शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटणार तरी केव्हा? महाराष्ट्रातील विविध अनुदानित महाविद्यालये आणि विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिनांक २० फेब्रुवारी २०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसंदर्भात बेमुदत बंद पुकारला असून त्यामुळे विद्यापीठे आणि महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज मंदावले आहे. दिनांक २ फेब्रुवारी २०२३ पासून हे आंदोलन सुरू असून दोन दिवस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यांची दखल घेऊन उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री यांच्याबरोबर शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीची शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत बैठक होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च शिक्षण विभागाला योग्य ते निर्देश दिले होते परंतु उच्च शिक्षण विभागाने उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या कोणत्याही निर्देशांचा सदर बैठकीचे इतिवृत्त लिहिताना उल्लेख केलेला नाही. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार गंभीर नाही असा शिक्षकेतर कर्मचारी कृती समितीचा आक्षेप असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती...