेच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान होते अशा स्थितीत तुकाराम कुनबी (OBC) उभा राहतो आणि वैदिक ब्राह्मणांना खुरेखुरे ज्ञान नाही अशी घोषणा करतो तेव्हा देहू सहित पुण्याची भूमी भूक॔प झाल्यासारखी थरारली असेल.*

*वैदिक ब्राह्मणांच्या ज्ञाना विषयी संत तुकाराम महाराजांनी मांडलेले विचार परखड होते.ज्या लोकांच्या हातात ज्ञानाचा प्रकाश होता, त्याच लोकांनी बहुजनां मध्ये अंधाराचे साम्राज्य का वाढवले? स्वतःला ज्ञानी म्हणून घेणार्या वैदिक ब्राह्मणांनी बहुजनांना का नाडलं? त्यांचा कोंडमारा का केला? त्यांचा छळ का केला?*

संत तुकाराम महाराजांनी वैदिक ब्राह्मणा संदर्भात मांडलेले विचार इतके स्वछ आणि स्पष्ट आहेत, त्यावर अधिक चर्चा करण्याची गरजच नाही.
====================
✍🏻 *mn sonawane pune*
====================
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ×××××××××
*७ वा दिवस*
××××××××××××××××
*|| अपौरूषेय वैदिक वेदांची ||*
*|| तुकोबांनी केली चिकित्सा ||*
××××××××××××××××
वेद हे वैदिक ब्राह्मणी संस्कृतीच्या इतिहासातिल अतिशय पवित्र ग्रंथ मानले जातात. वैदिक व्यवस्थेत *रूग्वेद,यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद* या चार ग्रंथ येतात.वेदांना *" श्रुती "* असे ही म्हणतात. हे वेद *अपौरूषेय* असे मानले जाते अर्थात मानवाने निर्माण केलेले नाही. वेदां बद्दल बहुजना मध्ये असा समज पसरलविला गेला होता की *वेदां मध्ये जगातील सर्व ज्ञान आहे*. सृष्टिचे सर्व रहस्य वेदांमध्येच दडलेले आहे.वेद सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याने कोणीही *आपली बुद्धी किंवा तर्क वापरून वेदांची चिकिस्ता करायची नाही*.वेदांत जे सांगितलं आहे त्यातील शब्द न शब्द, अक्षर न अक्षर सत्य मानायचे.अशी रूढी तयार करण्यात आली.*जे लोक वेदांची चिकित्सा करतील त्याला नास्तिक म्हणावे*.त्याला वाळीत टाकावे.सामाजिक कार्यक्रमातून बहिष्कृत करावे असे कठोर नियम वैदिक ब्राह्मण पंडितांनी कले होते.

वेदांचा संदर्भ घेऊन *बाळ गंगाधर टिळक* हिंदू कोण? व्याख्या करताना सांगतात की *"जे लोक ही रूढी मनतात, ते वैदिक म्हटले जातात, आणि जे लोक फक्त वेदांना 'प्रमाण' मानतात तेच लोक हिंदू "*
(तमाम OBC नी टिळकाचे वाक्य लक्षात ठेवावे)

वैदिक ब्राह्मणी मनुवाद्यानी वेदांचा हत्यार म्हणून उपयोग करताना कलियुगा मध्ये क्षत्रिय वैश्य हे वर्ण शिल्लक राहिले नाहीत ह्या वर्णातिल सर्व लोक आताशुद्र झाले आहेत तेव्हा *ब्राह्मण आणि शुद्र हे दोनच वर्ण अस्तित्वात आहेत* वैचारिक ब्राह्मणांनी ह्याच *वेदांच्या हत्याराने शिवाजी महाराजांना शुद्र घोषीत करून त्यांचा राज्याभिषेक नाकारला* तसेच तुकाराम महाराज कुनबी OBC (मराठा) ही *ब्राह्मणेतर जात वेदांच्या धर्मशास्त्रीय नियमाने शुद्र असल्याने त्यांना वेद उच्चारण्याचा, वेदांवर भाष्यकरण्याचा अधिकार नाकारला* तसेच तुकारामांच्या किर्तनावर आणि अभंग लिहण्यावर धार्मिकबंदी आणली त्यातूनच त्यांची हत्या करण्यात आली.

संत तुकाराम वैदिक ब्राम्हणाला वेदां विषयी जानिव करुन देतात•••••••••••
*वेदांचा तो अर्थ अम्हांसीच ठावा।*
*येरानी वाहवा भार माथा।।*
*तुका म्हणे आले आपणचि फळा ।*
*हातोहाती मूळ सापडले ।।*

वेदांचे पाठांतर केवळ घोकंपट्टी त्यांना अर्थ माहिती नाही, आचरण नाही तरीही स्वतःला वैदिक पंडीत, विद्वान, ज्ञानी, आत्मज्ञानी मानू लागले.वरील अभंगात तुकाराम महाराज वैदिकांच्या वेदप्रमाणाला आवाहन देताना आपल्या गाथेतून सांगतात•••

अर्थेविण पांठातर कासया करावे |
व्यर्थचि मरावे घोकूनिया ||
घोकूनिया काय वेगी अर्थ पाहे |
अर्थरूप राहे होऊनिया ||
अर्थ न जाणता कलेले पाठांतर हे पोकळ शब्दज्ञान आहे.आशा शब्दज्ञानाच्या जोरावर पंडित म्हणून मिरवून घेण्यात वेदपठणाला काय अर्थ आहे.
पंडित म्हणता थोर सुख |
परि तो पाहता अवघा मूर्ख ||
काय करावे घोकिले |
वेदपठण वाया गेले ||
वेंदी सांगितले ते न करी |
सम ब्रम्ह नेणे दुराचारी ||
वैदिक ब्राम्हणी *धर्माचे स्वरूप जाणण्याचा वेद हा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे* वेद हे वैदिक ब्राम्हणी विषमतावादी व्यवस्तेचे प्रभावी शश्त्र आहे.
*वेदांनी चातुर्वर्ण विषमतावादी समाजाची निर्मिती तर केलीच आणि त्यातुन विषारी जातिव्यवस्थेचा उगम झाला.*
पुढे चालून वैदिकांनी असा दंडक घोषित केला की *वेदांची कोणीही चिकित्सा करु नये तसे करणे हे वैदिक धर्मामध्ये सर्वात मोठे पाप* माणण्यात आले तसेच *वेद अपौरुषय* आहेत अर्थात *विचारस्वतंत्र्याला* संपूर्ण नकार देण्यात आला,

हिंदुत्वाचा गर्व आणि अभिमानाचा दंभ भरणार्या हिंदूनी धाडसाने, हिम्मतिने वैदिक ब्राह्मणांना सरळ प्रश्न विचारला पाहिजे की, *वेद हे जर हिंदु धर्माचे मूळ आहे तर त्या वेदांवर सर्व OBC SC ST हिंदूची मालकी पाहिजे* तर तुमच्या वैदिक ब्राह्मणी मनुवादि व्यवस्थेतेने आम्हा हिंदूचा धार्मिक अधिकार का नाकारला? आज ही एक ही धर्मपिठाचा शंकराचार्य SC ST OBC का नाही?
*जर आम्ही हिंदू म्हणून आणि तुम्ही ब्राह्मण म्हणून आमचा धार्मिक अधिकार नाकारत असाल तर हे सिद्ध
होतो की * तुम्ही वैदीक ब्राम्हण म्हणून आणि आम्ही हिंदू म्हणून SC ST OBC हिंदूचा धर्म वेगळा आहे व तुम्हा ब्राह्मणांचा धर्म वेगळा आहे*

(*वेद* हे ब्राम्हणाचे *सत्ता*, *संप्पती* , *प्रतिष्ठा* व *सुखभोगाचे* प्रतिक आहे)

वैदिक ब्राम्हण स्वतःला *भुदेव* म्हणवून घेतात.

*देवा आधिन जगस्तर्व*
*मंत्रा आधिन देवते* ।
*ते मंत्र आधिन ब्राह्मण*
*ब्राम्हण मम देवतम* ।।

संत तुकाराम महाराज वेदाच्या या बनवेगिरीला प्रश्न विचारतात•••••

*दैवते असती तयाच्या हाती* ।
*मग का मरती त्याची नातेगोती* ।।

संत तुकाराम महाराजाच्या सडेतोड ऊत्तराने वैदिक ब्राम्हणाच्या विशेष अधिकाराला तडा गेला.
*वैदिक ब्राह्मणा बद्धल बहुजनाला जो आदर होता, त्यांच्या शब्दाला जे पवित्र मानले जायचे, वेदांचा जो सन्मान होता. संत तुकाराम महाराजांच्या सत्याच्या सिद्धांताने वैदीक पंडिताच्या धार्मिक वर्चस्वाला हादरे बसु लागले.ज्ञानाची श्रेष्ठत्वाची घमेंड, दुसर्याना दुखविनारा अहंकार त्यातुन इतरांना कमि लेखन्याची प्रवृत्तिला धक्क्यावर धक्के बसु लागले* वैदिक पंडितांचे आसन डगमगू लागले. वैदिकांच्या पोकळ वाणीला सूरुंग लावण्याचे क्रांतिकारी कार्य संत तुकारामांनी केले म्हणुनच संत तुकाराम टाळकुटे संत नसून *विद्रोही संत* आहेत !!!

*संत तुकाराम महाराजांच्या वेदावरील कठोर टिकेने वैदिक पंडितांच्या गोटात त्यावेळी एकच "खळबळ" उडाली असेल ज्या वेदांची प्रतिष्ठा बहुजनांच्या मनात वैदिक पंडितांने निर्माण केली होती, वेदांचा एकही शब्द उच्चारण्याचा धार्मिक अधिकार शुद्रांना(OBC) नव्हता त्या शुद्रा मधिल तुकाराम नावाच्या शुद्राने (OBCने) वेदा विषयी शंका घ्यावी, वेदाची वैदिक पंडिताच्या ज्ञानाला अव्हान द्यावे हे पाहुन जातीवादी वैदिक पंडितांच्या मेंदुला चांगल्याच झिण-झिण्या आल्या असतिल आणि मग या वैदिक पंडिताचे विषारी दात संत तुकाराम महाराज यांना डसन्या करिता *"सळसळले"* ही असतिल आणि संत तुकाराम महाराजांच्या हत्येचा कट कसा रचला गेला असेल हे आपण पुढे येणार्या वैचारिक वारीच्या क्रमवारीत पाहणारच आहोत•••••
•••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: 🔥 *६ वा दिवस* 🔥
   ▪     ▪     ▪
|| *यज्ञावर संत तुकारामांचे परखड विचार* ||
▪▪▪▪▪▪▪▪▪▪▪
वैदिक ब्राम्हणाचा *पर्जन्येष्टी यज्ञ* आहे ह्या यज्ञाने *पाऊस पाडला जातो* असा वैदिक ब्राम्हाणाचा दावा आहे की,
*यज्ञ भवती प्रजन्ये।*
*यज्ञ कर्म सामुभ्दव।।*
*अर्थात यज्ञानेच पाऊस पडतो कर्मा पासुन यज्ञ हेच आदितत्व आहे.*

परंतु वास्तविक पाहता *गिते* मध्ये १२-१२ वर्षाचे दुष्काळ पडल्याचे वर्णन आहे आणि दुष्काळा विषयी गितेत विश्वमित्र रूषीचा उल्लेख आहे. *विश्वमित्र* मोठा रुषी याला ह्या बारावर्षाच्या भंयकर दुष्काळात आपला जीव वाचविण्या साठी *कुत्र्याचे मांस* खावे लागले.जर यज्ञाने पाऊस पडत असता तर *वेदरचना करनारा यज्ञाचे पौरोहित्य करणार्या विश्वमित्र रुषीने पर्जन्ययज्ञ करुन पाऊस पाडला असता परंतु हे करताना दिसत नाही यज्ञाने पाऊस पडतो ही वैदिक ब्राह्मणांची काल्पनिक कथा आहे.*

संत तुकाराम वैदिक ब्राम्हणाच्या *पर्जन्येष्टी यज्ञाच्या* थोथांडावर आपल्या अभंग वाणीत वैचिरिक सिद्धांत मांडतात.

*प्रजन्य पडावे आपल्या स्वभावे*।
*आपल्याला देते पिके भुमी* ।।
।। तुका म्हणे ।।
*काही विदविर्य शक्ति नाही*

*पाऊस निसर्ग नियमा प्रमाणे पडतो, भुमी आपल्याला धान्य पिकवते यज्ञातून नाही.*

*संत तुकोबाने वैदिक ब्राह्मणाच्या "पोकळ"शब्दावर ओढलेले हे असुड होते.अनैतिक वैदिक पंडितांच्या मर्मावरच जबरदस्त आघात होता.*

वैदिक ब्राम्हणाचे *"यज्ञ"* हे अतिशय महत्वाचे स्थान कारण यज्ञा मध्ये *पशुबळी दिल्याने पुण्य मिळून स्वर्ग प्राप्त होतो हे वैदिक ब्राम्हणाचे तत्वज्ञान* होते.वैदिक अनुयायांचे धार्मिक कर्मकांडाचे यज्ञ हे प्रभावी हत्यार होते.

*《《* वैदिक ब्राह्मणी *" यज्ञात "* दिला जाणार्या पशुबळी प्रथेच्या विरोधात तथागत बुद्धाने कडाडून विरोध केलेला आहे. तथागत बुद्धांना वैदिक ब्राम्हणाच्या यज्ञातिल प्राणीहत्या मान्य नव्हती म्हणूनच पंचशीलेतिल पहिलेच शील*•••••
*पाणातिपाता वेरमणिसिक्खापदं समादियामि* ।।
मी जीवहिंसे पासून अलिप्त राहन्याची शिकवण ग्रहण करतो.ही प्रतिज्ञा बौद्धांना दिलेली आहे.
तथागत बुद्धाने यज्ञ सिद्धांत तिरस्करणीय मानून यज्ञाचा तिव्रशब्दात धिक्कार केला आहे.
हिंसा-हत्या कामवासनेचा मिथ्याचार, असत्य-खोटीभाषा,उत्तेजक मद्यपान या पासून परावृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा सर्व श्रेष्ठ *यज्ञ* आहे असे तथागत बुद्ध सांगतात••••• *》》*

बहुजानांच्या *वेदना - दुःख त्यांची गरिबी-लाचारी*
*बौद्धिक गुलामीचा* *निर्माता वैदिक ब्राह्मणच आहे* हे संत तुकाराम सांगु लागले, लोक ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊ लागले.संत तुकारामांनी आपल्या वाणीचे असूड वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेवर चालविले.

*अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड* ।
*काय त्यासी रांड प्रवसली*
*वैष्णव चांभार धन्य त्याची माता* ।
*शुद्ध उभयंता कुळ याती*
*ऐसा हा निवाडा जाळासे पुराणी* ।
*नव्हे माझी वाणी पदरीची*
*तुका म्हणे आगी लागो*
*थोरपणा* ।
*दृष्टी त्या दुर्जना न पडो माझी*।।

पुढे ते सांगतात••••
*किर्तनाचा विकारा मातेचे गमन ।*
*भाड खाई धन विटाळ तो ।।१।।*

*हरिकथेची विक्री करणे,त्यापासून धन मागणे हे मातेशी गमन केल्या प्रमाणे आहे.अशा प्रकारचे धन मातेची भाड घेण्यासारखे होय.हे वाईट मार्गाने असल्याने त्याचा विटाळच होतो ।।१।।*

संत तुकाराम महाराजांचे वैदिक ब्राह्मण पंडितां बरोबरचे *वैर* व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेले नव्हते तर वैदिक ब्राह्मण पंडितांच्या *अनैतिक*
*संस्कार व संस्कृति* विरोधी वैचारिक भुमिका तुकारामानी घेतली होती.

