Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018

काय केले नेहरूंनी : अरविंद गोखले

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरूंची वल्लभभाईंसह सर्व जाणकारांनी केलेली निवड पंडितजींनी अनेक अर्थांनी सार्थ ठरवली आहे. आज पं. नेहरूंची १२९वी जयंती. त्यानिमित्ताने... 'काय केलं त्या नेहरूंनी?, भारताचं वाटोळंच केलं, या देशाच्या ऱ्हासाला जबाबदार फक्त नेहरू आणि नेहरूच' किंवा 'जर आपल्या देशाच्या पंतप्रधानपदी पटेल असते तर आज देश कुठल्या कुठे पोहोचला असता', असे बिनदिक्कत उद्गार काढणारा तरुणवर्ग आज जो दिसतो, त्याला या देशाचा इतिहास एकतर माहिती नसतो किंवा सध्याच्या परिस्थितीत वाहवत जाऊन नेहरूंना नावे ठेवण्यासाठी तो पुढे येत असतो. सर्वाधिक उंचीच्या पुतळ्याने तर आता नेहरू हे कायमचे खुजे ठरतील अशी व्यवस्थाच केली गेली आहे! इथे वल्लभभाई पटेल पंतप्रधानपदाला पात्र होते की नाही, हा सवालच नाही, पण तेच पात्र होते असे ठासून सांगत त्यांना पंडितजींवर अन्याय करायचा असतो. त्यावेळची ती निवड गांधीजींची आणि अर्थातच वल्लभभाईंसह सर्व काँग्रेसजनांची होती आणि त्यातल्या कुणालाच काही कळत नव्हते, असा दावा करण्याजोगी स्थिती नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे सर्वात मोठे योगदान ज...

MSEB Rules

आपल्या सर्वांसाठी MSEB संबधी एक उपयुक्त माहिती वाढती वीज बिलांची आता ग्राहकांनीचं घ्यावी काळजी. 1) मीटर चे रिडींग घेण्यास येणाऱ्या व्यक्तीचे नाव, ID प्रूफ, आणि रिडींग घेतल्या तारखेला त्याची सही घेणे 2) *पुढल्या वेळेस हे रिडींग 30 दिवसांनी घेतले जाते का नाही ह्याची खात्री करणे.* 3) पुढल्या वेळेचे रिडींग 30 दिवसा नंतर घेण्यास आल्यास त्याला रिडींग घेण्यास मनाई करून त्वरित त्याची तक्रार विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्यानं कडे लेखी करणे. 4) बिल्डिंग सोसायटी असल्यास सेक्रेटरींनी आपल्या बिल्डिंगच्या वॉचमन कडून ह्या गोष्टी करावयास लावाव्यात. 100 रिडींग पर्यंत 3.76 रुपये प्रति युनिट आहे. परंतु रिडींग 30 दिवसा नंतर घेतल्या मुळे रिडींग * 100 च्या वर रिडींग गेल्यास हेच दर दुप्पट म्हणजेच 7.21 रुपये प्रति युनिट आहे.  * 300 च्या वर रिडींग गेल्यास दर तिप्पट 9.95 रुपये प्रति युनिट आहे. * 500 च्या वर रिडींग गेल्यास चौपट 11.31 रुपये प्रति युनिट आहे. आपल्याला येणारे वाढीव बिल हे वरील एकमेव कारणाने येत आहेत, आमच्या विद्युत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमुळे सामान्य जनतेस भुर्दंड भरावयास ल...

Sardar V. Patel letter to Golwalkar

Sardar Vallabhai Patel, union home minister, to Golwalkar Guruji, RSS chief in a letter written on September 11, 1948: Aurangzeb Road, New Delhi,11th Sept. 1948 Brother Sri Golwalkar, Received your letter dated 11th August. Jawaharlal has also sent me your letter of the same date. You are very well aware of my views on the RSS. I have expressed these thoughts at Jaipur in December last month at Lucknow in January. The people had welcomed those views. I had hoped that your people also would accept them. But they appear to have no effect on the RSS persons, nor was there any change in their programmes. There can be no doubt that the RSS did service to the Hindu Society. No person of understanding could have a word of objection regarding that. But the objectionable part arose when they, burning with revenge, began attacking Mussalmans. Organising Hindus and helping them is one thing but going in for revenge for its sufferings on innocent and helpless men, women and children is quit...