Skip to main content

नेहरू समजून घेताना......!

 [12/11, 19:37] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#1


सध्या नेहरू मोठे की वल्लभभाई पटेल, असा वाद हेतुत: निर्माण केला जात आहे. पटेलांनी नेहरुंचे मोठेपण मान्य केले होते, तरीही पटेल पंतप्रधान झाले असते तर, असा सवाल केला जातो आहे. 

 रामगढच्या काँग्रेस अधिवेशनात काँग्रेसने वसाहतीचे स्वराज्य झिडकारून संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. हा ठराव का झाला, असा प्रश्न तेव्हाच्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनाही पडला. या ठरावाचा मसुदा तयार करणारे होते पंडित जवाहरलाल नेहरू. मात्र वल्लभभाई, राजेंद्र प्रसाद आणि राजाजी हे पुन्हा सत्ताग्रहण करण्याचा आग्रह धरत होते. पटेल यांचा विजय झाला असता तर नेहरू बाहेर पडतील या भीतीने गांधीजींनी सत्ताग्रहणाचा निर्णय लांबणीवर टाकला. याचा अर्थ नेहरू हे सत्तेसाठी हपापलेले होते, असा जो प्रचार केला जातो तो किती खोडसाळपणाचा आहे, हेच इथे स्पष्ट होते.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[13/11, 08:07] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺

#2


*विवेकानंद - नेहरू*


या देशाच्या रूढी-परंपरा आणि अंधश्रद्धा यांतून मुक्तता करणे हे प्रमुख काम आहे, असे सांगताना विवेकानंद म्हणतात, ‘आकाशात हिंडणारे वायूचे गोळे पृथ्वीवर हिंडणाऱ्या माणसाच्या कर्तृत्वावर परिणाम करतात, असे समजणे हा मानवी मनाला होणारा भयावह रोग आहे.’ नेहरूंनी बेधडकपणे तो रोग देशाच्या शरीरातून हद्दपार करण्यासाठी पावले उचलली. मंगळवार 13 मे हा पहिल्या लोकसभेचा पहिला दिवस होता. मंगळाची अवकृपा, त्यातून 13 ही जागतिक अशुभ तारीख. इतरांचे राहू देत, खुद्द राजेंद्रप्रसादांनी तारीख बदलण्याची गळ घातली. नेहरूंनी सर्वांचे सांगणे धुडकावून लावले. या राष्ट्राला अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचे हे पहिले सक्षम पाऊल आहे, असे सांगितले.

- दत्तप्रसाद दाभोलकर

- - - - - - - - - -

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[15/11, 07:29] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#3


रस्ते साफ व्हावेत, म्हणून हातात झाडू घेऊन फोटो काढण्याचे तर आज वेडच पसरलेय. नेहरू प्रश्नांना भिडतात; फोटोंना नव्हे! या देशाला अणुयुगात आणि अंतरिक्ष युगात नेण्यासाठी धडपडणाऱ्या नेहरूंचे पाय जमिनीवर पक्के आहेत. स्वच्छतेसाठी प्रामाणिकपणे काय करावयास हवे, याचा ते शोध घेताहेत. दि.12 जून, 1960 रोजी परदेशातून पत्र पाठवून ते सांगताहेत, ‘या देशात स्वच्छता-कामगारांच्या हातात काठीला बांधलेला झाडू असतो. त्यामुळे त्यांचे वाकण्याचे श्रम वाचतात. अद्याप हे आपल्या लक्षात कसे आले नाही? यापुढे सर्व सफाई- कामगारांना लांब काठीला बांधलेली केरसुणी द्या. महत्त्वाचे म्हणजे, आपण त्यांना गणवेश द्यायला हवा. तो नेहमी स्वच्छ करून इस्त्री करून द्यावयास हवा. त्यामुळे त्यांचा स्वत:कडे व इतरांचा त्यांच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्यांचे जीवन सुसह्य होईल. त्यांचे सफाईचे काम अधिक चांगले होईल.’


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[16/11, 05:51] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#4


नेहरूंच्या समोर बालविवाह नव्हते, तो कायदा झाला होता; पण झपाट्याने वाढणारी लोकसंख्या ही भयावह समस्या होती. कुटुंबनियोजन धर्मविरोधी होते. नेहरूंनी 1950 मध्ये पहिली जागतिक कुटुंबनियोजन परिषद दिल्लीत भरवली. या माझ्या देशाला कुटुंबनियोजन समजावून देण्यासाठी हे गरजेचे आहे, म्हणून सांगितले. कुटुंबनियोजन कार्यक्रम हातात घेणारे भारत हे जगातील पहिले राष्ट्र बनविले. मात्र त्याच वेळी आग्रहाने सांगितले, ‘हे काम कायदा करून होणार नाही. यासाठी शिक्षण आणि आर्थिक स्तर वाढवणे गरजेचे आहे.’ त्यासाठी लोकशिक्षण हातात घेतले. आणि या देशात 1960 पर्यंत तीन हजार शासकीय कुटुंबनियोजन केंद्रे अस्तित्वात आली.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[17/11, 04:30] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#5


जवाहरलाल नेहरू यांनी १९४०मध्ये ‘The unity of India’ यामधील एका लेखात घटना कोणी लिहावी, याबद्दल जे म्हटले आहे, ते खूप महत्त्वपूर्ण आहे. ते लिहितात, ‘घटनेची निर्मिती ही कचेरीत निवांत बसणाऱ्या विद्वान वकिलांकडून होणार नाही, त्याचप्रमाणे कोणत्याही परकीय शक्तीकडूनदेखील ते होणार नाही, तर भारतीय जनतेमार्फतच होईल.’ नेहरू पंतप्रधान असल्यामुळेच आंबेडकर यांची घटना मसुदा समितीच्या प्रमुखपदी निवड झाल्याचे मत ‘रिइमॅजिनिंग द रिपब्लिक्स आयकॉन्स : पटेल, नेहरू अँड आंबेडकर’ या नोव्हेंबर २०१५ मध्ये दिल्लीत झालेल्या चर्चासत्रात सुप्रसिद्ध लेखक व दलित चळवळीतील कार्यकर्ते कांचा इलय्या यांनी मांडले आहे..

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[18/11, 08:04] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#6


राजाजी हे तेव्हाच्या मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल काटेकोर होते. त्यांच्या राज्यात सकलतवाला हे कम्युनिस्ट नेते जहाल भाषणे करत. तेव्हा त्यांना पकडून खटला भरण्यात आला आणि त्यांची रवानगी तुरुंगात झाली. तेव्हा नेहरुंनी राजाजींना विचारले की, उद्या मी सकलतवाला यांच्याप्रमाणे भाषण केले तर तुम्ही मलाही अटक कराल काय? तेव्हा राजाजींनी त्यांना 'होय' असे उत्तर दिले. विशेष हे की त्यानंतर लगेचच वर्ध्यामध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांनी मुंबई प्रांतात कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित पाच संघटनांवर बंदी घातल्याचे सांगितले आणि कम्युनिस्ट पक्षाकडे कल असणाऱ्या सात पुढाऱ्यांवर निर्बंध लादले. अध्यक्ष नेहरुंनी म्हटले की, 'संपूर्ण नागरी स्वातंत्र्याच्या तत्वास काँग्रेस पक्ष बांधील आहे आणि एखाद्याने फौजदारी गुन्हा केल्याचे न्यायालयात सिद्ध होत नाही तोपर्यंत काँग्रेस सरकार कोणत्याही संघटनेवर बंदी घालू शकत नाही.' नेहरुंचा उदारमतवाद कसा होता याचेच हे दर्शन आहे.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

[19/11, 08:38] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#7


आज इंदिरा गांधी यांची जयंती...


तेराव्या वर्षी त्यांनी वानरसेना सुरू केली. सहा हजार मुलं या सेनेत दाखल झाली. केवळ गुप्त निरोप पोहोचवायच्या कामावर त्या छोट्या सैनिकांनी कधीच समाधान मानलं नाही. काही वेळा ते इंग्रज बराकींवर हल्लाही करीत! जवाहरलालजींनी तुरुंगातून इंदिरेला पत्रे पाठविली, ती याच कालखंडात. एका पत्रात ते लिहितात, ‘जोन ऑफ आर्कची गोष्ट तू पहिल्यांदा वाचलीस तेव्हा कशी भारावून गेली होतीस, ते आठवतं? तिच्यासारखं व्हायची तुझी आकांक्षा होती... आज  भारतात आपण इतिहास घडवतो आहोत. तुझ्या-माझ्या डोळ्यांसमोर तो घडतोय आणि आपण आपला त्यातील हिस्सा उचलतोय, हे किती भाग्याचं!’ दोन खंडांत आज ही पत्रं ग्रंथबद्ध झाली आहेत.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[20/11, 11:41] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#8


नेहरूंनी या देशात लोकशाही प्रयत्नपूर्वक रुजवली. लोकशाही म्हणजे केवळ प्रत्येकाला एक मत नव्हे; तर दुसऱ्याच्या मताचा आणि संस्थात्मक रचनांचा आदर करणे, हे समजावून दिले. एकदा राज्यसभेत सर्वपल्ली राधाकृष्णन सभापती होते. एक मंत्री काही माहिती देत होता. नेहरू जागेवरून उठून दुसऱ्या मंत्र्यांकडून काही माहिती घेत होते. ‘हे योग्य नाही’ असे राधाकृष्णन यांनी म्हटल्यावर नेहरूंनी सभागृहाची माफी मागितली आणि पुन्हा कधी असे होणार नाही, म्हणून सांगितले.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

https://bit.ly/3klKsUj

[21/11, 07:24] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#9

17 सप्टेंबर 1948 या दिवशी नेहरूंना लिहिलेल्या पत्रात राजेंद्र प्रसाद म्हणाले, ‘मुसलमानांना लष्कराचे संरक्षण देण्याचे तुमचे धोरण काँग्रेसची लोकप्रियता व मते कमी करणारे आहे, ते तुम्ही थांबविले पाहिजे.’ राजेंद्रबाबूंना लिहिलेल्या उत्तरात दि. 19 सप्टेंबरच्या पत्रात नेहरू म्हणतात, ‘जोवर बापूंचा वचक होता तोवर आपण सारेच एकराष्ट्रीयत्वाची भाषा बोलत होतो. त्यात धर्म वा जातीला स्थान नव्हते. आज जेव्हा धर्माच्या नावावर कत्तली होत आहेत आणि क्रौर्याच्या कथांनी साऱ्यांची मने उद्‌ध्वस्त केली आहेत, तेव्हा अशी भाषा वापरणे आपल्याला न शोभणारे आहे’. ते पुढे म्हणतात, ‘मला पंतप्रधानपदाची आवड नाही. जोपर्यंत आपण काही मर्यादा व मूल्ये जोपासत नाही तोवर मिळविलेल्या स्वातंत्र्यालाही फारसा अर्थ उरत नाही. तुम्ही सांगता तसे केल्याने आपण स्वप्नात पाहिलेला भारत कधी अस्तित्वातच येणार नाही!’

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[22/11, 05:47] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#10


1947 च्या डिसेंबरला पटेलांनी उपपंतप्रधान, गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचीच तयारी केली होती. नेहरू आपल्या मंत्रालयाच्या कामकाजात हस्तक्षेप करतात, असा त्यावेळी त्यांचा आरोप होता. त्याला दोन कारणे झाली. जुनागडचे संस्थान विलीन करून घेताना, लष्कराने केलेल्या कारवाईत अन्याय झाल्याच्या तक्रारी आल्या तेव्हा नेहरूंनी त्याची चौकशी करण्यासाठी एका आयोगाची नियुक्ती केली. सरदारांना तो त्यांच्या कार्यक्षेत्रातील हस्तक्षेप वाटला. नंतर काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रसंघात नेण्याचा निर्णय सरकारने घेतला तेव्हा तो प्रश्न संस्थानांचा न राहता आंतरराष्ट्रीय झाल्याने नेहरूंनी तो परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारित घेतला. सरदारांचा त्या निर्णयावरही राग होता. मात्र या मतभेदांच्या काळात त्या दोघांची समजूत काढायला गांधी होते. त्याही वेळी नेहरू व पटेल यांच्यातील सौदार्ह असे की, एका विदेशी पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत नेहरू म्हणाले, ‘मी नुसता नजरेचा इशारा केला तरी सरदार राजीनामा देतील आणि त्यांचा तसा इशारा मिळाला की मीही माझे पद सोडेन, हे आम्हा दोघांनाही चांगले ठावूक आहे आणि त्यावर पक्षाचाही विश्वास आहे!’