*वैदिक ब्राम्हणाने संत तुकारामांची शारीरिक मारहाण केली.त्यांच्या किर्तनावर व अभंगावर बंदि घातली, वेदांवर बोलतात म्हणून शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील महसूल वसुलीचे काम बघणार्‍या कृष्णाजी अनंत चिटणीसाला भरीस घालून तुकोबांच्या घरावर, दुकानावर, शेतीवर जप्ती आणण्यात आली.*
त्यांच्या सहित कुटूंबाला *वाळीत* टाकले, त्यांच्या कुटूंबाला गावातुन हद्धपार केले.

*नाही नाही ते खटाटोप आणि आटापिटा करूनही तुकारामांचे प्रबोधन कार्य थांबत नाही हे पाहून तुकारामांची "गाथा" धर्मविरोधी आणि अप्रस्तुत ठरवण्याचा आणि ती इंद्रायणीच्या डोहात बुडवण्याचा अघोरी प्रयोग झाला.* त्यासाठी काशीहून धर्मपीठाचार्य बोलावण्यात आले. त्यांच्यासमोर तुकारामाला पाचारण करून शास्त्रार्थाची तर्कटचर्चा करण्यात आली. हे अर्थात ढोंग होते. तुकाराम जे लिहितो, सांगतो ते धर्मविरोधी आहे, हे ठरवण्याचा डाव ठरलेला होता. त्यानुसार तुकारामांचे अभंग नष्ट करण्यात यावेत असा निर्वाळा धर्मन्यायपीठाने दिला. तुकारामांनी लिहिलेले अभंगांचे संबंध बाड तुकारामांच्याच हाताने इंद्रायणीत बुडवले गेले.
*कारण काय तर तुकाराम कुणबी अर्थात वर्णाने शुद्र(OBC) त्यामुळे एका ज्ञानप्राप्तीचा आणि विचार मांडण्याचा अधिकारच नाही.* शुद्रांचे (OBC) विचार म्हणजे घोर पातक. त्यामुळे धर्मभ्रष्ट होतो. देवाचा प्रकोप होतो. म्हणून हे आक्रीत (तुकारामांचे अभंग) नष्ट केले पाहिजे.
दुर्दैवाने त्यावेळी तुकारामांची बाजू घ्यायला तिथे कोणीच नव्हते. गाथा इंद्रायणीत बुडवणे हा धर्मपीठाचा न्याय होता. त्यात कोण हस्तक्षेप करणार? *गाथा पाण्यात बुडाली. पण त्यातला विचार मात्र तरला. तो बुडाला नाही. कारण तोवर तो सर्वोतोमुखी झाला होता.*

*जेंव्हा एखादा मणुष्य आपल्या दूरदृष्टीने, आपल्या न्यायाच्या नजरेने, समाजव्यवस्थेला काही नवे वळण देऊ पाहतो. जुन्या व्यवस्थेतील दूषित घटक दूर करून काही ताजे, टवटवीत असे नवे करू पाहतो. काही नवी स्वप्ने पाहतो, नवा विचार करतो.पण त्याच्या मणात जे काही नव्याने उगवलेले असते, ते प्रत्यक्ष फुलवण्याचा प्रयत्न त्याने सुरू केला, तर प्रस्थापित व्यवस्थेचे ठेकेदार सर्व अंगाने त्याच्यावर कोसळतात.अशा वेळी तो मणुष्य लेचापेचा असेल, त्याची आपल्या विचारावरची निष्ठा कच्ची असेल, आपल्या विचारा स्वतंत्र्या पेक्षा आपली तात्कालिक सुखे त्याला महत्त्वाची वाटत असतिल, तर तो माघारी फिरतो, आपल्या मनात उदभवलेले विचार मनातल्या मनात जिरू देतो, शरणागती पत्करतो.*
पण
*काही माणसे तशी नसतात.आपल्या मनातील विचारावर त्यांचे इतके प्रेम असते,की त्या विचारापुढे जगातील इतर सर्व गोष्टी त्यांना तुच्छ वाटतात.आपण उचलेले पाऊल आपल्याला अखेरीस मृत्यूच्या जबड्यात घेऊन जाईल, याची त्यांना पुरेपुर कल्पना असते. आपला मृत्यू समोर दिसतो तरीही ते आपल्या कार्याची निष्ठा तिळमात्र ही कमी होत नाही.तुकाराम महाराजांनी नेमके हेच केले होते.म्हणूनच ते अभंगात सांगतात*•••••••••

*बौद्ध अवतार माझिया अदृष्टा* |
*मौन मुखे निष्टा धरियेली* ||
*मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी* |
*बौद्ध ते म्हणोनी नावे रूप* ||

संत तुकाराम महाराज वरील अभंगात म्हणतात *बुद्ध अवतार मी पाहिलेला नाही परंतू बुद्धाची मुखाने मौन आणि कार्याच्या प्रती निष्ठा मी धारण केली आहे.
••••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻*mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ********
*८ वा दिवस*
********
*लावूनी कोलित |*
 *माझा करितील घात* ।।१।।
*ऐसे बहुतांचे संधी |*
 *सापडलो खोळेमधी*।।२।।
*पाहतील उणे |*
*तेथें देती अनुमोदने*।।३।।
*तुका म्हणे रिघे |*
 *पुढे नाही जाले धींगे*।।४।।

*संत तुकाराम महाराजांचे वैदिक ब्राह्मण पंडितां बरोबरचे वैर व्यक्तिगत कारणातून निर्माण झालेले नव्हते तर वैदिक ब्राह्मण पंडितांच्या अनैतिक संस्कार व संस्कृति विरोधी वैचारिक भूमिकेतून झाले होते.*

*धर्म आणि देवाची दहशत पसरवून त्या आधारे हजारो वर्षांपासून घामाचा थेंब न गाळता उच्च दर्जाचे जीवनमान आणि रक्ताचा थेंब न गाळता सुरक्षा मिळवणार्‍या वैदिक पुरोहित वर्गाची मक्तेदारी संत तुकाराम महाराज मोडून काढू पहात होते.* कर्मकांड नाकारत होते. देव आणि भक्तांमधील पुरोहितांची मध्यस्थी अमान्य करत होते. *दैवाधीन समाजाला कर्मवाद समजावून सांगत होते. जातीभेदाच्या भिंती गाडू पहात होते.*

वैदिक मनुवादि ब्राह्मणांची संगत सोडा हे संत तुकाराम महाराजानी बहुजनांना निक्षून सांगितले.त्यांनी *यज्ञ,होम,हवन,तीर्थयात्रा,व्रतवैकल्ये,दशक्रिय,*
*पुरोहितगिरी,पंचांग, भविष्य याविरुद्ध मोहीमच उघडली* होती.त्यामुळे वैदिक ब्राह्मण संत तुकाराम महाराजांच्या विरोधात *संघटितपणे उभे राहिले.* ते पदोपदी संत तुकाराम महाराजाना त्रास देऊ लागले. वैदिक ब्राह्मणाकडून त्याच्यावर होत असलेले शाब्दिक आणि शारीरिक हल्ल्यातून संत तुकाराम म्हणतात.

। *मरणाही आधी राहिलो मरोनी* ।।
।। *मग केले मनी होते तैसे* ।।

*"तुकाराम महाराज म्हणतात मी प्रत्यक्ष मरणाच्याही आधी जिवंतपणीच स्वतःचे मरण अनुभवले आहे आणि त्यानंतर माझ्या मणात जे काही होते, ते केले आहे."*
हे तुकारामांनी हिमतीने न घाबरता सांगितले•••
कारण,
वैदिक ब्राम्हणाने संत तुकारामांची *शारीरिक मारहाण केली.त्यांच्या किर्तनावर व अभंगावर बंदि घातली, वेदांवर बोलतात म्हणून त्यांच्यावर खटला भरुन त्यांचे घरदार जप्त केले. त्यांच्या सहित कुटूंबाला वाळीत टाकले, त्यांच्या कुटूंबाला गावातुन हद्धपार केले आणि संत तुकारामाची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडविण्यात आली आणि शेवटी त्याच पाण्यात संत तुकारामाची हत्या ही करण्यात आली*

एखाद्या व्यक्तीच्या मोठेपणाचे मूल्यमापन करायचे असेल, तर *व्यक्ती जगली कशी हे पाहणे जसे महत्त्वाचे असते, तसेच ती व्यक्ती मृत्यूला सामोरी कशी गेली,* हे पाहणेही आवश्यक असते.

संत तुकारामांना वयाच्या केवळ *बेचाळिसाव्या वर्षी* गूढ अशा मृत्यूला सामोर जावे लागले.

*संत तुकारामांचे खरे मोठेपण त्याच्यां सदेह वैकुंठगमना मध्ये नाही, हे आपण आवर्जून ध्यानात घेतले पाहिजे. त्यामुळे संत तुकारामांचे मोठेपण त्याच्यां कार्यात आहे, त्याच्यां विचारात आहे, त्याच्यां आचरणात आहे.* बहुजनांच्या मानवी मुल्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला, वैदिक ब्राह्मण मनुवाद्याचा जो छळ सोसला, त्यामध्ये संत तुकारामांचे मोठेपण आहे. हे त्यांचे मोठेपण कोणी नाकारले, तर जरूर संताप करावा पण सदेह वैकुंठगमन नाकारले म्हणून संताप करू नये.

*तुकाराम सदेह स्वर्गात गेले असल्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कार करायचे नाहीत, असे रामेश्वरभटांनी सांगितले. हे तेच रामेश्वरभट आहेत ज्यांनी एके काळी तुकारामांच्या तथाकथित शुद्रत्वामुळे त्यांना वेदांचा अधिकार नसल्याचे सांगितले होते. तुकारामांच्या कीर्तनातुन व अभंगातून वेदांचा ध्वनी उमटत असल्याचा आक्षेप घेतला होता.त्याच्यावर खटला भरला होता. या खटल्यामुळे तुकारामांचे घरदार जप्त झाले. त्यांना वाळीत टाकण्यात आले. त्यांना गावातून हद्दपार करण्याचा हुकूम सोडण्यात आला आणि त्यांच्या अभंगाची गाथा इंद्रायणी नदीच्या पाण्यात बुडविण्यात आली.त्यांना नविन अंभंग लिहायला बंदी घालण्यात आली.हा सगळा अन्याय ज्यांच्यामुळे झाला, ते रामेश्वरभटच तुकाराम सदेह वैकुंठाला गेले, असे सांगण्यासाठी पुढे सरसावतात, तेंव्हा रामेश्वरभटांच्या बोलण्यावर कसा विश्वास ठेवावा?*

● *संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले हे खरे मानायचे असेल, तर वारकरी संप्रदायाला प्रिय असलेला एकादशी सारखा दिवस निवडण्याऐवजी (शिमगा) धुळवडीसारखा दिवस का निवडला ?*

● *तुकाराम सदेह वैकुंठाला गेले असते, तर तुकारामांचे कुटूंबिय हे गावातील लोकांच्या आदराचाच नव्हे तर पुजेचा विषय का झाले नाही ?*

● *तुकारामांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नी जिजाई घरदार सोडून आपल्या मुलांसह माहेरी अश्या गेल्या, त्या पुन्हा देहूला कधीही का परतल्या नाहीत?*

● *तुकारामांचे धाकटे बंधू कान्होबा हे देखिल जिजाई प्रमाणेच देहू सोडुन आपल्या सासुरवाडीस का जाऊन राहीले? आणि ते देखिल देहूला पुन्हा कधी परतले नाही?*

● *तुकारामांच्या हत्ये नंतर त्यांची पत्नी जिजाई व भाऊ कान्होबा देहू सोडुन गेल्यावर त्यांचे घरदार, जमीन-जुमला असा इस्टेटीचा बहुतेक भाग मंबाजीसारख्या ब्राह्मणांच्या ताब्यात का गेल्या?*

संत तुकाराम महाराजांनी *बहुजानांच्या वेदना - दुःख त्यांची गरिबी-लाचारी आणि बौद्धिक गुलामीचा निर्माता वैदिक ब्राह्मणच आहेत हे ठणकावून सांगितले*
लोक ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेऊ लागले.संत तुकारामांनी आपल्या वाणीचे असूड वैदिक ब्राम्हणावर चालविले.
*तुकाराम महाराजांनी अमानवी वैदिक मनुवादि ब्राह्मणी व्यवस्था बदलण्यासाठी जिवाच्या आकांताने लढाई केली, ह्या व्यवस्थेतच त्याच्या मृत्यूची बीजे होती.तुकाराम महाराजांचा संघर्ष ज्या वैदिक ब्राह्मणी लोंकाबरोबर होता, त्यांच्या हाती हजारो वर्षांपासुन धार्मिक- सामाजिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याची धमक देहूतिल सामान्य माणसे त्या काळात दाखवू शकले नाहीत.*
परंतु•••••
*आजच्या वर्तमानात संत तुकाराम महाराजांचे विचार आणि त्या विचारधारेचा प्रचार - प्रसार करण्याची हिम्मत - धाडस आजच्या वारकरी संप्रदाया मध्ये आहे का?*

आपण सादर करित असलेल्या ह्या आजच्या वैचारिक वारीचा वारकरी संप्रदाया समोर वास्तविक पाहता चिंता
आणि चिंतनाचा प्रश्न होऊ शकतो•••••
••••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
•••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: || ● *९ वा दिवस* ● ||
•••••••••••••••
*नाही वैकुंठाला गेला*
*तुका मारूनी टाकला*|
*डाव्या हाताचा कलंक*
*उजव्या हाताने झाकला*||

