Skip to main content

सत्तापिशाच्च षड"यंत्र

Fwd
*सत्तापिशाच्च षड"यंत्र"*
अकरा मुडदे घेऊन पावली भाजपला एव्हीएम

*ताज बसला कि महल बनवणारे हात कलम करणारा "शाह" जहान या देशाला नवा नाही*

_(टीप - हलक्या काळजाच्या तथा आपली बुद्धी कुठल्यातरी खुंटीला बांधलेल्या भक्त, अनुयायी तथा कार्यकर्त्यांनी लेख धाडस करून वाचावा नसता आपली वेळ वाचवावी)_

सुरेश भटेवरा हे दिल्लीत पत्रकारिता करणारे आमचे मित्र आहेत, लोकसभा राज्यसभेत वृतांकन करताना मोदी सरकारला जवळून त्यांनी अनुभवले आहे त्यांचे एक व्याख्यान ऐकण्याची संधी उपलब्ध झाली अन त्यांच्या संदर्भाने निरंजन टकले आणि ते अस्या उभय दोघांकडे असलेल्या सूत्राच्या माहिती आधारावर देशात मोठा कावा झालेला आहे यावर कुणाचे दुमत होत नाही . मोदींच्या यशात मंत्रावाल्या साध्वीचा नाही तर यंत्रांचा मोठा सहभाग आहे . याच वेळी नाही तर २०१४ आणि २०१९ अश्या दोन्ही अनिर्बंध सत्तेच्या बुडात मोठा घपला असल्याचे देशाला वाटू लागले आहे. नुसता घपला नाही तर मोठा रक्तपात देखील केलेला आहे. ज्याप्रमाणे ताजमहाल बनवणाऱ्या कारागिराचे हात शहाजहान कडून कलम केले तद्वत ज्यांनी मशीन हाईक केल्या त्या १२ लोकांना देखील भाजपने कंठस्नान घालण्यात आले ज्यातला एक भाजपच्या दुर्दैवाने वाचला ज्याचे नाव सय्यद शुजा. ज्याने लंडन मध्ये २१ जानेवारी ला स्काईप द्वारे पत्रकार परिषद घेऊन भारतीय निवडणूक आयोगाची कुठलीही मशीन मी छेडू शकतो हे सांगितले. १८ जानेवारीला शुजा वर हल्ला झाला होता हे आणखीन चिंतनीय.
संपूर्ण देशात मोदींची भाजपा अभूत यशाने आणि गुलालाने माखलेली असताना अनेकांना सोडाच दस्तूर भाजपच्या कपाळावरच्या आड्या आणि नाकपुड्या गोळा झाल्या. संपूर्ण पाच वर्षात कुठलेच आश्वासन पूर्ण न करणारे मोदी २०१४ च्या तुलनेत तब्बल २५ टक्के मते अधिक घेतात, म्हणजे एकूण मतात ५४ टक्के मते मिळतातच कशी, हा प्रश्न आता काही दैनिकांनी समोर आणल्यावर पवार ममता माया उपस्थित करत आहेत . मोदींचे सत्तारोहण विनासायास पार पडले असले तरी देशाला हा विजय नाही तर साधूंच्या मंत्रांचा नाही तर मोदीशाहीच्या यंत्रांचा आहे काय अशी शंका येत आहे . देशातील ३७० मतदार संघात पडलेल्या आणि निकालात मोजलेल्या मतात तफावत आहे. या नंतर अनेक तक्रारी निवडणूक आयोगात दाखल झालेल्या आहेत मात्र जिथे लातुरात मोदींचे वक्तव्य शिक्षापात्र असताना आयोग अजून चित्रफित यायची म्हणत होते अन तोवर महाराष्ट्रातील सर्व टप्पे संपून जात असतील, त्या आयोगाकडून शुजा वर कसले गांभीर्य? तरीही त्यांनी सांगितलेल्या तथ्याची जुळवणी केली आणि जर ती सत्य असेल तर लक्ष्यात येते कि भाजपने फक्त ११ लोकांची नाही तर लोकशाहीची हत्या केली आहे. वरून लोकप्रियतेच्या आडपडद्यात ?
युरोप इंडियन प्रेसचे अध्यक्ष आशिष रे जे सुभाष बोस यांचे नातू असल्याचे बोलले जाते त्यांनी शुजा सय्यद यांची पत्रकार परिषद आयोजित केली व ज्याचे निमंत्रण भारतातील सर्व राजकीय पक्षांना दिले . या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे दोन लोक उपस्थित होते त्यांनी शुजा ला प्रश्न देखील विचारले. मात्र शुजा ने फोडलेल्या या मोठ्या गौप्यस्फोटाची चर्चा झाली नाही कारण कॉंग्रेसचे कपिल सिब्बल हे एलिफंटा इन रूम सारखे समोर आले अन भाजपला पत्रकार परिषदेवर पाणी टाकण्याची संधी मिळाली. मंत्री रविशंकर प्रसाद तर २२ मे रोजी दिवसभर तिथे कपिल सिब्बल कसे यावर बोलत होते अन देशातील ८५ टक्के मिडिया यावरच चर्चा करत होता. मात्र ज्या शुजाने आपले आई वडील गमावले , मुले पत्नी दुरावले, दोन जीव घेणे हल्ले सहन केले त्या शुजाच्या मुद्द्याला बरोबर बाजूला सारण्यात भाजपला यश आले. नसता २०१९ निर्विकार निवडणूक शक्य होण्याचे काही कारण नाही.
२०१९ च्या निवडणुकीला सुरवात झाली तेव्हा सर्वांनी मोदींचे अपयश समोर आणलेले होते, मोदींचे एक वैशिष्ट्य राहिलेले आहे, नरेंद्र मोदी ज्या निवडणुकीचे केंद्र बिंदू असतात किवा कर्णधार असतात ती निवडणूक ते हमखास जिंकतात, कारण ते वर्तुळ करून घेतात आणि निवडणूक त्याच मुद्यावर कशी फिरेल चर्चा ठरलेल्या मुद्यावर कशी होईल याची ते काळजी घेतात. त्यांना विकासकामावर सत्ता मिळणार नाही, कारण त्यांनी विकास तर सोडाच मात्र देशाला अडचणीत आननारे निर्णय, ज्याची किंमत देशाने चुकवली अश्या घोडचुका केलेल्या होत्या म्हणून मोदींनी निवडणूक थेट हिंदुत्वावर नेऊन आदळली ज्यावर आपण चर्चा केली आहे. उरी चित्रपट काढून हाऊज द जोश एक सोंग होते जे सर्जिकल पर्यंत चालत राहिले असो आज आपण फक्त मशीन कश्या वापरल्या यावर चर्चा करणार आहोत .
१९९० पासून एव्हिएम द्वारे मतदान घेण्याची चर्चा होती मात्र प्रत्यक्षात २००४ ला हि मशीन आली जयाल भाजपने विरोध केला, अडवाणी यांच्या घरी स्वदेशी जागरण मंच च्या लोकांनी यावर बैठक घेतली आणि एव्हिएमला विरोध केला . मात्र पुढे हा. विरोध मावळला आणि इलेक्शन कोर्प्रेशन ऑफ इंडिया हैद्राबाद आणि भारत कॉर्परेषण बंगलोर येथे या मशीन बनवण्यात येऊ लागल्या यात लागणारी चीप अमेरिका जपान वरून मागवण्यात आल्या . मार्क १ मार्क २ ची मशीन तयार झाले मात्र एक शंका उपस्थित करण्यात आली कि बाबा हि मशीन हरवली तर काय करायचे , मग त्यातून विषय आला कि आपण ट्रकर बसवले पाहिजे . या साठी गुजरात चा मनीष आणि दक्षिणेतला तंत्रज्ञ वीरएप्पण यांना जबाबदारी देण्यात आल्या . विन सोल्युशन या कंपनीला रेडीवो फ्रिक्वन्सी बसवण्याचे काम देण्यात आले . त्या कंपनीने १२ लोक कामाला लावले ज्यांनी मशीन ला ट्रकर लावले मात्र याचा फायदा वेगळ्याच गोष्टीसाठी सुरु झाला ज्यामुळे मशीन मध्ये काहीतरी इंस्तोलेषण सुरु झाल्याचे लक्ष्यात आले . मग १२ लोकांनी यावर आक्षेप घेतला ज्यांना सांगण्यात आले कि विरोधी पक्षासाठी म्हणजे भाजप साठी हा सर्व प्रकार आहे , तुम्हाला याचा मेहनताना मिळेल या साठी एक पार्टी तेलंगाना येथे आयोजित करण्यात आली . भाजपचे दोन मोठे नेते तिथे आले अन त्यांनी फर्मान सोडले सर्वांना खलास करा . बेछुट गोळ्यांनी त्या १२ मधल्या ११ चा जीव घेतला , सदरील घटना मोदींनी २६ मे २०१४ रोजी शपथ घेण्यापूर्वी १३ मे २०१४ रोजी घडली . एक वाचला त्याचे नाव सय्यद शुजा . जो पुढे जखमी अवस्थेत शिकागो अमेरिका येथे पोहचला , त्यास अमेरिका तपास यंत्रणाकडून रोखण्यात आले . शुजा ने आपण हैकर आहोत अन भारतात खूप मोठा राजकीय घोळ झाल्याचे सांगितले , आपणाला अमेरिकेत शरण देण्याची मागणी त्याने केली . त्याचे प्रकरण होमलैंड सेक्युरिटी कडे देण्यात आले ज्यांनी त्यास १५ दिवस उपचार दिला आणि नैशनल सेक्युरिटी कडे सोपवण्यात आले . तोवर त्याची पूर्ण माहिती अमिरीकेने मागवली अन त्यास हैकर असल्याचे सिद्ध करण्याचे सांगितले . शुजा ने अमेरिकेची साईड हैक करून ते सिद्ध केले , त्या नंतर शुजाने आपल्याला अमिरेकेत असायलईम देण्याची मागणी केली म्हणजे अधिकृत आश्रय . हा आश्रय भारतात सरकार ठरवते मात्र अमिरिकेत कुणाला आश्रय द्यायचा यावर न्यायलय निर्णय घेते . शुजा चे प्रकरण डलास च्या कोर्टात चालले . न्यायलयाने त्यास मुभा दिली त्यास नौकरी देखील देण्यात आली . नंतर भारतातल्या शोध पत्रकारांनी शुजा ला शोधले त्याला समोर येण्यासाठी विनवणी केली , त्याच्या आई वडिलांना मारले गेल्याचे देखील तोवर त्यास सांगण्यात आले . त्यांने त्याच्या सोबत असलेल्या आणि नंतर मारलेल्या ११ लोकांची यादी देखील दिली मात्र भारतात यावर चर्चा देखील झालेली नाही , ८५ टक्के मिडीयाने देशाला मूर्ख बनवण्यात मोठा वाटा उचलला ? २१ जानेवारी २०१९ झालेल्या हल्लकल्लोळ माजला मात्र भारत सरकारला त्याचे गांभीर्य दाखवायचेच नव्हते , तिथे शहा यांचे लोया प्रकरण बाहेर काढणारे निरंजन टकले उपस्थित होते ज्यांच्याशी चर्चा केल्या नंतर अनेक गुंते सुटतात मात्र सर्वच याठिकाणी शब्दबद्ध करणे कठीण आणि शर्थीचे ठरावे . विन सोलुशन हि नफ्यातली कंपनी एकाएक बंद झाली , ज्याचा मालक सुखेष नारायण ला हे विचारले पाहिजे . याच कंपनीतील एक कर्मचारी लास वेगास मध्ये जावून बसला आहे . याचे उत्तर देशाला हवे आहेत . जर शुजा सय्यद खोटारडा आहे तर मग सरकारने देशासमोर ते सिद्ध केले पाहिजे . सरकार ते अजिबात करत नाही . उलट कोण शुजा असे सांगून पाप झाकत आहे काय , ज्या देशाने आपल्यावर १५० वर्षे राज्य केले त्या देशातून भारताला बेइज्जत करणारी पत्रकार परिषद होते यावर सरकारला काहीच सोयरे सुतक नसावे याचा अर्थ काय ? देशातल्या निवडणुका एका षड्यंत्रात निकाली निघाल्या आहेत काय , देशात भाजप जिंकली मग लोकात उत्साह का नाही , गल्ली ते दिल्ली एकच चर्चा आहे एवढी मते भाजपला कशी आलेली आहेत , या चर्चा कमी करण्यासाठी काही निवडक लोक *वादग्रस्त ट्वीट करतील मग कुणी गांधींना शिव्या घालून गोडसेचे उदात्तीकरन करतील , कुणी शिवाजी महाराज यांच्यावर तोंड सुख घेईल कारण एव्हिएम पातक झाकण्यासाठी कुठली तरी चर्चा आवश्यक आहे* , बहुदा तुम्ही एका ट्वीट वर एक तासाचे डिबेट पाहितलीच असेल . भारतीय नागरिकांच्या सहन शक्तीच्या पल्याड काही पोहचले तर देशात अराजकता माजेल ज्याचे श्रेय आणि स्वामित्व केवळ सरकारच्या बेफिक्रीला जाईल .

