Skip to main content

Posts

Showing posts from February, 2019

कविता - चला युद्ध सुरू करू........!

चला युद्ध सुरू करू........! तुम्ही आमचे पाच माराल, आम्ही तुमचे पन्नास मारू. चला युद्ध सुरू करू. तुमच्या Ak-47आणि आमचे हॅन्डग्रेनेड, धुमश्चक्री होऊ दे सुरू. तुम्ही आमचे पन्नास माराल, आम्ही तुमचे पाचशे मारू. चला युद्ध सुरू करू. तुम्ही आमची घरे जाळा, आम्ही तुमची घरे जाळू. चला खेळ युद्धाचा खेळू, तुम्ही आमची पाचशे माराल, आम्ही तुमची पाच हजार मारू. चला युद्ध सुरू करू. तुमचे गोहरी मिसाईल आणि आमचे ब्रह्मास्त्र, एकमेकांवर सोडू. पोरं मरू द्या गरिबांची, उत्सव देशप्रेमाचा साजरा करू. तुम्ही आमची पाच हजार माराल, आम्ही तुमचे पन्नास  हजार मारू. चला युद्ध सुरू करू. लेकरं होऊद्या अनाथ, आई होऊ द्या पारखी. तुम्ही आमचे हजारो माराल, आम्ही तुमचे लाखो मारू. चला युद्ध सुरू करू. माता-भगिनी होऊध्या विधवा, शाहिद मृतांना घोषित करू. देशप्रेमच्या नावाखाली, जगण्याचे प्रश्न बाजूला सारू. तुम्ही आमचे कितीही माराल, आम्ही तुमची कितीही मारू. चला युद्ध सुरू करू. रक्त सांडू द्या कितीही, किंमत रक्ताने वसूल करू, तुम्ही आमचे कितीही माराल, आम्ही तुमची कितीही मारू. चला युद्ध सुरू...

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

कविता - युध्द

युद्ध म्हणजे मरण असतं, आपल्याच माणसाचं आपल्या हातानं रचलेलं सरण असतं! युद्ध म्हणजे घात असतो, माणूस माणसाला खात असतो! युद्ध म्हणजे वणवा लागलेलं माळ असतं, सुवासिनींचं कुंकू पुसलेलं कपाळ असतं! युद्ध म्हणजे फाटाफूट असते, आपल्याच माणसांशी ताटातूट असते! युद्ध म्हणजे घनदाट जंगल ! युद्ध म्हणजे हिंस्त्र दंगल! युद्ध म्हणजे धरण असतं, आपल्याच उशाला आपलं मरण असतं! युद्ध म्हणजे कोंडलेला श्वास असतो, युद्ध म्हणजे हुकूमशाहीचा ध्यास असतो! युद्ध असतो भोग, युद्ध असतो रोग. युद्ध असते तेढ, युद्ध असते वेड. युद्ध असतो दंभ, युद्ध असतो प्रारंभ, विनाशाकडे जाण्याचा! ©के.राहुल 9096242452

मोदींची पाच वर्षे

पंतप्रधान नरेंद्र मोदीची पाच वर्षांची कारकीर्द म्हणावी तशी प्रभावी राहिलेली नाही तरीही ती कायम लक्षात राहणारी आहे. यशस्वी होणारी माणसे लक्षात राहतातच, त्यात वावगे काही नसते पण अपयशी ठरूनही काही माणसे लक्षात राहतात.  ही त्या माणसाची जमेची बाजू समजली पाहिजे आणि मोदींच्या बाबतीत हे तंतोतंत लागू पडते. त्यांचा पाच वर्षाचा कारभार बघितला तर ते अपयशी ठरले आहेत हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज पडणार नाही इतके त्यांचे अपयश ठसठशीतपणे समोर येत आहे. शिवाय हे सगळे चार वाक्यात सांगणे शक्य नाही म्हणून जर सविस्तर मत मांडतो.  मुळात मोदी ज्या पक्षाचे प्रतिनिधींत्व करतात तो पक्षच मुळी लोकशाहीचा पूर्वापार पासूनचा विरोधक राहिलेला आहे. भारतात धर्मनिरपेक्ष लोकशाही व्यवस्था असतानाही देशात एका विशिष्ट धर्माचे वर्चस्व असले पाहिजे असे मानणाऱ्याची मांदियाळी त्यांच्या पक्षात पहिल्यापासून  आहे. मोदींचे गुरू, कर्मठ हिंदुत्वाचे पुरस्कर्ते आणि कणखर लोहपुरुष (सध्या अडगळीत फेकले गेलेले लालकृष्ण आडवाणी) यांच्याकडून हा वारसा मोदींकडे आल्याने त्यात काही बदल होईल असे समजणे बाळबोधपणाचे लक्षण ठरेल. त्यामुळे ...