Skip to main content

Posts

Showing posts from July, 2020

लोकमान्य टिळक ते #क्रांतिकारक गांधी! - संजय आवटे

#लोकमान्य टिळक ते #क्रांतिकारक गांधी! - संजय आवटे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त परवा होत असलेल्या एका कार्यक्रमात अमित शहा प्रमुख वक्ते आहेत. म्हटले तर हे आश्चर्याचे आहे. कारण, टिळक हे कॉंग्रेसचे नेते. मात्र, शहांना ते 'आपले' वाटतात. शहाच नव्हे, त्यांच्या पूर्ण पक्षाला आणि संघटनेलाही लोकमान्य आपले वाटतात. शिवाय, हा प्रकार निव्वळ महापुरूषांच्या अपहरणाचा मानावा, असाही नाही. लोकमान्य टिळक हे खरोखरच असामान्य असे महापुरूष. प्रतिभावंत आणि सर्वगामी बुद्धिमत्ता असलेले. कॉंग्रेस नावाचा 'डिबेटिंग क्लब' हे आक्रमक आंदोलन झाले, ते लोकमान्यांमुळे. लोकमान्य ज्या 'तेल्या-तांबोळ्यांचे पुढारी' म्हणून मानले गेले, त्या तेल्यांविषयी आणि तांबोळ्यांविषयी त्यांचे काय मत होते, हा मुद्दा वेगळा. पण, कॉंग्रेस आक्रमक अशी चळवळ व्हावी, हा प्रयत्न लोकमान्यांचाच. त्यासाठी त्यांनी अनेकविध कल्पना लढवल्या आणि त्यातून कॉंग्रेसला जनाधार मिळू लागला. १८९० मध्ये लोकमान्य कॉंग्रेसमध्ये आले आणि अल्पावधीतच महत्त्वाचे नेते झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीनंतर तर 'लाल-बाल-...

नागवंशाचा इतिहास डॉ बाबासाहेब आंबेडकर

~ नागवंशाचा इतिहास ~ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागवंशाबद्दल नागपूरच्या दीक्षाभूमिवर १४ /१५ ऑक्टोबर १९५६ रोजी जे भाषण केले त्यात म्हणतात, "ज्यांनी बौद्ध इतिहासाचे वाचन केले असेल त्यांना हे कळून येईल की भारतात बौद्ध प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी केला. नाग लोक आर्याचे भयंकर शत्रू होते. आर्य व अनार्य यांच्या मध्ये लढाया व तुंबळ युद्ध झाली. आर्य लोकांनी नागाना जाळून टाकल्याचे दाखले पुराणात सापडतात. अगस्ती मुनिने त्यातून फक्त एक नाग मनुष्य वाचविला. त्याचेच आपन वंशज आहोत. ज्या नाग लोकांनी एवढा छळ सोसावा लागला. त्यांना वर येण्यास कोणीतरी महापुरुष हवा होता, त्यांना तो महापुरुष गौतमबुद्ध भेटले. भगवान बुद्धाचा उपदेश नाग लोकांनी सर्व भारतामध्ये पसरविला. नाग लोकांनी मुख्य वस्ती नागपूर येथे येथे व आसपास होती असे दिसते. म्हणून या शहरास *'नागपूर'* म्हणजे नागाचे गाव असे म्हणतात. येथून सुमारे सत्ताविस मैलावर नागार्जुनाची टेकडी आहे. नजीकच वाहणारी नदी आहे ती नागनदी आहे. अर्थातच या नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरुण पडले आहे. यावरुन नागवंश हा या देशातला राज्यकर्ता वंश होता. त्य...

कथा

संपानाना सकाळी लवकर उठून कारखान्यावर सगळ्यात अगोदर हजर झालं व्हतं.  गाळप बंद असल्यामुळे ऑफिस दहा वाजता उघडत व्हतं. आठ वाजल्या तरी गेट उघडलं न्हाय हे बघून नाना वॉचमनवर घसारलं, "आरं पगार काय झोपा काढायचा घेता काय? घड्याळात बघा जरा किती वाजल्या त्ये?".  "नाना कालवा करू नका, कार्यक्रम दहा वाजता आहे", वॉचमन गेटच्या आत मधूनच म्हणाला.  'आरं कार्यक्रम रातच्या बाराला असू दि सभासद आला की गेट उघडलंच पायजे', नाना धोतराचा सोगा सावरत म्हणलं.         त्या म्हताऱ्याच्या नादाला लागू नको. लै खतरुड हाय त्ये, दुसरा वॉचमन पहिल्याला म्हणाला.         म्हातारा तुझा बाप असंन, असून धाकट्या पोराचं लगीन व्हायचंय माझ्या, नाना सुपारी कातरत वॉचमनला तावदारलं.        नाना बाप काढायचं काम न्हाय, न्हायतर चेरमनकडं तक्रार करीन तुमची.          अरं तुझ्या चेरमनचा बा पन माझं काय वाकडं करणार न्हाय. खुशाल तक्रार कर माझी पण पह्यलं आत सोड मला.        वॉचमननं मुकाट्यानं गेट उघडलं आणि नाना