हरिभक्त बुवा सांगे जनलाेका ! *वैकुंठासी* तुका चालियेला !!1!!
प्रयाण काळी म्हणती *विमान* ते आले ! *अदृश्य* ते झाले तुकाराम !!2!!
आम्हां पामरांचा साधा हाे सवाल ! ऊत्तर ते द्याल! शांतपणे !! 3!!
ऊभ्या आयुष्यात सुखाचे ते क्षण ! किती नारायण? दिले तुकया !! 4!!
*किर्तनास बंदी ,गाथा बुडविली ! शेती हडपली मंबाजीने* !! 5!!
देहु साेडाया बहु त्रास दिला ! डाेंगर दाखविला !भामनाथ !!6!!
भट रामेश्वर! सालाेमालाे जहरी ! *ऊठले जिव्हारी तुकाेबांच्या* !!7!!
शिल हननास *'वेश्या'* पाठविली "माऊली" मानली 'तुकाेबांनी' !!8!!
चाळीस वर्षाचा वादळी प्रवास ! सुखाचा ताे घास कुणा नाही !!9!!
सांगा हरिभक्त शेवटच्या क्षणासी ! *विमान तुकाेबासी आले कैसे*?? .!10!!
परिवार अवघा साेडुन तुकाेबा ! अचानक *गुप्त* झाले कैसे??!!11!!
टाळ विणा आणि जुनाट गाेधळी बांबुच्या वनी पडली कैसी ?? !!12!!
*एकादशी नाही कार्तीक आषाढी? देवाने 'हाेळी'निवडली कैसी* ?? !!13!!
विमानात बैसुन वैकुंठी गेलिया !कुटुंबाची पुजा नाही कैसी ?? !!14!!
कान्हाेबा आवली अवघे गाेकुळ ! क्षणात भंगुर झाले कैसे ?? !!15!!
*वैकुंठासी तुका न दिसला कुणाला* ? जाेडा सापडला झाडी कैसा ?? !!16!!
ईंद्रायणी तिरी विमान ऊतरले ! का न दिसले कान्हाेबासी ?? !!17!!
हरिभक्त ऐका - *सत्य सांगा लाेका* !! तरचं घ्या नाव तुकाेबाचे !! 18!!
*षंढपणा साेडा --साेडा ती लाचारी* तरच 'वारकरी' म्हणवुन घ्या !!19!!
*भित नव्हते तुकाेबा कधी मरणाला* ! सांगा समाजाला धिटपणे !!20!!
*आजची ती पिढी हुशार हाे झाली ! भाकडकथा गेली विमानात* !!21!!
वेळ नाही गेली सुधरा लवकर !! हरिचे डिंगर ,म्हणवतांना !! 22!!
बस्स करा आता लटिके पुराण ! सांगा तत्वज्ञान समाजाशी !!23!!
*नसेल जमत सत्य ते सांगणे ! शेतीत राबणे सुरु करा*
!! 24!!
*वदत असे जिव्हा लबाड चाेरटी ! नाव ते आेठी घेऊ नये*
!! 25!!
( रचना ::--अमाेल मिटकरी)
••••••••••••••••••••••••••••
*संत तुकाराम महाराजांनी असमानतेची, गैरबराबरीची,उचनिचतेची,जातीपातीची व्यवस्था बदलण्यासाठी जिवाच्या आकांताने वैदिक ब्राह्मणांसी जो संघर्ष केला. वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेतेच्या संघर्षातच संत तुकाराम महाराजांच्या मृत्यूची बीजे होती.तुकाराम महाराजांचा संघर्ष ज्या वैदिक ब्राह्मणी मनुवाद्या बरोबर होता, त्यांच्या हाती हजारो वर्षांपासुन धार्मिक- सामाजिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे त्यांच्या वाटेला जाण्याची धमक बहुजनांत नव्हती पण संत तुकाराम वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याच्या विरोधात गेले कारण•••••••••*

*भय नाही जन्म घेता।*
*मोक्षपदा हाणो लाथा।*
*तुका म्हणे आता।*
*मज न लगे सायुज्यता।*

संत तुकाराम महाराज म्हणतात या जन्माची मला भीती नाही,म्हणजे ते पृथ्वीवर राहू इच्छित होते,मोक्षाला लाथा घाला असे म्हणून ते मोक्ष(वैकुंठ) नाकारतात.जे *तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात, ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?* तथाकथित मोक्षाचे अतिउच्च पद म्हणजे पुज्यपद आहे, असे वैदिक परंपरा सांगते,त्या पुज्यपदाला तुकाराम महाराज नाकारतात.
म्हणजे जे तुकाराम महाराज वैकुंठ नाकारतात ते तुकाराम महाराज वैकुंठाला जातील का?
संत तुकाराम महाराज म्हणजे•••••••

*बोले तैसा चाले।*
*त्याची वंदावी पाऊले।*

या विचारांचे जसे बोलायचे तसे वागायचे,असे होते.म्हणजे तुकाराम महाराज वैकुंठाला गेले नाहीत हे त्यांच्याच अभंगावरून त्यांच्या विचारावरून स्पष्ट होते.
तरमग *तुकाराम महाराजांच्या वयाच्या 42 व्या इतक्या तरुण वयात मृत्यू कसा झाला* ?

डॉ आ ह साळुंखे "विद्रोही तुकाराम" पुस्तकातील "परिशिष्ट" मध्ये आपले मनोगत व्यक्त करताना सांगतात की !!

तुकाराम सदेह स्वर्गाला गेले असल्यामुळे मृत्यू नंतर केले जाणारे विधी त्याच्यासाठी करण्याचा प्रश्न नाही, त्यांचे आशौच वा सुतक पाळण्याची गरज नाही, असे रामेश्वरभटांनी कान्होबांना सांगितले, असे म्हणतात.
पण रामेश्वरभटांच्या डोक्यात काही वेगळा विचार,धर्मशास्त्रांचे काही वेगळे नियम असण्याची शक्यता आहे, असे मला वाटते.गौतमधर्म- सूत्रामध्ये आलेला एक नियम (२.५.८) गो'ब्राम्हणहतानामन्वक्षम' असा आहे.अर्थात *'गाय आणि ब्राह्मण यांनी ज्याला मारले असेल, त्याच्या नातेवाईकांचे सुतक त्याच्या मृत्यू नंतर ताबोडतोब फिटते',* असा या सूत्राचा अर्थ आहे.
यानंतरच्या एका सूत्रावर (२.५.११) टीका लिहिताना हरदत्त नावाच्या लेखकाने मिताक्षरा नावाच्या वृत्तीमध्ये ब्रम्हपुराणातील पुढिल श्लोक उद्धृत केले आहेत.

*ब्रम्हदण्डहताये च ये चैव ब्राह्मणैर्हताः।*
*महापातकिनो ये च पतितास्ते प्रकीर्तिताः।।*
*पतितानां न दाहःस्यान्न च स्यादस्थिसंचय।*
*न चाश्रूपाताः पिण्डो वा कार्या श्राद्धक्रिया न च।।*

या श्लोकाचा अर्थ असा ••••••

*जे ब्राह्मणांच्या काठीने मारले गेले असतील, ज्यांची ब्राह्मणा कडून हत्या झालेली असेल आणि जे महापातकी असतील ते पतित म्हटले जातात.अशा पतित लोकांचे दहन करू नये. त्याचा अस्थिसंचय करू नये.(म्हणजे तिसर्या दिवशी त्याच्या अस्थी गोळा करून त्याचे विसर्जन करण्याचा विधी करू नये) त्याच्यासाठी आश्रू ढाळू नयेत.त्यांना पिंड अर्पण करू नये वा त्यांच्यासाठी श्राद्धक्रियाही करू नये.*
*ब्राह्मणांनी ज्याची हत्या केली असेल, त्याच्या नातेवाईकांनी त्याच्यासाठी अश्रू ढाळायचे नाही, मग त्याच्यासाठी धार्मिक विधी करण्याचा तर प्रश्नच उदभवत नाही, असे सांगणार्या या नियमाच्या क्रूरपणावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. ब्राह्मणाचे वैर ओढवून घेणार्या माणसाच्या नातेवाईकांनी त्याच्या जिवंतपणीही आणि मृत्यू नंतरही त्याच्या बरोबरीचे आपले रक्ताचे नातेही नाकारावे, असे हा नियम सुचवितो.*

*रामेश्वरभटांनी तुकारामांच्या मृत्यूनंतर त्याच्यासाठी कही ही विधी करू नये, असे कान्होबाला सांगितले, तेव्हा त्यांचे शब्द कोणतेही असोत, रामेश्वरभटांच्या मनात मात्र धर्मशास्त्राचा हा नियम असण्याची शक्यता आहे असे दिसते.*

*संत तुकारामांबद्दलचा आदरभाव, श्रद्धा, भक्ती म्हणून आपण त्यांच्या खुनाला वैकुंठगमन म्हणायचं का?* आणि *त्यांचा खून करणार्‍या पाप्यांना शुद्धीपत्र बहाल करायचं का?*

*संत तुकारामांसाठी वैकुंठाहून विमान येते आणि त्यांना घेऊन जाते. ही घटना आपल्याला आजही खरी वाटत असेल तर आपल्याइतके मूर्ख आपणच असेच म्हणावे लागेल.*

*प्रश्न हा आहे की,*

*जर संत तुकारामाचा धर्म हिन्दू आणि वैदिक ब्राह्मणांचा धर्म ही हिन्दू, तर एका हिन्दू ने दुसर्या हिन्दूच्या धार्मिक आधिकारावर बंदी का घातली?*

*संत तुकाराम शुद्र होते (OBC) होते अर्थात बहुजन होते ह्या कारणाने जर वैदिक ब्राम्हणाने संत तुकारामांचा धार्मिक अधिकार नाकारला असेल तर*
*वैदिक-ब्राम्हणाचा आणि शुद्र हिंदू OBC चां धर्म एक आहे का?*
कारण
*जर वैदिक ब्राह्मणांचा व शुद्र हिंदुचा धर्म एक असता तर संत तुकारामाची धार्मिक हत्या झाली असती का ?*

तेव्हा बहुजन OBC जागे व्हा ! आणि सदसदविवेक बुद्धीने विचार करा !!

*हिंदूना धार्मिक गुलाम बनविणार्या वैदिक ब्राह्मणी पंडिताच्या असमानतेच्या धार्मिक दहसतवादाला शुद्र हिंदू OBCने आजही पवित्र मानायचे का* ?

*वैदिक पंडित ब्राह्मणांच्या अनैतिक संस्काराला आम्ही हिंदूनी शुद्र अतिशुद्रांनी अर्थात SC ST व OBC ने आजही नैतिकतेचा आधार मानायचं काय* ?

*वैदिक पंडित ब्राह्मणानी त्याची संस्कार आणि संस्कृति आज ही शुद्र अतिशुद्रांना नाकारली आहे, ती संस्कार संस्कृती SC ST OBC शुद्र- अतिशुद्र हिंदूनी आपलीच आहे असे मानायचं का* ?

आमच्या बहुजन महापुरुषांनी आपल्या प्राणाची आहुति देऊन वैदिक ब्राह्मणशाहीला ज्या प्रश्नांची अव्हाने उभे केली ते प्रश्न•••••

*आमच्या महापुरुषांनी विचारलेले प्रश्न, SC ST OBC अर्थात हिंदूबहुजन हे प्रश्न वैदिक ब्राह्मण पंडिताना कधि विचारणार आहे का नाही*?
••••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: 🥀🍁🥀🍁
*११ वा दिवस*
🥀🍁🥀🍁

आज ११ व्या दिवशी आपण पंढरपूर येथे *विठ्ठलाच्या वारीत पायी चालत जणार्या वेगवेगळ्या दिंड्या आणि पालख्यांची मुळ पंरपरा व उद्देश काय होता हे पाहणार आहोत*•••••
*******
*चारिका* : *चालत रहा !!!*
*******
एखाद्या चालत आलेल्या परंपरेचे मुळ स्वरुप नेमके काय होते, हे समजून घ्यायचे असेल तर त्या *परंपरांच्या चालीरीती, वैचारिक दृष्टीकोन, बौद्धिक तत्वज्ञानाचे साम्य शोधने महत्त्वाचे आहे* कारण ज्यांचा शिक्षणाचा मानवी अधिकार नाकारला गेला तो बहुसंख्याक समाज चालीरीतीच्या माध्यमातून एका पिढी कडून दुसर्या पिढिला हा वारसा देत असतो. वारीतिल दिंड्याची हि परंपरेचे *तर्क संगत तटस्थपणे साम्य* शोधले असताना स्पष्टपणे जाणवते की•••
जेव्हा संत नामदेव महाराजां पासून ते संत तुकाराम महाराज पर्यंत चे संत आपल्या *अभंगगाथेत "बुद्धांचा" उल्लेख करतात*•••••

*संत नामदेव*•••
गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू |
आपण योगेश्वरु *बौद्ध* रुपी ॥
व्रतभंगासाठी *बौद्ध* अवतार |
झाला दिगंबर अवनिये |
ऐसा कष्टी होऊनी *बौद्ध* राहिलासी ||

"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागी *बौद्ध* रूपे पंढरी नांदसी ||"

लोक देखोनि उन्मत दारांनी आसका |
न बोले *बौद्ध* रूपे ठेविले जधनी हात ||
नववा वेसे स्थिर रूप तथा नाम *बौद्ध* रूप |
संत तया दारी! निष्ठान्टती निरंतरी ||

*संत तुकाराम*•••
*बौद्ध* अवतार माझिया उदृष्ट |
मौन मुखे निष्टा धरियेली ||
मध्ये झाले मौन देव बीज ध्यानी |
*बौद्ध* ते म्हणोनी नावे रूप ||

कलयुगी *बौध्द* रुप धरी हरी |
तुकोबा शरीर प्रकटला ||

होऊनिया कृष्ण कंस वधियेला |
आता *बुद्ध* झाला सखा माझा ||

*संत बंका महार*•••••
हाती न घेता तलवार
*बुद्ध* राजकरी जगावर |
ऐकोनी "बंका" करित उत्तर
बुद्ध अवतार पांडुरंग ||

*संताचे ही अभंगवाणी* निश्चितपणे स्पष्ट करते आहे की,
*संत संप्रदायावर बुद्धांच्या विचारांचा प्रभाव होता* आणि त्याचाच एक भाग म्हणजे•••
|| *वारी* || महाराष्ट्रातील विविध गावांपासून
चालत-चालत पंढरपूर येथे संपणारी *सामुदायिक पदयात्रा* होय.

बुद्धकाळा पासून *" चारिका"* अर्थात *चालत रहा* !!!
भिख्खू संघाची परंपरा आहे.
*चरिक भिक्खवे चरिक* ... *बहुजन हिताय बहुजन सुखाय* ...
*लोकानुकंपाय* ... *देखेथ भिक्खवे धम्म आदि कल्याण .. मज्जे कल्याण* ... *परियोसन कल्याण*•••••
तथागत बुद्ध अनुयायांना आदेश देतात की, *समस्त मानवाच्या कल्याणाकरीता गावोगावी फिरत रहा. लोकांना धम्म सांगून लोकांचे कल्याण कसे होईल ते पहा*. ते अज्ञानामध्ये असतील तर त्यांना चार आर्यसत्ये सांगून त्यांचेवर अनुकंपा करा. *धम्म हा सुरवात, मध्ये व शेवटीही लोकांचे कल्याण कराणारा आहे. एकाच वाटेने दोघांनी जावून नका दहाही दिशेला धम्म सांगण्यासाठी फिरत रहा*. जास्तीत जास्त लोकांना धम्म पालनासाठी प्रवृत्त करा की, जेणेकरुन त्यांचे कल्याण होईल त्यांना दु:क्खमुक्ती मिळेल. त्यांना निर्वाणाचा साक्षात्कार होईल. याच उपदेशाचा भाग म्हणून वारी ची परंपरा *तथागतांच्या काळापासूनच सुरु झाली आहे. ही विशिष्ट विचारांच्या प्रसारासाठी सुरु केलेली जगाच्या मानवी इतिहासातील बहुधा पहिली अराजकिय संघचारिका म्हटली पाहिजे*.

वारकर्यांची *दिंडी किंवा वारी* हे बौद्ध भिख्खूच्या *"चारिकेचे"* दुसरे रूप आहे.बौद्ध चारिका तथागतांच्या वा सारिपुत्ता सारख्या वरिष्ठ भिख्खूंच्या नेतृत्वाखाली निघत असे.या चारिकेत सामील झालेले *भिख्खू पायी चालत* असत.वाटेल जागोजागी लोक त्यांचे भोजन, निवासाची व्यवस्था करीत असत.त्या काळातील चारिके कडे उत्कट आशा श्रद्धेच्या भावनेने पाहिले जात होते. *संतांच्या दिंड्या देखील याच चारिकेच्या स्वरूपाच्या आहेत*.
*वारकर्याची जातपात न पाहता त्यांना भोजन देणं हा जसा श्रद्धेचा भाग आहे ही तसेच वारकरी संप्रदाय जाती पाळत नाहीत तेंव्हा तुम्ही ही जातीभेद पाळू नका हा संदेश दिंडीकडे पाहिल्या नंतर आपल्या ध्यानात येवू शकतो*.