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

या आधीच्या पोस्ट वाचण्यासाठी फेसबुक ला *नेहरू समजून घेताना* या पेजला like करा.

https://bit.ly/3klKsUj

[23/11, 02:44] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#11


नेहरूंचा राष्ट्रवाद हा ऐक्याचा राष्ट्रवाद होता. भारतीय राष्ट्रवादामागे कोणतीही धार्मिक भावना असता कामा नये असे त्यांचे मत होते.आपल्या देशाच्या पूर्व परंपरा व पराक्रम यांची सामुदायिक स्मृती म्हणजेच राष्ट्रवाद असे ते मानत होते.जगाचा इतिहास,वर्तमान आणि संस्कृतीचा सूक्ष्म अभ्यास त्यांनी केला होता. म्हणूनच ‘भारताचा शोध ‘ मध्ये ते म्हणतात ‘आपल्या भोवती काय चालले आहे याचा विचार न करता आपल्यापैकी अनेक लोक प्राचीन काळातच वावरत असतात.काहींना वैदिक काळाची पुन्हा प्रस्थापना करायची आहे,तर काहींना इस्लामच्या आरंभीचा काळ पुन्हा यायला हवा आहे.आपली प्राचीन संस्कृती निराळ्या परिस्थितीत निर्माण झाली होती हे आपण विसरतो.आपल्याकडील अनेक परंपरा ,सवयी,रुढी, सामाजिक कायदे, वर्णव्यवस्था ,स्त्रियांना दिलेले निम्न स्थान ,धार्मिक कर्मठपणा या सर्व गोष्टी आजच्या परिस्थितीत अगदी कालबाह्य ठरलेले भूतकाळाचे अवशेष आहेत.’आपल्याला प्रगती करायची असेल तर साम्राज्यवाद गाडला पाहिजे,साम्राज्यवादाला विरोध करणे हा समाजवादाच्या पूर्वतयारीचा मुख्य टप्पा आहे ही त्यांची धारणा होती.


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती  आता पुस्तक रूपाने आपल्या भेटीला.. आजचे 'जवाहर' पुस्तक बुक करा संपर्क - 9637351400

[24/11, 07:51] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#12


हिंदू कोड बिल...

त्या विधेयकाने स्त्रियांना दिलेले अधिकार कर्मठांच्या वर्गाला मान्य होणारे नव्हते. ते बिल संसदेत आणले जाऊ नये यासाठीच मग पक्षातील उजव्या विचाराच्या लोकांनी कंबर कसली. त्यासाठी ते प्रत्यक्ष राजेंद्रबाबूंपर्यंत पोहचले. त्यावेळी देशाचे राष्ट्रपतीपद भूषवीत असलेल्या राजेंद्रबाबूंनी मंत्रिमंडळाला बाजूला सारून, प्रत्यक्ष लोकसभेच्या सभापतींनाच, (अनंत शयनम्‌ अय्यंगार यांना) ते विधेयक चर्चेला घेऊ नका अशी आज्ञा केली. हा घटनाबाह्य प्रकार होता. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार निर्णय घ्यायचे असतात आणि राजेंद्रबाबू मंत्रिमंडळालाच बाजूला सारत होते. यावेळी नेहरूंनी त्यांच्याशी लढत घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा त्यांच्याकडे पोहोचता केला. नेहरूंची लोकप्रियता तेव्हा एवढी जबर होती की, त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रपतीच हादरले व सभापतींना पाठविलेले ते आदेशवजा पत्र मागे घेतले.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[25/11, 08:20] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#13


महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृती दिन...


द्विभाषिक राज्याचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण मंत्रीमंडळाची यादी घेऊन दिल्लीला आले. तेव्हाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची परवानगी घेणे आवश्यक होते. ठरल्या वेळी यशवंतराव नेहरूंच्या केबिन मध्ये गेले. त्यांना आपली यादी दाखवली.


पंडीतजीनी ती यादी हातात घेऊन पाहिली. ते कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कारभारात ढवळाढवळ करायचे नाहीत. तरी त्यांनी यशवंतरावांच्या यादीवर एका नावापुढे खून केली आणि म्हणाले,


“तुम्हाला योग्य वाटले तर हा बदल करा !”


आपल्या सारखी अननुभवी मुख्यमंत्र्याच्या यादीत कोणताही मोठा बदल न करणाऱ्या नेहरूंच्या दिलदारपणामुळे यशवंतराव भारावून गेले आणि आभार मानत उभे राहिले. त्यांनी कमरेत थोडस झुकून नेहरुंना प्रणाम केला आणि म्हणाले,


“पंडितजी मी आपला कृपाभिलाषी आहे !”


पण अचानक काय झाल काय माहित पंतप्रधान ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले,”My blessings are not cheap !”


यशवंतरावांना धक्का बसला. आपल काय चुकलं याचा विचार करत ते प्रधानंमंत्र्याच्या दालनातून बाहेर आले. ते म्हणतात,

“मुंबईला परतण्याच्या विमानप्रवासात मी अस्वस्थ होतो! मी माझ्या शक्तीवर किंवा संघटनेवर मुख्यमंत्री बनलो नव्हतो! भाऊसाहेब हिरे नकोत म्हणून मोरारजींनी मला पुढे केले व मी मुख्यमंत्री बनलो. नेहरूंच्या दृष्टीने मी वशिल्याचा मुख्यमंत्री होतो !”


त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा आनंद ओसरला . राजकीय परिणाम घडतील म्हणून त्यांनी घडलेली घटना कुणालाच सांगितली नाही. पण नेहरूंच्यापासून अंतर राखायच ठरवल.


पंतप्रधान जेव्हा दौऱ्यावर येतात तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या समवेत राहिलेच पाहिजे हा शिरस्ता आहे. जेव्हा जेव्हा नेहरू मुंबई दौऱ्यावर येत तेव्हा यशवंतराव काळजी घेऊ लागले. जेव्हा नेहरूंच्या सोबत कार मध्ये बसायची वेळ आली तर ते मुद्दामहून मागे रेंगाळू लागले. यामुळे पंतप्रधानाच्या शेजारच्या सिटवर राज्यपाल बसायचे आणि यशवंतराव ड्रायव्हरच्या शेजारी.


यशवंतरावांनी या काळात महाराष्ट्रात संघटना मजबूत व्हावी म्हणून भरपूर कष्ट घेतले. ते सांगतात,”


मी राज्यात बेरजेचे राजकरण केले. मोरारजींच्या काळात जो कडवा विरोध त्यांचं ताठर भुमिकेमुळे होता तो हळूहळू निवळला. गुणीजनांना मान दिला. गरिबांना आधार दिला. मुख्य म्हणजे विश्वासातल्या सहकाऱ्यांना उत्तेजन दिले. नवनवीन योजना आणल्या. महाराष्ट्रातील वातावरण बदलले.  कॉंग्रेसवरचा राग कमी झाला.”


यशवंतरावांच्या नेतृत्वाची प्रशंसा सुरु झालीवरच जनतेचं प्रेम वाढलं. त्यांची लोकप्रियता शिखरावर पोहचली होती.


पुढे जेव्हा नेहरू परत मुंबई दौर्यावर आले तेव्हा त्यांना महाराष्ट्रातील बदललेल्या घडामोडी जाणवत होत्या. मुख्यमंत्री आपल्याला टाळतात हे सुद्धा त्यांना दिसत होतं. एकदा असच गाडीत बसायचा प्रसंग आला. यशवंतराव नेहमीप्रमाणे मागे रेंगाळले. मात्र नेहरूंनी त्यांचा चटकन हात पकडला आणि ओढून आपल्या शेजारच्या सिटवर बसवले आणि हसून म्हणाले,


“Chief Minister, now you have my blessings! “


यशवंतराव चव्हाणांनी कर्तबगारीने आपल मुख्यमंत्रीपद सिद्ध केल होतं. पुढे यशवंतरावांवर नेहरूंचा एवढा विश्वास वाढला की त्यांनी चीनच्या युद्धातील संकटानंतर अनेक मोठ्या नेत्यांना बाजूला सारून यशवंतरावांना संरक्षण मंत्री पद सांभाळण्यासाठी दिल्लीला बोलवले. 


हा किस्सा जेष्ठ पत्रकार नीलकण्ठ खाडिलकर यांनी आपल्या टॉवर्स या पुस्तकात लिहून ठेवलेला आहे.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[26/11, 08:09] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#14


लंडन येथील हॅरो स्कूलमध्ये प्रवेश घ्यायला पंधरा वर्षे वयाच्या  जवाहरलालांसोबत प्रत्यक्ष मोतीलालजी आणि स्वरूपराणी त्यांच्या विजयालक्ष्मी या धाकट्या कन्येसह इंग्लंडला आले. 

तो काळ इंग्लंडच्या निवडणुकांचा होता आणि त्या निवडणुकीत लिबरल पक्षाचे कॅम्पबल बरनान सरकार मोठ्या बहुमतानिशी पार्लमेंटमध्ये निवडून आले होते. वर्गातल्या अध्यापकांनी इंग्लंडच्या तत्कालीन राजकीय स्थितीविषयी विचारलेल्या प्रश्नाला नेहरूंखेरीज दुसऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उत्तर देता आले नाही. नेहरूंच्या उत्तरात इंग्लंडचे राजकीय विश्लेषण होते, लिबरल पक्षाच्या विजयाची कारणे होती आणि कॅम्पबेल यांच्या मंत्रिमंडळातील सर्व सभासदांची नावेही त्यांच्या अनुक्रमानिशी होती. त्यांच्या उत्तराने शिक्षक थक्क झाले होते आणि वर्ग थिजून गेला होता. 

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[27/11, 07:48] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#15


हॅरोचे विद्यालय इंग्लंडच्या इतिहासात मान्यता पावलेले होते. त्या शाळेने चार पंतप्रधान इंग्लंडला दिले होते. पिल, पामर्स्टन, बाल्डविन आणि विन्स्टन चर्चिल. त्यापुढे पाचव्या पंतप्रधानाचा समावेश व्हायचा होता. ते पंतप्रधान होते भारताचे पं.जवाहरलाल नेहरू. (हॅरो विद्यालयाच्या 1952 मध्ये झालेल्या वार्षिकोत्सवात नेहरू व चर्चिल हे दोघेही पंतप्रधानपदावर असताना एकमेकांजवळ उभे राहून त्या शाळेची गाणी म्हणत असल्याचे छायाचित्र आजही त्या शाळेत लागले आहे.) या शाळेत असतानाच कुठलीशी स्पर्धा जिंकल्याने नेहरूंना जी.एम. ट्रॅव्हेलीनने लिहिलेल्या गॅरिबाल्डीच्या चरित्राचा एक खंड बक्षीस म्हणून मिळाला. नेहरू गॅरिबाल्डीच्या चरित्राच्या, त्याच्या पराक्रमाच्या व त्याच्या चारित्र्याच्या प्रेमात एवढे पडले की, त्यांनी त्या चरित्राचे इतरही दोन खंड परिश्रमपूर्वक मिळविले. त्यांची त्यांनी अनेक पारायणे केली.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[28/11, 14:07] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#16


रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र हे विषय घेऊन केंब्रिजमधून आपली विद्यार्थिदशा सुरू करणाऱ्या नेहरूंना अर्थशास्त्र व तत्त्वज्ञानाचेही आकर्षण होते. तो काळ विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य, कला या संशोधनाच्या क्षेत्रातही फार मोठे बदल घडविणारा होता. नेहरूंचे चौकस मन आणि ज्ञानाची तृष्णा त्यांना त्याही गोष्टींकडे वळवीतच होती. सर जे.जे. थॉमस यांचा गॅसमधून वीज प्रवाहित करण्याचा युगप्रवर्तक शोध नुकताच पुढे आला होता. बर्गसनच्या तत्त्वचिंतनाने इंग्लंड भारावले होते. एच.जी. वेल्स आणि बर्नार्ड शॉ यांच्या वाङ्‌मयाने इंग्लंडसह साऱ्या जगाचे लक्ष वेधले होते. आइन्स्टाईनचे संशोधन जगात एका नव्या क्रांतीला जन्म देत होते. थॉमस हार्डीचे लिखाण साऱ्यांना रिझवीत आणि दिपवीत होते. याच काळात स्पेनचे पाब्लो पिकासो त्यांच्या नव्या चित्रसृष्टीने जगाच्या सांस्कृतिक विश्वात खळबळ माजवीत होता. त्या साऱ्यांसोबत फ्रॉईडने सांगितलेले माणसाच्या मूलभूत प्रेरणांधील लैंगिकतेचे माहात्म्य एक नवा कोलाहल उभा करीत होते. मात्र याही वातावरणात नेहरूंचे कवितेविषयीचे प्रेम जागे होते. राजकारण आणि भारतातील घडामोडी यावरचे लक्ष कायम होते. वयाच्या मागणीप्रमाणे त्यांच्यात स्त्रीविषयक आवडही होती. पण त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर, ती कमालीची ‘अनुत्साही’ होती. त्याविषयीच्या त्यांच्या मनातील मर्यादा धार्मिक नव्हत्या आणि लैंगिकता म्हणजे पाप हेही त्यांना मान्य नव्हते. तरीही ते त्याविषयी पुरेसे नीरस मात्र होते.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंबद्दल अशीच रोचक माहिती नियमित वाचायची असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[29/11, 08:08] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#17


