Skip to main content

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.

माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा.....भाग १


प्रत्येक नात्यात म्हणजे अगदी मैत्रीत, नवरा-बायकोत, आई-मुलीत, भाव-बहिणीच्या नात्यात... अगदी कोणत्याही नात्यात एकमेकांसाठी आदर, एकमेकांसाठी प्रेम,एकमेकांची जाणीव,  एकमेकांसाठी space, एकमेकांप्रती जबाबदारीची जाण, आणि ती प्रत्यक्षात क्रुतीपुर्ण देणं घेणं, empathy अशा क्षमता लागतात.... त्या दोन्ही बाजूंनी असतील तर नात फुलत,टिकत आणि खर खर बहरत.... 


कोणतीही दोन माणस एकत्र आली की वाद संवाद, मतभेद हे होत राहतात... चुका होतात....पण एकमेकांशी बोलत सामोपचाराने हे छोटे छोटे विसंवाद संपवता आले तर चांगलं आहे..... एकमेकांना माफ करत , एकमेकांची माफी मागत जी नाती आनंदी वातावरणात परिपक्व होत जातात...mature होतात.... ती एकमेकांना ओझ होत नाहीत

हे आहे forgive and forget


Self actualization


काही माणसं समोरचा कसा ही असला तरी नात्यात comfortable रहातात....समोरच्या माणसाला आहे तसा खरोखर स्वीकारतात....आणि स्वतः ला त्रास करून न घेता समोरच्या माणसाला योग्य पद्धतीने हाताळतात ....  forgive and forget इथे ही होताना दिसत...

माणूस मनातून जेवढा स्वस्थ तेवढा बाहेर वागतानाही समजून वागणारा, विवेकी आणि शांत असतो... थोडक्यात स्वतः वर काम करायचं आहे

अशी माणसं  खूप खूप कमी असतात. खूपदा self actualization ही अवस्था मिळवलेली ही माणसं असतात.... यांचा प्रगत मेंदू खूप छान विकसित झालेला असतो...मास्लोच्या थिअरीनुसार  ही माणसाची  पाचवी गरज किंवा इच्छा आहे....पहिल्या चार गरजा काही प्रमाणात भागल्या की पाचवी इच्छा माणसाला निर्माण होते...आधीच्या गरजा पूर्ण करताना आलेल्या अनुभवातून ,परिस्थितीतून   शिकत ,प्रगती करत ही मनोअवस्था येते....


पण ही पायरी गाठायला न  जमलेल्या आपल्यासारख्या सामान्य माणसांनी हा भावनांचा कोलाहल कसा आवरायचा ....माणसांना कस हाताळायच

बघू या


आदिम भावना.....म्हणजे काय..?


माणसाचा मेंदू प्रगल्भ होतोय ....पण या 8-10 हजार वर्षात मेंदूमधील प्रगत मेंदू neo cortex हा भाग विकसित होत आहे... यामुळे empathy, सजगता, rational thinking, प्रश्न सोडवण्याची क्षमता, resilience  म्हणजे कितीही वादळं आली तरी  पुन्हा सावरत त्याच दिमाखात, grace मध्ये उभं राहण्याची क्षमता , कृतज्ञता, सामंजस्य अश्या प्रगत भावना माणसाला जाणवतात..... पण अजूनही हा मेंदूतील भाग सर्व माणसांमध्ये सारखा विकसित झालेला नाही, या भावनिक मेंदू कमी विकसित असणाऱ्या माणसांना काही गोष्टी कळणं किंवा जाणवण खूप अवघड असत...


आदिम काळात माणूस तीन गोष्टी करत असे

fight  वाघ आला तर आक्रमक होणे

freeze वाघ आला तर  लपून बसणं

flight  वाघ आला तर पळून जाणे


या  आदिम भावना आहेत म्हणजे...जगण्यासाठी किंवा जिवंत राहण्यासाठी लागणाऱ्या क्षमता.....  प्राणी जगतातून प्रगती करत आपण आता सुरक्षित आयुष्य जगत आहोत त्यामुळे या आदिम भावना आता आपण चक्क मनातून व्यक्त करत आहोत.


Fight- परिस्थितीवर , माणसांशी आक्रमक वागणे, राग, संताप, शारीरिक मारहाण, वाईट बोलणं, शिवीगाळ 

Freeze - निर्णय घेण्याची क्षमता नसल्याने थिजण, अडचण आली तरी काहीच न करता बसून राहणं, आणि मनात चिडचिड, नैराश्य ,हतबलता , आत्महत्या

Flight - परिस्थितीपासून पळ काढणं किंवा माणसांपासून लांब जाणे, जबाबदारी न घेणे

मनातून घाबरून जाणे, आधार शोधणे


आणि fawn ही  नवीन क्षमता..ज्यात अवघड परिस्थिती आली की समोरच्या व्यक्तीच्या गुड बुक्स मध्ये राहण्यासाठी प्रयत्न सुरू होतो, लाळघोटेपणा,पुढे पुढे करण आहे हे..परिस्थिती त्रासदायक होण्यापेक्षा समोरच्यापुढे लिन होणं...माणसांना खूष ठेवण्याचा आटापिटा करण... हे हल्ली खूप बघायला मिळत ...बाहेर आणि अगदी घरांमध्ये सुद्धा


थोडाक्यात हे परिस्थितीतून बाहेर पडण्याचे चार मार्ग आहेत....आपल्यातला प्रत्येक जण यातील कोणता ना कोणता  मार्ग आपापल्या क्षमतेनुसार निवडतो.... एखादा मार्ग वारंवार निवडतो आणि तो त्याचा comfort zone होऊन बसतो.... comfort zone झाला की तो सोडायला मनाची तयारी नसते... 


Comfort zone असला तरी त्यात मन  आतून त्रासलेलच असत....म्हणून मग दुसऱ्या मार्गाचा विचार करायचा का ...? तर  माणसाला तेही सहन होत नाही.... सवयीचा त्रास सहन करण सोयीचं वाटतं..... पण हे ही नीट स्वीकारायचं नसत .... सतत स्वतःच्या मनाकडे कुरकुर करायची असते....


मग काय केलं की आपण  आतून आणि बाहेरून शांत हाऊ शकतो ....


नात्यांची वर्तुळ


आयुष्यात अनेक माणस भेटत असतात. अगदी जन्म झाल्यावर मिळतात ती  रक्ताची नाती आणि आपण स्वतः निवडतो ती नाती.....


साधारण या नात्यांची सहा वर्तुळ असतात

सगळ्यात बाहेरच्या गोलात फक्त ओळख असणारी माणस असतात .... हल्ली हा गोल गजबजलाय.... खूप मोठठी friend list असते..... त्याच्या आतल्या गोलात आपण निवडलेली मित्रमंडळी असतात.. त्यानंतर नातलग... मग घरातली माणस... आणि सगळ्यात आतल्या पाचव्या गोलात अगदी आपली वाटणारी  अशी माणसं असतात... आणि शेवटच्या वर्तुळात आपण स्वतः असतो... हे आपलं स्वतःच वर्तुळ अनेकांना दिसत नाही, जाणवत नाही.... पण स्वतः शी नात छान असेल तर अनेक प्रसंग आणि आसपासची अनेक माणस नीट हाताळता येतात....

 

जन्माला आल्यापासून नवीन नात्यांमध्ये आपण गुंफले जातो आणि हळूहळू गुंतत जातो. 

साधारण ज्यांच्या सोबत खूप हिशोब पूर्ण करायचे असतात अशीच माणस आपले अगदी जवळचे नातलग  असतात. रक्ताच्या नात्यात सहवास जास्त असतो त्यामुळे भावनांचा गुंताही जास्त असतो. आणि हिशोब पूर्ण करायला संधी जास्त असते. म्हणून त्रास देणारी माणस सहसा रक्ताची आणि तुम्ही न निवडलेली असतात.....


