Skip to main content

गीत-धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...?

संपवीला देह जरी, संपणार नाही मती...
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

आठवा तुकोबाची गाथा तुम्ही बुडविली
तुका मारुनिया त्याची खबर दडविली....
त्या तुकाच्या अभंगाची आज तुम्हा वाटे भीती
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

आठवा चार्वाकाला तुम्ही भस्म केले होते
नाव इतिहासातूनी लुप्त केले होते
त्याच चार्वाकाचे तुम्हा वारस आज दावु किती?
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

भिकूंच्या शिराला दिल्या मोहरा शंभर
कसा रक्ताने भिजविला अहिंसेचा तो संगर...
गळे चिरूनी धम्माचे संपली का सांगा नीती...?
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

सत्यासाठी सॉक्रेटिस विष प्याला होता
कोपर्निकसवरती पोप चा रोष आला होता
मार्टिन ल्युथर धर्मद्रोही ठरला होता
सत्यासाठी ग्यालिलिओ तुरुंगात सडला होता...
बघा उजेडाची फुले धडका मरणाला देती...
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

सत्य चिरडूनि इथे धर्म वाढलाय
फुल्यांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय...
गांधीजींचा धर्मांधांनी खून पाडलाय
गोळ्या झेलूनिया पाश निपचित पडलाय...
न्यायासाठी भोतमांगे रोज रडलाय...
रक्ताच्या थारोल्यात सफदर पडलाय...
त्याच सत्यासाठी आज दाभोळकारांची आहुती...
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार गती...?

तुम्ही उजेडाची फूल खुडली किती सांगा...?
धर्म क्रौर्याचा हिशेब आज मांडा...
तुमच्या अंधाराने आमच्या उजेडाशी भांडा
अज्ञानाचा होईल अंत असत्याची होईल माती...
धर्माच्या गारद्यांनो, कशी रोखणार  गती...?

                    शाहिर सचिन माळी
     
       (मुंबईच्या ऑर्थर रोड तुरुंगात लिहिलेलं गीत)

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...