१९४४ साली टोकियो विद्यापीठात विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोस म्हणाले- ‘भारताला नाझीवाद आणि साम्यवाद यांच्यामधल्या विचारधारेची गरज आहे.’ या विधानाने नेहरू आणि बोस यांच्यातले संबंध अजून दुरावले. बोस हिटलरच्या नाझीवाद आणि मुसोलिनीचा फासीवाद यातून प्रभावित होते, पण पंडित नेहरू या दोन्ही विध्वंसक विचारांचा परिणाम ओळखून होते. त्यांना हिटलर-मुसोलिनीची तीव्र चीड होती. त्यांनी स्पष्ट म्हटले होते की, फासीवाद आणि साम्यवाद यांच्यात कुठलाच मध्यममार्ग शक्य नाही आणि नाझीवाद-फासीवाद ही भांडवलशाहीची अपरिष्कृत व क्रूरतम रूपं आहेत.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[30/11, 08:26] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#18


पंडित नेहरू आपल्या या महान सहकार्‍याला बोस यांना अभिवादन करताना लिहितात, “भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी जीवन अर्पण केले. त्यासाठी त्यांनी एका बहाद्दर सैनिकाप्रमाणे सर्व अडचणींचा वीरतेने सामना केला. त्यांचं देश व स्वातंत्र्य यावर निस्सीम प्रेम होतं. मी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या काही धोरणांशी सहमत नसलो तरी त्यांनी जे काही बरोबर-चुकीचं केलं, ते सर्व देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलं. ते आपल्यातून निघून गेले, त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक बनवलं, त्यांच्या प्रमाणिकतेवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. त्यांनी आयुष्यभर भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पद्धतीने लढा दिला.” आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर जेव्हा लाल किल्ल्यात खटला चालवला गेला, तेव्हा त्यांच्या बचावासाठी उभ्या असलेल्या चार वकिलांपैकी एक जवाहरलाल नेहरूदेखील होते.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास खालील लिंक ला भेट द्या. 

https://bit.ly/3klKsUj

[04/12, 08:25] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#19


आल्फ्रेड पार्क मध्ये ब्रिटीश पोलिसांनी घेरले असतांना चंद्रशेखर आझाद हे पिस्तुलाने शर्थीचा प्रतिकार करत होते. असहाय्यता लक्षात घेऊन त्यांनी ब्रिटीशांना शरण न जाता स्वतःवर गोळी झाडून घेत या महान क्रांतीकारकाने आपले आयुष्य संपवले.


त्यांच्या खिशात त्यावेळी ३००० रुपयांचा हिशोब लिहिलेली डायरी आणि उर्वरित ४७२ रु रोख सापडले. ते पैसे नेहरूंनी दिलेले होते.


नेहरूंनी कॉंग्रेस अंतर्गत ‘नवजवान सभा’ स्थापन केलेली होती. त्या माध्यमातून पंडित नेहरू भारतीय क्रांतिकारकांच्या संपर्कात राहत होते.


गणेश शंकर विद्यार्थी या पत्रकाराच्या माध्यमातून ते क्रांतीकारकांना अर्थ पुरवठा, त्यांच्या पश्चात कुटुंबियांना नेहरू मदत देत असत. आझाद हुतात्मा झाल्यावर, पोस्ट मार्टम केलेली त्यांची बॉडी क्लेम करायला दुसरे कोणी तिथे धजावले नव्हते. 

बॉडी ताब्यात घेणार्या या नेहरूंच्या पत्नी कमला नेहरू होत्या. चंदनाची लाकडे आणून चंद्रशेखर आझादांवर सन्मानाने अंत्यसंस्कार केला गेला. तो दिवस २७ फेब्रुवारी १९३१ चा होता. त्या वेळी सोन १८ रु तोळा होते आणि स्वतःला स्वयंघोषित क्रांतीकारक समजणारे सावरकर ब्रिटिशांकडून महिना ६० रु पेंशन घेत मुंबईतील आपल्या शिवाजी पार्कच्या घरात पहुडलेले होते.


चंद्रशेखर आझाद यांना नेहरूंनी एक पत्रही लिहिले होते. त्यात मॉस्कोला जावून कम्युनिस्ट विचारसरणीचा अभ्यास करण्याविषयी सुचवत संपूर्ण खर्च उचलण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्यक्ष जमिनीवर लढणार्या जहाल क्रांतिकारकांच्या पाठीशी जवाहरलाल नेहरू नेहमीच होते.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

https://bit.ly/3klKsUj

[05/12, 07:12] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

#20


याच काळात त्यांच्या शेल्फवर ऑडेन, मॅन्सफिल्ड, वॉल्टर मरे, स्पेन्सर, इलियट आणि यिट्‌स यांची पुस्तके आली. पुढे ती आनंद भवनातही त्यांच्यासोबत गेली. या साऱ्यांसोबत ते असत. त्यांचे मन त्यात असे. मात्र त्यांचा आत्माच त्यातून मुक्त असे. हा सारा आपल्याभोवतीच्या एका सांस्कृतिक नेपथ्याचा भाग आहे, असे त्यांना वाटे. तरीही त्यातल्या अनेक कवींच्या कविता त्यांना तोंडपाठ होत्या. त्या ते स्वत:शी गुणगुणतही. याच काळात त्यांना त्यांचे अनेक भावी मित्र व सहकारी मिळाले. जे.एम. सेनगुप्ता त्यांच्याहून वडील होते. केंब्रिजनंतर ते बंगालमध्ये गेले आणि त्यांनी त्या प्रांतात स्वत:चे नेतृत्वच उभे केले. सय्यद अहमद हे बिहारमधून आलेले स्नेही पुढे त्यांच्या मंत्रिमंडळाचे सभासदही झाले. सैफुद्दीन किचलू हे मात्र स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नेहरूंपासून दूर झाले आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते बनले. त्यांचे तेव्हाचे व नंतरही आयुष्यभर राहिलेले मित्र होते श्रीप्रकाश. त्यांच्यामते, नेहरू तेव्हा होते तसेच ते अखेरपर्यंत राहिलेही. पुढे सरहद्द गांधी म्हणून ख्यातकीर्त झालेल्या बादशहा खानांचे बंधू डॉ.खानसाहेब हेही या काळात नेहरूंचे जिव्हाळ्याचे मित्र झाले. त्या दोघांतले मैत्रही अखेरपर्यंत कायम राहिले...


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

https://bit.ly/3klKsUj[11/03, 09:29] +91 90221 21242: नेहरू समजून घेताना...

        

#23

दंगलखोरांशी लढण्यासाठी पिस्तूल उगारली

हा 1947 चा प्रसंग आहे. फाळणीनंतर सीमेच्या दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. लाहोर असो वा इतर कुठलंही शहर, सगळीकडे हत्या आणि लूटमार सुरू होती. जवाहरलाल नेहरू यांना अचानक माहिती मिळाली की, दिल्लीच्या कनॉट प्लेसमध्ये मुस्लिमांची दुकानं लुटण्यात येत आहेत.

नेहरू तिथं पोहोचले तेव्हा हिंदू आणि शीख दंगेखोर मुस्लिमांच्या दुकानांमधून महिलांचे हॅंडबॅग्स, कॉस्मेटिक्स आणि मफलर घेऊन पळत होते. पोलीस फक्त बघ्याच्या भूमिकेत होते.

दंगलीदरम्यान नेहरूंनी रिव्हॉल्व्हरचा आधार घेतला होता.

नेहरूंना प्रचंड राग आला आणि त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या एका सुस्त पोलिसाची लाठी हिसकावली आणि दंगेखोरांना तिथून पिटाळून लावलं. हे इथंच संपत नाही.

माजी IPS अधिकारी आणि अनेक देशांमध्ये भारताचे राजदूत असलेले बदरूद्दीन तय्यब 'मेमॉयर्स ऑफ एन इगोइस्ट' या त्यांच्या आत्मकथेत नेहरूंविषयी एक किस्सा सांगतात.

"एका रात्री मी नेहरू यांच्या घरी पोहोचलो. त्यांना माहिती दिली की, शरणार्थी शिबिरात पोहोचण्याच्या प्रयत्नात असलेल्या जुन्या दिल्लीतील मुस्लीमांना मिंटो ब्रीजच्या जवळपास दंगेखोर घेरून मारत आहेत. हे ऐकताच नेहरू तडक तिथून उठले आणि वेगाने शिड्या चढत वरच्या खोलीत गेले."

थोड्यावेळानं ते खाली उतरले तेव्हा त्यांच्या हातात एक जुनी धुळीनं माखलेली रिव्हॉल्व्हर होती. खरंतर ही रिव्हॉल्व्हर त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांची होती, ज्यातून अनेक वर्षांपासून गोळी चालवण्यात आलेली नव्हती.

त्यांनी मला सांगितलं की, आपण खराब आणि जुने कपडे घालून रात्री मिंटो ब्रीजला जाऊ. आपण तिथून पळून जाणारे मुस्लीम आहोत, असं भासवू. जर कुणी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपण गोळी घालू.

डॉक्टर झाकीर हुसैन

मी नेहरू यांचं म्हणणं ऐकून हादरलो. अशा घटनांशी दोन हात करण्यासाठी इतरही चांगले पर्याय आहेत, हे जगातली दुसरी सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या देशाच्या पंतप्रधानांना समजावण्यात मला जोर लावावा लागला.

माउंटबॅटन यांना नेहमी ही भीती असायची की नेहरू यांचा हाच आवेश एखाद्या दिवशी त्यांच्या मृत्यूचं कारण ना ठरो. यासाठी त्यांनी नेहरूंवर लक्ष ठेवण्यासाठी काही सैनिक तैनात केले होते.


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

[13/03, 09:17] +91 95527 51400: *नेहरू समजून घेताना...*

🌺🌺🌺🌺🌺

#24

*सुरक्षा रक्षकांविना झाकीर हुसैन यांना वाचवायला निघाले*


स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवसांआधीची ही घटना. नेहरू यांचे सहकारी मोहम्मद युनूस यांना जामिया मिलिया इस्लामियाचे मुख्याध्यापक डॉ. झाकीर हुसैन यांचा रात्री अकरा वाजता फोन आला. ते फार घाबरलेले होते.

युनूस तेव्हा नेहरूंच्या घरीच थांबले होते. झाकीर हुसैन यांनी सांगितलं की कॉलेजबाहेर दंगेखोरांची मोठी गर्दी झाली आहे आणि त्यांचा हेतू काही चांगला दिसत नाही.

मोहम्मद यूनूस त्यांच्या 'परसन्स, पॅशन्स अँड पॉलिटीक्स' या पुस्तकात लिहितात - "फोन होताच मी नेहरूंकडे धावत गेलो. त्यावेळीही ते त्यांच्या कार्यालयात काम करत होते. मी त्यांना फोनवर मिळालेली माहिती सांगितली."

त्यांनी तात्काळ गाडी मागवली आणि मला त्यात बसायला सांगितलं. कारमध्ये त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक नव्हता. आम्ही जामियाला पोहोचलो आणि बघितलं की घाबरलेले विद्यार्थी आणि कर्मचारी कॉलेजमध्ये लपून बसले होते. त्यांना त्या हिंसक जमावानं घेरलं होतं.

नेहरूंसमवेत बी.के.नेहरू आणि पत्नी कोरी नेहरू

जसे नेहरू तिथं पोहोचले, जमावानं त्यांना ओळखलं आणि त्यांच्या बाजूला गोळा झाले. नेहरू यांनी वेळ न दवडता जमावाच्या वागणुकीवर आक्षेप घेत ओरडायला सुरुवात केली.

काही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले.

जामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूंनी झाकीर साहेबांना धैर्य दिलं. दरम्यानच्या काळात नवनियुक्त व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविना एका नाराज जमावाला सामोरे गेले.

त्यांनी तत्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षा रक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिलं. जेव्हा शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तिथं पोहोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घातलेलं दृष्य त्यांनी बघितलं.

पण ते काही कारवाई सुरू करतील त्याआधीच त्यांना घोषणा ऐकू आल्या - "जवाहरलाल नेहरू जिंदाबाद!"