आत्मिक प्रगती


कधी कधी हिशोब पूर्ण करणे हा विषय नसतो तर काही अनुभव आत्म्याची परीक्षा म्हणूनही घडत असतात.  आपण त्या परीक्षा कशा पार करतो.... रडत बसतो... वाद घालत राहतो.....शांत राहतो, सहन करतो..... मनात खात राहतो.... स्वतः ला त्रास देतो.....स्वतःला बोल लावतो  .....  का gracefully सगळा विषय होताळतो यावर आत्म्याची प्रगती अवलंबून असते. 


प्रगती म्हणजे काय ???? तर शून्य अवस्थेत असणारा म्हणजे balanced असणारा  आत्मा प्रवास सुरु करतो आणि भावनांच्या गदारोळात तोल हरवत जातो . परमतत्वपासून दूर होत मायेच्या जंजाळात गुंततो. आणि अडकतो... अनेक जन्म घेतो आणि त्यातून पुन्हा शून्याकडे त्याला पोहोचायचं असत आणि यासाठी सर्व भावनांवर विजय मिळवणं,वासनांवर ताबा मिळवण, सगळ्यात असून कशात नसणं हे जमवण ही परीक्षा असते. त्या पार करणं म्हणजे प्रगती.


यातून हेही लक्षात घेऊया की आपण जे पुस्तकी शिक्षण घेतो , उच्च शिक्षीत होतो ...कोणी खूप हुशार असत, खूप छान नोकरी असते, जोरदार पगार असतो , स्वतः ची कंपनी असते, गाडी बंगला, सर्व amenities असणार lavish घर असत....पण यातील कोणतीही गोष्ट या आत्मिक प्रवासाचा, प्रगतीचा भाग होत नाही.... कारण हा सगळा भौतिक आयुष्याचा भाग आहे. या भौतिक सुखसोयी असोत किंवा नसोत मिळालेलं आयुष्य जगताना भावनिक पातळीवर तुम्ही कसे respond करता , कोणत्या भावनांची देवाणघेवाण करता, स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांना किती त्रास देता,लोकांबद्दल मत्सर ठेवून त्यांचं वाईट होण्यासाठी प्रयत्न करता का.... 

आलेल्या कठीण प्रसंगानंतर पुन्हा उभे राहता का लोकांना दोष देत विव्हळत राहता...… असे विविध प्रसंगातील प्रतिसाद महत्वाचे असतात…थोडक्यात तुमची भावनिक क्षमता महत्वाची ठरते.... ही क्षमता रोजच्या आयुष्यातही तेवढीच महत्वाची असते....


प्रत्येक जण आपापल्या जीवनमूल्यांचा सेट लहानपणापासून तयार करत असतो.... लहानपणी विचारक्षमता शून्य असते...जे अनुभव करतो, जे सांगितल जात ते नकळत रुजत जात.घट्ट होत...

आजूबाजूचे लोक या values  बनवायला मदत करतात.... 


नकारात्मक कंपन जशी negativity निर्माण करतात तशीच सकारात्मक कंपन positivity निर्माण करतात... ....पत्र किंवा ई-मेल जशी योग्य पत्त्यावर जाते तशीच ही न दिसणारी कंपन किंवा लहरी योग्य माणसापर्यंत जाऊन पोचतात...त्यामुळे

समोरचा कितीही नकारात्मक ऊर्जा देत असला तरी तुमची सकारात्मकता अशी वाढवायाची आहे की तुमच्याभोवती  तुम्ही निर्माण केलेल्या सकारात्मक ऊर्जेचे एक कवच तयार होईल... थोडक्यात तुमचा aura strong करायचा आहे.... भावनिक प्रतिकारशक्ती वाढवायची  आहे आणि हे  तुमच्यावर अवलंबून आहे..


So called.... forgive and forget


माणसांमध्ये वाद होतात, फसवणूक होते,मानपानाचे प्रसंग येतात, अपमान होतो, कोणी वापरून घेत, मारहाण करत, आमच्या मनात काहीच नाही म्हणत कोणी वागण्यातून किंवा नजरेतून तुम्हाला नाकारत , टाळत ,कोणी मनस्वी वागत, कोणी भयाण रागीट व्यक्त होत. कोणी गृहीत धरत, छळ करत.... 


अनेकदा चढाओढ असते दोन भांवडात , जावाजावांमध्ये किंवा इतर काही नात्यात की कोण मदत करतंय... यासाठी पुढे होऊन काम करणं आणि त्याच credit स्वतः च्या पारड्यात पाडून घेणं असेही प्रकार अनेक ठिकाणी दिसतात.... काम करताना, मदत करताना मनातला मूळ भाव मदतीचा नसतोच  तर चढाओढीचा असतो,credit मिळवणं आणि मी किती चांगली आहे किंवा चांगला आहे हे दाखवायचं असत......कृतीमागचा  विचार गढूळ असतो त्यामुळे त्या गढूळ विचारांचे परिणाम तसेच असमाधानकारक मिळतात....

मग मी किती केलं याचा हिशोब सुरू होतो आणि विचारचक्र गतिमान होत... नकारात्मक कंपन वेगाने फिरू लागतात...चरफड होत रहाते, असमाधानी वातावरण तयार होऊ लागत...


अशा घटना घडल्या की माणस कशी वागतात...

तर

काही माणसं सगळं सोडून द्या विसरा अस म्हणतात आणि चांगले संबंध राहतील असा प्रयत्न करतात....काही वेळा असेही विचार मनात येतात जाऊ दे माफी मागू .... माफी मागून काही आपण झिजत नाही… नात महत्वाचं.... पण अस कितीही मनाला समजावलत तरी चूक नसतांना माफी मागता तेंव्हा ते नात जाणीवपूर्वक टिकवण चालू असत. आपण कसेही वागलो तरी समोरचा चालवून घेतो याची मग त्या नात्याला सवय होते. गृहीत धरण चालू होतं....यात समजून घेणाऱ्यांवर  खूप ताण येत असतो..

खरंतर अस करताना यापैकी निम्याहून जास्त माणस मनात आत तडफडत असतात.... त्या त्रासामुळे मनात प्रचंड संवाद चालतो... मनात त्या माणसाला समोर उभा करून सगळं फाड फाड बोलायची सवय लागते . तोंडावर बोललात काय आणि मनात बोललात काय ...सारख्याच तीव्रतेच्या नकारात्मक लहरी तयार होतात. त्या आपण स्वतःसाठी तयार करतो आणि समोरच्यासाठी सुदधा.... ती माणस समोर आली की एक न सांगता येणार pressure जाणवत राहत...त्यामुळे  मग आपलयाला सतत राग येतो, चिडचिड होते,समोरचा गृहीत धारतोय हे कळून अजून  मानसिक ताण येतो, दुःखी वाटत, निराश वाटत. 

अशी नाती तोंड देखली संभाळण्यात , वाईट वाटून घेण्यात आपली खूप शक्ती खर्च होते. या नात्यांच हे ओझं सांभाळायचं का उतरवायाच    ...?


माझे सगळ्यांशी संबंध आहेत.... माझी कित्ती माणस आहेत हे बाहेरच्या दुनियेला दाखवणं हा दिखाऊ छंद खूप लोकांना असतो... हा छंद जोपासण अनेकदा अवघड  झालेलं असत.... तरी हट्टाने तो जोपासायचा असतो

कोणाकोणाच काय काय धरून ठेवायचं.... अस झालं तर कोणाशी संबंधच ठेवायला नको हा विचार आपण मनाला सांगत रहातो ....पण काही माणसं अगदी नकोशी झालेली असतात...मनाला खूप ताप होतो... मनस्ताप....करतोय तो अट्टाहास खूपदा स्वतः साठी जाचक होतो....

