Skip to main content

संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार!

 संत रवीदासांचे क्रांतिकारक विचार!

प्रस्तावना:

भारतीय प्रमुख संतांमध्ये ज्या संतांचे नाव अग्रभागी घेतले जाते त्यामध्ये संत रवीदासांचे नाव अग्रभागी आहे. जन्माने दलित असलेल्या रविदास यांची जन्मतारीख निश्चितपणे सांगता येत नसली तरी त्यांचा जन्म साधारण 1450 मध्ये झाला असा त्यांच्या साहित्याचे अभ्यासक आणि तज्ञांचा कयास आहे. रघुराम आणि  घुरबिनिया या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आलेल्या रवीदासांचा जन्म उत्तरप्रदेशातील वाराणसीच्या जवळ असलेल्या श्री गोवर्धन या गावी झाला. हे ठिकाण सध्या त्यांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते. रवीदासांच्या वडिलांचा चामडे कमविण्याचा व्यवसाय होता आणि ते मेलेल्या जनावरांच्या कातडीपासून बनविले जात असे. या व्यवसायाकडे हीन नजरेतून पाहिले जात असल्यामुळे त्यांची, त्यांच्या परिवाराची आणि हा व्यवसाय करणाऱ्या चमार (अर्थातच चांभार) या जातीची अस्पृश्य जातीत गणना केली जात असे. 

शूद्र म्हणून गणले जात असले तरी जन्मापासूनच रावीदासांचा स्वभाव, वर्तन आणि समज आध्यात्मिक विचारांच्या जवळ जाणारे होते. त्यामुळे अगदी लहानवयातच ते उत्तरप्रदेशातील भक्ती चळवळीच्या  प्रभावाखाली आले असले तरी संत परंपरेतील निर्गुणा संप्रदायातील त्याचे कार्य आणि कर्तृत्व विशेष उल्लेखित आहे. निर्गुणा संप्रदायाच्या माध्यमातून त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाखालील हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेविरुद्ध अध्यात्मिक मार्गाने लढा दिला. हिंदू धर्मातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेविरुद्ध अध्यात्मिक मार्गाने लढा उभारताना स्वतः ब्राह्मण जातीत जन्मलेल्या रमनदासत्यांनी रामनुजनाचार्य यांचे ब्राह्मण आणि सवर्ण केंद्री नियम आणि कायदे धुडकावून लावले. भक्ती चळवळीत त्यांनी सर्व वर्णातील स्त्री आणि पुरुष यांना समान स्थान दिले. त्यांनी भक्ती संप्रदायात मुस्लिम धर्मातील लोकांनाही सामावून घेतले. शूद्र  आणि मुस्लिम सदस्यांनी बनविलेले भोजन त्यांनी स्वतःही ग्रहण केले आणि संप्रदायातील इतरांनाही खायला सांगितले. त्यांच्या विचारांनी आणि मतांनी प्रेरित होऊन उत्तर भारतातील अनेक हिंदू जातीमधील लोक त्यांच्या चळवळीत सामील झाले. त्यातील त्यांचे बारा शिष्य प्रसिद्ध असून त्यांनी रवीदासांचे जीवन कार्य आणखी पुढे नेले. त्यामुळे तेही नावारूपास आले. यांमध्ये  अंतर्नाद, कबीर, पिपा, भावानंद, शुख, सुर्सर, नरहरी, रयदास, धना, सौना आणि दोन महिला शिष्य सुर्सरची पत्नी, पदमावती यांचा समावेश आहे.


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...