पुढे जाऊन झाकीर हुसैन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[14/03, 08:29] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*


#25 


पं. नेहरूंचे विरोधक अनेक प्रकारचे आहेत आणि होतेही. नेहरू एका बाबतीत सुदैवी होते की त्यांच्या हयातीत त्यांना चांगले टीकाकार भेटले. राम मनोहर लोहिया एकदा म्हणाले की, नेहरू एवढे चांगले साहित्यिक वा लेखक आहेत की खरेतर त्यांनी अजून लेखन करायला हवे होते. पण त्यासाठी त्यांना पुन्हा तुरूंगात टाकावं लागेल म्हणजे भारतीयांना अधिक चांगलं साहित्य वाचायला मिळेल ! यात नेहरूंच्या साहित्यशैलीचे कौतुकही आहे आणि राजकीय उद्देशही होता !

नेहरू राजकारणी नसते तर ते नक्कीच इंग्रजी भाषेत लिहिणारे जगप्रसिद्ध असे लेखक झाले असते, असे मत प्रख्यात साहित्यिक रस्किन बॉंड आणि मुल्कराज आनंद यांनी व्यक्त केले होते. 

- राज कुलकर्णी (हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.)

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

[15/03, 08:29] +91 90221 21242: नेहरू समजून घेताना...

        

#26

मध्यंतरी एकदा ‘कोटेशन्स’ चे पुस्तक वाचत होतो. त्यात अनेक प्राचीन भारतीय आणि ग्रीक, युरोपियन विचारवंतांचे विचार अभ्यासायला मिळाले. आधुनिक कालखंडातील अनेक साहित्यिक, लेखक विचारवंताचे आणि काही राजकीय नेत्यांचे विचार त्यात नमूद केले होते. भारतातील अनेक विचारवंत, तत्वचिंतक यांचेही विचारधन त्यात होते. मात्र राजकीय व्यक्ती असूनही ज्यांच्या विचारांचा समावेश केला होता , अशात भारतीय म्हटले तर दोनच नेते पाहायला मिळाले, ते म्हणजे गांधी आणि दुसरे नेहरू!

भारतातील इतर नेत्यांचे ‘कोटेशन्स’ तेवढ्या प्रमाणात इंग्रजी भाषेत आढळून येत नाही, याचं कारण कदाचित इतर नेत्यांचे इंग्रजी भाषेत लेखन नसेल, किंवा असलेच तर ते जागतिक स्तरावर पोचलं नसेल किंवा ते मोजकं लेखन असेल. जागतिक स्तरावर वितरण असणाऱ्या प्रकाशकाकडून पुस्तक प्रकाशित होणे, याचाही फरक पडतो. नेहरूंची सर्वच पुस्तके आंतरराष्ट्रीय प्रकाशकांनी प्रकाशित केली. याचा अर्थ असाही की त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनापूर्वीच त्यांची ओळख आंतरराष्ट्रीय पातळीवर नेता अशी झाली होती. 

- राज कुलकर्णी (हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.)



_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

[16/03, 08:46] +91 90221 21242: नेहरू समजून घेताना...

 🌺🌺🌺

#27

१९वे शतक हे जगभर पसरलेल्या साम्राज्यशाहीच्या विस्ताराचे शतक होते. मात्र याच शतकाच्या उत्तरार्धात विविध वसाहतीत स्वातंत्र्य आंदोलनास सुरुवात झाली. याच कालखंडात आणि २०व्या शतकाच्या सुरुवातीला जगाच्या पाठीवर अनेक देशात त्यात त्या देशातील जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, प्रचंड लोकप्रियता लाभलेले अनेक नेते तयार झाले. म्यानमारमध्ये ऑंग सान, चीनमध्ये चैंग कै शेक, श्रीलंकेत बंदरनायके अगदी त्याच प्रमाणे अरब देशात, काही आफ्रिकन देशातही नेल्सन मंडेला वगैरे अनेक नेते निर्माण झाले ज्यांनी चळवळीत, आंदोलनातही भाग घेतला, कारावासही भोगला, लोकप्रियताही मिळवली, यशस्वी राजकारणही केले आणि तत्वचिंतनपर लेखनही केले. पण हे सर्व नेते सर्व पातळ्यांवर काम करू शकले नाहीत. काही लेखक होते पण चळवळीत नव्हते, कोणी तत्वचिंतनपर लेखन केले पण ते लोकप्रिय व यशस्वी राजकारणी होऊ शकले नाहीत.परंतु जवाहरलाल नेहरूंनी मात्र यशस्वी राजकारणासोबतच लेखन केले आणि त्यांचे संशोधनात्मक न राहता त्यास साहित्यिक मूल्य लाभले आणि त्यातून त्यांची ओळख एक साहित्यिक राजकारणी अशी निर्माण झाली. 

- राज कुलकर्णी (हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.*

[17/03, 06:25] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

 ❤️❤️

#28

*'नेहरू कधीच रडत नाही!'*


नेहरू यांचे भाचे आणि अमेरिकेत माजी राजदूत बी. के. नेहरू यांनी 1935मध्ये फोरी या हंगेरियन युवतीशी लग्न केलं.

लग्नाआधी तिची आपल्या कुटुंबासोबत भेट घडवून आणण्यासाठी आनंद भवन इथं घेऊन गेले. खादी घालणाऱ्या संपूर्ण कुटुंबाला भेटून तिला फार आनंद झाला.

पण नेहरू त्या वेळेस कलकत्त्याच्या अलीपूर जेलमध्ये कैदे होते. बी. के. नेहरू यांनी ती भेट साधवण्यासाठी आपल्या भावी पत्नीला कलकत्त्याला नेलं.

फोरी यांनी जेव्हा नेहरू यांना बघितलं तेव्हा त्यांना विश्वासच बसला नाही की, ही अगदी सभ्य, स्नेही आणि इंग्रजांसारखी दिसणारी व्यक्ती एखादा कायदा तोडू शकते.

जेव्हा नेहरूंचा निरोप घेण्याची वेळ आली तेव्हा फोरी आपले अश्रू थांबवू शकल्या नाही. नेहरूंना त्यांच्या कुटुंबाला महिन्यातून फक्त एकदाच पत्र लिहिण्याची परवानगी होती.

बी.के. नेहरू यांचे आत्मचरित्र नाइस गाइज फिनिश सेकेंडचे मुखपृष्ठ बी. के. नेहरू त्यांच्या 'नाइस गाईज फिनीश सेकंड' या आत्मकथनात लिहितात - "पुढच्या महिन्यात नेहरू यांनी लिहिलेली पत्रं जेव्हा आनंद भवनात आली, तेव्हा त्यात एक पत्र फोरी हिच्यासाठीही लिहिलेलं होतं."

त्यात त्यांनी लिहिलं होतं, तू आता नेहरू कुटुंबाची सदस्य होणार आहेस, म्हणून तुला नेहरू कुटुंबातले काही नियम-कायदेही शिकावे लागतील.

मी बघितलं, जेव्हा तू मला भेटल्यानंतर निरोप घेताना तुझ्या डोळ्यात अश्रू होते. एक खूणगाठ मनाशी बांधून ठेव - 'कितीही मोठं दुःख असू दे, नेहरू कधी रडत नाहीत!'

त्या पाकिटात एक पत्र इंदिरा गांधी यांच्यासाठीही होतं. त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली, असं लिहिलं होतं.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

नेहरूंच्या विषयी रोचक माहिती वाचण्यासाठी आपल्याजवळ असायलाच हवे असे 'जवाहर' हे पुस्तक आजच बुक करा. 

*9637351400* या क्रमांकाला संपर्क करा.

[19/03, 02:23] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

        

#29

'प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल?'

एप्रिल 1949 मध्ये म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले. तो रविवार होता. त्यावेळी वाय. डी. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले.

म्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले, तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्च्यूममध्येच जलतरण तलावाकडेच निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते.

पंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असं ते म्हणाले. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले.

नेहरू एका निवांतक्षणी

हा प्रसंग गुंडेविया यांनी 'आऊटसाईड द आरकाईव्ह्स' मध्ये मांडला आहे - नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, "कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत?"

त्यावेळी मी शॉर्ट्स, बुशशर्ट आणि चपलांमध्ये होतो, आणि माझ्या काखेत टॉवेल होता. "मी पोहण्यासाठी निघालो आहे," असं प्रांजळपणे सांगितलं.

आणखी एका तासात त्यांचं विमानतळावर आगमन होईल हे त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मी तयार झालो नाही.

त्यावर ते ओरडून म्हणाले, "प्रोटोकॉल, कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला."

पोहण्याच्या वेशात आणि चपलांमध्ये असल्याने मी नेहरूंना विचारलं "अशा अवतारात येऊ?"

ते 'हो' म्हणाले.

त्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभर पायऱ्या उतरून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो. पोहण्याच्या कपड्यातच मी नेहरूंच्या बरोबर गाडीत बसलो. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचलो तेव्हा माझा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले.

म्यानमारचे पंतप्रधान यू नू यांचं आगमन झालं. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने मी घरी गेलो.

पण ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात मी होतो. बरोबर अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता.

दुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर एक पार्सल होतं, ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि टॉवेल काळजीपूर्वक पॅक केलेलं होतं.


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link  https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[19/03, 02:23] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

💐💐💐💐       

#30

नेहरू आणि एडविना यांचे ऋणानुबंध

नेहरू यांना एडविना माउंटबॅटन आवडायची, त्यांचं तिच्यावर प्रेम असल्याचं काहीजण खाजगीत सांगतात.

1949 मध्ये नेहरू पहिल्यांदा कॉमनवेल्थ परिषदेत सहभागी होण्यासाठी लंडनला गेले होते. त्यावेळी खुशवंत सिंग भारतीय दूतावासात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहत होते.

खुशवंत आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले तेव्हा टेबलवर भारताचे राजदूत कृष्णा मेनन यांचा एक निरोप आला. "मला ताबडतोब भेटा," असं त्यात लिहिलं होतं.

नेहरू आणि एडविना माउंटबॅटन

खुशवंत सिंग यांनी 'ट्रूथ, लव अँड लिटिल मॅलिस' या आपल्या पुस्तकात हा किस्सा कथन केला आहे - भेटायला जाण्याआधी नेहरूंबाबत वर्तमानपत्रांमध्ये काही वावगं छापून आलेलं नाही ना, हे पाहू लागलो.

'डेली हेराल्ड' या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर नेहरू आणि लेडी माउंटबॅटन यांचं छायाचित्र छापलं होतं. नाईटीमध्ये असलेल्या माउंटबॅटन नेहरूंसाठी आपल्या घराचा दरवाजा उघडत असल्याचा तो फोटो होता. या फोटोखाली वाक्य होतं- 'लेडी माउंटबॅटन्स मिडनाईट व्हिजिटर', अर्थात लेडी माउंटबॅटन यांचा मध्यरात्रीचा पाहुणा.

संबंधित बातमीत असंही म्हटलं होतं की लेडी माउंटबॅटन त्या वेळी लंडन शहरात नव्हत्या.

या फोटोचा संदर्भ लक्षात घेऊन मी मेमन यांच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथं जाताच ते माझ्यावर ओरडले, "तुम्ही आजचा हेराल्डचा अंक पाहिलात का? पंतप्रधान तुमच्यावर अतिशय नाराज आहेत."

"या बातमीशी माझं काही देणंघेणं नाही," मी स्पष्ट केलं. "पंतप्रधान विमानतळावर उतरल्यानंतर थेट माउंटबॅटन यांच्या घरी जातील, याची मला काय कल्पना?"

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[22/03, 17:03] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

        

#31

*एडविना यांना ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानी*


खुशवंत सिंह पुढे लिहितात - मी दोन दिवस नेहरूंच्या समोर फिरकलोच नाही. त्यानंतर परिषदेच्या कार्यक्रमांमध्ये ते इतके व्यस्त झाले की हेरॉल्डमधल्या छायाचित्राचं प्रकरण ते विसरूनही गेले.

भारतात परतण्यापूर्वी नेहरूंनी लेडी माउंटबॅटन यांना सोहोमधल्या एका ग्रीक रेस्टॉरंटमध्ये मेजवानीचं आमंत्रण दिलं. रेस्टॉरंटच्या मालकाने त्यांना ओळखलं. आपल्या हॉटेलमध्ये नेहरू आले आहेत, याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी प्रसारमाध्यमांना बोलावलं.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रांमध्ये नेहरू आणि लेडी माउंटबॅटन एकत्र भोजन करत असल्याचं छायाचित्र प्रसिद्ध झालं.

नेहरू आणि एडविना माउंटबॅटन.

फोटो पाहताक्षणी हे प्रकरण आपल्याला शेकणार हे माझ्या लक्षात आलं. मी ऑफिसमध्ये पोहोचलो तेव्हा टेबलवर पुन्हा एकदा मेमन यांचा निरोप होता. यावेळीही तोच निरोप होता- "पंतप्रधान तुम्हाला ताबडतोब भेटू इच्छितात."