*तर सुप्रिया सुळे पराभूत झाल्या असत्या* .
आठवून पहा शरद पवार यांनी बारामतीत जर भाजप जिंकणार असेल तर मात्र एव्हिएम बद्दल शंशय व्यक्त केला होता .सुप्रिया सुळे कुल यांच्याकडून पराभूत होतील हे चंद्रकांत दादा पाटील एव्हिएम च्या विश्वासावर बोलत असल्याचे अनेकांना वाटले मात्र यावर पर्याय कुणी शोधला नाही . २३ मे रोजी सुप्रिया सुळे ११ वाजेपर्यंत पिछाडीवर होत्या . सुळे पराभूत होतात कि काय अशी शंका असताना त्या ठिकाणी जामर गाड्या मागवण्यात आल्या . आणि सुळे यांनी आघाडी घेतली . जर जामर गाड्या आल्या नसत्या तर सुळे यांचा पराभव एव्हिएम ने केला असता. राजू शेट्टी यांनी देखील असा जामर मागवला होता मात्र मोदींना तर शेट्टी कुठल्याही स्थितीत लोकसभेत नको होते म्हणूनच एक गुजराती चमू हातकनंगलेत हात सफाई करत होता. नांदेड आणि बारामती जिंकण्याची घोषणा चंद्रकांत दादा यांनी का केली असावी आता यावर चर्चा होत आहे .

- जेष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा, नवी दिल्ली.

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...