Skip to main content

बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कर्ते

 बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कर्ते:

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील जातीव्यवस्था आणि अस्पृश्यतेविरुद्ध दिलेला शास्त्रशुद्ध लढा संपूर्ण भारताला आणि जगाला ज्ञात आहे. बाबासाहेबांनी भारतात लोकशाही रुजविण्यासाठी दिलेले योगदान त्यांचे चाहतेच काय? पण त्यांचे विरोधकसुद्धा नाईलाजाने का होईना मान्य करतात. भारताला सरंजामशाही व्यवस्थेतून बाहेर काढून समता, बंधुता आणि एकात्मतेची त्रिसूत्री बहाल करताना भारतीय राज्यघटनेच्या रूपाने त्यांनी त्याला लिखित आणि कायदेशीर स्वरूप दिले. त्यामुळेच जगातील अनेक देश हुकूमशाही आणि अंतर्गत यादवीने होरपळून निघत असताना अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि नैसर्गिक संकटे येऊनही भारत त्यातून सावरला आणि खंबीरपणे उभाही राहिला. साहजिकच स्वातंत्र्यापूर्वीचा आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत यातील बदलांनी जगातील अनेक विचारवंतांचे आणि तत्त्ववेत्त्यांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी लोकशाहीवर अनेक ग्रंथ लिहिले आणि नवनवीन सिद्धांतही मांडले. पण अंतिमतः त्याचा मूळ पाया हा डॉ. बाबासाहेबांनी मांडलेले विचार आणि तत्वज्ञान हेच असल्याचे त्यात दिसून येते. 

अश्याच तत्वज्ञानींमध्ये अमेरिकन तत्वज्ञ जॉन रॉवल्स यांचा समावेश होतो. रॉवल्स यांनी १९७१ साली "अ थेअरी ऑफ जस्टीस(सामाजिक न्यायाचा सिद्धांत)" नावाचा ग्रंथ लिहिला.  राजकीय तत्वज्ञान आणि नैतिकता हा या ग्रंथाचा मूळ पाया आहे. यामध्ये त्यांनी उपयुक्तवादाला पर्यायी व्यवस्था सुचवीत असतानाच 'उपलब्ध साधनांची आणि स्त्रोतांची कोणत्याही भेदांमध्ये न अडकता समान वाटणी केली जावी', असा सिद्धांत मांडला. त्यांचा हा सिद्धांत "Social Contract Theory (सामाजिक करार सिद्धांत)" या सिद्धांतावर आधारित आहे. हा सिद्धांत जॉन, जेकब आणि रुसो यांनी १७६२ साली लिहिलेल्या सामाजिक करार या पुस्तकातील सिद्धांतावर आधारित असून त्यातील राजकीय इच्छाशक्ती, नैतिकता आणि प्रभावी अंमलबजावणी हा भाग मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर आधारित आहे. बाबासाहेबांनी आपले राजकीय तत्वज्ञान मांडताना असे सांगितले आहे की, राजकीय निर्णय घेताना आणि त्यांची अंमलबजावणी करत असताना समानता या तत्वाचे पालन होणे आवश्यक असून त्यासाठी सत्तेवर असलेल्या माणसांकडे राजकीय इच्छाशक्ती आणि नैतिकता असणे आवश्यक आहे. सत्ताधारी व्यक्तीकडे या दोन्हींचा अभाव असेल तर लोकशाही मूल्यांचा ऱ्हास होतो आणि सामाजिक न्यायाचे उद्दिष्ट पूर्ण होत नाही. साहजिकच त्याचे ध्येयात रूपांतर होते. उद्दिष्ट आणि ध्येय या दोन्हीं संकल्पना समान अर्थाने वापरल्या जात असल्या तरी त्यात फरक असून अल्पकाळात ज्या गोष्टी साध्य करायच्या असतात त्यांना उद्दीष्टे असे म्हटले जाते तर दीर्घकालीन उद्दिष्टांना ध्येय असे म्हटले जाते. राजकीय व्यक्तींकडे जर इच्छाशक्ती आणि नैतिकतेचा अभाव असेल तर उद्दीष्टे गाठण्यातच अनेक अडचणी निर्माण होतात आणि ध्येयपूर्तीकडील वाटचाल आणखी कठीण होऊन बसते. आरक्षण, स्त्री-पुरुष समानता, शिक्षण आणि पायाभूत सुविधा यांच्याबाबत भारत अजूनही पिछाडीवर असण्यात हीच बाब अडथळा म्हणून उभी असल्याचे जाणवते. सर्वपक्षीय राजकीय नेतृत्वाने एकतर काहीच उद्दीष्टे ठेवली नाहीत किंवा उद्दीष्टे ठेवली पण ती साध्य करून ध्येयाकडे वाटचाल करताना आवश्यक असणारी इच्छाशक्ती दाखवली नाही. साहजिकच भारतीय लोकशाहीला आणि राज्यघटनेला अपेक्षित गोष्टी अद्याप साध्य झालेल्या नाहीत हेच अंतिम सत्य म्हणून समोर येते. 

बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक न्यायाची संकल्पना ही प्लेटो आणि अँरिस्टॉटल यांनी मांडलेल्या "Good Society (चांगला समाज किंवा व्यवस्था)" या संकल्पनेवर आधारित असून रॉवल्स यांचा सिद्धांतही त्याच मार्गाने जाणारा आहे. म्हणूनच डॉ. आंबेडकरांच्याबाबत मत व्यक्त करताना रॉवल्स म्हणतात की, 'मी सामाजिक न्यायाची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नजरेतून पाहतो'. यानंतर पुढे जाऊन १९९७ मध्ये रॉवेल्स यांनी "Justice of Fairness (प्रामाणिक न्याय)" ही संकल्पना मांडली. त्यानुसार त्यांनी 'प्रामाणिक न्याय' हा आधुनिक घटनादत्त लोकशाहीचा कणा असून प्रामाणिक न्यायासाठी राजकीय नैतिकता आवश्यक आहे असे मत मांडले. बाबासाहेबांनी त्यांच्या सामाजिक न्यायाच्या सिद्धांतात प्रामाणिक न्यायाचा अगोदरच समावेश केला असून त्याबाबत २०१७ मध्ये वलेरियन रॉड्रीग्झ यांनी "बाबासाहेब आंबेडकर: एक राजकीय तत्वज्ञ" नावाचा शोधनिबंध लिहिला आहे. यामध्ये त्यांनी बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय या संकल्पनेचा पाया, आणि त्यात अंतर्भूत होणाऱ्या विविध घटकांचे अत्यंत सखोल आणि अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेले आहे. 

बाबासाहेबांच्या सामाजिक न्याय या संकल्पनेचा पुढे विस्तार करताना रॉवल्स यांनी त्याची दोन तत्वात विभागणी केली असून ती अनुक्रमे १. सामाजिक स्वातंत्र्याचे तत्व आणि २. समतेचे तत्व अशी आहेत. सामाजिक स्वातंत्र्याचे तत्व मांडताना रॉवल्स म्हणतात की,  प्रत्येक व्यक्तीला जात, लिंग, पंथ आणि वर्ण यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचे, व्यक्त होण्याचे, आवडीची कृती करण्याचे, वास्तव्याचे आणि निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. तर समतेच्या तत्वात त्यांनी आर्थिक बाबींवर भर दिला आहे. समाजाला आर्थिक लाभ देताना  कमीत कमी आर्थिक लाभ मिळणाऱ्या घटकाला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळवून देणे म्हणजे समतेचे तत्व असून क्षमता समान असतील तर समान लाभाचे तत्व वापरताना जात, धर्म, लिंग, पंथ आणि वर्ण यांचा विचार करू नये, रॉवल्स म्हणतात. 

रॉवल्स यांचा हा संकल्पना विस्तार म्हणजेच भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार होत. जी बाबासाहेबांनी कायद्याच्या रूपाने अगोदरच समाजात रुजविण्याचा प्रयत्न केला आहे. 

©के.राहुल 9096242452


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...