Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

प्रजासत्ताकाची वाटचाल आणि पुढील आव्हाने

प्रजासत्ताकाची वाटचाल आणि पुढील आव्हाने लोकांनी, लोकांच्याकडून लोकांसाठी चलावलेले राज्य म्हणजे लोकशाही! ही लोकशाहीची व्याख्या शालेय जीवनापासुन लिहित वाचत आणि ऐकत आलेलो आहे. शालेय जीवन संपेपर्यंत सहज पाठ होणारी आणि हक्काचे दोन गुण मिळवून देणारी एवढीच तिची उपयुक्तता होती. विद्यार्थी म्हणून त्याचा फायदाही झालाच. परंतु जसजसे मोठे होत गेलो. समज वाढत गेली तसे या व्याखेचे विस्तृत स्वरूप आणि त्यानुसार देशात रुजू पाहत असलेली लोकशाही आणि सामाजिक मूल्ये यावरून तिचे महत्त्व लक्षात यायला लागले. वेगवेगळ्या हुकूमशाही, राजेशाही आणि लष्करी अंमलाखाली असलेल्या देशातील व्यवस्था आणि त्यामुळे झालेली मानवी जीवनाची दुरावस्था पाहिल्यानंतर आपल्या देशातील व्यवस्थेचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही.  ही व्यवस्था काय आहे याचा विचार करून आणि वाचून समजून घेतल्यावर ही व्यवस्था लोकशाही आणि त्यातही ती प्रजासत्ताक लोकशाही असल्याचे सहज लक्षात येते. जगाच्या पाठीवर अनेक देशात लोकशाही व्यवस्था आहे परंतु त्यातही भारतातील लोकशाही अनेक अर्थाने आणि बाजुंनी वेगळी आहे. साहजिकच जगाला तिचे कौतुक आहे आणि आश्चर्यही वाटते कारण भारतात...

कथा दोघी दिनानाथ मनोहर

दोघी सामानाने लादलेल्या हातगाडीबरोबर शांती जेव्हा वस्तीत शिरली, तेव्हा दुपारचे चार वाजले होते. वस्तीला नुकतीच जाग आली होती. काही बाया झोपतून उठल्या होत्या. चहावाल्या पोऱ्याची वाट पाहात दारांशी उभ्या होत्या, तर काही वेणीफणी करत होत्या. घडी केलेली लोखंडी कॉट, दोन खुर्च्या, जाळीचे कपाट, जाडजूड गादी,रंगीबेरंगी चादरी, पत्र्याच्या ट्रंका आणि असे कितीतरी सामान भरलेल्या त्या हातगाडीबरोबर संथ, धिम्या गतीने, हसतमुखाने येणाऱ्या शांतीला पाहायला सर्व बाया आपापल्या झोपड्यांबाहेर येवून उभ्या होत्या. खरं तर दोन आठवड्यांपूर्वी सावित्रीच्या झोपडीशेजारच्या दोन खोल्यांच्या घराची दुरुस्तीचे काम सुरू झाले तेव्हाच शांती एकदा वस्तीत येऊन गेली होती. त्यामुळे शांती त्या वस्तीत राहायला येणार हे सर्वांना माहीत होते. शांतीला ह्य तालुक्याच्या गावात येवून सहा वर्षे होत आली होती. त्यामुळे वस्तीतील बाया तिला ओळखत नव्हत्या असेही नव्हते. तरीही तिचे आगमन म्हणजे काहीतरी विशेष घटना घडत असल्याप्रमाणे सर्व बाया बाहेर आल्या होत्या. ह्याला अपवाद होती सावित्री. शांतीची गाडी जेव्हा कोपऱ्यावरून वस्तीकडे वळली होती, तेव्हा सावित्री...