सगळं मन या नकोत्या विचारांनी, माणसांनीच आपणच  सतत भरून टाकतो...कोण कस वागलं.... किती त्रास झाला... मी अस बोलायला हवं होतं... वेळीच खोड मोडायला हवी होती.... जागा दाखवायला हवी होती.... खोटा दिखावा उघडकीस आणायला हवा होता... पुढे पुढे करणार हे पण आत आम्ही मरायचं..इतक केलं मी यांच्यासाठी पण जाणीव नाही त्यांना..

एखाद्या वेळेस नाही जमल तर लगेच कोणीतरी रुसून बसत... म्हणजे इतके दिवस कष्टाने केलं ते एका क्षणात शून्य झालं... इतके कसे हे कृतघ्न..मनातली बडबड सुरू

पाठ वळली की  gossiping करण हा अजून एक छंद.

नकोसे असले तरी विचार करून करून आपण या नात्यांशी घट्ट बंध तयार करतो....कारण ही माणसं समोर नाही तर चक्क तुमच्या आत, मनात ठाणं मांडून बसतात...   बंध चांगले असोत किंवा वाईट ते बंध आहेत ,ते हिशोब आहेत ते मोकळे करण्यासाठी पुन्हा दोघांनाही समोरासमोर यावं लागणार .... कदाचित याच जन्मात किंवा नंतर कोणत्यातरी आयुष्यात... विचार करा .... जे नको आहे तेच का कवटाळतोय..... त्यांनाच पुन्हा भेटायच booking का करून ठेवतोय!!


अजून एक मोठा अडथळा असतो...

लोकं काय म्हणतील ....या लोकांच्या विचारात तर अनेक जण काय काय  करतात…मुळात लोक बोलण्यासाठीच असतात...चुका काढायलाच त्यांना कामावर ठेवलं असावं असे वागतात.. तुम्ही काहीही केलत तरी त्यात चुका शोधण्याची कला त्यांना अवगत असते.... त्या चुका काढून तुमचं भावनिक खच्चीकरण करण हा या लोकांचा विरंगुळा असतो....


प्रत्यक्षात परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कोणीही येत नसत.....कोण सोबत असत तर ....अगदी तुमची असतात ती 4- 5 माणस आणि खूप महत्वाच म्हणजे....स्वतः तुम्ही....

त्यामुळे  तुम्हाला वाटेल तो योग्य निर्णय  घ्यायचा.... तो घेताना योग्य , अयोग्य किंवा  चूक , बरोबर विचार कसा ठरवायचा तर

 माझ्या निर्णयामुळे समोरच्या व्यक्तीच आर्थिक, शारीरिक किंवा भावनिक नुकसान होणार असेल आणि तुम्ही स्वतः चा निर्णय बदलून तुमचं फारस नुकसान होणार नसेल म्हणून तुम्ही तुमचा निर्णय बदलणं योग्य आहे...

 पण तरी केवळ हेकट पणा , माझंच खर , दुसऱ्याला त्रास झाला तर त्याच नशीब असा विचार  करून तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहिलात तर ते अयोग्य आहे ,चूक आहे... त्यामुळे विवेकनिष्ठ विचार करा ....

 स्वतः ची जीवनमूल्य तपासा....आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या.... 


लोकांचे विचार, मतं कानाने ऐका.... जर मनाला योग्य वाटल तर appreciate करून स्वीकारा...पण

लोकांच्या टोमण्यांचा, फाजील बंधनांचा, दबावाचा, बिनबुडाच्या मतांचा अजिबात विचार करू नका.....आणि ते ऐकलं नाही म्हणून guilt बाळगू नका..... जे कराल ते पूर्ण समजून उमजून करा...


 थोडक्यात अशा सांभाळलेल्या नात्यात  आपण मनात खूप काही धरूनच ठेवलेलं असत  ...फक्त दिखावा वेगळा करत  असतो की मी सगळं सोडून दिलाय ...समोरच्या माणसाशी आपण बोलत आहोत म्हणजे त्याला माफ केलेलं असत अस अजिबात नाही....

 पण जग रहाटीनुसार यालाच  forgive and forget मानलं जातं  कारण बाहेर forgive and forget चाच show चालू असतो. बाहेर कीर्तन आणि आतून तमाशा.....


समंजस पण गोंधळलेली 


काही माणस पटकन react होणारी असतात....या माणसांचा प्रगत मेंदू  विकसित असतो पण भावनांवर ताबा नसतो.परिस्थितीच आकलन पटकन होत नाही. त्यांना भावना जाणवू शकतात त्यामुळे ही माणसं   समाजवून सांगितलं तर  ऐकतात ...म्हणून समजावून सांगा .. शांतपणे , एकटं असताना समजावलं तर हे लोक ऐकतात.समजून घेतात....

नाती घरातली असतात तेंव्हा हे असे विसंवाद वारंवार होऊ शकतात  ...तरी इथे  मुळात माणूस म्हणून 'ती  व्यक्ती 'सौम्य आणि समंजस असते  , तुमच्यासाठी असणार तीच प्रेम, काळजी तुम्हाला  इतर वेळेस जाणवत असते त्यामुळे तुमच्या मनात या व्यक्तीसाठी फार काळ राग राहत नाही.... हे विसंवाद , मतभेद निवळतात... इथे होत ते forgive and forget.


पण बोलताना कायम थोडी काळजी घ्या... agressive होऊ नका, ठासून बोलू नका.... समोरची व्यक्ती समंजस आहे पण आत्ता गोंधळलेली आहे अस असेल तर थोडा वेळ जाऊ द्या.. हे बोलणं,सांगण  एकदाच करा.... काहींना हे परत परत बोलत राहायची सवय असते.. जुन्या चुकांचे हिशोब उगाच  मधेच काढायची मांडायची सवय असते... यामुळे समोरची व्यक्ती ऐकायच्या किंवा बदल करायच्या मनस्थितीत येत असेल तरी या जुन्या हिशोबीपणामुळे  वाकड्यात जाते....पटलं तरी बदल नाकारते....समजावताना बोला पण फक्त आणि फक्त आत्ताच्या घटने बद्दल....


वेळ द्या वेळ घ्या


घटना घडत असेल किंवा विसंवाद होत असेल त्यावेळी अजून एक करा.... इतकच सांगून थांबा की मला याबद्दल बोलायचं आहे पण आज  बोलायला नको ....उद्या बोलू.... थोडा वेळ गेला की सगळच शान्त होत... खरंतर एक रात्र उलटली .... सकाळ झाली की  आपले विचार त्याची तीव्रता आपल्यालाच निवळलेली वाटते... घेतलाय  कधी असा अनुभव ....? स्वतःच्या या  अनुभवाची नक्की अनुभूती घ्या ...आपण आणि समोरचाही मिळालेल्या वेळात विचार करतो... कधी कधी प्रत्येकाला नक्की कुठे चुकल हे कळत.... विषयाचा गुंता सुटायला प्रत्येकाच्या मनातच सुरुवात होते....त्यामुळे विसंवाद संपून एकमताने निर्णय होतो किंवा  निर्णय पटला नसेल तरी निर्णय न पटलेली व्यक्ती त्रास देत नाही.... सहकार्य करते.... 


Ego... हेकट माणस


काही ठिकाणी हा समजूतदारपणा, समज  समोरच्यात नसते ....छोट्या छोट्या विषयात  तिरसट  वागणं चालू असत. व्यक्ती हेकेखोर, स्वकेंद्रित असतील अहंकारी असतील, वाद घालून आकांत करत असतील तर त्या नात्यांची कुरबुर आपण स्वतः च्या मनाकडे सतत करत असतो.कारण आपल्या मनाला सतत वेदना होत असतात....


