Skip to main content

विक्रम वेताळ कथा 55

 विक्रम वेताळ कथा:  नव्या देशाची मागणी

या वेताळाला आपण कधी पकडून शकू की नाही,  या विचारात असलेल्या राजा विक्रमाला अचानक लक्षात आले की, आज अमावस्या आहे. त्यातही 'सोमवती अमावस्या म्हणजे चांगलाच मुहूर्त!' हे लक्षात घेऊन आज काहीही करून वेताळाला पकडायचेच, असा पक्का निर्धार करून विक्रम राजाने घाईगडबडीने आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी वेताळाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायची चूक यावेळी करायची नाही, असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. रात्रीच्या गडद अंधारातही पांढऱ्या केसाचा वेताळ वडाच्या  झाडाला उलटा लटकलेला त्याला दिसला. वेताळानेही विक्रम राजाला पाहिले आणि काहीही झाले तरी आज याला आपल्या पाठीवर बसू द्यायचे नाही,  या विचारात असलेल्या विक्रम राजाच्या डोळ्याचं पातं लवण्याच्या आत वेताळाने चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले. वेताळ दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, आज तू जर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची तात्काळ हजार शकले होऊन तू इथेच गतप्राण होशील.  वेताळाच्या काव्याला बळी पडायचे नाही हे मनोमन ठरवून आलेला विक्रम नाइलाजानेच त्याला म्हणाला, "विचार तुझा प्रश्न?". त्यावर वेताळ म्हणाला, "महाराष्ट्र देशी कोण्या अभ्यंकराने  आपल्या जातीचा वेगळा देश निर्माण करायचा विचार बोलून दाखवला आहे. खरंच तो म्हणतो तसा जातीचा वेगळा देश निर्माण करता येईल का?

"वेताळा, सगळ्यात अगोदर कोणीही उठसुट काही बोलले म्हणून ते गांभीर्याने घ्यायचे नसते आणि गांभीर्याने घ्यायचेच झाले तर बोलणारी व्यक्ती त्या तोलामोलाची आहे का, याचाही विचार करणे आवश्यक असते. त्यामुळे तुला वाटते तितका हा प्रश्न महत्त्वाचा नसला तरी तुझ्या प्रश्नाचे उत्तर देणे मला क्रमप्राप्त आहे म्हणून सांगतो. एखादा देश उभारायचा म्हणजे खायचे काम नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागतो, आंदोलने करावी लागतात, उपोषणे करावी लागतात,  प्रसंगी सश्रम कारावास भोगावा लागतो, अनेक हालअपेष्टा, कष्ट आणि अन्याय-अत्याचार सहन करावे लागतात. गरज भासल्यास सशस्त्र लढाही उभारावा लागतो. हा जो कोणी अभ्यंकर नावाचा माणूस आहे; त्याची आणि त्याच्या पूर्वजांची पाटी त्याबाबत पूर्णपणे कोरी आहे. असले संघर्ष यांना ठाऊक नाहीत. इतिहासात तश्या नोंदीही नाहीत.  उलट भारत देशावर ज्या ज्या परकीय आक्रमकांनी सत्ता काबीज केली, त्या त्या आक्रमकांशी संधी करून त्यांच्या आश्रयाला राहणे आणि त्यांची मनसबदारी करण्यातच यांच्या पूर्वजांची हयात गेली आहे. ब्रिटिशांना तर त्यांनी हा देश आमचा नाहीच असे सांगून कर द्यायलाही नकार दिला होता. मुघलशाही, निजामशाही आणि इतर आक्रमकांची भलामन करून आपल्या पदरात दुय्यम का होईना पदे मिळतील आणि त्यातून द्रव्य प्राप्त कसे होईल हेच यांनी पाहिलेले आहे. भारत देशावर त्यांचे असलेले वर्चस्व हे देशातील बहुजन समाजाच्या अज्ञानामुळे आणि त्यांच्यामध्ये आपण यांच्यापेक्षा खालच्या जातीतील आहोत या असलेल्या न्यूनगंडामुळे टिकून आहे. त्याच्या जोरावरच ही अशी वक्तव्ये केली जातात. बहुजन समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्ता मिळवणे सोपे आहे परंतु त्यांच्या जीवावर दुसरा देश बनविणे वाटते तितके सोपे नाही. हा देश सोडायचा म्हणजे या देशावर प्रेम, निष्ठा नाही हेही आपोआप सिद्ध होईल आणि त्यातून त्यांना बहुजन समाजाच्या रोषालाही बळी पडावे लागेल सगळ्यात महत्वाचे म्हणजे  प्रखर राष्ट्रवादाचा त्यांचा बुरखाही आपोआप गळून पडेल. शिवाय स्वतःच्या जातीच्या जीवावर नवा देश मिळविणे ही आजच्या काळातील सर्वात अशक्यप्राय गोष्ट आहे.  कारण अशी भेकड, संधीसाधू आणि दगाबाज माणसे स्वतःच्या सामर्थ्यावर स्वतःचे अस्तित्व निर्माण करू शकत नाहीत.  चांगले राष्ट्र निर्मितीसाठी किती खस्ता खाव्या लागतात हेही त्यांना ठाऊक नाही. त्यामुळे त्याच्या बोलण्याला त्याच्या जातभाईंनी सुद्धा गांभीर्याने घेतलेले नाही किंवा त्याला महत्त्व दिलेले नाही. तेव्हा तुला हा पडलेला प्रश्न आनाठायी आहे".

विक्रमाचे ते बोलणे ऐकून वेताळ छद्मी हसून म्हणाला व विक्रमा अगदी योग्य आणि मनासारखे उत्तर दिलेस, पण तू तुझे न बोलण्याचे वचन मोडलेले आहे. त्यामुळे तू मला पकडू शकत नाही, असे म्हणून वेताळ कर्कश्य हसत तिथून निघून गेला आणि विक्रम पुन्हा एकदा मोकळ्या हाताने आपल्या राजवाड्याकडे निघाला.

©के. राहुल, ९०९६२४२४५२.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...