आळंदी व देहूगाव हे संत परंपरेतील महत्वाची गावे आहेत. देहू व आळंदी येथून संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर यांच्या पादुकांच्या पालख्या पायी निघून त्या पंढरपूर येथे जातात. ह्या दोन पालख्या एक संत ज्ञानदेव आळंदी पालखी आणि दुसरी संत तुकाराम देहूची पालखी या दोन पालख्यांचा इतिहासातील तपशील पाहता *एकोणीसाव्या शतकाच्या सुरूवातीला पेशवाई संपुष्टात आली*. वारकरी संप्रदाय हि बहुजनांचा संप्रदाय असल्याने आणि त्यात *ब्राह्मणांची मातब्बरी नसल्याने पेशवाईत वारकर्या कडे पुरेशा सहानुभूतीने पाहिले न जाणे* हे स्वाभाविक आहे कारण *संत तुकाराम महाराजा सारख्या संताला दुसरा बाजीराव तुच्छतेने " शुद्र " म्हणून हिनवत असे*•••••

एक ब्राह्मण इतिहासकार ज्यांना *इतिहासिचार्य* पदविने गौरव केला जातो ते *राजवाडे* यांनी भारतीय संशोधक मंडळात एका पुस्तकाचा उल्लेख केला आहे. पुस्तकाचे नांव आहे *"देहुकर तुकारामाची ब्राह्मणात किंमत"* त्या पुस्तकामध्ये *पेशव्यांच्या श्रीवरधनात किर्तन करणार्या वारकर्यास तुकारामचा अंभंग म्हटला म्हणून स्थानिक ब्राह्मण भटाने वाळीत टाकल्याचा उल्लेख आहे*.
*एकोणीसाव्या शतकाच्या मध्यावर देखील वैदिक ब्राह्मणी विद्वानांनी जाणीवपूर्वक, हेतूपुरस्कर वारकरी संप्रदायाच्या कार्याला दुर्लक्षित केले*.

*महात्मा ज्योतिबा फुले यांनी काळानुरूप वारकरी संप्रदायाच्या कार्याची दखल घेतली. म.फुले यांना बहुजनांच्या संताची समतामुलक विचारधारा आणि वारकरी संप्रदायाचा वारकरी , सामाजिक परिवर्तनाची प्रभावी ताकद बनुशकते हे जाणून घेतले. सत्यशोधक अंदोलना मध्ये सुरवातीच्या काळात म.फुले यांना जे अनुयायी मिळाले ते वारकर्याच्या प्रभाव क्षेत्रातील आणि परंपरेचे वारकरी कुटुंबातूनमिळाले*.
*म.ज्योतिराव फुले यांच्या काव्यरचने मध्ये संताच्या शैलीचा बराचसा प्रभाव जानवतो*.म.ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक अंदोलना मध्ये संताचे अंभंग, गाथा बहुजनांना मध्ये जागृती आणि जाग्रणात कलेला उपयोग आणि प्रयोग म.ज्योतिराव फुले यांच्या समग्र वाड्मयात वाचायला मिळतात.

बहुजन मित्र हो !!!

पंढरपूर- वारीच्या ह्या संपूर्ण वैचारिक प्रवासात आपण पुढे जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की, *संताचा मार्ग हाच " बुद्धांचा मार्ग" होता आणि तथागत बुद्धांच्या विचारधारेच्या माध्यमातून संतानी "ब्राह्मणी वैदिकांच्या धार्मिक" दहशतवादा विरूध्द बहुजनांचा मानवी हक्काच्या स्वातंत्र्याचा " संघर्ष " केला होता*, हे बहुजनांनी
जाणून घेणं, समजून घेणं महत्त्वाचे आहे•••••
•••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
•••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: |●| *१० वा दिवस* |●|

*बहुजन मित्र हो !!!*

आज वैचारिक वारीचा दहावा दिवस, आपण माझ्या वैचारिक लिखाणाचा अनुभव घेत आहात. माझ्या मांडणी मध्ये दुटप्पीपणा नाही, की डावपेच नाही. किंवा  तडजोड ही नाही, फसवणुक तर अजिबात नाही•••हा जिव्हाळा आहे, ही आत्मीयता आहे आणि या जिव्हाळ्याचं, या आत्मीयतेचा एक भाग म्हणजेच•••••

*|| वैचारिक पंढरीची वारी ||*
*। आप आपल्या घरी ।*

बहुजन संतानी वैदिक ब्राह्मणी मनुवादि संस्कार आणि संस्कृतीच्या विरोधात जीवाच्या आकांताने संघर्ष केला  या संघर्षाचे नेतृत्व संत कबीरा पासून ते संत तुकाराम महाराजांनी शेवटच्या श्वास पर्यंत केला हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला , समजून घेण्याचा प्रयत्न केला हे जाणून घेणं हे समजून घेणं जरूरीचे होते, समजून घेणं आवश्यक होते कारण वैदिक ब्राह्मणांचा असा दावा होता की,

*ब्राम्हणो जायमानो*
*हि पृथिव्याम अधिजायत*।
अर्थात *ब्राम्हण हा जन्मत:च सर्वसत्ताधीश आहे.*

*अशा प्रकारे पुरातन कालापासून वैदिकांनी "ब्राम्हण श्रेष्ठत्वाचे प्रतिक" बहुजनांच्या डोक्यावर बसवलं आहे. वैदिकांनी ब्राह्मण श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी जाणीवपूर्वक ब्राह्मणाचा संबंध सदगुणांसी दाखवून ब्राह्मणा भोवती चांगुलपणाचे एक वलय निर्माण करन्यात वैदिक सफल झालेले आपन आज देखील अनुभवतो आहोत*.•••••

*श्रृति-स्मृति पुराणे इतिहासांचे दाखिले देऊन हेतूपुरस्सर ब्राह्मण सर्वगुण संपन्न आहे असे बहुजन समाजास पटविन्यात वैदिक  कमालीचे यशस्वी झालेले आहेत*•••••

पंरतु ,
*बहुजन संतानी वैदिक ब्राम्हण श्रेष्ठत्वाला व दैवत्वालाच वैचारिक आव्हान दिले. ब्राह्मणाच्या शील-नैतिकता-चारित्र व आचरणाला टिकेचे लक्ष बनविले आणि त्याच बरोबर बहुजन समाजाच्या समता मुलक ऐकतेच्या स्थापने साठी विधायक प्रयत्न ही केले*

बहुजन मित्र हो !!!

वास्तविक पाहता•••
*ब्राह्मण एक व्यक्ती म्हणून किंवा ब्राह्मण समाजाशी विनाकारण बौद्धिक संघर्ष करावा हा आमुचा मुळातच हेतू नाही, परंतु "ज्या वैदिक ब्राह्मणी विद्वानां कडे शिक्षणाची मालकी असतांना देखील भारतातील ब्राह्मण इतर बहुजन समाजातील लोकांना ब्राह्मणांनी जपण्याऐवजी, वाढविण्याऐवजी, फुलविण्याऐवजी ब्राह्मण जेव्हा बहुजन समाजाच्या लोकांना एकमेकांन विरुद्ध लढवून कलंकित करतो, भयग्रस्त करतो, त्यांचे खच्चीकरण करतो तेंव्हा बहुजन समाजाचा गुणवान, शिलवान, चारित्र्यवान, त्यागी आणि समर्पित व्यक्ती खुजा आणि खुरटलेलाच राहतो."*

*वैदिकांची ब्राह्मणी मनुवादि धार्मिक व्यवस्था बहुजनांच्या स्वातंत्र्याची गळचेपी करीत असताना, बहुजन महापूरूषांचा खोटा इतिहास सांगत असताना, बहुजनांचे रहन-सहन,खान-पान,जीवनशैलीवर ब्राह्मण अतिक्रमण करीत असताना, बहुजनांच्या माणूसकीला डाग लावत असताना, जेव्हा बहुजनांचा शिक्षित उच्चशिक्षित उघड्या डोळ्यांनी पहातो आणि वैदिक ब्राह्मणी मनुवादि व्यवस्थेला भिऊन तडजोड करतो अशा प्रकारची बहुजनांचा शिक्षित- उच्चशिक्षित वर्गाची "बौद्धिक बेइमानी" मुळातच योग्य नाही.कारण ज्या वैदिक मनुवादि ब्राह्मणी व्यवस्थेने बहुजनांचा शिक्षणाचा अधिकार नाकारला होता . त्यानंतरच्या काळात बहुजनांच्या महापूरूषांनी जीवघेणा संघर्ष केल्यामुळेच बहुजनसमाजाला आता शिक्षणाचा, ज्ञानाचा आणि त्यांच्याबरोबर येणार्या इतर गोष्टींचा अधिकार प्राप्त झाला आहे हे वास्तव माहिती असुनही जेव्हा शिक्षित उच्चशिक्षित बहुजन वैदिक ब्राह्मणांच्या पालखीचा भोई होतो तेंव्हा ह्या शिक्षित उच्चशिक्षित बहुजनांच्या बुद्धिची कीव येते*•••••

*ज्या वैदिक मनुवादि व्यवस्थेने धर्मशास्त्राची भीती दाखवून बहुजनांचे मानवीमुल्य हिरावून घेतले अर्थात शिक्षण घेण्याचा, शस्त्र धारण करण्याचा आणि धन संचय करण्याचा मानवी अधिकार नाकारला त्या मुळेच मानसा सारखा माणूस जनावरा सारखा गुलाम झाला. ज्या वैदिक ब्राह्मणांनी बहुजनांचे सर्व अधिकार हिरावून आपल्याला कंगाल बनवले, त्यांच्याच नजरेने आजहि जीवना कडे पाहयाचे असेल, तर बहुजनसमाजाला शिक्षणाचा अधिकार मिळून तरी काय उपयोग ? अशा पोकळ शिक्षणाच्या अधिकाराला अर्थ नाही*

*इतिहासा कडे स्वतंत्र दृष्टीने पाहता येणे, समाजस्थितीचे अचूक मूल्यमापन करता येणे, घडनार्या घटनाचा तर्कशुद्ध स्वतंत्रपणे अर्थ, मतिअर्थ व गंभीरअर्थ लावता येणे हा खरा शिक्षणाच्या अधिकाराचा अर्थ आहे. म्हणूनच आजच्या बहुजन समाजाच्या शिकलेल्या तरूण- तरूणींनी जुन्या मूल्यांची चिकित्सा करणे, त्यातील घातक गोष्टी फेकून देणे आणि एक निकोप मूल्यव्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज आहे•*

*आपल्याला आयता दिलेला दृष्टिकोन न स्विकारता आपण स्वतःच आपला दृष्टिकोन तयार केला पाहिजे,हे विशेषत: तरुणपिढीने ध्यानी घेतले पाहिजे.*
*हजारो वर्षे ज्यांच्याकडे जिभा असूनही, मेंदू असूनही त्यांना आपला आवाज विचार व्यक्त करता आला नाही,करु दिला गेला नाही, अशा समूहांच्या जीभा आणि मेंदू बनने ही आजच्या बहुजनांतिल तरूण तरूणींची नैतिक जबाबदारी आहे. कारण आजच्या काळात माहितीचे प्रचंड स्त्रोत उपलब्ध आहेत.मात्र ती माहिती स्विकारताना सत्य-असत्यतेला पडताळून पाहिले गेले पाहिजे.कारण माध्यमांमध्ये ही माहिती अपलोड करणारा वैदिक ब्राह्मणी मानवी मेंदू आहे, आणि तो आपले उच्चवर्णिय विशेषधार्मिक अधिकार अबाधित राखण्याचे कार्य करीत असतो,त्यामुळेच अखंड जागृत असण्याची आज आवश्यकता आहे*

*नवनिर्मिती क्षमता हे माणसाचे फार मोठे वैशिष्ट्य आहे.जन्मास येणार मूल जसे नवनिर्मितीची क्षमता आहे.आनंदाची , हर्ष आणि उल्हास देणारी घटना आहे.*
तसेच
*याउलट मूल जन्माला न येण हे शारीरिक नपुंसकता किंवा वांझपणा माणसास आयुष्यभर दुखी:कष्टी वाटतो, तो स्वतःला कमी लेखतो, तो न्यूनगंडाच्या आहारी जातो. जर, आपण मुल जन्माला घालण्याच्या शारीरिकक्षमतेवर भर देत आहोत तर मानसाच्या बौद्धिक व मानसिक सर्जनशीलता देखील शारीरीक क्षमते इतकीच अधिक महत्त्वाची आहे हे देखील मान्यच करावं लागेल*.

वास्तविक पाहता शिक्षणाच्या अधिकारातून बुद्धीचा व मनाचा वापर करून नवनिर्मिती करणे हे मनसाला फार उच्च कोटीचा आनंद देणारी आहे तसेच *शिक्षण असून बुद्धीचा मनाचा वापर नवनिर्मिती करता न करणे हे देखील एक नपुंसकताच आहे, ते देखील एक वांझपणाच आहे.या प्रकारची नपुंसकता किंवा वांझपणा आपल्या वाट्याला येऊ नये, म्हणून माझी वारीचे औचित्य साधून लिखाण करण्याची धडपड आहे.त्याच धडपडींचा एक नवीन प्रयत्न " वैचारिक वारीचा आहे"*
•••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: 🌰 *१२ वा दिवस* 🌰
<><><><><><><><><>
*बहुजन मित्र हो !!!*

वारकरी संप्रदायाचे कार्य करणारे आमचे स्नेही तसेच समतावादी अंदोलनातिल बहुजन मित्र यांनी फोन आणि WhatsApp च्या माध्यमातून आग्रह केला आहे की, || *ज्ञानेश्वर माऊली* || विषयी "वैचारिक वारी" मध्ये विचार मांडावे.
तेव्हा आज १२ आणि उद्या १३ व्या दिवशी बौद्धिक वारीच्या प्रवासात दोन दिवस वैचारिक मंथन करणार आहोत•••••
 | | *ज्ञानेश्वर* माऊली  | |
 | |  *ज्ञानदेव* माऊली | |

ब्राह्मणी वैदिक धर्मशाश्त्राच्या नियमानुसार *संत तुकाराम शुद्र कारण ते जातीने कुनबी* OBC होते. तसेच *ज्ञानदेव(आळंदीचे) जन्माने ब्राह्मण पण मुंज न झाल्याने ते देखील शुद्रा* समान म्हणजे संत तुकाराम जातीने शुद्र कारण त्यांची जात कुनबी आणि ज्ञानदेव(आळंदीचे)ब्राह्मण असुनही धर्मशास्त्राच्या नियमानुसार शुद्र•••••••

संत तुकाराम व ज्ञानदेव हे दोघे वैदिक धर्मशाश्त्राच्या नियमा नुसार शुद्र ठरत असल्याने *ब्राह्मण्याच्या चौकटित ब्राह्मणाना ज्ञानदेव आणि तुकाराम दोघेही दूरचे असले पाहिजे परंतू इथंतर ब्राह्मणांना ज्ञानदेव जवळचे वाटतात.आणि तुकाराम दूरचे वाटतात*.प्रश्न हा आहे की ब्राह्मणांना असे का वाटतं?