 ही माणसं अनेकदा खूप शिकलेली, खूप चांगल्या पोस्ट वर नोकरी करणारी, खूप पैसे कमवत असणारीही असतात  आणि जोडीला  स्वकेंद्रित अहंकारीपणा अस combination असत...अशी बरीच माणस आसपास असतात.... इथे मोठी कसोटी असते.... 

 इथे यांचा हुद्दा , शिक्षण किंवा श्रीमंतीचा विचार करून यांना इतकं कस कळत नाही अस आपण कायम म्हणतो पण मुळात कोणत्याही माणसातील कला, शैक्षणिक पात्रता, आर्थिक स्थिती त्या माणसातून वजा केली की जो माणूस उरतो तो कसा आहे हे खूप महत्त्वाचं असत.... कोणी चित्रपटात काम करत.... प्रसिद्ध होत.....कोणी  उत्तम गात, कोणी वाद्य वाजवत, कोणी छान खेळाडू असत,कोणी डॉक्टर असत,  कोणी उत्तम कविता करत, कोणी उत्तम businessman  असत.... या सगळ्या कला आहेत.... चांगल्या क्षमता आहेत...एखाद्या व्यक्तीची कला आवडली की तो अख्खा माणूसच आपल्याला आवडतो अस आपण म्हणतो..... अस नसत..... त्या माणसातली ती कला आपल्याला भुरळ घालते.... इतर वेळेस तो कलाकार माणूस असतो जो तुम्हाला आवडेलच असा अजिबात नाही.....त्यामुळे हे समजून घ्या की आपल्याला त्या माणसाची कला आवडते तो माणूस म्हणून कसा आहे हे अनुभवायला मिळाल ,सहवासात रहाता आल तर तो संपूर्ण माणूस आवडतो अस कदाचित म्हणता येईल...एखादी व्यक्ती बॉस म्हणून छान असते पण घरची माणस त्याला खूप वैतागलेली असतात.मित्रमंडळी फारशी नसतात...

हे जस चांगल्या बाबतीत असत तसच एखादी व्यक्ती एखाद्या विषयात विचीत्र वागत असेल तर आपण आख्खा माणूस वाईट ठरवतो..... ज्या विषयावर अनुभव येतो तेवढ्याच बाबतीत मत मांडल तर.....काय वाटत.... ?

तुमचा कदाचित त्याचविषयासाठी संबंध येत असेल म्हणून तुम्ही त्या माणसाला काही अंतरावर ठेवणार आहात..तुमच्यामधल भावनिक  transaction प्रमाणात ठेवणार आहात...  हा वेगळा विचार आहे... पण तुमच्या काही अनुभवांवरून त्या संपूर्ण माणसावर शिक्का मारु नका....


आपल्या आसपास अशी हेकेखोर  व्यक्ती असेल तर लक्षात येईल की समोरची माणस दबलेली असतात.....सहन करत असतात.... आणि यांच्या सहन करण्याची आजूबाजूच्या माणसांना सवय झालेली असते....त्यांना फक्त मनात आरडाओरडा करायची परवानगी असते.... 

सहसा  या मनात बोलणाऱ्यांची बाजू समंजस किंवा कमकुवत असते.....adjustment म्हणून किंवा वाद नको म्हणून ही माणस सहन करतात... पण मनात अस्वास्थ्य असत.... खूप त्रास होतो असतो.. मग नकारात्मक लहरींची सतत देव- घेव सुरु होते

.... हा न दिसणारा व्यवहार आत्मिक पातळीवरही होतो. त्याचे ठसे  कायम साठी उमटत राहतात.स्मृती बनतात ,नकारात्मक  बंध मजबूत होत जातात. मनात कटुता वाढत जाते..

त्या माणसाचं केवळ समोर असणं हे सुध्दा त्रासदायक होत… अशा नात्यात प्रेम उरत नाही सगळं यंत्रवत होत.... स्वीकारलं किंवा स्वीकारलं नाही तरी ते नात तसच राहणार हे कुठेतरी पक्क कळायला लागत ... तरी..समोरच्यात बदल होण्यासाठी प्रयत्न केले जातात , खूप वाद घातला जातो किंवा मनात शिव्याशाप दिले जातात... आणि हे करून करून अखेर जीव थकून जातो....   


बदल पण.... असा...


मग काय करायचं तर

समोरचा बदलणार नाही हे जे पक्क समजलंय ते पाहिलं स्वतः स्वीकारायच...डोक्यात fix करायच...

स्वतः च्या प्रकृतीत नसणार काहीही करण म्हणजे बदल करण अवघडच असत.....Empathy  ही भावना विकसित असेल तर दुसऱ्यासाठी स्वतः बदलण सोप जात....

पण इथे स्वभाव हट्टी असतो  ,सामंजस्य नसत त्यामुळे तो बदल करण त्या व्यक्तीसाठी जास्त अवघड असत....  अशक्यच म्हणा ना ....चांगल किंवा वाईट हा विचार इथे नाही सांगायचाय ..... कारण हे चांगल किंवा वाईट समजण्याची क्षमता त्या माणसात नाहीये ...त्यामुळे सर्व बाजूंनी केलेले प्रयत्न असफल झाल्यावर ...थांबा...अशा अहंकारी माणसामधे बदल व्हावा ही अपेक्षा आता आपण करणार नाही हे स्वतः ला सांगायचं....

 

 आणि आता काय करायच तर स्वतः मध्ये बदल..

 हो.... पण हे करताना स्वतःला दोष द्यायचा नाहीये.....अनेकदा स्वतः ला कमी लेखल जात.....ते बिलकुल करू नका....स्वतःची नकोशा विचारातून सुटका करण्यासाठी अलिप्त होण, detatch होण हा एक मार्ग आहे ... तुमची हार नाही...त्या माणसाला  सुधरवण ही तुमची जबाबदारी नव्हती आणि नसेल...

या प्रक्रियेत स्वतः स्वतःसाठी काळजी आणि आदरभाव बाळगला नाहीत तर हे अहंकारी लोक आणि आजूबाजूचे लोक तुम्हाला संपवतील... कारण तुमची energy level  स्वतःला कमी लेखण्याने क्षीण होणार आहे .... तुम्ही कोमेजून जाल.... अगतिक व्हाल....भावनिक प्रतिकारशक्ती सशक्त राहील असे प्रयत्न करा....


सक्षम तो टिकेल हा डार्विनचा सिद्धांत मनाच्या खेळासाठीही लागू पडतोच...त्यामुळे अलिप्त होण्याचा निर्णय घेतलात तरी हा बदल स्विकारताना मन सक्षम करायच आहे.....  स्वतःमधे स्वतःसाठी बदल करतोय हे ध्यानात ठेवा...या बदलांमुळे तुमच्या मेंदूमधील neurons विकसित होतील...तुमच्या क्षमता वाढतील... Resilience  वाढू लागेल...


किमान स्वतः मधील बदल करण तुमच्यावर अवलंबून असेल .... बदल करण अवघड असलं तरी अशक्य नाही...काय बदल कराल...??


 तर वाद घालून, भांडून, चिडचीड करून काहीही निष्पन्न होत नाही हे जर आता कळलं असेल तर  नकारात्मक लहरींच गाठोडं रिकामं करायला सुरुवात करा...... नात यंत्रवत रहाणार .....हो यंत्रवतच..राहूदे

 हरकत नाही ..निराश व्हायच नाही....सगळ स्विकारायच.... मनापासून...

 समोरचा विक्षिप्तच व्यक्त होणार हे गृहीत धरून वागा.....मनातून  पूर्ण अलिप्त व्हा

 नको वाटणाऱ्या  या माणसामधली भावनिक गुंतवणूक बंद करा....यासाठी  react होणं बंद करा ... respond पण कमीतकमी करा. कामापुरता संवाद ठेवा.  शक्य तेवढं दुर्लक्ष करा...कोणत्याही परिस्थितीत वाद घालू नका. विषय मनस्ताप देईल अशा मार्गवर जाण्याची चिन्ह दिसली की स्वतः ला सावध करा .....  अशा माणसांशी कसही बोललात तरी त्यांचा हेका अंतिम राहतोच .......

