Skip to main content

कविता - पुरामधील प्रेत

कविता - पुरामधील प्रेत

पुरामध्ये वाहत आलेल्या प्रेताजवळ,

दोघेजण बसले होते रडत.

अधून मधून दोघेही होते तिच्या निर्जीव देहावर पडत.

बघता बघता गोळा झाला नदीकिनारी गाव,

कोण ही स्त्री? आणि कोण हे पुरुष? म्हणून चर्चा करू लागले रंक आणि राव.

ही माझीच बायको म्हणून दोघे हमरीतुमरीवर आले,

निवाडा होईना गावाला म्हणून प्रकरण थेट पोलिसात गेले.

चांगल्या घरची दिसते बिचारी, 

आया बाया कुजबुजू लागल्या,

अंगावरच्या दागिन्यांकडे टक लावून पाहू लागल्या.

पोलिसांनी मग सगळी सखोल चौकशी केली,

थोड्या वेळातच एक रुग्णवाहिका सायरन वाजवत आली.

पुरामधून मरता मरता वाचलेला एकजण रडत रडत खाली उतरला,

पोलिसांचा आधार घेऊन प्रेताजवळ गेला.

ही माझीच बायको म्हणून तिथेच गर्भगळीत झाला,

त्याला बघून रडणारे दोघे मग हळूच मागे फिरले,

पोलिसांनी ताणून मग सहज धरले.

अंगावरच्या सोन्याची त्यांना सुटली होती हाव,

संधीचे सोने करण्याचा त्यांना आखला होता डाव.

सोन्यासारखी बायको गेली मला त्याची गरज नाही,

देऊन टाका हवे ते त्यांना, माणूस मेला की काही उरत नाही.

कितीही कमावले तरी माणसाला काही पुरत नाही,

फुकटचे घेऊन कुणी आनंदी झाल्याचे मला तरी स्मरत नाही.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हे दोघे गावामध्ये आले होते,

मदतीच्या नावाखाली कित्येक प्रेते ओरबडतांना,

 मी यांना पाहिले होते.

झाले असेल समाधान तर थेट आता घरी जा,

कसे वाटते घरच्यांना सगळे त्यांना एकदा सांगून पहा.

चोऱ्या केल्या,  दरोडे टाकले तरी चालेल एकवेळ,

पण पुन्हा नका करू असा कावा,

माझी यांच्याबद्दल काही तक्रार नाही, सगळे आता घरी जावा.

गळ्यात पडून तिच्या मग तो हमसून हमसून रडला,

तिच्याच बाजूला झोपून त्याने प्राण आपला सोडला.

आया बायांनी पदराने डोळे आपले पुसले,

मुद्देमाल पोलिसांच्या हवाली करून चोर गाडीत जाऊन बसले.

©के.राहुल 9096242452














Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...