मी त्यांना भेटायला क्लैरिजेस हॉटेलमध्ये पोहोचलो. त्यांचे सचिव मथाई यांना भेटलो. त्यांनी नेहरूंच्या खोलीत जायला सांगितलं. मी आत प्रवेश करण्यापूर्वी दरवाज्यावर टकटक केली.

"कोण?" त्यांनी आतून विचारलं.

"तुम्ही मला बोलावलं आहे."

"कोण आपण?"

"लंडनमधला तुमचा जनसंपर्क अधिकारी आहे."

त्यांनी आत बोलावलं. मला आपादमस्तक पाहिल्यानंतर ते म्हणाले, "तुमच्या जनसंपर्काची पद्धत अजबच आहे."

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[24/03, 02:56] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

        

#32

नेहरू आदर्श संसदपटू होते. लोकशाहीशी निगडित प्रथा-परंपरांचं पालन करण्यात यावं याबद्दल ते अतिशय दक्ष असत. विरोधी पक्षातील एखाद्या सभासदाने चांगलं भाषण केलं तर नेहरू त्याचं मोठय़ा मनाने अभिनंदन करीत असत. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळणकर यांच्याविरुद्ध विरोधी पक्षाच्या सभासदांनी जेव्हा अविश्वासाचा ठराव मांडला तेव्हा नेहरू विलक्षण अस्वस्थ झाले होते. त्या अस्वस्थतेचं कारण होतं- ठरावातील अस्पष्ट आणि संदिग्ध आरोप. ठरावावरील चर्चेला उत्तर देताना नेहरूंनी मावळणकरांचं समर्थन करण्यात फार वेळ न घालवता खासदारांनी लोकशाही परंपरा कशा पाळाव्यात, अविश्वासाचा ठराव केव्हा मांडावा, स्पष्ट आणि नेमके आरोप कसे करावेत या गोष्टींवर अधिक भर दिला होता. लोकशाहीचे संकेत काटेकोरपणे पाळले जावेत आणि योग्य तेच पायंडे पाडले जावेत असं नेहरूंना तीव्रतेनं वाटे. त्यांनी त्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[25/03, 08:51] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

        

#33

*वायफळ खर्चाला विरोध*

नेहरूंना वायफळ खर्च अजिबात आवडायचा नाही. ते बाहेर जायला गाडीने निघायचे. त्यावेळी एखादा नळ उघडा दिसला तर गाडी थांबवून ड्रायव्हरला नळ बंद करण्यासाठी धाडायचे.

रुस्तमजी यांनी आपल्या पुस्तकात याविषयी विस्ताराने लिहिलं आहे - सौदी अरेबियाची राजधानी रियाधमध्ये नेहरूंच्या राहण्याची व्यवस्था एका खास महालात करण्यात आली होती. या महालातून निघताना ते स्वत: दिवे बंद करायचे.

नेहरू कन्या इंदिरा गांधी यांच्यासमवेत

याच दौऱ्याविषयी मोहम्मद युनूस लिहितात - नेहरूंना झोपताना काही वाचायला हवं होतं. म्हणून त्यासाठी एक टेबल लॅम्पची मागणी त्यांनी केली.

खोलीत वाचनासाठी प्रकाश कमी आहे, हे त्यांच्या मदतनीसाला समजलं. म्हणून त्याने अधिक प्रकाश पुरवणारा लॅम्प त्यांना आणून दिला.

त्या लॅम्पचा प्रखर प्रकाश कमी करण्यासाठी मला एका टॉवेलनं झाकावं लागलं. त्यानंतरही प्रखरतेमुळे टॉवेल जळू लागला.


_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[26/03, 13:13] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🍂🍂🍂🍂

#34

तिबेट, चीन आणि काश्मीरबद्दलच्या नेहरूंच्या धोरणांबद्दल सतत टीका केली जाते. परंतु त्याबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्याची तसदी मात्र त्यांचे टीकाकार कधीच घेत नाहीत. तिबेटला संरक्षण देण्याबाबत भारताने त्याकाळी प्रयत्न केले होते, परंतु इतर राष्ट्रांचा पाठिंबा भारताला मिळू शकला नव्हता. वेगवेगळ्या कारणांनी ब्रिटन आणि अमेरिका या प्रश्नात गुंतू इच्छित नव्हते. चीनला रशियाचा पूर्ण पाठिंबा होता. तिबेटच्या संरक्षणासाठी भारतीय फौजा पाठवता येतील काय याबद्दलही तपशिलाने विचार झाला होता; परंतु त्यावेळचे सरसेनापती जनरल करिअप्पा यांनी ते शक्य नसल्याचं नेहरूंना स्पष्टपणे सांगितलं होतं. अशा परिस्थितीत भारताला तिबेटबाबत काही करता येणं शक्य नव्हतं.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[27/03, 15:57] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

💧💧💧💧

#35

नेहरूंनी भारताचा स्वतंत्रलढा आणि त्यानंतरच्या कालखंडात त्यांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोठे योगदान दिले. आपल्या आयुष्यातील बराच मोठा कालखंड प्रत्यक्ष, सामाजिक सुधारणा आंदोलन, साम्राज्यशाहीच्या विरोधातील स्वातंत्र्य आंदोलनात आणि या दरम्यान तब्बल ९ वर्ष कारावासही भोगला. त्याचसोबत आपले राजकीय वैचारिक चिंतन मांडणारे अनेक ग्रंथ देखील लिहिले.

जवाहरलाल नेहरूंचा जन्म भारतात, मात्र पूर्ण शिक्षण युरोपात झाले होते. उच्चभ्रू वर्तुळात वावरत पाश्चात्य विचारांचा व आचारांचा प्रभाव असणाऱ्या नेहरूंचे भारतीय जनतेचा नायक बनणे तसे अवघडच होते. मोतीलाल नेहरूंनी त्यांची जडणघडणच तशी केली होती. श्रीमंती प्रचंड होती. नेहरूंना इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना जे पैसे पाठवले जायचे ते त्या काळाच्या मानाने खूप होते. पण नेहरूंनी या पैशाचा वापर खूप सुयोग्य पद्धतीने केला. त्यांनी विविध ग्रंथांची खरेदी केली. जगातील विविध भाषेतील पुस्तके त्यांनी विकत घेतली. प्रचंड वाचन केले आणि त्यातूनच त्यांच्यातील साहित्यिक घडला. 

- राज कुलकर्णी (हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.)

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[29/03, 05:27] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🌼🌼🌼🌼🌼

#36

चीनबाबत भारत सरकार आणि नेहरू बेसावध कधीच नव्हते. चीनचा कावा नेहरू ओळखू शकले नाहीत आणि ‘हिंदी-चिनी भाई भाई’ या मंत्राचा जप करत राहिले असं जे समजलं जातं त्याला वास्तवात काहीही आधार नाही. चीनने भारतावर केलेल्या हल्ल्याच्या दहा र्वष आधीच- म्हणजे १९५२ मध्ये गुप्तहेर खात्याला ‘Treat China as India’s potential enemy number one’ या शब्दांत नेहरूंनी सावध केलं होतं. नेहरू जरी जाहीररीत्या भारत आणि चीन यांच्यातील मित्रत्वाच्या संबंधांवर वारंवार भर देत असले तरी त्यांना चीनपासून भारताला असलेल्या संभाव्य धोक्याची पूर्ण कल्पना असल्याचे इतरही भरपूर पुरावे आहेत. पत्रकार मंकेकरांच्या ‘दि गिल्टी मेन ऑफ १९६२’ (The Guilty Men Of  1962) या पुस्तकातही चीनबाबत नेहरू गाफील नव्हते, या म्हणण्याला पुष्टी देणारे कित्येक परिच्छेद आहेत. १९५४ मधील चीनच्या दौऱ्यात नेहरूंनी त्यांच्यासोबत गेलेल्या भारतीय पत्रकारांपाशी (ज्यात मंकेकरही होते!) खाजगीत व्यक्त केलेले विचार त्यांनी नमूद केले आहेत. मंकेकर लिहितात : ‘During a stimulating discussion the prime minister observed that some day or other these two Asian giants are bound to come into conflict and that we should strive hard to avert.’ मंकेकर पुढे लिहितात :

‘that statement indicated Nehru’s acute awareness of the Chinese threat to India as early as 1954.’ (पृष्ठ ११०) लष्करीदृष्टय़ा चीनने भारतावर हल्ला केल्यास आपण त्याला तोंड देऊ शकणार नाही, असं भारताच्या सरसेनापतींनी नेहरूंना त्यावेळी सांगितलं होतं आणि त्याला अनुसरूनच नेहरूंनी आपलं धोरण आखलं होतं. दुर्दैवाने विरोधी पक्षांच्या सदस्यांना नेहरूंचं चीनबाबतचं धोरण कचखाऊ आणि त्यांच्या भोळेपणाचं व स्वप्नाळू वृत्तीचं द्योतक वाटलं आणि त्यांनी नेहरूंवर टीकेची झोड उठवली. या टीकेची धार बोथट करण्याकरता नेहरूंनी काहीसा आक्रमक पवित्रा स्वीकारला आणि त्यातूनच चीनला भारतीय हद्दीत घुसण्याकरता हवं असलेलं निमित्त मिळालं. नेहरूंनी चीनबाबत तत्कालीन परिस्थितीच्या संदर्भात योग्य तेच धोरण स्वीकारलं होतं असंच या विषयावरील अभ्यासकांचंही मत आहे.

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[30/03, 08:42] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

☘️☘️☘️☘️☘️

#37

हॅरोमध्ये शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीस ‘हॅरोवियन’ म्हणून प्रचंड मान इंग्लंडमध्ये दिला जातो. याचा नेहरूंना खूप फायदा झाला. बडे बडे ब्रिटिश अधिकारीही ‘हॅरोवियन’ म्हणून नेहरूंबद्दल एक वेगळाच मान आणि आदब राखून असत. यामुळे त्यांची प्रतिमा इंग्लंडमध्ये खूप आदराची बनली आणि त्यामुळे त्यांच्या लेखनास युरोपात खूप प्रसिद्धी मिळाली.

नेहरूंची एक आठवण नेहरूंबरोबर केम्ब्रिजमध्ये शिकलेल्या श्री. प्रकाश यांनी लिहिली आहे. ते नेहरूंना प्रथम एका भारतीय डॉक्टरच्या घरी भेटले तेव्हा, असे जाणवले हा एक केम्ब्रिजमध्ये शिकणारा हुशार तरुण असून श्रोत्यांवर प्रभाव टाकण्यासाठी अतिशय प्रभावी इंग्रजी भाषेत बोलतो आणि शेक्सपियरच्या हॅम्लेटप्रमाणे प्रश्नही विचारतो ! खरेतर प्रभावी संभाषण, शैलीदार लेखन ही त्यांची ओळख पुढे अनेक वर्षांनी १९३६ नंतर अधिकृतपणे तयार झाली. 

- राज कुलकर्णी (हे नेहरुवादाचे अभ्यासक आहेत.)

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

[31/03, 08:31] +91 90221 21242: *नेहरू समजून घेताना...*

🍃🍃🍃🍃🍃

#38

श्री. छागला (जे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि नंतर नेहरूंच्या मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री होते.) यांनी आपल्या उत्कृष्ट आत्मचरित्रात (‘Roses in December’) नेहरूंच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचं वर्णन पुढील शब्दांत केलं आहे : ‘Nehru never left his table till about one or two in the morning. Every file which was placed before him was disposed of and every letter that had to be replied to was dictated to the stenographer before lights were switched off. I wrote several letters to him and I always found that the reply was  dictated the day he received the letter. People do not realise that he was a first class administrator. He gave his full mind to the problem in hand, made his decisions and put it out of his mind and turned to another, which was also dealt with, with the same vigour and  precision.’

_ _ _ _ _ _ _ _ _ _ 

*याआधीच्या सर्व पोस्ट वाचायच्या असल्यास 'नेहरू समजून घेताना..' हे फेसबुक पेज नक्की like करा.* 

Link https://www.facebook.com/NehruSamjunGhetana

==============================

“नेहरू नावाचा हिमालय आणि खुजी आरएसएस!”