  या तुमच्या non reactive दृष्टिकोनामुळे तुम्हाला निर्माण होणाऱ्या घटनेचे परिणाम भोगावे लागणार आहेत असं कधीतरी वाटू शकत तेव्हा हा विचार करा की बोलून, वाद घालून परिणाम बदलतात का ??? 

जर बोलून , वाद घालूनही बदल होत नाहीत तर मग react न करण सुखाच होऊ शकत का....??  अगदी आतून अलिप्त होणं स्वस्थता देईल का ...? विचार करून बघा. हे सोईस्कर आहे का?????मनातल बोलण, बोल लावण हे ही बंद करायचा प्रयत्न करू या... यासाठी स्वतः च्या मनाला इतर कामात गुंतवा....


जेंव्हा ही विक्षिप्त माणस  थोडीशी लांबची पण महत्त्वाची असतील आणि तुम्हाला त्यांच्या निर्णयामुळे परिणाम  भोगावे लागणार असतील आणि जर जबाबदारी घेण्याची  तुमच्यात हिंमत असेल , तुमच्यात  resilience असेल तर काहीही  बोलू नका..पण तुम्हाला हवं तेच करा... तस केल्यामुळे समोरचा   नंतर वाट्टेल ते बोलणार आहे हे लक्षात ठेवा....तेंव्हाही काहीही बोलू नका.... ते ऐका आणि सोडून द्या...तुमच्या क्षमता यात वाढतील.  तुमच्यावर वर्चस्व दाखवता आल नाही म्हणून ही स्वकेंद्रित व्यक्ती तुमचा स्वाभिमान ठेचायचा प्रयत्न करेल....पण  कोणत्याही टप्प्यावर मनस्ताप करून घेऊ नका.guilt येऊ देऊ नका.... पश्चाताप होऊ देऊ नका.....अशा माणसासोबत वागताना कृतीपूर्ण शांतता खूप बोलकी ठरू शकते..

परिस्थितीतून धैर्याने बाहेर पडण्याची क्षमता आपल्यात असली तरी तशी अवघड परिस्थिती आल्यानंतरच त्याची जाणीव आपल्याला होते.... आपण असे वागू शकतो हे आपल्यालाही प्रथमच कळत...त्यामुळे स्वतःला  संधी द्या... स्वतःचीच कदाचित नव्याने ओळख होईल .... तर  स्वतः ला संधी देण्याच मनोबळ असेल तर नक्की द्या..।


जेव्हा ही अहंकारी माणस घरातली किंवा जवळची नातलग असतात तेव्हा घरातले काही लोक या माणसांना सहन करत असतात.. अनेक वर्ष सहनशील रहातात.... यांच्या सहन करण्याची त्यांना स्वतः ला सवय लागते आणि आजूबाजूच्या लोकांनाही लागते.... पण कधीतरी असह्य करणारा क्षण येतो आणि सहन करणारा प्रतिकार करतो...स्वतः च्या मनाशी नीट बोलून निर्णय घ्या...सर्व परिणामाना तयार रहा..... तुमच्या अनोळखी वागण्यामुळे एक परिस्थिती निर्माण होणार आहे.....विचार करून  पण नेहमी पेक्षा वेगळी प्रतिक्रिया देणार आहात.. त्यामुळे नंतरही आत्मविश्वासपूर्ण शांत रहाण्याची तयारी ठेवा.... 


 या सहनशील लोकांच हे प्रतिकार करण आजूबाजूच्या अनेक लोकांना आवडत नाही... कारण ते त्यांच्या सोईच नसत...त्यांच वर्चस्व संपत, त्यांच गुलाम होण कोणीतरी नाकारतय म्हणल्यावर मग ही माणस या सहनशील माणसांच मानसिक खच्चीकरण करायचा प्रयत्न करतात... पण सतत सगळ्यांना स्पष्टीकरण देत बसू नका.... या वेळी जर ही सहनशील माणस निभावून नेऊ शकली तर स्वतः मध्ये असणाऱ्या अनेक क्षमतांची त्यांना ओळख होते.... मी अस कधीच केलेल नाही अस वाटत असल तरी हे लक्षात ठेऊ या की प्रसंग घडला कीच माणस कळतात, आपणही स्वतःला कळतो.... आणि नवीन काही करायच तर पहिली वेळ कधीतरी येतेच.... त्यामुळे स्वावलंबी व्हा, आत्मनिर्भर व्हा आणि लोकांनाही  करा....


Resilience  प्रत्येक माणसात असतो... पण प्रत्येक माणूस तो आजमावून बघू शकतो अस नाही....

काही जणांमध्ये  त्यांना विचार पटत नसले , मार्ग पटत नसले तरी प्रत्यक्षात जबाबदारीने कृती करण्यासाठी स्वतःच्या comfort zone मधून बाहेर येण्याची ताकद नसते, सवय नसते ,   होणारे परिणाम भोगण्यापेक्षा विरोध न करण सोप वाटत.....

अस असेल तर जे होतंय ते  फक्त बघा... आणि स्वीकारा.. तुमची ही भावनिक स्थिती तुमच्या देहबोलीतुन  फक्त दिसू दे. 

हे अस का तर स्वतःच्या क्षमता काही बाबतीत नाहीत आणि त्या तोडून बघण्याची ... कधी कधी त्यात चुका होतात तेंव्हा त्याची जबाबदारी घेण्याची  तयारी तुमची नाही म्हणून..चुकांमुळे आजूबाजूची माणस खूप कचकच करतील पण त्या चुका हा एक अनुभव आहे..   तो स्वतः च्या प्रगतीमधील भाग आहे  अशा प्रकारे बघण्याची ताकद तुमच्यात नाही. त्यामुळे दुसऱ्याकडे जे करण्याची क्षमता आहे ते तो करणार हे स्वीकारावं लागणार....त्याला हवा तसा विचार करणार.. कधी कधी ते agressive, dominating, त्रासदायक अस वागणं असू शकत. पण आपण जर जबाबदारी घेऊ शकत नसू तर गप्प रहाण्याशिवाय इलाज नाही पण मग हा निवडलेला पर्याय  १००%  स्वीकारा .... सल्ले देऊ नका, चिडचिड करू नका...  मनस्ताप करून घेऊ नका...


 काही माणसांमध्ये काही वर्षांपूर्वी खूपदा विसंवाद झालेले असतात... कदाचित अनेक विषयांवर मतभेद, अपमान झालेला असतो.... त्या त्या वेळेला आपापल्या क्षमतेनुसार आपण तो विषय हाताळलेला असतो.....अशा माणसांची कधीच भेट होणार नाही अशा प्रकारे नात संपत तेंव्हा कधी कधी थोड सोपं असत , पण  कधीकधी ही माणसं घरातली असतात.   जुन्या जुन्या अनुभवांना कवटाळून बसणारी माणस वर्तमानकाळात  सर्वांचच जगण भिषण करतात..... तेच तेच जुने झालेले प्रसंग उगाळत राहतात... मी किती सोसलं हे सांगत राहतात.... ती परिस्थिती बदलली , समोरच्याला काही प्रमाणात शहाणपण आलेल असत किंवा ते कधीच येणार नाही हे  कळलेलं असत तरी या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सतत टोचत राहतात....

