कोण आहेत ही लोकं!
त्यांनी सांगितले भोंगे काढा,
त्यांनी सांगितले भोंगे लावा,
आणि आम्ही नेहमीप्रमाणे पळत सुटलो.
कोण आहेत ही लोकं याचा विचार न करता!
हीच तीच लोकं आहेत,
ज्यांनी जाती आणि धर्म निर्माण केले,
नंतर जातींची उतरंड लावली,
कुणी कपाळी टिळा लावला,
कुणी तराजू घेऊन व्यापारी झाले,
कुणी हातात तलवार घेतली,
आणि आपल्याच धर्मातील इतरांना शूद्र ठरविले.
हीच तीच लोकं आहेत,
ज्यांनी धर्म निर्माण केले,
कुणी आचार्य झाले,
कुणी मुल्ला-मौलवी झाले,
कुणी पाद्री झाले,
आणि सगळ्यांनी मिळून आपल्या अनुयायांमध्ये भांडणे लावून दिली.
हीच तीच लोकं आहेत,
ज्यांनी सांगितले,
शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊ नये,
कुणब्यांनी फक्त शेती करावी,
बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावे,
ऋषींचे कुळ आणि मूळ विचारू नये,
प्रश्न विचारू नयेत,
जे आहे त्यातच समाधान मानावे,
हे असेच पिढ्यानपिढ्या सांगत राहिले,
आणि आपण ऐकत राहिलो.
कधी जात श्रेष्ठत्वाच्या नावाखाली,
तर कधी धर्म श्रेष्ठत्वाच्या नावाखाली.
आणि हे असेच कुठपर्यंत चालू राहील?
जो पर्यंत आपण विचार करत नाही,
जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारत नाही,
जोपर्यंत आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव होत नाही,
जोपर्यंत आपल्याला समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे महत्व कळत नाही.
©के. राहुल, 9096242452
₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹₹
*कौन है ये लोग!*
उन्होंने कहा लाउडस्पीकर निकालो,
उन्होंनेही कहा लाउडस्पीकर हटाओ,
और हम हमेशा की तरह दौड़ पड़े।
बिना सोचे समझें, कौन है ये लोग!
ये वोही लोग है,
जिन्होने जाती आणि धर्म बनाये,
जातियोमे उच-नीचता की सिढी बनाई,
कुछ लोगो ने माथे पर तिलक लागाया,
कुछ तराजू लेकर बनिया बने,
कुछ हात में तलवार लेकर क्षत्रिय बने,
और आपनेही धर्म के लोगों को शूद्र करार दिया।
ये वोही लोग है,
जिन्होंने धर्म का निर्माण किया,
कुछ आचार्य बने,
कुछ मुल्ला-मौलवी बने,
कुछ पाद्री बने,
और सबने मिलकर अपनेही अनुगामीयोमें झगडे लगवाये।
ये वोही लोग है,
जो कहते थे,
शूद्र और औरत को पढने मत दो,
किसान सिर्फ हल चलाना चाहीये,
औरत को सिर्फ बच्चे और घर गृहस्थी संभालनी चाहीये,
ऋषी का गोत्र और जड मत पुछो,
कोई सवाल मत पुछो,
जो है उसिमेंही खुश रहो,
वो पिढी दर पिढी हमे बताते रहे,
और हम सिर्फ सूनते रहे,
उनकी जाती और धर्म हमसे श्रेष्ठ है यह समझकर!
लेकिन ऐसा कब तक चलेगा?
जब तक हम सोचना सुरू नही करेंगे,
जब तक हम सवाल नहीं पुछते,
जब तक हम अपने अधिकारोसें वाकीब नहीं होंगे,
जब तक हमें समता, आझादी और भाईचारे का महत्व समझमें नही आता।
©के.राहुल, 9096242452
Comments
Post a Comment