    - राजू परुळेकर


३० जानेवारी १९४८ ला नथुराम गोडसे या कट्टरवादी हिंदू राजकीय विचारसरणीच्या उजव्या प्रतिगामी अतिरेक्याने महात्मा गांधींना गोळ्या घातल्या. ज्यामध्ये तो महान राष्ट्रपिता देहाने मरण पावला. तेव्हाच देशाची सारी सुत्रं पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हातात आली. ज्यांच्याकडे जाऊन काही विचारावे, सल्ला घ्यावा इतरांसोबतच्या नातेसंबंधाबाबत चर्चा करावी असा माणूस नेहरुंसह उरला नाही. पंडित जवाहरलाल नेहरू हे तेव्हा देशातील सर्वोच्च आणि अतिशय मोठे नेते होते. केवळ इतकच नव्हे. तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव होता, दबदबा होता आणि त्यांच्याविषयी विलक्षण आकर्षण होतं. पंडित नेहरू जेव्हा गांधींनंतरच्या भारताचे एकमेव आणि निर्विवाद नेते झाले; तेव्हा भारताची राज्यघटना बनायची होती. भारतासमोरच्या असंख्यगुंतागुंतीच्या आणि अजस्त्र समस्या त्यांच्यासमोर आ वासून उभ्या होत्या. एकेकाळी पुरातन संस्कृती म्हणून समृद्ध असणारा देश हा विलक्षण दारिद्र्य आणि एक प्रकारे भुखेकंगाल होता. आधुनिक यंत्रयुगाशी भारताचा तसा अजूनही संपर्क यायचाच होता. भारतासमोरच्या ज्या समस्या होत्या ते ब्रिटिश भारतात यायच्या अगोदर परंपरेने, जातीव्यवस्थेने आणि संस्थानिकांमध्ये विभागल्या गेलेल्या भूभागामध्ये जे प्रश्न दडलेले होते त्याची गुंतागुंतीच्या स्वरूपामुळे त्या समस्या अजस्त्र बनल्या होत्या. दिडशे वर्षाच्या राजवटीत ब्रिटिशांनी त्या समस्यांमध्ये अधिक बिकट अशी भर घातली होती. काही भारतीय प्रतिगामी नेते आणि संस्थानिकांना हाताशी धरून हिंदू मुस्लिम तिढ्यासारखे बरेच प्रश्न ब्रिटिशांनी निर्माण करून ठेवले होते. भारत अनेक संस्थानांमध्ये विभागला गेलेला होता आणि या साऱ्या प्रश्नांची निश्चित अशी कोणतीही उत्तरे कुणाहीपाशी नव्हती. गांधीजी आता हयात नव्हते. नेहरूंचे सहकारी प्रतिभाशाली आणि बुद्धिमान होते. परंतु नेहरूंएवढी लोकप्रियता नेतृत्वाची उंची आणि गांधीजींचा विश्वास त्यांना प्राप्त झालेला नव्हता. अशा वेळेला सारी जबाबदारी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर येऊन पडली. खरं तर अशा वेळेला अनेक नवस्वतंत्र आफ्रिकन देशांप्रमाणे सर्व सत्ता हातात एकवटत खोटी स्वप्ने दाखवून मोठा हुकूमशहा होणं हे नेहरूंना सहज शक्य होतं. परंतु नेहरूंवर तीन गोष्टींचा खूप खोल प्रभाव होता. त्या गोष्टींमुळेच पुढे नेहरूंचं नेतृत्व आणि स्वातंत्रोत्तर काळात भारत उभा राहिला. यातली पहिली गोष्ट म्हणजे नेहरूंना प्राचिन भारतीय परंपरेचा आणि प्राचिन भारताच्या उद्गम आणि विकासाच अभिमान होता. त्याचं नेहरूंना आकर्षण होतं. त्यातले काळासोबत आलेले दोषही नेहरूंना माहिती होते. पण प्राचिन परंपरेच्या विलोभनियतेला नेहरू कधीच विसरू शकले नाहीत. याची खूण त्यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकात स्पष्टपणे दिसून येते. किंबहुना ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’मध्ये नेहरूंनी भारताच्या प्राचिन महानपणाचा जो लेखाजोखा मांडलेला आहे त्यातूनच हे लक्षात येतं की, मर्क्सवादाचा जगावर आणि नेहरूंवर किती प्रभाव पडला तरी नेहरू भारताला मार्क्सवादाच्या वाटेने जाऊ देणार नाहीत.


नेहरूंवर दुसरा प्रभाव जो पडला तो महात्मा गांधींच्या व्यक्तिमत्वाचा. महात्मा गांधी हे एक अत्यंत गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व होते. ते एक अत्यंत आधुनिक पण कर्मठ वैष्णव हिंदू होते. अर्थात त्यांचे काही बाबतीतले आग्रह  जरी अगदीच अवैज्ञानिक वाटत असले तरी त्यांनी आपल्या म्हणण्या व्यतिरिक्त काही वेगळं करण्याचं स्वातंत्र्य काँग्रेसमधल्या नेहरू किंवा बोस यांच्यासारख्या तरूण नेत्यांना बऱ्याचदा दिलेलं होतं. गांधीजींच्या सत्य, साध्य- साधन सुचिता, शुद्ध भारतीयत्व आणि साधेपणा याचा नेहरूंच्या आयुष्यावर निर्विवादपणे प्रभाव पडला.ज्याचं पालन त्यांनी पुढे आयुष्यभर केलं. दंभ आणि  ढोंग यांना नेहरूंच्या आयुष्यात जागा नव्हती. गांधीजींनी व्यापलेलं नेहरूंचं आयुष्य हे त्यांच्या जीवनात गांधी येण्याच्या आयुष्याहून वेगळं आणि खूपच भिन्न होतं. गांधींप्रतीच्या प्रेमाने आणि समर्पणाने नेहरूंनी ते आयुष्य स्वीकारलं आणि निभवलं. 


नेहरूंवर तिसरा महत्त्वाचा असलेला प्रभाव हा खूपच निर्णायक होता. तो प्रभाव होता विज्ञाननिष्ठतेचा. नेहरूंना बालवयाच विज्ञानाचं शिक्षण देण्यात आलं होतं आणि केंब्रिजमध्ये ते भौतिकशास्त्र शिकले होते. शास्त्रिय, वैज्ञानिक आणि भौतिकशास्त्रात ज्याला आधार मिळेल असं काहीतरी करण्याकडे आणि ते स्वीकारण्याकडे त्यांच्या मनाची रचना होती. पुढे मार्क्सवादाच्या उदयानंतर नेहरूंना मार्क्सवादाविषयी आकर्षण वाटलं. मानवी समाजाची रचना, उत्पत्ती आणि विकास यासंबधिचं मार्क्सवादाचं विवेचन इतकं तर्कशुद्ध आहे यामुळे नेहरू प्रभावित झाले. १९२७ साली नेहरू रशियात गेले होते. तेव्हा रशियामध्ये यंत्रयुग कुस बदलत होतं. रशियन राज्यक्रांतीनंतरच्या सुरुवातीच्या काळातील तो रशिया होता. ज्यामध्ये नेहरूंना आकर्षण वाटावं असा वैज्ञानिक दृष्टिकोन होता. राजकीय जीवनात धर्माला स्थान नव्हते. आणि औद्योगिक क्रांतीने देशाची झपाट्याने आर्थिक प्रगती करण्याची तत्कालीन सोव्हिएत रशियामध्ये प्रक्रिया सुरू होती. त्यावेळच्या रशियावर समतोल भाष्य करणारी लेखमालाही नेहरूंनी त्यावेळी लिहिली. पण एवढं असूनही नेहरू मार्क्सवादी झाले नाहीत. नेहरूंनी मार्क्सवादाचा सखोल अभ्यास केला. त्यातील विश्वातील रहस्यांची उकल करण्याची वैज्ञानिक पद्धती त्यांना मोहून टाकत होती परंतु नेहरूंच्या मनावर प्राचिन भारतीय परंपरांचा ज्यामध्ये अनेक धर्माची सरमिसळ झालेली आहे अशा प्रवाहांचा जो प्रभाव होता त्याने नेहरूंना मार्क्सवादी बनू दिलं नाही. ते शुद्ध भौतिकवादी विज्ञाननिष्ठ राहिले. यात गांधीजींच्या नेहरूंवर असलेल्या प्रभावाचाही मोठाच वाटा होता. १९३३ साली नेहरूंनी इंदिरा गांधींना एक पत्र लिहिलंय ज्यामध्ये त्यांना ‘मार्क्सवाद म्हणतो त्याप्रमाणे खरोखरच तर्काने साऱ्या मानवी आयुष्याची उकल करणं शक्य आहे का’, अशी शंका उत्पन्न केलेली आहे, आणि ती शंका नेहरूंच्या मनात इतकी बळकट होती की पुढे नेहरूंना मार्क्सवादामधल्या कित्येक गोष्टी पसंत असूनही त्यातल्या पोथीनिष्ठतेचा आणि साचेबद्धतेचा तिटकारा आला. इतिहासात भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावे, त्या भारतात यंत्रयुग यावे आणि अणूपासून ते रॉकेटपर्यंत, धरणांपासून ते  अजस्त्र कारखाण्यांपर्यंत जे जे आधुनिक वैज्ञानिक आहे ते भारताने करावे. हे नेहरूंच्या  वर उल्लेखलेल्या वैभवपेढी व्यक्तिमत्वातून उतरलेले आहे. 


संविधान भारतीय राज्यघटना निर्माण व्हावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली संविधान सभा निर्माण व्हावी आणि ज्यामध्ये भारतीय नागरिक हा सार्वभौम  आणि लोकशाही नागरिक असावा हे प्रत्यक्षात आलेलं स्वप्न नेहरूंचंच. निसःदिग्धपणे नेहरूंना याचे श्रेय आपल्याला द्यावं लागेल. एकिकडे भारत हा लोकशाही राष्ट्र बनत असताना त्याचवेळेला भारताच्या जडणघडणीत वैज्ञानिक दृष्टिकोन पेरण्याचं काम नेहरूंनी सुक्ष्मपणे केलं. एकिकडे आधुनिक विद्यापिठं, आण्विक प्रकल्प, भाक्रा नांगल आणि त्यासारखी धरणं, आंतरराष्ट्रीय विद्यापिठं, भारतीय आयुर्विज्ञान संस्था, बँकांची पायाभारणी, अवजड उद्योग प्रकल्प, एम्स सारखी आधुनिक वैज्ञानिक आरोग्य व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी भारतीय विद्यार्थ्यांच्या विचारांच्या आदानप्रदानाची व्यवस्था,….. नेहरूंच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या कामांची यादी जर द्यायची झाली तर हा लेख संपेल त्यामुळे अधिक लिहिता येत नाही. खरं तर तो पुस्तकाचाच विषय आहे.  


१९५२ साली पहिली निवडणूक झाली त्यावेळी  नेहरू हे इतके मोठे नेते होते, तेव्हा त्यांनी जर ठरवलं असतं. तर भारतात बहुपक्षीय लोकशाही येऊ शकली नसती. पुढची शंभर वर्षं त्यांनी ठरवून दिलेले लोक भारतावर राज्य करत राहिले असते. स्वतः नेहरूंनी एखाद्या रॉबर्ट बुगाबेप्रमाणे भारतावर राज्य केलं असतं आणि भारत हा २०१२-१३ मध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत होता, त्याऐवजी आफ्रिकेतल्या एखाद्या भूखेकंगाल देशाप्रमाणे एखाद्या क्रूर हुकूमशहाच्याटाचेखी रगडला गेला असता. भारतीय लोकशाहीचं जे स्वरूप आहे;म्हणजे त्यातली विज्ञाननिष्ठता, त्यातला कल्याणकारी राज्याचा गाभा, लोकशाही आणि प्रत्येक माणसाला असलेला मतदानाचा अधिकार, समता आणि समानता, हिंदू कोडबिलांसारखे क्रांतीकारक विचार हे दोन माणसांमुळे उभे राहिले, पंडित जवाहरलाल नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 


१९५२ च्या निवडणूकांनंतर उजव्या शक्तीचे लोक म्हणजे बरेचसे संस्थानिक काही भांडवलदार आणि काँग्रेसविरोधक पराभवगंडाने ग्रासले. ‘आपल्याला काँग्रेसचा मुळातून निकाल लावायचा असेल तर नेहरूंना बदनाम केलं पाहिजे’ हे त्यानंतरच्या भारतीय राजकारणाचं विरोधकांचं धोरण ठरून गेलं. यामध्ये एकेकाळी नेहरूंचे सहकारी असलेले समाजवादीसुद्धा गोडसेप्रेमी कट्टर हिंदूत्त्ववाद्यांशी हातमिळवणी करून नेहरूंची बदनामी करू  लागले. नेहरूंच्या हयातीत शांतीस्वरूप भटनागर असोत, होमी भाभा असोत, भारताबाहेर इजिप्तचे नासेर असोत, मार्शेल टिटो असोत, अमोरिकेचा आयसेन हॉवर, अल्बर्ट आईन्स्टाईन असोत, चार्लिचॅप्लिन असो, हेराल्ड लास्की असो जगभरातल्या या विचारवाद्यांमध्ये, राजकारण्यांमध्ये भारतातल्या विचारवाद्यांमध्ये सर्वांनाच नेहरूंबद्दल प्रेम होतं आणि नेहरूंनाही या सर्वांबद्दल प्रेम होतं. बुद्धिवैभवाची एवढीमोठी प्रभावळ नेहरूंनी निर्माण केलेली होती की नेहरूंच्या हयातीतच काय की त्यांच्या नंतरसुद्धा ती तोडणं विरोधकांनाअशक्य होतं. नेहरूंच्या मृत्यूनंतरही अगदी आजही त्यांचं नाव बदलणे,त्यांच्या आंदनभवनासमोरील त्यांचे पुतळे हटवणे किंवा त्यांच्याबद्दल फोटोशॉप अश्लील प्रचार करणे हे करूनही त्यांच्या महानतेला धक्का लावणं जमलेलं नाही आणि ते जमणारही नाही. 