 खरतर योग्य अंतर ठेवून हसत खेळत जगणं शक्य असतं ....पण जुन्या  परिस्थितीत समोरची व्यक्ती जे वागली त्यातून त्या व्यक्तीची  आणि स्वतः ची सुटका  ही भूतकाळात जगणारी, रमणारी माणस होऊ देत नाहीत.... यामुळें त्यांच्या शरीरात आणि ते राहतात त्या जागेत प्रचंड नकारात्मक उर्जा निर्माण होते... ती त्यांच्यात आणि समोरच्यात विकार निर्माण करते.... आजार निर्माण करते ...

 जी व्यक्ती त्रासदायक वाटत आहे तिलाच तुम्ही दोन्ही हातानी घट्ट धरून ठेवलं आहेत....त्याच व्यक्ती समोर तुम्ही  जणू बसून आहात.... त्या व्यक्तिशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करायची तुमच्याकडे उसंत नाहीये....

 बाकी कित्ती  छान माणस आसपास असली तरी तुम्हाला दुसर कोणीच नकोय .... आणि तीच व्यक्ती हवी आहे जी खरंतर नको आहे... गम्मत आहे मनाची....अस करू नका....यातून बाहेर यायला हवं ना... यासाठी स्वतः वर काम करूया

भूतकाळातली परिस्थिती संपली हे स्वतःला सांगा.... वेदना अपमान भूतकाळात जमा झालाय.. आलेला अनुभव विसरू नका .....पण चघळतही  बसू नका.... 

 वर्तमानात सोबत असणाऱ्या किंवा संपर्क येणाऱ्या  त्या व्यक्तीबद्दल कोणतीही कटुता, नकारात्मकता न ठेवता  सावध आणि पुरेस आनंददायी वागणे ठेवण्याचा प्रयत्न करूया...या मुळे समोरच्याला काय फायदा होईल या पेक्षा तुम्ही मोकळे होणार आहात हे खूप महत्वाच आहे.... 

 पुढच्या आयुष्यात जुन्या घटनांमधील अनुभवांचा ref म्हणून  नक्की वापर करा...अहो

शिकलेल कधी विसरायच नसतच... पण नकारात्मक पद्धतीने चघळत पण बसायचं नसत... चघळण बंद करू या...


काही माणसं आपण निवडतो.... आपल्या विचार लहरींच्या freq नुसार आपोआप ती आपल्या संपर्कात येतात. ऊर्जेच्या लहरींचा खेळ जादूचा आहे.

 दिसत काही नाही तरी घटना घडतात.

 काही नाती मरेपर्यंत साथ देतात त्या नात्यांना expiry date नसते. मधासारखी, मद्यासारखी ही जेवढी जुनी होतात तेवढी मुरतात.

 काही माणस पहिल्यापासूनच डोक्यात जाणारी असतात . ही माणसं  एखाद्या ग्रुपचा भाग असतात किंवा नातलगांच्या गोतावळ्याचा भाग असतात.... या नात्याचं आयुष्य फारस नसतंच... ही नाती खुरडत   खुरडत  पुढे जात असतात.....

 अशीच काही माणसं, काही नातलग , काही जवळची नाती कधीकधी काही काळासाठी येतात. ....या नात्यांची काही काळाने expiry येते....

 

 

काहींच्या बाबतीत काहीतरी निमित्त होत , वाद होतात..अशा नात्यात आनंद आणि समाधान कमी पण तडजोड आणि तडफड जास्त होऊ लागते ..अशी नाती डोक्यातून खाली उतरवायला शिका.... त्या माणसांबद्दल मनातून सगळंच काढून टाका आणि कायमचा राम राम करा.....पण तो good bye असायला हवा....यातला good शब्द अर्थपूर्ण आहे.... बळजबरीने धरून ठेवलेलं नात दोन्ही बाजूंना तणाव निर्माण करत असत... त्या माणसांबद्दल असणारा राग, चिडचिड संपवा.. इथे खरच थांबायला शिकावं.

रेश्मा जोशी 

 

 क्रमशः

[08/03, 20:17] +91 96735 08955: माफ करा आणि विसरा किंवा माफ करा आणि त्या माणसालाही विसरा ...भाग २


Long post


expiry झालेले पदार्थ वापरायचं ठरवलं तर काय होईल..... तब्येत बिघडेल..... हो ना.?

 मग जो नियम शरीरासाठी तोच मनासाठी लावताना मात्र व्याप होतो.... घुसमट होते ...बरोबर ना?

म्हणून हळूहळू शांतपणे बाजूला व्हा... आणि थांबा.काही कॉमन गृप मुळे नुसते समोर आलात तर ओळख द्या... वातावरण तुमच्या साठी हलक राहिल..... पण नात संपलेल असेल..... Transaction  होणार नाही....

 

नात्यात थांबायचं असेल तर अवघड कधी वाटत....?


तर नात नातलग मंडळींशी असेल तर लोक काय म्हणतील या विचाराचा मोठा अडथळा असतो ...किंवा नातलग असल्याने कोणत्या ना कोणत्या समारंभात भेट होणार आणि मग akward होणार ..... मनात आरडाओरडा चालू असतो किंवा पूर्वी खूप छान क्षण अनुभवले असतील पण काळाने, परिस्थितीने सगळं बदलत जात तेंव्हा काही नात्यात अवघडलेपण येत.....  तिथे थांबताना पाय अडखळतो...


अशावेळी चक्क लिहून काढा....  लिहिताना डोळे, मन हात एकत्र काम करतात... त्या ठरावीक विचारासाठी आपण खास बसतो आणि सर्व बाजूंनी विचार होऊ लागतो... आपण लिहितो ,वाचतो .... खोडतो.... परत लिहितो ...पण  या प्रक्रियेत  विवेकनिष्ठ आणि स्वतःच्या क्षमतेला योग्य असा निर्णय  बाहेर यायला मदत होते....थांबताना केलेली अशी  process नंतरचे मनावरचे ताण नक्की कमी करते ...अस थांबताना समोरच्याला लिहून कळवा....बोलून  सांगा.....जो मार्ग सोईचा वाटतो तो वापरा आणि कळवा की आपण थांबतोय..... लिहीताना , बोलताना भाषा योग्य वापरा.... समोरचा कसा चुकला हे सांगू नका.... कारण नात टिकवायच असेल आणि पुन्हा त्रास होऊ नये म्हणून संवाद- विसंवाद करायचे असतात.... पण तुम्ही थांबणार आहात.....हे लक्षात ठेवा...तुमच्या मनातली घालमेल , तडफड  तुम्हाला नको आहे .... म्हणून थांबताय एवढच कळवा.... शुभेच्छा द्या... आणि मनाची पाटी कोरी करा...न कळवता थांबलात तर चुकीच्या समजांमुळे भावना  दुखावल्या जातात.. द्वेष भावना वाढते... म्हणून कळवा...आणि थांबा..


समोरच्याने काय केलय हे त्याला बरोबर ठाऊक असतं..... तो हे स्विकारतो.... 

 पण जर समोरच्या व्यक्ती ने विचार केला आणि संपूर्ण जाणिवेतून नात संपू नये यासाठी ती व्यक्ती समोर आली किंवा प्रयत्न करू लागली तर मागच्या कोणत्याही गोष्टींचा चोथा चघळत न बसता सावध राहून नात्याला संधी देऊ शकता... अर्थात  तुमच्या मनाचा आतला आवाज ऐका.... आणि उत्तर नको आल तर थांबा....मला थोडा वेळ हवाय अस समोरच्या माणसाला सांगा..... आणि थांबा...इथे आपण अहंकारी वागतोय अस कदाचित वाटेल...तुम्हाला आणि समोरच्यालाही.... पण हा अहंकार नाही...पुन्हा पुन्हा तसेच अनुभव घेण्याचा आणि नंतर होणाऱ्या तगमगीचा थकवा येतो.... तो नको म्हणून थांबायच असतं...स्वतःला समजून घ्या.... स्वतः ला कमीत कमी नकारात्मकता येण्यासाठी जे  स्वतः ला सुखकर वाटत, योग्य वाटत ते ठरवा....


