Skip to main content

नागवंशाचा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकर

~ नागवंशाचा इतिहास ~

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागवंशाबद्दल नागपूरच्या दीक्षाभूमिवर १४ /१५ ऑक्टोबर १९५६ रोजी जे भाषण केले त्यात म्हणतात, "ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या मध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागाना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनिने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपन वंशज आहोत. ज्या नाग लोकांनी एवढा छळ सोसावा लागला. त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता, त्यांना तो महापुरुष गौतमबुद्ध भेटले. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. नाग लोकांनी मुख्य वस्ती नागपूर येथे येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास *'नागपूर'* म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे सत्ताविस मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी नदी आहे ती नागनदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरुण पडले आहे. यावरुन नागवंश हा या देशातला राज्यकर्ता वंश होता. त्याचप्रमाणे या नागवंशीय लोकांनी तथागत गौतम बुद्धाचा महान धम्म या पृथ्वीतलावर पसरवण्याचा प्रयत्न केला. याबाबतीत त्याचे अनेक उल्लेख सापडतात.

शंकरराव खरात यांनी प्रा. रॉबर्टसन यांच्या 'महार फोल्क' या ग्रंथातील पुढील उल्लेख केला आहे. "महारांचा पहिला राजा 'नाग होता असा महार जातीत प्रघात मानला जातो. एकवेळी महाराष्ट्रावर ज्यांचे राज्य होते, त्या *'नाग'* वंशाचे हे स्मरण आहे" नाग लोक आपल्या नावासमोर *'नाग'* ही उपाधी लावत असत.' *नाग' या शब्दाचा अपभ्रंश *नाक* असा झाला आजही आपण *नागपूर* चा उच्चार *नाकपूर* असाच करतोत. *नाक* ही *महार*, *मांग* यांच्या नावासमोर आजही लावली जाते. तर आदिवासी समाजात *नाक* चे पुन्हा अपभ्रंश होऊन *नाईक* हा शब्द नावासमोर लावला जातो. महार, मांग, आदिवासी आजही नागाची पूजा करतात. नागाला आपले दैवत मानतात. संपूर्ण विदर्भात *नागविदर्भ* या नावाने ओळखले जाते.
कोकणात कुणबी समाज स्वतःला शेषवंशीय समजते. तर मराठवाड्यात आणि उर्वरित महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात मधील महार समाज स्वतःला नागवंशीय समजतात. तसे पुरावे ही उपलब्ध आहेत. महार हे नागवंशीय आहे.

याबाबतीत डॉ. श्री. व्यं. केतकरांनी राजारामशास्त्री भागवतांच्या मताचा उल्लेख त्यांच्या ज्ञानकोशातिल आरठव्या विभागात केला आहे. तो पुढीलप्रमाणे *"नाग लोक म्हणजेच महार लोक होते"* नागाचा प्राचीन इतिहास आणि त्याच्यातील गुणविशेष पुढे महाराच्या मध्येही आढळतात.
 याचप्रमाणे दास आणि नाग यांच्याविषयी *डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे* संशोधन महत्त्वाचे वाटते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, *दास* असे का संबोधण्यात आहे हे कळणे कठीण नाही. *दहाक* या इंडो - इराणीयन शब्दाचे संस्कृतीकरण केलेले रूप *दास* हे होय. दहाक हे नाग लोकांच्या राज्याचे नाव होते. यामुळे त्यांच्या राज्याच्या नावावरुन आर्य लोक त्यांना दहाक म्हणू लागले. परंतु संस्कृत मध्ये त्यांचे रूप *दास* असे बनले व संपूर्ण नाग लोकांसाठी ते वापरण्यात येऊ लागले.

नाग लोक कोण होते ? नि:संशयपणे ते अनार्य होते वैदिक वाङ्मयात बारकाईने अभ्यास केला तर या दोन लोकांमधील संघर्ष, दैतभाव व या दोन संस्कृती मध्ये वरचढपनासाठी चाललेली चढाओढ स्पष्टपणे दिसून येते. आर्यच्या इंद्र देवाचा *अहिवित्त* नावाचा नागदेव विरोधी असल्याबद्दल ऋग्वेदामध्ये प्रथमतः आपणास सागन्यात येते. नंतरच्या काळात नागदेव हे नाव बरेच प्रसिद्धीस आले असले तरी सुरवातीच्या वैदिक वाङ्मयामध्ये *नाग* हा शब्द आढळत नाही. नाग हे प्राचीन असून त्यांचे अस्तित्व वैदिकांच्या पूर्वीपासून इथे होते. त्यांची संस्कृती उच्च दर्जाची होती. त्यांचे रोटीबेटी व्यवहार राजकुळाशी सबंधित होते. याबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.,ऋग्वेदामधील नागाच्या उल्लेखावरून नाग हे फार पुरातन लोक होते असे दिसते. भारतातिल राजघराण्यामध्ये त्यांचे विवाहसबंध होते. हे इतिहासावरुण दिसून येते.

नाग लोक समृद्ध, सुसंस्कृत, शांतताप्रिय, होते. कदंब, पल्लव, वाकाटक, गुप्त, चोल, ओरिसातील भोमन  वंशातील राजांचे विवाह संबंध नागवंशातील लोकांबरोबर होते. नागाचा मायदेश महाराष्ट्र आणि आसपासचा प्रदेश या नागराज्यचा होता सातवाहन कुळातील राजे कमी आधिक प्रमाणात नागवंशाचे होते. तमिळ वाङ्मयात नागनाडुसबंधी उल्लेख येतात. सिलोन व सयामच्या बौद्ध परंपरेनुसार आपणाला असे दिसून येते की, कराचीजवळ मजेरिक नावाचा नागदेश द्रविड आणि नाग हे एकाच वंशाचे आहेत.

अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, काग्रा खोर्‍यातील बैजनाथ देवालयात शिलालेखात त्या स्थळाचे पूर्वीचे नाव *किरा ग्राम* असल्याचा उल्लेख आहे. स्थानिक बोली मध्ये याचा *सापाचे गाव* असा असावा. वैजनाथ नाथाला आणि त्यालगतच्या संपूर्ण प्रदेशात अजूनही नाग देवाची सार्वत्रिक पुजा करण्यात येते.
नाग लोका बद्दल कटुतेची भावना निर्माण झाली कारन त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. आर्य संस्कृतीला विरोध केला. त्यावरून बौद्ध धम्म स्वीकारलेल्या नागाना अस्पृश्य केले. त्यांना महाराष्ट्रात महार या नावाने, उत्तरेत *मल्ल* तर दक्षिणेत *मादगुल* या नावाने ओळखले जाते.

महार आणि कुणबी - मराठे एकाच वंशाचे असल्याचे जोतिबा फुले आपल्या *गुलामगिरी* या ग्रंथात बळी राज्याच्या दरबारात आव्हानात्मक कार्य करण्यासाठी बेल भंडार लावून तळी उचलण्याच्या कार्यक्रमाचे वर्णन करतांना म्हणतात. "हल्लीचे मराठे म्हणजे मांग, महार, कुणबी आणि माळी इत्यादी लोक दर आदितवारी आपल्या घरातील त्या कुलस्वामिच्या प्रतिमेवर पाणी घालून त्यास कोरड्या ओल्या भाकरीचा नैवेद्य दाखविल्याशिवाय ते आपल्या जिभेवर पाण्याचा थेंबसुद्धा ठेवत नाहीत" जोतिबानी वरील जाती ह्या शेती वरून आणि व्यवसायावरून पडल्याचे एके ठिकाणी म्हटले आहे. कोरडवाहू शेती करणारा *कुणबी* पाण्याखालची शेती करणारा *माळी* आणि शेतीसाठी उपयुक्त प्राणी पाळणारा *धनगर* ह्या जाती एकाच कुळात असल्याचे सांगितले आहे.

बाणासुरांच्या राज्यात ब्रह्मा शिरला आणि त्याने लहान मोठ्या सरदाराचा पाडाव केला. त्यावेळी ब्रह्मासोबत लढत असताना *महाअरी* विषयी *गुलामगिरी* या ग्रंथात लिहिले आहे. "नंतर ब्रह्मा त्या आपल्या पखरी भटास बरोबर घेऊन बाणासुराच्या राज्यात शिरला आणि त्याने कित्येक लहान मोठ्या सरदारांना मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्याला हस्तगत करून घेण्याची त्यापैकी रणांगणी कंबरा लढणार्‍या *महाअरी* ( हल्लीचा ज्याचा अपभ्रंश महार होय ) क्षञियाशिवाय जे लोक त्याच्या तावडीत सापडले होते तेवढ्याचे मात्र त्याने सर्व हरन करून त्या सर्वांस केवळ सत्तेच्या मदाने क्षुञ लोक ( ज्याचा अपभ्रंश शूद्र होय.) मानून आपले दास केले. त्यातून कित्येकांस आपल्या लोकांच्या घरोघरी सेवा चालणार्‍या करण्याकरिता वाटून दिले. बाकी राहिलेल्या शूद्रांची गावोगाव एकेक भट कामगार पाठवून कुळवाडी करून त्याजपासून शेतीतील काम करून घेऊन, त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वहिवाट घातली.
यावरुन त्या कामगारांचे कुळे - करणी ( त्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय) त्याचप्रमाणे त्या शूद्र कुळाची नावे कुळवाडी अशी पडली. (  त्यांच्या अपभ्रंश कुळंबी अथवा कुणबी होय ) व त्या दास कुणब्याच्या स्त्रियांस नेहमी शेती पुरते काम नसल्यामुळे कधी कधी कारणपरत्वे भटांच्या घरी सेवा चाकर्या करावयास जावे असे. यास्तव कुनबिन आणि दासी या दोन शब्दामध्ये तिळमात्र भेद दिसून येत नाही.

एकाच कुळात जन्मलेल्या माणसांना फोडून त्यांच्या वर गुलामी लागली गेली. मराठा ज्यांना म्हणतो त्यांचे नाव, रुढी परंपरा ही सर्व महारामध्ये ही सापडतात. या विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथात म्हणतात, "महाराष्ट्रातील फार मोठी लोकसंख्या मराठा जातीची आहे. महार हे महाराष्ट्रातील अस्पृश्य आहेत. मानववंश शास्त्रीय संशोधनावरून असे आढळून आले आहे की, या दोघांचे कुळ एकच आहे. यांच्यातील साम्य इतके मोठे आहे की महार लोकात आढळणारे असे एकही कुळ नाही की, जे मराठा जमातीला सापडत नाही आणि मराठ्यांत असलेले असे एकही कुळ नाही जे महारात आढळून येत नाही " मराठा ही जात नसुन तो एक जात समुह आहे. कारन नाग लोकांनाच मराठा या नावाने पुढे ओळखले जाऊ लागले. नाग लोकातिल लढवय्ये होते त्यांना महाअरी म्हटले जाऊन लागले, तर जे हरले होते त्यांच्यामधून *दास* आणि *कुणबी* तयार केले गेले. हे जोतिबा फुल्यांच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मता वरून स्पष्ट होते..

- Rohit Shobha Shamsundar Gaikwad

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...