नेहरूंना स्वप्नाळू असं म्हटलं जातं. परंतु पंतप्रधान झाल्यावर नेहरूंना वास्तवाचं भान आणि जाणिव पुरेशी होती. आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या मंचावर जरी ते अलिप्ततावादी गटाचे एक प्रमुख नेते होते तरी भारतामध्ये त्यांनी अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्थेचे स्वरूप दिले. कित्येकदा सोव्हिएत युनियनच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातले मोठे सरकारी उद्योग मोठे केले. ते करताना त्यांनी अस्सल भारतीय वैज्ञानिक निर्माण केले त्यांना उत्तेजन दिलं. केवळ विज्ञानाच्या क्षेत्रातच नव्हे तर साहित्य, कला आणि सिनेमा या क्षेत्रातही त्यांनी हेच धोरण ठेवले. डॉ. महालनोबिस हे नेहरूंच्या पंचवार्षिक योजना आणि योजना आयोगाच्या कल्पनेचे एक शिल्पकार होते. स्वतः महाल नोबिस हे स्टॅलिनवादी होते. त्यांच्या विद्वत्तेचा वापर करताना. नेहरूंनी भारताची अर्थव्यवस्था स्टॅलिनवादी होणार नाही याची काळजी घेतली. जगामध्ये पुढे नाव कमावणाऱ्या अनेक शासकीय कंपन्यांची (पब्लिक सेक्टर युनिट) आणि बँकांची नेहरूंनी पायाभरणी केली. ज्याची विक्री करून आज मोदी सरकार पैसे कमावत आहे. संपत्तीच्या निर्मितीचे ज्ञान नसल्यामुळे नेहरूंना नावे ठेवत नेहरूंनीच निर्माण केलेल्या कंपन्या विकून देशाच्या फाडून ठेवलेल्या झोळीमध्ये गंगाजळी आणण्याचे काम  आज जे सरकार करते आहे त्यांना नेहरूंच्या ऐतिहासिक भूमिकेचे आकलन तर सोडा पण साधी समज सुद्धा नाही. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेहरू आणि त्यांचे वडिल मोतीलाल नेहरू हे धनाढ्य व्यक्ती होते. नेहरूंनी पुढे मोतीलाल नेहरूंचा वकिलीतून निर्माण होणारे वर्षाचे उत्पन्न इतको जास्त होते की त्याकाळामध्ये आत्ता केंद्रसत्तेत असलेले सर्व मंत्रीमंडळांचे पूर्वजांना पोसण्याचे सामर्थ्य मोतीलाल नेहरूंमध्ये होते. अलाहाबादमधले आनंदभवन हे स्वकष्टाने मिळवलेले आलिशान निवासस्थान नेहरूंनी देशाला अर्पण केले (त्याच्या समोरचा नेहरूंचा पुतळा हलवण्याचे कार्य अताच्या सरकारने केलेले आहे.). नेहरू फकीर नव्हते किंवा त्यांनी पस्तिस वर्षांपर्यत भिक्षा मागून खाल्ली नाही तरीही नेहरू ब्रिटिश राज्यकाळात एकूण नऊ वेळा जेलमध्ये गेले आणि आपल्या आयुष्याचे ३२५९ दिवस त्यांनी जेलमध्ये घालवलेले आहेत.  ब्रिटिश सरकारविरूद्ध लढण्याची त्यांची उर्मी आणि त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर असलेले त्यांचे संबंध फार उच्च दर्जाचे होते. एक उदाहरण द्यायचं झालं तर सरदार वल्लभभाई पटेल आणि  पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये काहीबाबतीत निश्चित मतभेद होते. परंतु पटेल आणि नेहरू या दोघांनाही एकमेकांविषयी निरातिशय आदर होता. पटेलांना नेहरू अतीलोकशाहीवादी वाटत असत.


गांधी हत्येनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही एक अतिरेकी विचारांची संघटना आहे  या मताचे पटेल होते. बऱ्याच प्रमाणात लोकशाहीवादी असणाऱ्या नेहरूंनी तसे होऊ दिले नाही. सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरातमध्ये पहिला देखणा आणि मोठा पुतळा  खुद्द नेहरूंनीच उभा केलेला आहे. हा पुतळा गोध्रा येथे  आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हयात असताना नेहरूंनी तो पुतळा उभा केला होता. यासाबंधी भाषण करताना नेहरू बोलले होते की, “Sardar Patel is a valiant fighter in the cause of freedom… Having won freedom, he is now engaged in retaining it. He has changed the map of India”. आपल्या जवळच्या सहकाऱ्याबद्दल त्याचा पुतळा जीवंतपणे उभा करून वर उल्लेखिलेले गौरोवोद्गार काढलेल्या नेहरूंना पटेलांविषयी काय प्रतीचा आदर आणि प्रेम वाटत असेल हे पुढे त्याच गोध्र्यामध्ये शतकातले भयानक असे दंगे घडवून आणणाऱ्या अतिरेकी हिंदूत्त्ववाद्यांना कधीच कळलं नाही. पटेल आणि नेहरू यांच्यामध्ये कोणताही सत्तालोभ संघर्ष नव्हता. तर वेगवेगळ्या विचार पद्धतीने सत्याकडे जाण्याची आणि भारत घडवण्याची त्यांच्यात स्पर्धा होती. जे सुभाषबाबू आणि नेहरूंच्या बाबतीत सत्य आहे तेच वल्लभभाई पटेल आणि नेहरूंच्या बाबतीत सत्य आहे हे या घटनांवरून दिसून येते. २०१४ पासून आपल्या अशा किती सहकाऱ्यांना या प्रकारचे उद्गार काढून त्यांचे पुतळे मोदींनी उभे केलेले आहेत, जे स्वतःची बरोबरी नेहरूंशी करू इच्छितात? या प्रश्नाच्या उत्तरातच नेहरूंची महानता आणि आजच्या अतिरेकी हिंदूत्त्ववाही सत्ताधिशांची क्षुद्रता दिसून येते. 


जी बाब सरदार पटेलांच्या बाबतीत तीच बाब सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीत होती. नेहरू आणि सुभाष अत्यंत जवळचे मित्र होते आणि नेहरूंच्या नेतेपदाबाबत सुभाषचंद्रांच्या मनात शंका नव्हती. ती शंका हिंदुत्त्ववाद्यांच्या मनात २०१४ पासून सुरू झाली. त्याचा सुभाषचंद्र बोसांशी काहीही संबंध नाही. कारण खुद्द सुभाषचंद्र बोसांनी १९३६ साली युरोपमधून जवाहरलाल नेहरूंना पत्र पाठवले आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की “काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये तुम्हीच असे आहात ज्याच्याकडे मी आशेने पाहू शकतो”. म्हणजे नेहरू हे बोसांचे नेतेही होते आणि मित्रही होते.  गांधीजी आणि बोस यांच्यात मतभेद होते तसे नेहरू आणि गांधीजींमध्येही मतभेद होते. गांधीजींच्या आर्थिक कार्यक्रमाला नेहरूंचा विरोध होता आणि तो त्यांनी जाहिरपणे मांडलेला होता. गांधीजींच्या विरोधात जाऊन जेव्हा सुभाषचंद्र बोसांनी निवडणूक लढवली तेव्हा पट्टाभी सितारामैयांचा झालेला पराभव हा स्वतः माझा पराभव आहे असं गांधीजी म्हणाले, पट्टाभी सितारामैयांना हरवून सुभाषबाबू दुसऱ्यांदा काँग्रेसचे अध्यक्ष झाले. हा पराभव माझा व्यक्तिगत पराभव आहे असं गांधीजी म्हणाले. कार्यकारणीचे सदस्य हे मागच्या वेळेला सभाषबाबूंनी नेमलेले तसेच होते पण यावेळेला सुभाषबाबूंनी असा आरोप केला की,‘आपल्या कार्यकारणीतील काही सदस्य संघराज्यवादी भूमिका सोडून देतात’. यावरून समितीच्या १५ पैकी १२ लोकांनी कार्यकारणीचा राजीनामा दिला. ज्या तीन सदस्यांनी सुभाषबाबूंच्या बाजूने राजीनामा दिला नाही ते होते. स्वतः सुभाषचंद्र बोस, त्यांचे बंधू शरद बोस आणि जवाहरलाल नेहरू. नंतर नेहरूंनी आपलं स्वतंत्र पत्रक काढून सुभाषचंद्र बोसांनी नवीन कार्यकरिणी स्थापन करावी त्यात आपण सहभागी होणार नाही. जेणेकरून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये बोसांना किती पाठिंबा आहे असं ठरवता येईल असं नमूद केलं. आणि हा नेहरूंचा सुभाषचंद्रांवरचा व्यक्तीगत राग किंवा द्वेष खचितच नव्हता किंबहूना ३ एप्रील १९३९ ला तसं तपशीलवार पत्र सभाषबाबूंना पाठवलं त्यात या साऱ्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत.  वर उल्लेखिलेल्या पत्रात या साऱ्याचा गोषवारा आलेला आहे. 


हा नेहरूंचा विरोध सुभाषचंद्र बोस यांच्यावरील रागातून आलेला नसून ती नेहरूंची फार पूर्वीपासूनची फॅसिझम आणि नाझीझम बाबातची सुसंगत भूमिका होती. आणि सुभाषबाबूंनी जर गांधीजींशी संघर्षाची भूमिका घेतली तर पक्षातील डाव्या गटाला पक्षाचे ओझे पेलता येणार नाही. त्यांचा यात फायदा होईल. आणि अततः पक्षातील उजव्या विचारसरणीच्या आणि धर्मवाद्यांचा विजय होईल हा मुद्दा नेहरूंनी उपस्थित केलेला आहे. यामध्ये व्यक्तीगत सुभाष बाबूंशी नेहरूंचे काहीही वैर नव्हते. इतिहासाचा प्रवाह असा की काँग्रेस आज पुन्हा त्याच वळणावर येऊन उभी राहिलेली आहे. फॅसिझम विरोधी राहुल गांधी यांनी पक्षातील जी२३ गटाशी संघर्ष हा त्याच प्रतीचा संघर्ष आहे. आणि त्या संघर्षात विजयी होण्याकरिता पुन्हा एकदा जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहण्याशिवाय गत्यंतर नाही. इथे एक स्पष्ट करावेसे वाटते ते म्हणजे सुभाषचंद्र बोस हे कट्टरधर्मवादी विरोधक होते, आणि जवाहरांसोबत डाव्या गटांचेही सदस्य होते, फक्त त्यांना  साध्य- साधनसुचिता वगळून फॅसिस्टांचा पाठिंबा घेण्यात काही गैर वाटत नव्हते जे नेहरूंना भयंकर वाटत होते. 