नकारात्मक लहरी, भावनांचे आवेग संपावेत...आणि स्वतः ला मोकळ करता याव यासाठी काम करू या


 ..... २१ दिवस रोज काही मिनिटे शांत बसा.... त्या माणसाच नाव घ्या..... त्यांना मिटलेल्या डोळ्यांसमोर आणा..त्यांना माफ केलय सांगा..... त्यांचं सगळ चांगलं होईल अशा शुभ इच्छा द्या... माझही सगळं छान होणार आहे हे ही बोला...ही विचार कंपन रोज निर्माण झाली की ती काम करतात हे अनुभवास येईल...

पुढे आयुष्यात परत समोर आलोच तर हसून ओळख देता येईल इतपत भावना चांगली करा...या पुढे कोणतीही वाईट भावना त्यांच्यासाठी तुमच्या मनात नसेल....त्यांचे ते सुखी आणि तुमचे तुम्ही सुखी....  ऋणानुबंध संपला... स्वीकारा आणि शांत व्हा...बाहेरून आणि आतूनही


 

काही नाती नकोशी होतात पण सोडता येत नाहीत, दूर करता येत नाहीत ...ही सहसा घरातली माणस असतात

अशा नात्यात   नात अलिप्त पणे चालू ठेवण्यासाठी हीच process करता येईल... पण ती रोज करावी लागेल.... अलिप्तपणा आणला तरी ती व्यक्ती सतत संपर्कात असते...घटना घडत राहतात.... भावना निर्माण होत राहतात...म्हणून  मग निर्माण होणाऱ्या भावना लवकरात लवकर मुळातून शान्त करण महत्वाचं काम आहे.... रोज  झालेल्या परिस्थितीसाठी समोरच्याला मनातून  सुरक्षित अंतरावर ठेवा.....तटस्थ व्हा...अलिप्त रहा... Detatch व्हा. काही शिकू शकत असाल तर शिका... भविष्यात हे शिक्षण वापरात आणता आलं तर वापरा.....स्वतःची कीव करू नका....

मनाला training द्या.... ते तयार होईल .... दगडावर डोक आपटू नका..... तुमच डोक वाचवा.... इतर कामात गुंतवा

नित्यनियमाने आणि consciously केलेली कृती मनात छान रुजते...उपयोगाच आहे हे... करून बघा... सातत्य आणि सजगता मात्र  नक्की राहील हे ठरवूया...


तसच  काही नीट हाताळल्या तर ताणतणाव कमी निर्माण होतील....

१ एखाद्या विषयात तुमचा संबंध नसेल तर नातलग मंडळींमध्ये उगाच मधे पडू नका..... गप्प राहून बघा....


२ समोरच्याने तुमची मदत मागितली तर नक्की मदत करा पण हवी तेवढीच मदत करा..... उगाच आपल्या मदतीची गरज आहेच अस स्वतः च ठरवून टाकू नका...


३ स्वतःहून मदत करायची इच्छा झाली तरी प्रत्यक्ष कृती करण्याआधी समोरच्याला खरच मदत हवी आहे आणि ती आपल्या कडून हवी आहे का हे विचारा.....


४ एखाद्याने मदत मागितली...तुम्ही ती करायला  लागलात आणि लोक मदत करु नका म्हणाले तरी मग अशावेळेस मागे हटू नका.... अशा कठीण प्रसंगात ठाम रहा.... मदत मागणारा अडचणीतून सहीसलामत बाहेर येईपर्यंत साथ द्या....

असा मदत मागणारा अनेकदा शब्दात नाही पण वागण्यातून सांगतो की त्याला मदत हवी आहे...अगतिकता दिसत असते.... अशावेळी डोळे झाक करणारी, अंगाला लावून न घेणारी, कातडीबचाव माणस  दिसतात...ही माणस बहुतांश वेळा स्वकेंद्रित असतात.... 


५ एखादी जबाबदारी पार पाडायला मनापासून जमणार असेल तरच हो म्हणा....जमणार नसेल तर नाही म्हणायला शिका.....  प्रत्येक वेळेस प्रत्येक जबाबदारी पार पाडता आलीच पाहिजे याचा ताण स्वतः ला देऊ नका....


६ तुम्ही काही मदत मागितलीत , काही विचारलत आणि समोरची व्यक्ती नाही म्हणाली तर रागवू नका..... नाही पचवायला शिका.....


७ स्वतः स्वतःला respect द्या तरच लोकही तुमच्याशी  नीट वागतील...स्वाभिमान आणि अहंकार यातील रेष धूसर असते ती  मात्र नक्की सांभाळूया...


८ परिस्थितीमूळे निर्माण झालेला माणसांमधील ताण असो किंवा माणसांच्या वागण्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती असो मार्ग काढण्याच्या क्षमता  अशा वाढवा की नकारात्मक वातावरण कमीत कमी तयार होईल ....भावनिक प्रतिकारशक्ती वाढवा...

यामुळे तुम्ही लवकर  normal व्हाल..


९ तुमच्या कडे असणाऱ्या भौतिक सुखाचा कोणाला तरी मत्सर वाटत असेल, jealousy  वाटत असेल ही कल्पना करून खूष होऊ नका.....लोक तुमच्याबद्दल jealous   होणार म्हणून कसला आनंद.... लोकांची जळजळ होते यामुळे खूष होण्यापेक्षा जी भौतिक सुख तुमच्या कडे आहेत त्यामुळे जी उपयुक्तता मिळते आहे... तुमची कामं सोपी होत आहेत  म्हणून सुखी व्हा.. कोणाबद्दल मत्सर वाटण  आणि कोणाला मत्सर वाटतोय म्हणजे मी भारी काही तरी कमावलय या दोन्ही भावना उथळ आहेत..स्वच्छ आणि निर्मळ  आनंद यात नाही.... स्वतःची जीवनमूल्य ,values तपासा...

  

लोकांसाठी जगलात तर लोकच जगतील तुमच्यातून ...

स्वतः साठी जगलात तर खरच तुम्ही जगाल आतून


१०.. लाईट गेले, पाणी गेल, ट्रँफिक झाला, गाडी पंक्चर झाली, लिफ्ट बंद पडली, पेन उठेनास झाल,जाँबमधे  बाँस सारखा अपमान करतो, घरात सतत अपमान होतो अशा अनेक छोट्या अडचणी येत असतात.... लगेच डोकी फिरतात.... आयुष्य त्रासदायक वाटत...चिडचिड करण, शिव्या घालण यामुळे वातावरण उगाच तापत.... परिस्थिती उगाचच जास्त असह्य वाटते.....काही विषय  जरा थांबलात तरी आपोआप सुटणार आहेत....विचार करण्याची दिशा बदला..... त्रास कसा होतोय...त्यापेक्षा परिस्थिती तून मार्ग काढण्यासाठी मेंदूला हलवा..... मेंदूमधील अनेक  connections  ताजीतवानी होतील..... मेंदू सक्रिय होईल...

gracefully  मार्ग कसा काढायचा.... आपल्यात कोणत्या क्षमता आहेत...असे विचार करा.....


११ तुमच्या बाबतीत कायम  आनंददायी  घटनाच घडायला हव्या अस वाटत असेल  आणि ते होत नाही म्हणून तुम्ही दुःखी असाल तर  comfort zone मधून बाहेर या...... तुमच्या क्षमता वाढायला हव्या आहेत, तुमची भावनिक क्षमता, प्रगल्भता, प्रतिकारशक्ती वाढायला हवी आहे.....सतत गुडीगुडी आयुष्य नाही रहाणार आणि तुमच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कोणत्याही प्रसंगातुन तुम्ही कसे बाहेर येता..किती कुरकुर करता...कोणाला बोल लावता, कोणाशी बंध तयार करता हा भाग महत्त्वाचा असतो..... 