कारण••••जेव्हा ज्ञानदेवाला(आळंदीचे) बहुजनांनी "माऊली" म्हणत आपलंस केलं तेव्हा *ब्राह्मणाची ज्ञानदेवा (आळंदी) विषयी तिरस्कार व तुच्छतेची भूमिका बदलली. काही झाले तरी ज्ञानदेव हे ब्राह्मणच म्हणुन ते आपलेच आहेत* असे म्हणत ब्राह्मणांनी आपल्या सोयी पुरते ज्ञानदेवाला(आळंदी)आपलस केलं•••
पुण्याच्या आळंदीचे *ज्ञानदेव* आणि संत नामदेव समकालीन होते.संत ज्ञानदेव हे संत नामदेवां पेक्षा वयाने लहान होते. *पुण्याच्या वैदिक ब्राह्मणांनी ज्ञानदेवाच्या कुटुंबियांना चांडाळ घोषीत करून, जाती बहिष्कृत केले.अर्थात ज्ञानदेवाचा भाऊ-निवृत्ती-सोपान- बहिण मुक्ता आणि बाप विठ्ठल - आई रखुमाई या कुटुंबियांना वैदिक ब्राह्मणांनी अस्पृश्य घोषीत केले*.
संत ज्ञानदेव आणि त्यांच्या भावंड ब्राह्मण असुनही सन्याशाची मुले म्हणुन वैदिक ब्राह्मणांनी शुद्र व चांडाळ मानले.त्यांच्या मुंजी होऊ दिल्या नाही.त्यांचा *वेदांचा अधिकार नाकारला*.त्यांना अपवित्र व अशुद्ध मानले.त्या लहानग्यांना भिक्षा देखील मिळने अवघड करून टाकले.त्या लहान भावंडांचा धिक्कार केला तिरस्कार केला.
पण
*जेव्हा बहुजनांनी या लहान भावंडांना जवळ केले.त्यांना आधार दिला.त्यांचा आदर केला मानसन्मान दिला,प्रतिष्ठा दिली,त्यांची किर्ती पसरविली आणि जेव्हा या भावंडांची ख्याती झाली*
तेव्हा
*वैदिक ब्राह्मणांना संत ज्ञानदेव जवळचे वाटू लागले,त्यांना ते जवळ करू लागले,ते संत ज्ञानदेवाचा गौरव मुद्दाम मोठ्या प्रमाणात वाढवू लागले.ब्राह्मणांनी ज्या ज्ञानदेवाला आधी नाकारले होते,ते संत ज्ञानदेव ब्राह्मणांना संत नामदेव शिंप्या पेक्षा, कुनबी संत तुकारामां पेक्षा अधिक जवळचे वाटू लागले कारण काही झाले तरी ज्ञानदेव ब्राह्मण कुळाचे आहेत, नामदेव शिंपी तर तुकाराम कुनबी अर्थात शुद्र OBC जातीचे आहेत. हे धार्मिक भान सतत ब्राह्मणांच्या मनमेंदूत असल्या मुळेच बनावटी अभंग रचला--*
॥ *ज्ञानदेव रचिला पाया* ॥
॥ *तुका झालासी कळस*॥

परंतु इतिहास साक्ष आहे,खरा अभंग आहे•••••

*नामदेव रचिला पाया*|
*तुका झालासी कळस*||

*संत तुकाराम महाराजांना शूद्र म्हणून वैदिकांनी त्यांची हत्या केली. आळंदीच्या ज्ञानदेवांच्या संपूर्ण कुटुंबियांना चाडाळ म्हणून घोषीत करून छळ केला, पण त्यांची लोकप्रियता पाहून वैदिक ब्राह्मणांनी संत तुकाराम संत ज्ञानदेव आपल्या परंपरेचाच एक घट्ट दुवा असल्याचा जसा आभास निर्माण करण्यात यशस्वी झाले तसेच स्वतःच्या मनगटाच्या बळावर जेव्हा छ.शिवाजी महाराज यशस्वी झाले व त्यांनी स्वराज्य स्थापणचा विचार घोषीत केला तेव्हा वैदिक ब्राह्मणांनी शिवाजी महाराज शूद्र म्हणून त्यांचा राज्याभिषेक करण्यास नकार दिला. नंतर मात्र त्यांची लोकप्रियता पाहून स्वतःच वैदिकांनी त्यांच्यावर 'गोब्राह्मणप्रतिपालक' अशी पदवी आरोपीत करून त्यांच्या नावाच्या आधारे आपली केवळ धार्मिक, सांस्कृतिकच सत्ता बळकट करण्याचा नव्हे, तर राजकीय सत्ताही हस्तगत करण्यात ब-याच अंशी वैदिक ब्राह्मण यशस्वी झाले हे आज आम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहोत.*
( शिवाजी, संभाजी ही नांवे आजहि ब्राह्मणा मध्ये शोधून सापडत नाहीत किंवा आपल्या मुलांची नांव ठेवत नाहीत, कारण ही नांवे वैदिक ब्राह्मणांच्या कसोटीवर अस्पृश्य नांवे आहेत.)
*म. जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांनी स्त्रीशिक्षणासाठी अंतःकरणापासून झटून कार्य केले, तेव्हा वैदिक ब्राह्मणांनी धर्मद्रोहाचे आरोप करून त्यांचा अपार छळ केला. पण नंतर आपल्या मुली शिक्षणात आघाडीवर कशा राहतील हे पाहिले*
( आजहि पुण्यातील घैसास वेद शाळेत ब्राह्मण सोडून इतर कोणालाही तो ९६ कुळी असला तरीही प्रवेश दिला जात नाही)

*डॉ.बाबासाहेब आंबेडकरांवर हिंदूधर्म सोडून बौध्द धम्म स्वीकारण्याची वेळ आणली, पण जसजसी आंबेडकरी विचारधारा देशव्यापी होऊ लागली तेव्हा ब्राह्मणी मनुवाद्यानी डॉ.हेडगेवार आणि डॉ.आंबेडकर एकाच विचारधारेचे समर्थक असल्याचे भासवून डॉ.आंबेडकरांना पचवण्याचे जोरदार प्रयत्न त्यांनी सध्या चालवले आहेत*.

*अशा प्रकारची आणखी असंख्य उदाहरणे देणे शक्य आहे, पण दिशा दाखवण्यापुरती एवढी मोजकी उदाहरणे पुरेशी आहेत. येथे एक गोष्ट आवर्जून ध्यानात घ्यायची की ही केवळ काही सुटी उदाहरणे नाहीत. हा वैदिक ब्राह्मणाचा स्थायीभाव आहे. ही त्यांची सांस्कृतिक जीवनशैली आहे. त्यांचे तत्वज्ञान आहे. नव्या गोष्टींना विरोध करायचा आणि त्या फायद्याच्या आहेत असे दिसू लागले की त्यांच्यावर मालकी प्रस्थापित करण्यासाठी झडप घालायची, हा त्यांचा अखंड वारसा आहे. दुस-यांनी राबून निर्माण केलेले धान्याचे खळे आपण लुटून न्यायचे, ही त्यांची प्रवृत्ती आहे. निर्मिती दुस-यांनी करावी आणि त्या निर्मितीची फळे, तिचे सुखोपभोग आपण घ्यावेत यासाठी त्यांचा आटापिटा असतो !*

त्याचं असं आहे की••••••••••

*वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याचा एक सनातन उद्देश आहे.*
*काय वाटेल ते झाले तरी sc/st /obc अर्थात् बहुजना वरिल आपले धार्मिक वर्चस्व कमी होऊद्यायच नाही,बहुजनांच्या मनावरची आपली धार्मिक पकड सुटू किंवा ढिली होऊ द्यायाची नाही. याकरिता वैदिक ब्राह्मण हजारो वर्ष जागरुक राहिले.परिस्थिति जर ब्राह्मण विरोधी आहे याची जानिव होताच तात्पुरती माघार घेऊन नंतर संधि मिळताच कपट कारस्थान, षडयंत्र विश्वासघाताने जबरदस्त प्रतिहल्ला करुन वैंदिक ब्राह्मणाने पूर्व प्रतिष्ढा पुन्हा प्राप्त केलेले इतिहासातिल दाखले आज ही आम्ही पाहू शकतो , अनुभवु शकतो*

*संत नामदेव, संत तुकाराम यांना कमी लेखन्याच्या आटोकाट प्रयत्न्यात ब्राह्मण यशस्वी झाले असले तरी ब्राह्मणांनी ज्या आळंदीच्या संत ज्ञानदेवाचा धिक्कार केला, ज्ञानदेवाच्या कुटुंबियांना जाती बहिष्कृत केले.त्यांना चांडाळ म्हणून छळ केला त्याच ज्ञानदेवाचा संत म्हणून स्वीकारावे लागले हा वैदिक ब्राह्मणांच्या बुद्धीचा नैतिक पराभव आहे आणि संत नामदेव, संत तुकाराम यांच्या वारकरी संप्रदायाचा वैचारिक विजय आहे.*
•••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: 🌼🌼 *१३ वा दिवस* 🌼🌼

*संत संप्रदायाची खरी माऊली कोण ?*

*पुण्याच्या आळंदीचे ज्ञानदेव*
की•••••••••
*आपेगांव पैठणचे ज्ञानेश्वर ?*

वारकरी संप्रदायाचे कार्य करणारे आमचे स्नेही तसेच समतावादी अंदोलनातिल बहुजन मित्र यांना मी माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला की,
मला माहीत आहे हा विषय अतिशय *भावनिक* आहे तसेच फार *जिव्हाळ्याचा* देखील आहे कारण *"माऊली"* म्हणजे बहुजन वारकरी संप्रदायात *श्रद्धास्थान* आहे. वारकरी मंडळींना यदा कदाचित हे तर्क संगत चिंतन पटणार नाही कारण बहुजन वारकरी अत्यंत *श्रद्धाळू* असल्यामुळे एखादा प्रमुख वारकरी जे सांगेल ते *" वेदवाक्य "* बाकीच्याने जसेच्या तसे मान्य करायाचे ही *मनोधारणा*•••परंतु•••••संत तुकाराम म्हणतात••••

*विवेकाने वागा | होऊनी निर्भय,*
*अशुभाचे भय | निर्बुद्धीना ||*
*सत्य सांगा लोका | जरी कडू लागे,*
*चाला, नाही मागे आला कोणी।।*
|| तुकाराम महाराज ||

ज्ञानेश्वर आणि ज्ञानदेव हे दोन भिन्न सत्पुरुष भिन्नकाली अवतिर्ण झाले. *ज्ञानेश्वर शके बाराशे मध्ये पैठण जवळील आपेगाव* जन्म आणि आपेगावीच समाधिस्थ झाले. *ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी* आणि *अमृतानुभव* असे दोन ग्रंथ लिहिले. आपेगावचे ज्ञानेश्वर गावातले *कुलकर्णी* अर्थात *गावजोशी* होते. म्हणजे ज्ञानेश्वर हे *पंत होते संत नव्हते* कारण अमृतानुभवाच्या *गुरूस्तवन* नामक दुसर्या अध्यायात आपेगावचे ज्ञानेश्वर असे म्हणतात•••••
|| जीवपणाचेंनी त्रासे । यावया आपुलिये दसे ||
।। शिवहि मुहूर्त पुसे । जया *जोशियाते* ।।
याचा अर्थ असा होतो की *आपेगावचे जोशीपणाची वृत्ती ज्ञानेश्वराच्या घराण्याकडे होती. एवढेच नव्हे तर कुळकरणपणही त्याच्याच घराण्याकडे असेल*.

*पुण्याजवळील आळंदीचे संत ज्ञानदेव जन्म तेरावे शतक* आणि आळंदीस समाधिस्थ झाले. *दिव्यनमन, चांगदेवपासष्टी, सुबोध टीका ओवीबद्ध केल्या*. आपल्या ओव्याच्या शेवटी *"बाप रूखमादेवीवरू"* असे पद घालितले.
आळंदीचे संत ज्ञानदेवाची पंढरपूरच्या *विठ्ठलावर* नि:सीम भक्ती होती.
विठ्ठलु नाहीं जिये शरीरी । वाया कां जन्मले संसारी
विठ्ठलु नाही जिये नगरी । तें अरण्य जाणावें
गुरु निवृत्तिने दिधले । ते प्रेम कोणे भाग्ये लाधले
बापरखूमा देविवर विठ्ठले । ऐसे केले ज्ञानदेवा ||
देहाची आणि मनाची उद्धार करण्याइतकी पवित्रता ज्या *विठ्ठला* मध्ये आहे तो *विठ्ठल* जर चिंतनात(शरीरी) नसेल तर हा जन्म वाया गेला. ज्या नगरी मध्ये *विठ्ठलाचे* नामस्मरण केले जात नाही ति नगरी जंगल आहे आणि शेवटी ते *बापरखूमा देवीवरू* असे पद घालतात.

***************
*संत एकनाथ (ब्राह्मण) पुरस्कृत आपेगावचे ज्ञानेश्वर*
****************
एक आख्यायिका प्रचलित आहे की,
एके दिवशी पैठण एकनाथाचा(ब्राह्मण) *घसा* एकाएकी सुजून दुखू लागला. एकनाथ सांगतात की आळंदीच्या ज्ञानदेवाने स्वप्नात येऊन *दृष्टांत* दिला--------
*श्रीज्ञानदेव येऊनी स्वप्नात*
*सांगितली मात मजलागी*॥
*अजानवृक्षाची मुळीकंठसी लागली*
*येऊनी आळंदी स्थळी काढवेगा*॥
माझ्या *मानेस गळफास* बसला आहे. तो काढल्यावाचून तुझा *घसा बरा होणार नाही*.एकनाथ पैठणहून पुण्याच्या आळंदीला गेले. आळंदी येथील ज्ञानदेवाची *समाधी उकरून* पाहतो तो ध्यानस्त बसलेल्या *ज्ञानदेवाच्या गळ्याला पिंपळाची मुळी* वेष्टून गेली आहे. एकनाथाने मुळी तोडून टाकली *तत्क्षणीच ज्ञानदेवाने डोळे उघडले* आणि पुढे असलेली *ज्ञानेश्वरी ग्रंथ एकनाथाच्या हवाली* करून ती *लोकामध्ये प्रगट* करण्यास सांगितले हा मोठा प्रसाद प्राप्त झाल्याने एकनाथ परत पैठणास आले.
*आळंदीच्या संत ज्ञानदेवाचा काळ तेरावे शतक आणि एकनाथ(ब्राह्मण) काळ सोळावे शतक एवढ्या दिर्घकाळात वारकरी सांप्रदायात अनेक संत झाले पंरतु आळंदीचे ज्ञानदेव फक्त पैठणच्या(ब्राह्मण) एकनाथांच्याच स्वप्ननात जातात, हा योगायोग मानायचा का ?*

पैठणच्या एकनाथाच्या हाती *श्रीमदभगवदगीता* यावर टिकात्मक *भावार्थदीपीका* नांवाचे जुनं लिखाण लागलं तेव्हा एकनाथ(ब्राह्मण) यांनी ह्या लिखाणाचा कर्ता कोण, तो कोठे राहत होता, हा ग्रंथ कोणी कधी लिहला हि सर्व माहिती काढली आणि ही माहिती काढणे त्यांना सहज शक्य होते. कारण एकनाथांच्या *पैठण पासून चार कोसावर आपेगाव* होते.
आपेगावच्या ज्ञानेश्वराचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे *" श्रीमदभगवदगीतेवर भावार्थदीपिका नावाची टीका* होय. हाच ग्रंथ लोकांत *" ज्ञानेश्वरी "* या नावाने प्रसिद्ध आहे. *ज्ञानेश्वरी ग्रंथ शके १२१२ म्हणजे इ.स.१२९० साली रामदेवराव यादव देवगिरीस राज्य करीत असता लिहला*

हे ह्याच ग्रंथाच्या शेवटी उल्लेख आहे तसेच मूळ ज्ञानेश्वरीत ओव्याची संख्या नऊ हजार नऊ होती•••••
*नवसहस्त्र नव ओवी* |
*टीका मूळ ज्ञानेश्वरी* |
*जे श्रवणें मोक्षपदवी* |
*भलतेयाही दे* |
(शिवराम एकनाथ भारदे(भारद्वाज) लिखित 'ज्ञानदेव व ज्ञानेश्वर पान नं 38 दुसरी आवृत्ती 1999)

*" श्रीमदभगवदगीतेवर भावार्थदीपिका नावाची टीका* असणारा *" ज्ञानेश्वरी "* हा ग्रंथ जवळ जवळ तिनशे वर्षे हा ग्रंथ अप्रसिद्ध होता त्याचं कारण म्हणजे•••
१• *ब्राह्मण जातीत प्राकृत भाषेचा तिरस्कार*•
२• *बहुजन जातीला शिक्षणाचा अधिकार नाकारलेला*••
३• *अल्लाउद्धिन खिलजी व सरदार मलिक काफर ह्या मुसलमान राजाची राज्यात दहशत*•••
४• जेव्हा *सुलतान हसन गंगू* याने ब्राह्मणी राज्याची स्थापना केली त्यानंतर संत नामदेव, संत ज्ञानदेव याची ओळख झाली.
५• म्हणूनच *तीनशे वर्षे सांदीत पडून राहिलेला " ज्ञानेश्वरी " हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय एकनाथा(ब्राह्मण) कडे जाते.*

कारण संत नामदेव आणि आळंदीचे संत ज्ञानदेव *समकालीन* होते. संत नामदेवाच्या अभंगात *मुसलमानी शब्द* आहेत.

