Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

ज्याचा त्याचा देव

 ज्याने त्याने आपला देव जपावा, आपल्या मनातला भाव जपावा. कोणी, कधी आणि काय करायचे, हे कोणी कोणाला सांगू नये. आपल्या शब्दाला किंमत नाही, म्हणून कोणी कुणाला टांगू नये. आपल्या आवडीचे आचरण, हा ज्याच्या त्यांच्या मनाचा भाव असतो. आपल्या भावना जपणे, हाच मनाचा ठाव असतो. कोणी, कधी आणि काय खावे, हे कोणी कुणासमोर घोकू नये. उगीच आपले तत्वज्ञान जगासमोर ओकू नये. ईश्वर काय, अल्ला काय आणि येशू काय सगळे एकसारखेच असतात, आपण ज्या चष्म्यातून पाहू तसे आपल्याला देव दिसतात.

कविता

  समतेच्या भिंतीला जातीचे रंग, भगवा, हिरवा, निळा सगळे राजकारणात दंग. तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ; सगळ्यांनी भांडायचे, दुसऱ्याच्या ताटातले मुद्दामहून सांडायचे.

Marx and Engel

  Social Contribution And Achievements of Friedrich Engel & Karl Marx At National And International Levels. 1* Dr.Rahul Sadashiv Kharat, Assistant professor, M.S.Kakade College, Waghalwadi-Someshwarnagar. *Email of the corresponding author: srass229@gmail.com Introduction: Friedrich Engels is a German Socialist Philosopher born in Barmen, Rhine province of Germany in November, 1820 in a moderately liberal political viewed family. His father was a successful industrialist and founder owner of textile mill in Berman and partner of Ermen and Engel cotton plant situated at Manchester. Being a part of Protestant faith his family was orthodox and believed in differences of race among the society, Friedrich grew up as a rebel with support of his mother. He was not interested in studies and left his studies before graduation. But he came forward as a good poet and expressed all his feelings, opinions and thoughts about current societal differences and inequalities on the basis of race,...

हेरंब कुलकर्णी यांना पत्र

 प्रति,  श्री. हेरंब कुलकर्णी आपला जुन्या पेन्शनच्या संदर्भात सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगाने आपण केलेल्या वेगळ्या मांडणी बाबतचा लेख नुकताच वाचनात आला. भारत अजून तरी कागदोपत्री का होईना लोकशाही देश असल्याने प्रत्येकाला आपल्या पद्धतीने व्यक्त होण्याचा आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहेच! त्यामुळे आपण मांडलेल्या मताचा आदर तसेच लोकशाही देशातील नागरिक आणि त्यातही सरकारी नोकर या नात्याने जुन्या पेन्शनच्या मागणी संदर्भातील काही मुद्दे मांडू इच्छितो. हे मुद्दे मांडल्यानंतर कदाचित आपण आणि आपले समर्थक मलाही आणखी वेगळ्या चाकोरीत बसवतील अशी दाट खात्री वाटते. तरीपण कुणीतरी बोलले लिहिले पाहिजे म्हणून मी माझे मत मांडत आहे. मुळात वेतन आणि त्या अनुषंगाने मिळणारे फायदे ही घटनादत्त बाब. दर दहा वर्षांनी वेतन आयोग नेमला आणि त्यानुसार विविध घटक लक्षात घेऊन अवर्ग ते ड वर्ग या संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पुनर्रचना केली जाते आणि ती कायद्यानुसार केलीच ही पाहिजे त्याला कुणाचा आक्षेप असल्याचे काही एक कारण नाही. अगदी 2005 पर्यंत हे सर्व व्यवस्थित सुरू असताना अचानक २००५ नंतर "जुनी निवृत्ती...