Skip to main content

नागवंश आणि महाराष्ट्र

 नागवंश आणि महाराष्ट्र

प्राचीन काळातील नागलोकांचे वंशज आजचे बौद्ध (महार) आहेत, असे राजाराम शास्त्री भागवत यांनी म्हटले आहे. इतिहासचार्य वि. का. राजवाडे, प्र. न. देशपांडे, ह. श्री. शेणोलीकर, एच. एल. कोसारे, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. भीमराव बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांनीसुद्धा वरील मतास पुष्टी दिली आहे. महारांच्या परंपरेनुसार महारांचा पहिला राजा नाग हा होता. नागलोक व नागराजे आपल्या नावात ‘नाग’ व ‘निका’ या शब्दांचा वापर करीत असत. चंद्रगुप्त दुसरा (विक्रमादित्य) याच्या राणीचे नाव कुबेरनागा होते. कळलाय राजाच्या मुलीचे नाव ‘नागलिका’ होते. पद्मावतीला ‘भवनाग, भीमनाग, बृहस्पतीनाग, देवनाग, गणपतीनाग, प्रभाकरनाग व स्कंदनाग या नावाचे राजे होऊन गेले. यावरून बौद्ध तथा महार लोकांचे प्राचीनत्व लक्षात येते. महारांच्या नावावरून या देशाला महाराष्ट्र असे नाव पडले आहे. जॉन विल्सन यांनी महारांचे राष्ट्र ते महाराष्ट्र अशी उत्पत्ती दिली आहे. महार+राष्ट्र = महाराष्ट्र असे होते. या उत्पत्तीला अलेक्झांडर रॉबर्टसन, महात्मा जोतिबा फुले, डॉ. एन. जी. भवरे, डॉ. दत्तात्रय पुरुषोत्तम खानापूरकर यांनीही या मताला दुजोरा दिला आहे.


कोकण हा प्रांत मुळात महार, मांग, भिल्ल, कोळी, ठाकूर व कोंग या लोकांचा होता. परंतु कदंबानी महारांचा, चालुक्यांनी मांगाचा व मौर्यानी कोळ्यांचा पराभव करून त्यांची राज्ये जिंकून घेतली. त्यामुळे या भूमीचे भूमिपुत्र बेवारस झाले. आठव्या शतकापासून जातीची बंधने घट्ट होऊ लागली. जेते लोकांनी जीत लोकांना गुलामासारखी वागणूक द्यावयास सुरुवात केली. नागवंशीय महार हे राज्यकर्ते होते. पण राजकीय पराभवातून ते हतबल, निष्कांचन व हीन अवस्थेला पोहोचले. याचा परिणाम एकमेकांच्या सहकार्याने चालत आलेल्या पंचायतराज वा गावगाड्यावरही झाला. शिवकाळात व विशेषत: पेशवेकाळातील बहुतांश निवाडे हे अस्पृश्य व दलित समाजाविरुद्ध एकतर्फीच झाल्याचे दिसून येते. पेशवेकाळात माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनिष्ट प्रथांना काही धरबंधच राहिला नाही, हा इतिहास आहे. महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदींनी पंचायत समिती स्थापन करून प्रबोधन कार्यास चालना दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे भारतात बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी चालना मिळाली. ठाण्यासह महाराष्ट्रातही सर्वच भागात बौद्ध लोक आहेत. 

विद्यमान बौद्ध हे नागवंशीय असून ते या भूमीचे मूळ रहिवासी व राज्यकर्ते होते. आर्यपूर्व काळात नागलोकांची संस्कृती येथे अस्तित्वात होती. नागलोक म्हणजेच आजचे बौद्ध वा महार लोक होत. नागवंश हा भारतातील एक प्राचीन वंश आहे. प्राचीन काळात भारतात नागवंशाची राज्ये होती. ऋग्वेदात नागांचा उल्लेख वारंवार करण्यात आला आहे. देव, दानव, दैत्य, असूर व नाग ही कश्यपाची संतती असल्यामुळे ते परस्परांचे बंधू ठरतात. ऋग्वेदात उल्लेखलेला दास या शब्दाचा अर्थ आता गुलाम असा झाला आहे, परंतु या शब्दाचा मूळ अर्थ दाता, उदार असा होतो.


पुराणातील उल्लेखानुसार नागराजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी व पद्मावती या ठिकाणी राज्य केले. महाराष्ट्र ही तर नागांची मायभूमीच होती. दक्षिण भारतात नागांची अनेक लहान लहान राज्ये होती. महाराष्ट्रातील नागराजे ‘महारठी’ ही पदवी धारण करीत. सातवाहन काळात ‘कळलाय’ हा नागराजा कर्नाटक, तेलंगण व महाराष्ट्र या प्रदेशावर राज्य करीत होता. त्याने आपली कन्या नागनिका हिचा विवाह सातवाहन राजा सिमुक सातकर्णीबरोबर केला होता. नागनिका ही सिमुक राजाची पट्टराणी होती. तिने अनेक यज्ञयागादी दानकर्मे केली. त्यासंबंधीचे कोरीव लेख नाणेघाटातील लयनगृहातील भिंतीवर पहायवास मिळतात.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...