नामयाने *"बंदर"* घेतले|विठ्ठलासि जीतची धरिले||
देह करूनी *"बंदिखान"*|विठ्ठल सांठविला विधान||
पक्वानेही नाना *"रोटिया"* भरित |
केली अपरिमित यशोदेने ||

एवढेच नव्हे तर *नामीयाची जनी* अर्थात
(संत नामदेवाची जनाबाई) आपल्या अभंगात म्हणते

मांडियेला खेळ | बुद्धिरंगाचे *बुदबळ* ||
तैच *शह* आला | *प्यादा* *फर्जिसवे* मेला ||
तैसी *शहाबाजी* जाली | जनी म्हणे *मात* केली ||

संत जनाबाईच्या अभंगात यवनी शब्द शिरण्यास संत नामदेवाच्या पूर्वी बराच काळ दक्षिणेत मुसलमानी यवनी राज्य असले पाहिजे.
( *ज्ञानेश्वरीत एकही मुसलमानी शब्द नाही*अशी स्थिती होण्यास मुसलमानी अंमल होऊन बरेच वर्षे लोटले असले पाहिजेत*.)

आपेगावच्या ज्ञानेश्वरीचा काळ आणि आळंदीच्या ज्ञानदेवाचा जन्म व ज्ञानदेवाने आळंदीला घेतलेली समाधी या मधील अंतर पाहत *ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली गेली तेव्हा आळंदीचे ज्ञानदेव 15 वर्षाचे होते*, आणि जेव्हा ते या वयात होते तेव्हा ज्ञानदेव त्यांचे आई वडील व भावंडांना पुण्याच्या *वैदिक ब्राह्मणांनी शुद्र व चांडाळ* घोषित करून *ब्राह्मण जातीतून बहिष्कृत* केलेले होते, तेंव्हा असे असता *आळंदीच्या ज्ञानदेवाला संस्कृत मध्ये लिहिलेल्या गीतेवर भाष्य करण्याचा धार्मिक अधिकार वैदिक ब्राह्मणांनी दिला असेल का ?*

■ आपेगावच्या ज्ञानेश्वरानी लिहलेल्या ज्ञानेश्वरी मध्ये *सातसेच्या वर ओव्या* आहेत. आपेगावचे ज्ञानेश्वर जर वारकरी असते तर त्यांनी *सातसे ओव्या* मध्ये एकदा तरी *विठ्ठलाचे* नावं आले असते. परंतु ज्ञानेश्वरीच्या *पहिल्या ओवित गणेश स्वरुपात वर्णन* आहे.
*॥देखा षडदर्शन म्हणिपति॥*
*॥तयेची षडभुजाकृति॥*
गणपतीला षडभुजाकृती असे म्हणतात.
(ज्ञानदेव व ज्ञानेश्वर भारद्वाज पान नं 44)

■ परंतु *संत तुकाराम महाराज* आपल्या अंभंग गाथेतून सांगतात की••••
*चोखा आमचा गणपती l*
*सोयरा आमची सरस्वती ll*
वारकरी परंपरेत *गणपतीला स्थान नाही,* म्हणून मंदिरात होणाऱ्या भजनांत, काकडा आरतीच्या अभंगामधे *गणपतीची आरती गाईली जात नाही.*
■ आपेगावचे ज्ञानेश्वर आपल्या वाणीत बहुजनांना सांगतात की,
*"चातुर्वर्ण मया सृष्टं ।"*
*"गुण कर्म विभागश: ।।"*
ज्या गीतेचे भाषांतर आपेगावच्या ज्ञानेश्वराने केले त्यात साक्षात देवच म्हणतो की-
*निर्माण केले वर्ण मी*
*चारी गुणकर्मे विभागुणी*
अर्थात् आपेगावचे ज्ञानेश्वर *वैदिक वर्ण व्यवस्थेचे* समर्थन करतात अर्थात *जाती व्यवस्थेचे समर्थन* करतात.
■ परंतु *संत संप्रदायने* अर्थात वारकरी संप्रदायाने तर *वर्ण व्यवस्था, जाती व्यवस्था, देव, वैदिक शाश्त्र, पुराण नाकारलेले आहेत. धार्मिक शाश्त्राचे निर्मिते देव आहेत ही संकल्पनाच संतांनी नाकारलेली आहे*•••••••
*देवते कल्पित शाश्त्रे ते शाब्दिक* ।
*पुराणे सकळिक बाष्कलिक* ।।

■ परंतु
*आपेगावचे ज्ञानेश्वर* जाती व्यवस्थेचे समर्थन करतात आणि ज्ञानेश्वरीत लिहतात•••••••
*स्वधर्मा चरण*
*जाती परात्वे भेद* ।
*उचित ते शुद्ध जयाचे तया* ।।
*प्रत्येकाने जाती नुसारच धर्माचे आचरण करावे. अर्थात प्रत्येक जातीने आपली पायरीने राहवे*.परंतु वास्तव हे आहे की वारकरी संप्रदाय जाती व्यवस्ताच मानित नाही.
ज्ञानेश्वरीच्या १८/१८० ओवित आपेगावचे ज्ञानेश्वर बहुजनांना शिकवण देतात•••••••••
*पै द्विज सेवे परौते*
*धावणे नाही शुद्राते* ।
शुद्राने अर्थात OBC ने *द्विज सेवे परौते* म्हणजे *ब्राम्हणाच्या सेवेहून वेगळे कार्य करन्याचे विचार देखील करु नये*.अर्थात OBC *शुद्रानी फक्त ब्राह्मणांची सेवा करावी*.जाती व्यवस्थेचे समर्थन करताना आपेगांवचा ज्ञानेश्वरा सारखा महायोगी ज्ञानेश्वरीत सांगतात कि••••••••
*उत्तम अधर्म संचारती*
*वर्णावर्ण मिसळती*।
*तेथे समुळ उधळली जातीधर्म*।।
अर्थात
■ *आपेगावचे ज्ञानेश्वर सरळसरळ वैदिक ब्राम्हणी विषमतावादी व्यवस्थेचे समर्थन करतात, ज्या वारकरी संप्रदायाने कर्मकांड नाकारले, जातीवाद नाकारला, विषमतावादी वैदिक व्यवस्था नाकारली, ब्राम्हणी उचनिचता नाकरली आणि आपेगावचे ज्ञानेश्वरानी वैदिकांच्या ब्राम्हणी व्यवस्थेचा समर्थन करने हे त्यांचा || संत || असण्यावरच प्रश्नचिन्ह आहे.*

*तर्क संगत चिंतनाच्या माहितीच्या माध्यमातून हे स्पष्ट आहे की आपेगावचे ज्ञानेश्वर आणि आळंदीचे संत ज्ञानदेव हे एक नाहीत*.
*ज्ञानेश्वरीचा कर्ता आळंदीचा संत ज्ञानदेव असणं शक्य नाही.*
*ज्ञानेश्वरी कर्त्याचा आळंदीशी अर्थाअर्थी संबध नाही.*

《 *उपस्थित करण्यात आलेले मुद्दे व त्या मुद्द्यातिल पुरावे ऐतिहासिक आणि भाषेला धरून आहेत हे मुद्दे सांप्रदायिक नाही*.》
**************************
✍🏻 *mn Sonawane pune*
**************************
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ***************
🌷 *१४ वा दिवस* 🌷
***************
*पंढरपूरचा विठ्ठल देव आहे का ?*

वास्तविक पाहता•••••
पंढरपूरचा विठ्ठल,विठोबा, पांडुरंग पंढरीनाथ,विठाई इत्यादि नांव असणारा हा पंढरपूरचा *देव नाही. कारण विठ्ठल जर देव असता तर विठ्ठलाचा उल्लेख वैदिक ब्राम्हणाच्या धर्मसूत्रात म्हणजे रुग्वेद - यजुर्वेद - सामवेद व अथर्ववेदात असता पंरतु यात उल्लेख नाही. स्मृती - श्रृती, वेद - पुराण, - उपनिषद - अरण्यक - मनूस्मृती या तमाम वैदिक धर्म ग्रंथात विठ्ठलाचे नाव नाही. तसेच *विठ्ठल रामायणात नाही. विठ्ठल महाभारतात नाही.विठ्ठल साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या गीतेत ही नाही.*
म्हणजे वैदिक धर्माचे स्वरूप जानणाऱ्या वेदांच्या सर्वश्रेष्ठ ब्राम्हणी ग्रंथात जर विठ्ठल कोठे ही नाही,
तर
*ह्या सर्व पुराव्या वरुन हेच सिद्ध होते की पंढरपूरचा विठ्ठल हा देव नसून तो एक महामानव आहे*

विठ्ठलाच्या मूर्तीकडे नीट पाहिलेत तर काही गोष्टी लक्षात येतात कि, विठ्ठलाचे डोळे, त्याचे खांद्यावर रुळणारे लांब कान आणि कपाळ विशाल आहे. इतर *वैदिक देव-देवता सारखे विठ्ठलाने हातात कोणतेही हिंसा करनारे शस्त्रे नाहीत आयुधे धरलेले नाही की कोणतेही हत्यार नाही, विठ्ठलाला चार हात नाहीत, तो आपले दोन कमलहस्त आपल्या कमरेवर ठेऊन उभा आहे. तसे करून जणू तो जगाला आपल्या लेकरांना, उपासकांना म्हणजेच वारकऱ्यांना अहिंसेचा संदेश देत आहे*.
अर्थात पंढरपूरचा विठ्ठल हा अहिंसेचा पुरस्कर्ता महामानव आहे हे देव नाही.
तसेच•••••
*समतेने- ममतेने वागवणारा असा पंढरीच्या विठ्ठला मध्ये कुठलाच भेदभाव नाही, उच्चनिचता नाही, गैरबराबरी नाही*.
*विठ्ठलाला होमहवन-अभिषेक करण्याची गरज नाही,त्याला दक्षिणा वाहण्याची गरज नाही, त्याला भट-ब्राह्मणाची मध्येस्थही लागत नाही आणि त्याच्या पूजेसाठी मंत्र- तंत्र म्हणण्याची सुद्दा गरज नाही. फक्त मुखाने नामाचा गजर केला तरी चालतो. तो प्रसन्न हसतो आहे. विठ्ठलाची अहिंसक शांत मूर्तीच तो कोणी तरी महामानव असण्याचे प्रतिक आहे. अर्थात तो देव नाही.*

वारकरी संप्रदायाचे प्रथम *संत नामदेव महाराज* आपल्या वारकरी संत सहकार्यांना पंढरपूरच्या *विठ्ठलाची ओळख* करून देताना सांगतात•••••

*संत नामदेव महाराज* विठ्ठला हा *तथागत बुद्धच* आहे असे अभंगात सांगतात•••••
गोकुळी अवतारू सोळा सहस्त्रावरू |
आपण योगेश्वरु *बौद्ध रुपी* ||
व्रतभंगासाठी *बौद्ध अवतार* |
झाला दिगंबर अवनिये |
ऐसा कष्टी होऊनी *बौद्ध राहिलासी* ||

"धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी |
या लागी *बौद्ध रूपे पंढरी नांदसी* ||"
•••••••
*संत तुकाराम महाराज*

*बुद्ध अवतार* माझिया अदृष्टा |
मौन मुखे निष्ठा धरियली ||

संत तुकाराम महाराज म्हणतात *बुद्ध अवतार मी पाहिलेला नाही.मुखाने मौन धरण्याची निष्ठा तू धारण केली पण प्रत्यक्षात आपल्याला बुद्ध पाहता आलेला नाही ही एक प्रकारची खंत व्यत्क केलेली आहे*.

संत संप्रदाय *बुध्दालाच विठ्ठल* मानताना म्हणतात -

संत तया दारी, तिष्ठताती निरंतरी |
पुंडलिकासाठी उभा । धन्य धन्य विठ्ठल शोभा ||
*बौध्द अवतार* घेऊन विटे समचरण ठेऊन |

लोक देखोनि उन्मत्त दारांनी आसक्ता |
न बोले *बौध्द रूप* ठेवीले जघनी हात ||

*संत चोखोबा महार*

शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ।।१।।
मी यातिहीन महार । पूर्वी निळाचा अवतार ।।२।।
कृष्णनिंदा घडली होती । म्हणोनि महार जन्मप्राप्ती ।।३।।
चोखा म्हणे विटाळ । आम्हा पूर्वीचे हे फळ ।।४।।
(कदम ग्रंथ अभंग:पृ.11)
चोखोबा महार *" निळाचा अवतार " म्हणजे मूळ "नागवंश"होय.* ( तथागत बुद्ध नागवंशिय होते)
कृष्णाचा अंत नागवंशीयाकडून झाला.हीच कृष्णनिंदा झाली आणि म्हणून "महार" जन्म झाला असे चोखोबा या अभंगातून सांगतात.