नेहरूंची आयुष्याच्या सुरुवातीपासून उजव्या फॅसिस्टांबाबतची भूमिका ही सातत्यपूर्ण आणि सुसंगत अशी होती. तिच्यात गांधीजी, सुभाषबाबू, काँग्रेस किंवा इतर कोणत्याही घटकाने कधीच फरक पडला नाही. नेहरूवादाच्या नैतिकतेचा हा महान बिंदू म्हणता येईल.   नेहरू कुणीही नव्हते आणि ते व्यक्तिगत कामासाठी युरोपमध्ये होते तेव्हाही काँग्रेसचे एक नेते नेहरू आहेत याची फॅसिस्ट नेता बॅनिटो मुसोलिनी याला कल्पना होती आणि ते युरोपमध्ये असताना त्यांना भेटण्याची मुसोलिनीने इच्छा व्यक्त केली. नेहरूंनी तेव्हा युरोपमध्ये ज्याचा दबदबा होता आणि आधुनिक सिझर असा ज्याचा ब्रिटन देखील उल्लेख करत असे, त्या बेनिटो मुसोलिनीला भेटण्याचे नाकारले. तेव्हा तर महायुद्ध सुरू व्हायचे होते. आणि मुसोलिनी लोकप्रियतेच्या शिखरावर होता. त्यामुळे नेहरूंनी सुभाषबाबूंच्या फॅसिस्टांची वेळप्रसंगी मदत घेण्याच्या भूमिकेला विरोध करणे ही तारूण्याच्या सुरुवातीपासूनची नैसर्गिक भूमिका होती. ज्याचा त्यांनी मुसोलिनीच्या बाबतीतही अपवाद केलेला नव्हता. आणि तेव्हा तर नेहरू किंवा बोस यांच्यापैकी कुणीच काँग्रेसचे अध्यक्ष झालेले नव्हते. पण यानंतरही नेहरू सुभाषबाबू आणि काँग्रेस यांच्यात फुट पडू नये म्हणून प्रयत्न करत राहिले. खरं तर गांधींच्या सांगण्यावरून पंडित पंतांपासून ते राजेंद्र प्रसादांपर्यंत सुभाषबाबूंशी काँग्रेस अंतर्गत संघर्षाची भूमिका घेत होते. तेव्हा सुभाष बाबूंशी काँग्रेसचा संघर्ष होऊ नये म्हणून नेहरूंनी आटोकाट प्रयत्न केला. स्वतः सुभाषचंद्रांनी नेहरूंबाबत एकेठिकाणी असंही म्हटलेलं आहे की, “नेहरूंचं सामर्थ्य गांधीजींपेक्षा जास्त आहे. कारण नेहरूंना डाव्या गटाचा पाठींबा आहे जो डाव्या गटांना कधीही मिळू शकत नाही.” नेहरू आणि सुभाषबाबूंमध्ये सत्ता संघर्ष नव्हता. हे या अनेक घटनांवरून पूर्णपणे स्पष्ट होतं.किंबहूना सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष होण्याअगोदरच नेहरू दोनदा काँग्रेसचे अध्यक्ष होऊन गेलेले होते. त्यामुळे जेव्हा सुभाष बाबूंनी मुसोलिनी, हिटलर किंवा ऍक्सिस  शक्तिंची ब्रिटिशांविरूद्धच्या लढ्यात मदत घ्यायची ठरवली आणि आझाद हिंद सेना स्थापन केली, तेव्हा त्यांनी स्वतःचा वेगळा मार्ग निवडलेला आहे. आणि तिथेही गेल्यावर त्यांनी आपल्या बटालियनची नावे जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधींच्या नावाववरून ठेवली होती. शिवाय तिकडून राष्ट्राला संबोधित करताना गांधीजींना पहिला ‘राष्ट्रपिता’ असं संबोधन सुभाषबाबूंनीच केलेलं आहे. आणि नंतर जेव्हा आझाद हिंद फौजेच्यावर लाल किल्ल्यामध्ये ऐतिहासिक खटला उभा राहिला तेव्हा त्यांच्या बचावासाठीनेहरू पुन्हा एकदा वकिलाचा झगा घालून उभे राहिले होते. त्यामुळे बोस,गांधी, पटेल आणि नेहरू यांच्यात कोणताही आपापसात सत्तालोभाचा संघर्ष नसून या कल्पना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरच्या रेशीमबागेत तयार केल्या गेलेल्या आहेत. फॅसिझम बाबतच्या आणिउजव्या कट्टरवादी संघटनांबाबत्या आपल्या भूमिकेला नेहरूंनी आयुष्यात एकदाच मुरड घातली. ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायमची बंदी घालावी या पटेलांच्या म्हणण्याला त्यांनी त्यांनी मान्यता दिली नाही. आजच्या भारताच्या संकटाला नेहरूंची ही भूमिका मात्र कारणीभूत ठरली आणि पटेलांची भूमिका जास्त बरोबर होती हे मात्र पूर्णपणे खरे आहे.


नेहरूंना गांधीजींच्या पराकोटीच्या अहिंसेबाबत शंका होती. नेहरू क्रांतीकारकांना गांधीजींप्रमाणे ‘मारो काटो का पंथ’ मानत नसत. भागतसिंह आणि फाशीची वाट पाहणारे त्यांचे सहकारी जेव्हा लाहोरच्या तुरूंगात होते, तेव्हा ९ ऑगष्ट १९२९ रोजी सेंट्रल जेलमध्ये भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भेटण्याकरिता स्वतः नेहरू गेले होते. एवढेच नव्हे तर नेहरूंनी आपल्या आत्मचरित्रात भगतसिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. खरं तर भगतसिंहांनी असेब्लीमध्ये बाँब टाकला त्या तिथे समोर मोतीलाल नेहरू बसलेले होते. त्याबद्दलचा कोणताही नकारात्मक विचार ना मोतीलालजी यांच्या मनात होता ना नेहरूंच्या मनात होता. या उलट आत्ता ९ मे २०१८ रोजी भारताचे सध्यकालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक ट्विट टाकून – “भगतसिंह, बटुकेश्वर दत्त वगैरे ब्रिटिशांच्या कैदेत होते तेव्हा कोणी काँग्रेसचा नेता त्यांना भेटायला गेला होता का?” असं विचारलं आहे. हा रेशीमबागेतला कल्पनाविलास आहे. वास्तवात जे झालं ते वर लिहिलेलं आहे. 


सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नेहरूंमध्ये स्वदेशी आणि राष्ट्रवादाची एक तिव्र अशी भावना होती. त्यांना भारताच्या प्राचिन परंपरांच्या विषयी खूप आदर होता. कम्यूनिस्टांच्या बाबत त्यांच्या प्रेरणा इथल्या नाहीत आणि देशी प्रेरणा नाहीत हे मार्क्सवादाबद्दल नेहरूंना आदर असून देखील त्यांनी स्वच्छपणे म्हटलेले आहे. किंबहूना कम्यूनिस्टांचा पाठिंबासुद्धा त्यांनी यासंदर्भात नाकारलेला आहे. नेहरूंनी त्यांच्या‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ या पुस्तकामध्ये  प्राचिन भारताच्या ऋषीमुनींपासून भारतीय महाकाव्यांपर्यंत साऱ्याची एका आंतरिक प्रेरणेने विलक्षण अशी वर्णने केलेली आहेत. त्यांनी इंदिराजींनी लिहिलेल्या पत्रांमध्येही याचे उल्लेख आढळतात. धर्म निरपेक्षता ही भारताला बलवान बनवील यावर त्यांची श्रद्धा होती. (जी पुढे योग्य ठरली.) हिंदू महासभा आणि मुस्लिम लिग यांनी एकमेकांबरोबर सहकार्य केलेलं आहे पण उत्तरप्रदेशामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा १९३७ साली नेहरूंनी मुस्लिम लिग बरोबर मंत्रीमंडळ करण्याचे नाकारले होते. मुस्लिम लिगला संपूर्ण भारतात फाळणीअगोदर काँग्रेसच्यामानाने चांगल्या दर्जाची मते मिळाली नाहीत. काँग्रेसच्या मागे सर्व मुस्लिम नसले तरी लिगच्या मागेही सर्व मुस्लिम नव्हते. त्यामुळे हिंदूमहासभेच्या द्विराष्ट्रवादाच्या मागणीखेरीज मुस्लिम लिगला फाळणीसाठी बळ मिळणे अशक्य होते. १९३७ साली काँग्रेसच्या दैदिप्यमान यशानंतर मुस्लिम लिगबरोबर सिंधपासून ते बंगालपर्यंत युती करून सत्ता स्थापन करण्याचं काम हिंदू महासभेने केलं. त्यामुळे मुस्लिम लिगला नैतिक पाठबळ हिंदू महासभेने दिला काँग्रेसने नाही  अधिक थेट बोलायचं झालं तर १९३७ मध्ये अहमदाबाद(कर्णावती) च्या अधिवेशनात सावरकरांनी जे हिंदू आणि मुस्लिम हे दोन राष्ट्र आहेत असे म्हटले. खुद्द विनायक दामोदर सावरकरांचं त्यासंदर्भातील विधान आहे. . “India cannot be assumed today to be a unitarian and homogeneous nation, but on the contrary there are two nations in the main; the Hindus and the Moslems, in India.” (Samagra Savarkar Vadgmay- Volume 6, Maharashtra Prantik Hindusabha Publication, 1963-65, Page 296) Savarkar made the above statement in his presidential address at the All India Hindu Mahasabha convention in Karnavati (Ahmedabad) in 1937. पुढे १९४० मध्ये लाहोरच्या मुस्लिम लिगच्या अधिवेशनामध्ये स्वतंत्र पाकिस्तानच्या द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत उभा राहिला त्याचा पायाचा दगड हा होता. त्यामुळे  विनायक दामोदर सावरकर आणि मोहम्मद अली जीना हे फाळणीपुरुष आहेत. या दोघांच्या निवडीचे परिणाम नेहरू, गांधी आणि त्यांच्या काँग्रेसमधील इतर सहकाऱ्यांना भोगावे लागले.


त्यामुळे लाहोरमध्ये १९४० साली मुस्लिम लिगने द्विराष्ट्रवादाचा ठराव पास केला. या साऱ्यामध्ये नेहरूंचा दुरान्वयाने काहीही संबंध नव्हता, कारण नेहरूंनी धर्माधिष्ठीत भारताची स्थापना होऊ दिली नाही. किंबहूना स्त्रियांविषयीच्या हक्काचे कायदे पास करताना दिवाणी कायद्याच्या आधारावर लग्नापासून संपत्तीपर्यंत धर्माच्या पलिकडे जाऊन स्त्रियांना हक्क देण्याकडे नेहरूंनी प्रमुख भूमिका बजावली ज्याचे एक शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरही आहेत. नेहरूंनी आपल्या आयुष्यामध्ये भारत हा पाश्चिमात्य देशांच्या इतका बळकट, आधुनिक आणि धर्मनिरपेक्ष व्हावा यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी धर्माधिष्ठीत राष्ट्र कसे पतन पावते हे पाकिस्तानच्या रूपाने पाहिले. त्याअर्थाने भारत हा हिंदू पाकिस्तान होऊ दिला नाही म्हणून तो २०१४ पर्यंत निरंतर प्रगतीपथावर गेला असे म्हणता येईल आणि याचे संपूर्ण श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंना देण्यात काहीच हरकत नाही. 


कुठच्याही एका लेखात किंवा कुठच्याही एका पुस्तकात मावेल एवढे पंडित जवाहरलाल नेहरूंचे कर्तृत्व छोटे नाही. आधुनिक भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरू हे महात्मा गांधींएवढेच मोठे आणि अद्वितीय नेते होऊन गेलेले आहेत. काही बाबतीत तर ते गांधीजींपेक्षाही सरस होते. १९६२ साली चिन बरोबरीच्या युद्धात भारताला जेकाही अपयश आले त्याचे कारण नेहरूंना १९५२ पासून १९६२ पर्यंत दहा वर्षात अख्या भारताततल्या यंत्र युगाची निर्मिती करताना अडीज सिमांवर अत्याधुनिक यंत्राने सुसज्ज असलेली फौज उभी करणं अशक्य होतं हेही आहे. आज इतक्या वर्षानंतर लद्दाख, अरूणाचल प्रदेश, हिमाचल, सिक्कीमपर्यंत चिनच्या सेना आतपर्यंत आल्या आहेत त्याचा मुकाबला २०२२ साली भारताचे पंतप्रधान असलेले मोदी काय करताहेत? ते तर चिनचे नाव घ्यायलाही धजत नाहीत. चिनला नेहरू घाबरले नाहीत. पण आपल्याकडे संसाधनचं कमी होती. हिमालय आणि हिमालयाएवढे नेहरू यांचा खरा न्याय भारत आजही करू शकलेला नाही. नेहरूंच्या असण्याने आपण एक जगाला आदर वाटेल असा अर्वाचिन समाज निर्माण झालो. दुर्दैवाने हे लिहित असताना नेहरूंचा द्वेष करणाऱ्या क्षुद्र संघटनांनी हा महान देश परत अंधारयुगात लोटलेला आहे. अशा वेळी कदाचित नेहरूंचे स्मरण आपल्याला प्रकाश दाखवेल आणि नेहरूंच्या कर्तृत्वाचा खरा अर्थ काय आहे य़ाचा आपल्याला बोध होईल एवढीच आशा आज आपण बाळगू शकतो.  नेहरूंच्या शर्टावर लावलेलं गुलाबाचं फुल हे नेहरूंच्या गुलाबपुष्पावरच्या प्रेमातून आलेलं असेल. समोर असलेल्या कॅमेऱ्याच्या प्रेमातून नव्हे. 

 - राजू परुळेकर

======================================







Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...