Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

दो पैसे की धूप, चार आने की बारिश......!

भंगलेल्या स्वप्नांचे दुवे सांधणारी  कथा - दो पैसे की धूप, चार आने की बारिश......! सुख आणि दुःख या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात सतत घडणाऱ्या घटना असतात. आयुष्यात दीर्घकाळ फक्त सुखच भोगले आहे किंवा फक्त दुःखच भोगले आहे असा माणूस सापडणे ही फारच दुर्मिळ घटना आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात हे चढउतार  सतत येत असतात. सुख आणि दुःख यांच्या कसोट्यावर याचे मोजमाप करायचे झाल्यास काहींच्या आयुष्यात दुःखापेक्षा सुखाचे क्षण जरा जास्त असतात तर काहींच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखाचे क्षण जरा जास्त असतात. साहजिकच ज्याच्या आयुष्यात दुःखाचे क्षण जास्त असतात त्या माणसाला इतरांच्या आयुष्यातील सुखाचे क्षण पाहून फक्त आपल्याच आयुष्यात दुःख आहे असे वाटत राहते परंतु त्या माणसाच्या जवळ जाऊन हे जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यास त्या माणसाच्या आयुष्यातही दुःख असल्याचे आणि फक्त त्याचे स्वरूप वेगळे  असल्याचे लक्षात येते. अशाच सुखदुःखाचे क्षण भोगणाऱ्या दोन वेगळ्या व्यक्तींच्या आयुष्याचे चित्रण आपल्याला "दो पैसे की धूप, चार आने की बारिश" या दीप्ती नवल लिखित आणि दिग्दर्शित चित्रपटातून पहायला मिळते. आपल्या ...

दीपावली सणाचा अन्वयार्थ*

 *दीपावली सणाचा अन्वयार्थ* -------------------------------- - डॉ. श्रीमंत कोकाटे --------------------------------                                     भारतातील बहुतांश सण हे आर्य-अनार्य म्हणजेच सूर-असुर यांच्या संघर्षाच्या स्मृती आहेत. उदा तुळशी विवाह, बलिप्रतिपदा, दसरा इत्यादी.  त्याचप्रमाणे नरक चतुर्दशी हा दिवस देखील अभिमान बाळगावा असा आहे. अनार्य, असुर, अब्राह्मणी म्हणजे भारतीयांच्या अस्मितेचा सण आहे. वेदांमध्ये शेतीची कला अवगत असणाऱ्या जनतेला *अब्राह्मण* असे म्हटले आहे, याचा दुसरा अर्थ असा होतो ज्यांना शेतीची कला अवगत नव्हती त्यांना ब्राह्मणी समुदाय म्हटले जाते, त्यामुळे ब्राह्मणी-अब्राह्मणी हे शब्द जातीवाचक किंवा द्वेषमूलक नाहीत, तर हे दोन शब्द भारतातील सांस्कृतिक संघर्ष दर्शवतात, त्यामुळेच जगविख्यात प्राच्यविद्याविद शरद पाटील हे वेदांच्या आधारे त्यांच्या तत्वज्ञानाची मांडणी ब्राह्मणी-अब्राह्मणी अशीच करतात.                       ...

भळभळत्या जखमांच्या वेदनांची कहाणी...... वाघर!

भळभळत्या जखमांच्या वेदनांची कहाणी...... वाघर! भारतीय समाजातील स्त्रियांच्या कथा, व्यथा, वेदना सांगणाऱ्या अनेक कथा, कविता आणि कादंबऱ्या भारतीय साहित्यात होऊन गेल्या. त्यातील अनेक कथांवर अनेक मालिका, माहितीपट, नाटके आणि चित्रपटही येऊन गेले. त्यांनी त्या त्या काळात भारतीय समाजमनावर आपली वेगळी छाप सोडल्याचे ही आपल्या लक्षात येते. यात शहरी, ग्रामीण, सुशिक्षित, अशिक्षित, सवर्ण आणि शूद्र या भारतीय समाजव्यवस्थेने जाणीपूर्वक निर्माण केलेल्या भेदात आणि वर्गात मोडणाऱ्या अनेक स्त्री व्यक्तिरेखांचा समावेश असल्याचे दिसून येते. परंतु पाठीवर बिऱ्हाड घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी पायपीट करणाऱ्या भटक्या-विमुक्त समाजाची आणि त्यातही या वर्गातील स्त्रियांची दुःखे मांडणाऱ्या चित्रकृती अत्यंत दुर्मिळ आहेत. त्यातही मराठी चित्रपटसृष्टीच्या दुर्दैवाने भटक्या विमुक्त समाजाची आणि त्यातही या समाजातील स्त्रियांची दुःखे आणि हालअपेष्टा मांडण्याचा प्रयत्न आजपर्यंत झाला नव्हता. मुळात व्यवस्थेकडून हा संपूर्ण समाजच दुर्लक्षित राहिल्यामुळे समाज म्हणून आपण या समाजाच्या दुःखांवर जाणीवपूर्वक लिहायचे-बोलायचे  टाळले...