चोखोबा "महार" अर्थात् अस्पृश्य जातीचे असुनही त्यांचे संपुर्ण कुटुम्ब वारीकरी संप्रदायाचे निष्ठावान वारिकरी बनुनी अमानवतावादि वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करित होते.
संत चोखोबा म्हणतात••••••
कली माजी देव *बुद्ध रुप* जाला |
शरण शरणवाणी शरण तिवाचा विणवणी ||
कली युगातिल बुद्ध आमचे दैवात आहे.त्याला त्रिवार शरण जातो

संत चोखोबाची पत्नी
*संत सोयाराबाई* आपल्या अभंगात म्हणतात•••••••••••
देहासी विटाळ म्हणती सकल |
आत्मा तो निर्मळ *शुद्धबुद्ध*
देहीचा विटाळ देहिच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म ||

संत चोखोबाचा मुलगा
*संत कर्म मेळा*

आमुची केली हीन याती |
तुज का न कळे श्रीपती
जन्म गेला उष्टे खाता
लाज न ये तुमचे चित्ता ||

संत चोखोबाचा मेव्हणा
*संत बंका महार* आणि मुलगी *संत निर्मला*

हाती न घेता तलवार
*बुद्ध* राजकरी जगावर |
ऐकोनी "बंका" करित उत्तर
*बुद्ध अवतार पांडुरंग* ||

*सामाजिक आणि सांस्कृतिक विषमता नष्ट करण्याची भुमिका चोखोबा व त्यांच्या कुटुंबियांनी घेतली खरी, पण शेवटी ते आपल्या नशिबाला किंवा प्रारब्धाला शरण का गेले? कारण या काळात आपेगावच्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीतील "कर्ममार्ग" तत्वज्ञानाचा समाज जीवनात मोठा प्रभाव होता.*
आपेगावच्या ज्ञानेश्वरीची ज्ञानेश्वरीतील ही ओवी•••••••
*कर्म पराधिनपणे । निपजते प्रकृतिपूर्ण ।*
*म्हणून संग जंव प्रकृतीचा । तंव त्याग त घड़े कर्माचा ।।(ज्ञा.३:६ ३)*
कर्म अर्थात नशीब प्रकृतितुन म्हणजे पुनर्जन्मातुन निपजते, तेव्हा माणूस कर्माच्या बंधनातुन मुक्त नाही.

*संत चोखोबांचे अख्ख कुटूंब विठ्ठलमय अर्थात् बौद्धमय झालेले पाहुन वैदिक ब्राह्मणाने संत चोखोबाची भिंती खाली चिरडुन हत्या केली.वैदिक ब्राह्मणाचा ऐवढा दहशतवाद की संत चोखोबाचे प्रेत भिंती खालुन काढण्याची कोणाचिही हिम्मत नव्हती.*

*"वैदिक ब्राम्हणी व्यवस्थेने संत चोखाबाची केलेली हत्या, संत कबीर व संत रोहिदासा नंतरची तिसरी हत्या आणि महाराष्ट्रात झालेली संताची पहली हत्या होती.*
परंतु एक लक्षात असू द्या!!
*मरण आहे या सकळा* ।
*भेणे अवकळा अभयमोल*।।
मरणाच्या *भिती* पेक्षा मरणाची *प्रतिष्ठा* महत्वाची असते.जेव्हा संत चोखोबाच्या हत्या झाली तेंव्हा संत नामदेव उत्तरेत होते. *संत नामदेवानी चोखोबाची हाडं एकत्र करून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या पहिल्या पायरीवर* चोखोबाची समाधी केली.
*अस्पृश्य जातीचे संत चोखोबा महार विठ्ठलाच्या पहिल्या पायरीचे तमाम संताचे प्रेरणा स्थान झाले.*
संत मनोभावे म्हणू लागले•••
*कलियुगी प्रत्यक्षा पाषाण रुपी* ।
*बौद्धरुपी असता श्रीपती* ।।
*जनांसी दाखवूनी नाना प्रचिती* ।
*वाढविली किर्ती संताची* ।।

*संत जनाबाई*

होऊनिया कृष्ण कंस वधियेला |
आता *बुद्ध* झाला सखा माझा ||

लोक देखोनी उन्मत* |
दारांनी आसक्त
न बोले *बौद्धरुप*
ठेविले जघनी हात ||

धर्म लोपला अधर्म जाहला
हे तु न पाहसी |
या लागे *बौद्धरुपे* पंढरी नांदसी ||

*संत बहिणाबाई*

*कलियुग हरी । बुद्ध रुप धरी ।*
*तुकोबा शरीरी प्रवेशला ।।*

*संत तुकारामाच्या* तोंडून साक्षात तथागत *बुद्धच* बोलत आहेत, असे संत बहिणाबाई सूचित करतात.

बहुजन मित्र हो !!!
पंढरपूरचा विठ्ठल हा तथागत बुद्ध आहे हे झालं संतांची वाणीचे पुरावे. आता आपण तथागत बुद्धाचे डोळ्याने दिसणारे पुरावे पाहुया•••••
१• महाराष्ट्रात *शीळाप्रेसवर पंचाग छापले* जातअसे, या पंचागाच्या मुखपृष्ठावर *नवग्रह* व *दश अवताराच्या* चित्रात *नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापत* व त्या विठ्ठलाच्या खाली *बुद्ध* असे लिहिलेले असे.••••
इतिहास विचारवंत डॉ. रा.चि.ढेरे दोन पुस्तकांचा ऊल्लेख करतात पहले पुस्तक *श्री विठ्ठल एक महासमन्वय* आणि दुसरे म्हणजे *श्रीराम सहश्त्रनाम* ह्या स्तोत्राच्या पुस्तकात *गरुड, हनूमान विठ्ठलाचे चित्र* छापलेले असून त्याच्या खाली *बुद्ध* असे लिहिले आहे.
तसेच दोन मंदिर आहेत.

२• महाराष्ट्र - तासगांव - सांगली *विंचूरकरांनी बांधलेले दक्षिणी शैली चे गणेश मंदिराच्या गोपूरावर बुद्धाची मूर्ति आहे.*

३• *कोल्हापूर महालक्ष्मी मंदिराच्या ओवारित बुद्ध मूर्ती दगडावर कोरलेल्या आहेत.*
संत नामदेव महाराजा पासून ते संत तुकाराम महाराजा पर्यंतच्या संताच्या वाणीतून आणि महाराष्ट्रातील लिखीत व कोरीव शिल्पातिल पुराव्यावरून सिद्ध होतं की *पंढरपूरचा विठ्ठलच तथागत बुद्धच आहे*•••••
••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
🍀 *१६ वा दिवस*🍀
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

संत तुकाराम महाराज आपल्या गाथेतून सांगतात•••••

*सत्य असत्याशी मन केले ग्वाही ।*
*मानियले नाही बहुमता ।।*
अर्थात सत्य काय आहे, असत्य काय आहे, खर काय खोट काय आहे. वास्तव काय आहे, आभास काय आहे. हे तपासूनच त्या गोष्टींचा स्वीकार किंवा अस्विकार केला पाहिजे कारण,
वैदिक ब्राह्मणी धार्मिक व्यवस्थेने हजारो वर्षांपासून बहुजनांना
 शिक्षणा पासून वंचित केल्याने *"शब्द" बहुजनांना धार्मिक गुलाम करणार्याच्या वैदिकांच्या  ताब्यात होते,* तेव्हा वैदिकांच्या ग्रंथात, ब्राह्मणी इतिहासात, मनुवाद्याच्या साहित्यात बहुजन *इतिहास पुरुषांचे दाखले मागणे हे मुर्ख पणाचे आहे*. कारण वैदिक मनुवाद्यानी भारतीय *तत्वचिंतनाच्या क्षेत्रात जसी धर्मशाश्त्राची सरमिसळ केली तसी अन्य देशात फारच कमी दिसून येते* , त्याचा परिणाम *मानव निर्मित दुःखानाही ईश्वर निर्मित दुःखाचा दर्जा देण्यात वैदिक ब्राह्मण सफल झाले, यशस्वी झाले*.

*धर्म आणि बहुजन समाजाला एकाच दावणीला बांधून ठेवन्याचे काम वैदिक मनुवाद्यानी जितक्या चालाकीने केले तसे जगात अन्यत्र क्विचिंतच घडले असेल*.
म्हणूनच जगातील अन्य प्रदेशातील मानवी प्रतिभा सतत टवाटवीत राहिल्या आणि भारत भुमीवरील
बुद्ध - चार्वाक - संत कबीर - संत रोहिदास -गुरु नानक - संत नामदेव - संत तुकाराम - शिवाजी महाराज - संभाजीराजे - फुले - शाहू - आंबेडकरां सारखे "अस्सल" आणि श्रेष्ठ दर्जाच्या *मानवी प्रतिभांना मलिन करन्यात वैदिक मनुवादि यशस्वी झाले*.

आपण इथं संतांच्या विचारांचे मंथन करत असताना अचानक एक शंका मनात डोकावते की,
*संताचा मार्ग तर भक्तीचा मार्ग होता, आत्म्याचा परमात्म्यासी जोडनारा मार्ग होता*•••••
परंतु आम्हाला असे वाटते हे *अर्धसत्य आहे कारण संताचा मार्ग जर भक्ती मार्ग होता तर संत कबीर, संत रोहीदास, संत चोखा, संत तुकाराम या संतांच्या हत्या का झाल्या?*
*संत नामदेवाला वैदिक ब्राह्मणांनी महाराष्ट्रा बाहेर हद्दपार का केले ?*
तर्क संगत बारकाईने विचार करता सत्य बाहेर येतं की, *संताचा संघर्ष ईश्वराकडे जाणारा आध्यात्मिक स्वरुपाचा नव्हता तर समाजावर होनारा वैदिकधर्माच्या अर्थात ब्राह्मणी धर्माच्या नावाखाली होणारा अन्याय-अत्याचार कसा दुर करावा , समाजात खरी - खुरी नीति कशी निर्माण करावी , बहुजन संताचा हा कृति कार्यक्रम वैदिक ब्राह्मणी मनुवाद्याच्या विरोधात विद्रोहाची पेरणी* करनारा होता, म्हणूनच वैदिक मनुवाद्यानी निर्घुणपणे संताचा हत्या केल्या हेच *पुर्णसत्य* आहे.

परंतु बहुजन मित्र हो !!!

*शारीरिक हत्येपेक्षाही विचारांची कत्तल अधिक भयंकर आणि अधिक हानीकारक असते*."शरीर काय आज आहे उद्या नाही" मृत्यू अटळच आहे.पण विचारांच्या बाबतीत मात्र असे नाही. *विचारांची योग्य रीतीने जपणूक केली, तर तो विचार प्रदिर्घ नव्हे तर अनंत काळापर्यंत टिकू शकतात परंतू या विचारांची जपणूक केली नाही, या विचारांचा प्रचार- प्रसार योग्य रीतीने केला नाही तर मात्र हा विचार नष्ट वा भ्रष्ट होऊ शकतो*
ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे *भारतात जन्मलेला तथागत बुद्धांचा बौद्ध धम्म आणि भारतातच झालेले " बौद्ध धम्माचे पतन*•••••

भारताचा इतिहास साक्षी आहे की,
*"बौद्ध"* *राजांनी ह्या भारतावर १२००वर्षे राज्य केले.* *"बौद्ध"* धम्म देशाचा *"राजधर्म"* होता. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल *२०००* लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या ,अगदी *अफगाणीस्थानातील कंदाहार पर्यत* ह्या *लेण्या व बुद्ध मुर्त्या* पाहावयास मिळतात.
म्हणूनच *बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे "बौद्धराष्ट्र" होते ह्याची ग्वाही देतात*.

बौद्ध धम्माच्या *२५००* वर्षाच्या इतिहासात *बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क,मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन* व त्यानंतरचे *पाल* असे छोटे मोठे राजे
यांनी *बौद्ध धम्माला* उघडपणे *राजाश्रय* दिला
म्हणूनच *१२* व्या शतकापर्यंत भारतात *तक्षशिला,विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी* अशी *"बौद्ध"* तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची *१९* विद्यापीठे निर्माण झाली,

आजही भारताला संपूर्ण जगात *"बुद्धाचे राष्ट्र"* किंवा *"बुद्धभूमी"* म्हणूनच ओळखतात. आज ही भारतात कुठेही *उत्खनन* केले तर *तथागत बुद्धांच्या मूर्त्याच* सापडतात. 《उत्तर भारत अयोध्या(साकेत) रामजन्मभूमी- बाबरी मशीद उत्खननात आज ही तथागत बुद्धाचे अवशेष मिळत आहेत》
पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकांचा असा दावा आहे की, *ज्या धर्माचा इतिहास भूमीच्या गर्भात अर्थात पोटात मिळतो त्याच धर्माचे लोक भूमीचा मालक होय.* *"बौद्धमय भारत"* हीच या *भारत देशाची* खरी *ओळख* आहे••••

बहुजन मित्र हो !!!

*आपले स्वतःचे शब्द असणे. आपले स्वतःचे असे विचार असणे, आपल्या स्वतःच्या भावना असणे आणि जे काही आपले स्वतःचे आहे ते बोलून दाखविणे हे अतिशय आनंददायक आणि अभिमानास्पद स्वतंत्र आहे.*

*"आपल्या डोक्यावर दुसर्याच्या डोक्याच॔ "कलम" झालेली माणसं"* बुद्धिचे स्वतंत्र हरवून बसलेली माणसं एखाद्या झाडावर *"कलम"* केल्या सारखं वागतात, जसे ज्या झाडावर कलम करायचं, त्याचा *बुंध्यातील खालच्या बाजूचा काही भाग आणि मुळं शाबूत ठेवून वरचा सर्व भाग छाटला जातो आणि उरलेल्या खोडावर दुसर्या झाडाचं कलम केले जातं* या कलम प्रक्रिये मुळे काळाच्या ओघात मुळ झाडाचं खोड आणि त्याच्यावर केलेलं कलम एकजीव होऊन जातं परिणाम आधीचे खोड आणि मुळ जमिनीतून अन्नरस शोषून घेउन कलम केलेल्या फांद्यांना अखंड पुरवठा करतात. परंतू *रात्रंदिवस राबनार्या मुळाला व खोडाला कळतच नाही त्यांच राबन स्वतःच्या साठी नसून दुसर्या कोणाच्या तरी साठी आहे हा त्याचा भ्रम म्हणजे बौद्धिक गुलामी होय !!*( खास करून *OBC* बांधवांनो, हे उदाहरण लक्षात ठेवावे की, *कलम केलेला मेंदू बहुजनांचा आहे आणि कलम कसाई वैदिक ब्राह्मण आहे*.)
•••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:07] P.Shashikant Tikote: •••••••••••••••
🌹*१५ वा दिवस*🌹
•••••••••••••••
*"तथागत बुद्ध आणि संत तुकाराम वैचारिक साम्ये"*
•••••••••••••••
संत तुकाराम महाराज देहुजवळच्या *भंडारा* आणि *भांबनाथ* या डोंगरावर जाऊन ध्यान करीत असत. डोंगरावर ज्या ठिकाणी ध्यान करीत, ती ठिकाणे ही *बौद्ध लेणी* आहेत,. आजही भंडारा डोंगराच्या उतारावर *"कपाट"* म्हटल्या जाणार्या ठिकाणी बौद्ध लेण्यात *बौद्ध स्तूप* आहे.संत तुकाराम महाराजांनी *बौद्ध लेण्यातच ध्यान* कले होते. ध्यानाच्या माध्यमातून त्यांना *साक्षात्कार* झाला आणि त्या नंतरच त्यांनी वाडवडिलांनी लोकांना दिलेल्या *कर्जाची कागदपत्रे* इंद्रायणी नदीत बुडवून लोकांना *कर्ज मुक्त* केले.
सिद्धार्थ गौतम बुद्ध होण्याच्या आधी आपले *राजवैभव, विपुल शेती, घरदार* सोडून आपल्या मुख्य जीवनप्रवासाला सुरूवात केली अर्थात *संत तुकाराम आणि सिद्धार्थ गौतम दोघांनीही आपल्या वैभवाचे स्वतःच विसर्जन केले*.

