Skip to main content

वाळवंटातील झरा

वाळवंटातील झरा:
काही माणसे कोणत्याही क्षेत्रात असली तरी आपल्या कर्तृत्वाने आणि विचारसरणीने आपली दखल घ्यायला भाग पाडतात. त्यांच्या स्वभावाने आणि सर्वसमावेशक भूमिकेने ते आपल्या शत्रूंच्याही कौतुकाला पात्र ठरतात अर्थात अश्या माणसाला शत्रूच नसतात, असतात ते वैचारिक आणि तात्विक विरोधक.  अशी माणसे मुळातच दुर्मिळ असतात. ज्यांच्या आजूबाजूला ही माणसे असतात आणि ज्यांना त्यांचा सहवास लाभतो त्याचे आयुष्यही संपन्न होते. अशी माणसे जर राजकारणात असतील तर राजकारणाचा स्तर ही उच्च राहतो आणि देशातील लोकशाही अधिक संपन्न होते.
एके काळी भारतातील समाजकारण आणि राजकारण अश्या लोकांनी अत्यंत समृध्द होते. अगदी कालपर्यंत भारतात जे काही चांगले दिसत होते ते अश्या निवडक लोकांमुळे. अश्याच निवडक लोकांमधील शेवटचा तारा म्हणजे अटल बिहारी वाजपेयी.  आज हा तारा निखळला  आहे.  आजच्या भाजप कडे पाहिले तर खरच वाजपेयींनी कधी काळी या पक्षाचे नेतृत्व केले होते काय? याची शंका यावी इतपत धर्मांध आणि जात्यांध झालेल्या या पक्षाचे अत्यंत समतल, संयमी आणि देशहित समोर ठेवून त्यांनी केलेले नेतृत्व त्यांच्यातील माणूसपणाची साक्ष देते.
दोन खासदार (स्वतः आणि आडवाणी) ते प्रमुख सत्ताधारी पक्ष ही भाजप(आणीबाणी अगोदर चा जनता पक्ष) ची वाटचाल त्यांनी आपल्या याच संयमी आणि राष्ट्रप्रेमी भूमिकेने साध्य केली. हिंदू असून आणि आडवाणी सारखा धर्मांध सहकारी आणि पाठीराखा असतानाही राष्ट्रहित जपताना त्यांचा संयम कधी ढळला नाही. एकेकाळी कांग्रेस पक्ष राष्ट्रव्यापी आणि बलाढ्य असतानाही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी आणि राष्ट्रहिताच्या भूमिकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला आपली  दखल घ्यायला भाग पाडले. "एक दिवस अटलजी नक्कीच पंतप्रधान होतील" हे नेहरूंचे भाकीत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर खरे करून दाखवले.  सत्ताधारी असताना त्यांनी कधीही सुडाचे राजकारण केले नाही. पाहिले सरकार जेव्हा १३ दिवसात कोसळले तेव्हा त्यांनी पुन्हा एखादा आम्ही पूर्ण बहुमताने सत्तेवर येऊ हा आशावाद पुढच्या निवडणुकीत खरा करून दाखवला आणि विविध विचाराच्या आणि विविध स्वभावाच्या अनेक प्रादेशिक पक्षाचे आघाडी सरकार त्यांनी यशस्वी चालवून नवा वस्तुपाठ घालून दिला. ममता आणि  जयललिता सारख्या टोकाची भूमिका घेणाऱ्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांना आणि अहंकार असणारे अनेक नेते त्यांच्या सरकारमध्ये होते पण त्यांनी सर्वांना आपल्या स्वभावाने आपलेसे केले. "आपकी बेटी बहुत सताती है" ही लाडिक तक्रार ममता बॅनर्जी यांच्या आईकडे करताना त्यांनी त्यांच्या आक्रस्ताळी स्वभावाला आपल्या कवी मनाने मुरड घालायला भाग पाडले.
इंदिरा गांधींनी १९७१ ला पाकिस्तानविरुद्ध युद्ध पुकारले तेव्हा भारतात आता कोणताही राजकीय पक्ष नाही. आम्ही सगळे भारतीय आहोत आणि इंदिरा गांधींना आमचा पूर्ण पाठिंबाच नव्हे तर आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत ही घोषणा त्यांनी केली. नरसिंह रावांच्या कारकिर्दीत अपूर्ण राहिलेल्या अनुचाचन्यांचे स्वप्न त्यांनी सत्तेवर येताच प्राधान्याने पूर्ण केले आणि त्याचे वैयक्तिक श्रेय घ्यायचा कधीही प्रयत्न केला नाही की राजकारण केले नाही.
गुजरात दंगलीच्या काळात सध्या सत्तेत असलेले आणि पंतप्रधान पदावर विराजमान असलेले अहंकारी व्यक्तिमत्त्व दंगलीत सहभागी आहे हे सिद्ध झाल्यावर त्यांचा राजीनामा घ्यायला सज्ज झालेल्या वाजपेयींनी आडवाणी आणि समस्त अंध हिंदू भक्तांप्रमाणे गुजरात दंगलीचे कधीही समर्थन केले नाही.  राजकारण हा आयुष्याचा भाग असला तरी माणसाच्या माणूसपनावर त्यांचा विश्वास होता आणि तो कोणत्याही जाती धर्माचा असला तरी त्याला जगण्याचा हक्क आहे या लोकशाही तत्वाशी त्यांची बांधिलकी होती आणि शेवटपर्यंत त्यांनी ती जपलीही.
अश्या या भारतरत्न नेत्याकडून सध्याच्या सत्ताधारी आणि विरोधक यांना खूप काही शिकण्यासारखे आहे. राजकारण करत असताना त्यांच्याकडून अनेक चुकाही झाल्या किंवा कारण परत्वे आणि राजकारणाचा भाग म्हणून अपरिहार्यतेतून त्यांनी इतरांच्या अक्षम्य चूका पाठीशी ही घातल्या पण म्हणून त्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाचे मोल बिलकुल कमी होत नाही.  देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना वयोमानामुळे ते विजनवासात होते.  त्यांच्या मार्गदर्शनाची आणि विचारांची सध्या देशाला नितांत गरज असताना त्यांचे आपल्यातून जाने दुःखदायक आणि लोकशाहीला मारकच आहे. आज देशातील जनता धर्मांधतेच्या आणि जातीयतेच्या वाळवंटात गुरफटलेली असताना त्यांची लोकशाहीची तहान भागविण्याची क्षमता असणारा हा झरा आज आटला आहे.
त्यांची अशी ही एक्झिट दुःखदायक आहे. त्याचे विचार त्यांच्या पक्षातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि बळकटी करण्यासाठी प्रेरणा देतील यात शंका नाही. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
©के. राहुल ९०९६२४२४५२

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...