१२ चुक केली असेल तर मान्य करा...माफी मागा... तुमची देहबोली, नजर तुमच्या शब्दांना जुळणारी हवी.... माफी मागतोय ना अस म्हणून माज करू नका.....

माज करताय म्हणजे माफीनामा एक दिखावा आहे..... तुम्ही काही ही करा.... मनाच्या लहरी सगळ्या संवेदना उलगडून पोचवतात....


१३ . काही माणस निर्णय घेत नाहीत....  थोडा वेळ जाऊ देण कधी कधी .निर्णय घेण्यासाठी आवश्यक असत...पण तो वेळ जायला हवा म्हणून निर्णय घेतला जात नसेल तर चांगल आहे..... पण निर्णय घ्यायला टाळाटाळ हा विचार असेल तर ते खूप त्रासदायक होत....आपल्या निर्णयावर अवलंबून असणारी माणस suffer यामुळे होतात.... टाळाटाळ करणारी माणस म्हणतात आता काळच ठरवेल..... काळ फक्त म्रुत्यु ठरवतो.... बाकी वेळेस काळ म्हणजे तुमच्या चालढकलीला कंटाळून दुसर कोणीतरी निर्णय घेत.... अशा माणसांनाही लोक वैतागून जातात.... 


१४ कोणी माफी मागतली तर माफ करा..... पण त्या नंतर त्या व्यक्तीशी नाते संबंध ठेवण  तुम्हाला अवघड असेल तर तसही सांगा..... नात, संवाद परत आहे तसा ठेवला म्हणजे माफ केल अस नसत....  समोरच्या व्यक्तीच्या मनात कटूता नाही हे  माफ करण जास्त महत्त्वाच आहे.... परत कोणतेही ऋणानुबंध नको हा थांबण्याचा  विचार, भावना नात  expire झालय हे सांगतो... दोनही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.....भावनिक गुंता अनावश्यक वाढवू नका...स्विकार करा....समोरच्याने स्विकारल नाही तरी तुमच्या स्वतः च्या भावनेचा आदर करा.... आणि भावनिक बंध कायमचे मोकळे करा


१५. कोणत्याही व्यक्तीबद्दल मत्सर, द्वेष, एखाद्याबद्दल मनात वाईट चिंतण, समोरच्याच चांगलं होत असेल तर त्याची लायकी नसताना मिळतंय अश्या पद्धतीने बोलणं ,विचार करणं, समोरचा कुठे चुकतोय हे सतत शोधत राहणं, स्वतःच्या चुकीच्या गोष्टी लपवण्यासाठी , अपयश झाकण्यासाठी समोरच्यावर आरोप करण, त्याला बदनाम करण, स्वतः ला चांगलं ठरावण्यासाठी दुसऱ्याची अक्कल काढणं, त्याला बिनडोक ठरवणं.... मनाला वाटलं किंवा अस वाटतय असा विचार करून एखाद्याबद्दल मत मांडण आणि ते अनेकांना सांगण असे विविध पद्धतीचे विचार माणस करत असतात, त्रास देत असतात.... 

कोणी जर तुमच्याबद्दल असे विचार करत असेल तर त्याची जाणीव देणाऱ्या संवेदना आपल्याला होतात. अस तुम्हाला वारंवार जाणवायला लागलं तर मनाच म्हणणं एका....मनात खूप जागा असते पण काहींना डोक्यात जायच असत....त्यांना अलगद खाली उतरवा...अशा  माणसांपासून मनाने काही हात लांब राहा किंवा चक्क थांबा


१६ . तुम्ही जर एखाद्या परिस्थितीची किंवा माणसाची जबाबदारी घेऊ शकत नसाल तर जो माणूस ती जबाबदारी पार पाडत आहे त्याच्या चूक शोधू नका. त्या कामात काही अडचणी आल्या तर त्याची अक्कल काढू नका .... आपण जर जबाबदारी घेऊ शकत नाही तर आपल्याला असे वागण्याचा कोणताही अधिकार रहतो का??... तर नाही रहात... 


१७ 

जगातल्या प्रत्येक माणसाला आपण आवडायलच हव हा सुप्त भाव अनेकांच्या मनात कायम असतो... हे अस होण कधीच शक्य नाही.... तुम्हाला स्वतः ला संपर्कात येणारी सगळी माणस आवडतात का...???नाही ना.... मग जे आपल्या बाबतीत तेच इतरांच्या बाबतीत होणार.... 

आपली wave length  जुळते थोडक्यात जिथे लहरी जुळतात तिथे भावनिक  transactions  होतात....या सकारात्मक असतील तर व्यक्ती आवडते... नकारात्मक असतील तर व्यक्ती आवडत नाही....त्यामुळे  आपण प्रत्येक माणसी आवडलो पहिजे हा अट्टाहास सोडा......


१८ माणसांना आहे तस स्विकारायचा प्रयत्न करा म्हणल की लोक वैतागून जातात...म्हणजे मीच सहन करायच वाटून निराश होतात... सांगायला ठिक आहे...त्यांच्या सहवासात राहिलात कि कळेल... स्विकारा म्हणे...असे  संवाद  frustration मधून बाहेर पडतात

माणसांना आहे तस स्विकारायच म्हणजे  ही माणस बदलणार नाहीत हे स्विकारायचय... त्यांना सुधरवण, बदल व्हावा म्हणून प्रयत्न करण थांबवा ... आणि त्याच्या सोबत वागण्याची treatment  बदला...त्यांच आपल किती जमत , कुठे आणि किती जमत नाही याचा अंदाज घेऊन त्यांना किती अंतरावर ठेवायच यावर विचार करा...

या अंतराचा अंदाज सुरवातीला चुकतो... पण तो अनुभवाने येतो.... अंतर किती हे कळल की  transaction कस करायच , कस वागायच कळत... सगळ सोप होत... जे असेल  ते समजून आपण वागण्याचा  एक  pattern ठरवण म्हणजे माणसाला आहे तस स्विकारण....


१९. एखाद्या व्यक्तीशी कितीही जमत असल तरी कधी कोण कस वागेल सांगता येत नाही..... अवघड प्रसंग येत नाही तो पर्यंत सगळ सुरळीत आणि गोड असत.... म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी मनाची तयारी ठेवा....


२०... सतत दुसऱ्याचा आधार आहे , मिळेल असा विचार करत जगू नका.... स्वतःचा  स्वतः ला आधार आहे हे तो feel  करा.... आणि चालत रहा.... सगळ जमत...स्वतः ला संधी द्या....


माणसांसोबत वागताना अशा गोष्टी लक्षात ठेवू या


कोणाहींबद्दल विचार करत बसण्यापेक्षा स्वतः चा विचार करा....  नवीन गोष्टी शिका .... पुस्तक वाचा....व्यायाम करा.... मेंदू आणि मन सजग ठेवा....मन गुंतलेल ठेवा...। निसर्गाच्या सहवासात राहा, स्वतःच्या दिवसभरातील वागण्याचा रोज रात्री  आढावा घ्या.... अहंकारी होऊ नका आणि स्वतःला कमी लेखू नका... थोडक्यात स्वतः चा भावनिक तोल सांभाळा.... 


जी खरच तुमची वाटतात अशा प्रेमाच्या माणसांसोबत मनापासून आनंदाने  जगा.... 

बाकीची माणस फक्त असतात .... त्यांना  मनात जेवढ्यास तेवढीच जागा द्या.... 

आणि जीवाची तडफड करत असतील  त्या नात्याला विचारपूर्वक goodbye म्हणा... 


विचाराची घोंगडी भिजत ठेवू नका.... 

अति भिजल की कुजत , सडत.... वास येतो

म्हणून योग्य तिथे सावरा आणि बाकीचा पसारा आवरा....


जोशी रेश्मा

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...