Skip to main content

बळी राजा कोण होता?

*कोण होता बळीराजा*

  🚩
दक्षीण दिशेची वैदिकांना असलेली भीती त्यांनी आपल्यावर देखील थोपवली आणी म्हणून दक्षिण दिशेला प्लॉट नको, दरवाजा नको . ती यमाची दिशा आहे असे आपल्यावर बिंबवण्यात आले.
*दक्षिण दिशेला काय आहे ?*
दक्षिणेला केरळ राज्य आहे.आणी केरळ येथेच महान्यायी, महाप्रतापी व दानशुर असा पुराणातला आम्हा अवैदीकांचा, रयतेचा राजा होऊन गेला. त्याचे नावं बळीराजा. बळीराजाचाच पणजोबा हिरण्यकश्यपू ,ज्याला राक्षस ठरवले गेले व त्याला मारण्यासाठी सिंहाचे मुकुट वाघनख असे बहुरूपी सोंग घेऊन खांबाच्या आडोशाला लपलेल्या विष्णूने ज्याला वैदीक "नृसींह अवतार " म्हणतात, त्या नृसिंह ने कपटाने हिरण्यकश्यपू ला मारले. कारण हिरण्यकश्यपू आपला फुटीरवादी पुत्र प्रल्हादला विष्णू या वैदीकाची बाजू घेण्याला विरोध करत होता. इथले जे मुलनिवासी अवैदीक होते ते सर्वच वैदीकांचा विरोध करायचे. कारण वैदीक यज्ञ करुन अवैदीकांची जमीन कब्जात घ्यायचे.
या प्रल्हादाच्या पोटी विरोचन जन्माला आला व त्याला देखिल असेच कपटाने मारले गेले. विरोचनच्या पोटी आणी प्रल्हाद चा नातू म्हणून  हिरण्यकश्यपूच्या वंशातला हा *बळीराजा.*
 ज्याची ख्याती वैदिकांना अक्षरशः  डोकेदुखी ठरू लागली.म्हणूनच बळीला ब्राह्मण वामनानं पाताळात गाडलं. त्याचं कारण त्याच्या काळात बळी वर्णसंकर करत होता, वर्णव्यवस्थेला विरोध करत होता, त्याच्या काळात आदर्श समाजव्यवस्था होती म्हणून तो आदर्श समाजव्यवस्थेचा राजा होता.
नंतर नृश नावाचा राजा होता. अजगर पर्वात, महाभारत वनपर्वात, तो युधिष्ठिराशी वादविवाद करताना चातुर्वर्ण्य समाजाला विरोध करतो. शूद्र हे ब्राह्मणांशी बरोबरीनं आहेत हे सिद्ध करतो आणि युधिष्ठिराला निरुत्तर व्हावं लागतं. आणि हे तो राजर्षि असताना त्यानं केले म्हणून त्याच्या राज्यात ब्राह्मण वर्णानं बदनाम करून त्याला गणराज्याच्या बाहेर हाकललं. ही दोन उदाहरणं सांगतात की, त्या काळात जे लोकायतासारखे स्त्रीप्रधान पंथ होते, ते (चातुर्वर्ण्याला) विरोध करत होते. तर अशा प्रकारच्या तत्त्वज्ञानाचे जे पंथ आहेत, ते सबंध काळात या वर्णविषमतेला विरोध करत होते.

बळी पाताळात गेल्यावर सुध्दा त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. आजदेखील दिवाळीला बहीण ओवाळतांना म्हणते "इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो ".
अशा या बळिराजाच्या राज्याकडे दक्षिण मुखी प्लॉट, घराचा दरवाजा, खिडकी काहीही नको व त्या दिशेला यमाची दिशा हे नाव देऊन आम्हाला भीती दाखवण्यात आली. बळीराजाच्या घराण्यातच नैऋत्ती नावाची कर्तबगार स्त्री होऊन गेली जिने शेतीचा शोध लावला तिला *अवदसा*म्हणून संबोधण्यात आले. व नैऋत्त दिशा देखील अशुभ सांगण्यात आली.
होलीका (होळी) पण याच घराण्यातली हिरण्यकश्यपूची बहिण व प्रल्हाद ची आत्या. (होळी या सणाला मी होलीका वर लेख लिहीलेला आहे) या सर्व मातृसत्ताक व्यवस्थेतल्या कर्तबगार महिला होत्या. त्या सर्वांना वैदीकांनी बदनाम केले व त्यांच्या भूलथापांना बळी पडतं आम्ही बहुजन अवैदीक पण आमच्या या पुराणातल्या आदर्शाना त्यांचीच री ओढत राक्षस ठरवतो खरे तर तेच आपले आदर्श.
*छद्म विज्ञान (Pseudo science)ची जोड*
दक्षिण दिशेच्या नफरतला सिध्द करण्यासाठी छद्म विज्ञान ची जोड देण्यात येते, आणी ती म्हणजे चुंबकीय लहरी या उत्तर-दक्षीण दिशेला वहातात त्याचा आपल्या शरीरावर, धंद्यावर दुष्परीणाम करतात. हे फक्त ढोबळ विधान आहे. विज्ञानात अशा प्रयोगांती सिध्द न झालेल्या गोष्टीला काही थारा नाही. बऱ्याच एम.आर.आय सेंटरमध्ये ते मशीन दिशा बघून ठेवलेले नसते या मशीन मध्ये सर्वात जास्त विद्युत चुंबकीय लहरी असतात त्यावर काही प्रभाव पडत नाही.
दक्षिण दिशा अशुभ नाही व ती भीती न बाळगणाऱ्या अनेकांचे हॉस्पीटल्स, कारखाने, दुकाने आज देखील दक्षिण मुखी असुन सुध्दा भरभराटीला आहेत.

*बळीप्रतिपदेला या शेतकरी राजाला आपण सर्व अभिवादन करतो.दिवाळीच्या बजबजपुरीत माझ्याकडून या महान राजाचे विस्मरण व्हावयास नको म्हणून अगोदरच विनम्र अभिवादन*
एक पुराणातला राजा बळी व दोन इतिहासातले राजे छत्रपती शिवराय व छत्रपति शाहू  आमच्या कायम स्मरणात रहातील.

*इडा पिडा टळो व बळी चे राज्य येवो.*
संदर्भ- १)बळीवंश - (तात्या साहेब) प्रा.डॉ.आ.ह. साळुंखे.
२) कॉ. शरद पाटिल.

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...