तथागत बुद्धांनी *वैशाली राज्यातील वज्जी नागरिक लिच्छवींना* उपदेश केला होता की, जोपर्यंत वज्जी एकत्र जमत राहतील, *बहुसंख्येने ऐक्य राखतिल, एकमेकांचा आदर राखतिल तोपर्यंत त्यांचा पराजय होणार नाही*.
संत तुकाराम महाराजांनी देखील अशीच प्रकारचा उपदेश *बहुजन समाजाला* केलेला आहे.
न मिळती एका एक | जये नगरीचे लोक
भलीं तेथे राहू नये | क्षणें होईल न कळे काय
न करिता अन्याय | बळें करीती अपाय
नाही पुराणाची प्रीति | ठायींठायीं पंचाइती
भल्या बुर्या मारी | होता कोणी न निवारी
अविचार्या हातीं | देऊनी प्रजा नागविती
तुका म्हणे दरी | सुखें सेवावी ते बरी
तथागत बुद्ध आणि संत तुकाराम यांचा उपदेश आपणा सर्वांना *आत्मनिरीक्षणास प्रवृत्त* करणारा आहे.तथागत बुद्ध सांगत आहेत तसेच संत तुकाराम देखील सांगत आहेत की, *कुटुंब, समाज आणि राष्ट्र यांच्या मध्ये जर आंतरीक ऐक्याचा अभाव असल्यास कुटुंब उध्वस्त होते आणि राष्ट्रचा पराभव होतो.*

तथागत बुद्ध आणि संत तुकाराम यांच्यात *समान* दिसणारी *विचारधारा*•••••
तथागत बुध्दांच्या वैदिक काळात ब्राम्हण स्वतःला *ब्रम्हाच्या तोंडून* जन्मलो म्हणून आम्हीच सर्व वर्णात श्रेष्ठ आहोत(चार वर्ण : ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र) असे
सांगत असत.
*ब्राम्हणस्स मुख मासिद*
*बाहु राजन्य कृतः ।*
*उरुदहस्स वैशस्स*
*पद्मयाम शुद्र अयाजत ।।*
(येथे शुद्र म्हणजे *OBC* आहेत.)

अर्थात *ब्राम्हण स्वतःला ब्रम्हाच्या तोंडून जन्मलो म्हणून आम्हीच सर्वात श्रेष्ठ आहोत असे सांगत असत आणि क्षुद्र म्हणजे OBC हे पायातून जन्मले असे सांगतात.* मात्र * तथागत बुध्दांनी वैदिक ब्राह्मणांची ही संकल्पना खोडून काढली. तथागत बुद्धांने पुढील गाथा म्हटली•••••

तथागत बुद्ध पुढच्या गाथेत सांगतात•••••
*न जच्चा वसलो होत्ती,*
*न जच्चा होती ब्राह्मणो |*
*कम्मना वसलो होती,*
*कम्मना होती ब्राह्मणो ||*
कोणीही जन्माने शुद्र नसतो आणि ब्राम्हण ही नसतो.
कार्याने तो ब्राम्हण असतो व कार्यातूनच तो शुद्र असतो.
तसेच ते वैदिक ब्राह्मणांनाच्या लक्षात आनून देतात की,
*न जटाही न गोत्तेहि न जच्चा होति ब्राम्हणो* ।
*यम्हि सच्चञ्च धम्मो च सो सुची सो च ब्राम्हणो*
ज्याचा अर्थ आहे•••••••••••••
*न जटा वाढवल्याने, न गोत्राने, न जन्माने कोणी ब्राम्हण होतो. मात्र ज्यात सत्य आणि धम्म विद्दमान आहे,तीच व्यक्ती पवित्र आहे,तीच व्यक्ती ब्राम्हण आहे.*
( *ब्राम्हणांच्या वर्चस्वाखाली वावरणार्या भारतीय बहुजन समाजाला धक्का देऊन खडबडून जागे करणारे हे तथागताचे क्रांतीकारी वचन आहे.*)

*संत तुकाराम* देखील आपल्या अभंग गाथेतून सांगतात•••••

*लांबवूनि जटा नेसोनि कसोटा।*
*अभिमान मोटा करिताती।।*
*वाढवूनि जटा फिरे दाही दिशा।*
*तरी जंबुवेषा सहज स्थिति।।*

*न जटेन न गोत्राने न जन्माने ब्राम्हण होई* ।
*सत्य आणि धर्म जयात राही*
*ब्राम्हण तोची समजला जाई*।।

जटा वाढवल्याने व गोत्राने किंवा *ब्राम्हणाच्या घरी जन्माला आला म्हणून कोणी ब्राम्हण होत नाही.* तुमच्या लक्ष्यात आले असेल की संत तुकाराम आणि तथागत बुद्धांच्या *विचारांत अधिक साम्य आहे.*
अर्थात *तथागत बुद्धांची वाणी हिच संताची वाणी आहे, हे सिद्ध होते*

तथागत बुद्धाने *"मानवी चिंतनालाच"* अतिउच्च शिखरावर नेले. तथागत बुद्धांनंतर भारतीय *संस्कार आणि संस्कृतीवर* बुद्धविचाराचा प्रचंड प्रभाव पडलेला आजहि दिसून येतो तसेच भारतीय संस्कृती मध्ये संत तुकाराम हे देखिल एक असाधारण व्यक्तिमत्व आहे.

तथागात बुद्धांनी आपल्या आयुष्यात सदैव मनाच्या शुद्धीचा आग्रह धरला सर्व विचारांचा मध्यबिंदू मनच आहे. मन हे सर्व मानसिक क्रियाचे मार्गदर्शन करते. मन हे मानसिक शक्तीचे प्रमुख आहे.
*तथागत बुद्धांनी मनावर सप्रयोग जितके चिंतन केले, तितके मानव जातीच्या इतिहासात क्वचितच कोणी केले असेल. त्यांनी मनाचा अगदी अणु- रेणूही जाणण्याचा प्रयत्न केला.मानवी मनाच्या सर्व क्रिया- प्रतिक्रिया समजून घेतल्या माणूस कोणत्या परिस्थितीत कसा वागतो, याच्या अक्षरशः नाना तर्हा पाहिल्या. मानवी मनाचा कप्पा- न -कप्पा उलगडून दाखवविन्याचे काम केले.मनाच्या पार आत प्रवेश करून त्याचे सर्व तंरग जाणून घेतले.खरे तर ते मानवी मनाच्या मुळाशी पोचले आणि आपल्या चिंतनाचा हा सर्व प्रवास त्यांनी लोकांविषयीच्या करूणेपोटी आपल्या उपदेशातून त्यांच्या हृदयापर्यंत पोचविला.*

मनोपुब्बड़गमा धम्मा मनोसेटठा मनोमया
मनसा चे पदुटठेन भासति व करोति वा
*ततो नं दुःख मन्वेति चक्कं व वाहतो पदं*

मन उगम सर्व धर्माचे, मन श्रेष्ठ मनोमय
*मनाच्या मलिनतेने, बोले जो व कर्म करी*
*दुख धावी तया पाठी, जैसे चाक बैल पदे*

बुद्ध म्हणतात आपल्या मध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बर्या वाईट विचाराचे मन हे उगमस्थान आहे.
जसे *गाडी ओढणार्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके* जातात त्या प्रमाणे अशुद्ध मनाने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते.
म्हणून *मनाची शुद्धी बुद्धांच्या धम्माचे सार आहे.*

संत तुकाराम आपल्या अभंग गाथेत म्हणतात
*मन करारे प्रसन्न* ।
*सर्व सिध्दिचे कारण* ।।
मनाचे आपल्या जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे. आपल्या जीवनात, जे काही बरे वाईट घडते त्याच्या मुळाशी कोणत्या न कोणत्या स्वरुपात आपले मनच असते.
*बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त*।
*तया सुखा अंतपार नाही*।।
संत तुकाराम महाराजांची *जीवाला गारवा देणारी* ही रचना आहे.ह्या *"गाथेत"* *काव्याची कोमलता तत्वज्ञानाची दार्शनिकता मानसशात्राची सुक्ष्मता आणि जीवनाची सार्थकता आहे.* संत तुकाराम महाराज आपल्या गाथेतून पुढे म्हणतात की,
*आपणा कळेना आपले अवगुण* ।
*पुढिलाचे दोषगुण वाखाणिती* ।।

*आपले गुण कोणते ?*
*आपले दोष कोणते ?*
हे आपले आपणच निरखून पाहावे.
*आपले बळस्थान कोणते ?* *आपल्या उणिवा कोणत्या ?*
हे जाणण्याचा प्रयत्न करावा. थोडक्यात म्हणजे स्वतःची स्वतःला नीट आणि नेमकी ओळख पटेल हे पाहावे.
*आम्ही कोण ?*
*आमचे महापुरुष कोणते ?* *त्यांची विचारधारा कोणती ?* *त्यांचे संस्कार आणि संस्कृती आज ती आपलीच आहे का?*
*इतके जरी आपण निर्मळ व स्वच्छ मनाने कोणतेही किंतु परंतु मनात न ठेवता तपासून पाहीले तरी आम्ही शुद्ध होऊन बुद्धांच्या जवळ जाऊ शकतो*
••••••••••••••••••••••••••••••••••
*mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••
[29/06, 20:08] P.Shashikant Tikote: **************
🔹१७ वा दिवस 🔹
  ***************
*बुद्धांची अट्ठगाथा आणि संतांची अभंग गाथा*
"एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत" !!
•••••••••••••••••••••••••••••••
संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्यावर तथागत बुद्धाच्या विचारांचा प्रभाव पडलेला होता, हे त्यांच्या अभंगांचा आशय आपण पाहिलेला आहेच परंतु *"गाथा"* ह्या शब्दाचे महत्त्व पाहणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
गाथां ही मुलतः बुद्ध कालीन श्रमण संस्कृती मध्ये महत्त्वाचे स्थान आहे याउलट वैदिक परंपरे मध्ये गाथेला हिणवण्यात आले आहे. *गाथा श्रमण आणि वैदिक ह्या दोन संस्कृती प्रवाहांच्या विचारधारे मधील वैचारिक व बौद्धिक अंतर आहे.*
बौद्ध तिपिटकामध्ये तथागतांच्या पद्धवचनांना "गाथा" शब्दाने "थेरगाथा" बौद्ध ग्रंथात गाथांना अतिशय महत्त्व दिले जाते. *भारतातील बहुजन समाजाने गाथांचा संबध अवैदिक जीवन शैलीशी जोडला गेला आहे.*

वारिकरी संप्रदायातील नामदेवांपासून ते तुकारामांपर्यंत संताच्या अभंगसंग्रहांना देखील *"गाथा"* म्हटलं जाते. तथागत  बुद्धांच्या उपदेश संग्रहालाही जयमंगल अट्ठगाथा म्हटले जाते. बुद्धांच्या ह्या *'आठ गाथा'* म्हणजे स्वतःचे अनुभव आहेत. आठगाथा मधील *पाचवीगाथा* संत तुकारामांच्या जीवन अनुभव व बुद्धांच्या अनुभवाला तंतोतंत जुळते.

*कत्वान कट्ठमुदरं इव गब्भिनीया*
*चिच्याय दुट्ठवचनं जनकायमज्झे।।*
*सन्तेन सोमविधिना जितवा मुनिन्दो*
*तं तेजसा भवतु ते जयमंगलानि।।*

ज्या मुनिद्राने, पोटावर काष्ट बाधून गर्भवतीसारखे आपले पोट मोठे करुन लोकांसमक्ष दुष्ट वचन केले (बुद्धाला कलंक लावाण्यासाठी) त्या चिंचा नामक स्त्रीला आपल्या *शांती आणि सौम्यता* या गुणांनी जिकंलै, त्या तेजाने तुझे कल्याण होवो ।।५।।

संत तुकारामांला *बदनाम* करण्या करिता वैदिक ब्राम्हणानी एका *वेश्येला* तुकारामा कडे पाठविले तेव्हा तुकाराम म्हणतात

*परविया नारी अम्हा रुकुमाई समान।*
*हे गेले नेमुनीयाच ठाई ।।*
*जाये तु माते न करि कयास।*
*आम्ही विष्णूदास नव्हे तैसे ।।*
तथागत बुद्धांची गाथा आणि संत तुकारामांच्या अभंग विचारात कमालीचे साम्य आहे.
म्हणजे *"गाथा" हा शब्द संत संप्रदायाच बुद्ध विचारासी असलेले नातं आणि बहुजन समाजाला जोडनारा सांस्कृतिक प्रवाह आहे*

*"बुद्ध गाथा"*

।। *मनोपुब्बड़गमा धम्मा मनोसेटठा मनोमया*।।

।। *मनसा चे पदुटठेन भासति व करोति वा*।।

।। *ततो नं दुःख मन्वेति चक्कं व वाहतो पदं*।।

।। *मन उगम सर्व धर्माचे, मन श्रेष्ठ मनोमय*
*मनाच्या मलिनतेने, बोले जो व कर्म करी*
*दुख धावी तया पाठी, जैसे चाक बैल पदे*।।

*तथागत बुद्धांनी त्यांच्या धम्माचा पायाच या गाथेत विदित केला आहे. इतर धर्माचा पाया हा एखादी अलौकिक शक्ती असलेल्या ईश्वरावर आधारित आहे. ज्याने हे जग निर्माण केलें. बुद्ध इथे शिकवतात की जे काही आपण अनुभवतो, ती आपल्या विचारांचीच निर्मिती आहे, जी आपली धारणा असते, त्याचेच ते प्रक्षेपण असते. बुद्ध म्हणतात "माणसाचा निर्माता स्वतः माणूच आहे."*
।। *अप्प दीपो भव* ।।
अर्थात प्रत्येकाने स्वतः साठीचा दीप स्वतःच बनावे. स्वतः साठीचा द्वीपासारखा आधार स्वतःच बनावे. हे बुद्धाच्या गाथेतिल अतिशय महत्त्वाचे तत्व आहे.
संत तुकाराम देखील आपल्या अभंग गाथेत म्हणतात
*आणिकांसी तारी ऐसा नाही कोणी* |
*आपण चि तारी आपण चि मारी|*
*आपण उद्धारी आपणयां ||*
इतरांचा उद्धार करेल असा कोणी नाही. जगात कोणी कोणाचा उद्धार करीत नसतो. स्वतःच स्वतःचा उद्धार करावा लागतो.

संत नामदेव महाराजांपासून ते संत तुकाराम महाराजा पर्यंत सर्व संत हेच सांगतात •••••••
*जाऊ अर्हन्ता पुढे शरणं l*
*आहे संतांचे महेर घर ll*
आम्ही फक्त आणि फक्त अर्हताला शरण जाऊ आणि हा अर्हतच आम्हा संताचे माहेर आहे.
बौद्ध धम्मातील नैतिक आदर्श पुरुष म्हणजे अर्हत. अर्हत हा नैतिक आणि बौद्धीक अशा दोन्ही दृष्टीने महान असतो. बौद्धधम्माने 'विद्येला मुक्तीकरीता अनिवार्य मानले आहे. आणि 'अविद्या' व 'तृष्णा' ह्यांना मुक्तीच्या मार्गातील मुख्य बाधक कारणे मानली आहेत.

*अनुपत्तो सदत्यो वितरागो वीतदोसो वीतमोहो खिणासवो ओहितभारो कतंरणीयो नापरम् इत्थताया ति।*
ज्यांनी मोह, द्वेष, अविद्या यांच्यापासुन मुक्ती मिळवली आहे, स्कंधाचे ओझे ज्यांनी फेकुन दिले, अतिश्रेष्ठ ध्येय म्हणजे निर्वाणास ज्यांनी प्राप्त केले त्या *'अर्हतास'* म्हणजे अर्हत तथागत बुद्धाला आम्ही शरण जातो.
••••••••••••••••••••••••••••••••••
✍🏻 *mn sonawane pune*
••••••••••••••••••••••••••••••••••

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...