Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

क्रांतीने खाल्लेली पिल्ले!

क्रांतीने खाल्लेली  पिल्ले! कोणताही लढा किंवा क्रांती दीर्घकाळ चालू राहिली तर त्याचा मूळ उद्देश संपुष्टात तरी येतो किंवा जेव्हा त्या क्रांतीचे उद्देश साध्य झाले आहेत असे वाटते तेव्हा  सामाजिक-राजकीय-आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ इतके बदललेले असतात की त्याचा समाजाला , व्यवस्थेला किंवा त्या देशाला काहीच उपयोग राहत नाही. बऱ्याचवेळा ज्यांच्या नेतृत्वाखाली क्रांती केलेली असते त्यांना जर क्रांतीचा उद्देश साध्य करता आला नाही तर ज्यांनी क्रांती करण्यात मोलाची भूमिका बजावलेली असते तेच लोक क्रांतीच्या नेतृत्वाविरुद्ध बंड करून उठतात. त्या बंडाला ऐतिहासिक संदर्भ असतील तर  बऱ्याचवेळा त्याला प्रतिक्रांती असेही म्हटले जाते. यातही क्रांतीचा प्रणेता आपल्या विचारांवरून किंवा ध्येयावरून भटकला तर त्याचे अनुयायीच त्याच्या जीवावर उठले असल्याचे इतिहासात डोकावले असता  लक्षात येते. क्रांती होताना जर ती रक्तरंजित आणि अतिजीवीत हानी करणारी असली तर प्रतिक्रांती त्याहूनही अधिक भडक आणि भयंकर असण्याची दाट शक्यता असते. सध्या म्यानमार आणि आंग सान स्यू की यांच्याबाबत घडत असलेल्या घटना पाहिल्या की याचा ...

मराठा आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेली संधी

  मराठा आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेली संधी!  दिनांक ८ मार्च २०२१ च्या मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सूनावणीदरम्यान एक चांगली गोष्ट घडून आली. न्यायालयाच्या न्यायदानाच्या क्षमतेवर, विश्वासार्हतेवर विचारवंत आणि प्रसारमाध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आणि राज्यघटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वांचा संकोच करणारे निर्णय न्यायव्यवस्थेकडून एकामागून एक घेतले जात असतानाच "सद्या हे असेच चालू आहे" यावर एका सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशानेच शिक्कामोर्तब केले. त्यामुळे मराठा आरक्षणच काय इतर कोणत्याही बाबतीत आपल्याला न्यायव्यवस्था न्याय देईल का? असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला असतानाच ८ मार्चला झालेल्या मराठा आरक्षण सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अनेक राज्यातील सवर्ण जातींकडून गेली अनेक वर्षे होत असलेली आरक्षणाची मागणी लक्षात घेऊन आरक्षणाची मर्यादा ५०% च्या पुढे न्यावी का? या बाबत राज्यांना विचारणा केली  असून राज्यांना याबाबत आपले मत सात दिवसात म्हणजेच १५ मार्चपर्यत मांडावे लागणार होते. त्यानुसार काही राज्यांनी आपले मत मा...

इज लव्ह इनफ सर.....!

 इज लव्ह इनफ सर...! प्रेम आणि दया यामध्ये फार कमी अंतर असते. अगदी दोन बोटांचे म्हटले तरी चालेल. फार कमी लोकांना त्यातील फरक लक्षात येतो. बऱ्याच वेळा तो अनेकांना समजतो पण काही काळ लोटल्यानंतर ! आपण दयेला प्रेम किंवा प्रेमाला दया समजत होतो हे समोरच्याने आपल्याबरोबर केलेली कृती होऊन गेल्यानंतर अनेकांना ते उमजते. घटना भूतकाळातील असेल तर वर्तमानकाळात त्याबाबत मिळणारा आनंद किंवा दुःख हे तितके सुखकारक किंवा त्रासदायक नसते तितका आनंद किंवा दुःख समोरच्या माणसाच्या वर्तमानकालीन कृतीने मिळणाऱ्या आनंद किंवा दुःखाने होतो.  समोरच्या माणसाबाबत आपण केलेली कोणतीही कृती ही त्याला कशी वाटेल हे सांगणे तितकेच कठीण काम असते. त्यातही समोरच्या माणसाचा आणि आपला सामाजिक दर्जा म्हणजेच जात, धर्म, पंथ, लिंग, वर्ण आणि आर्थिक परिस्थिती काय आहे यावरून वेगवेगळ्या व्यक्ती आपल्या त्यांच्याबाबतच्या कृतींचा अर्थ काढत असतात.  या विचाराला नेहमी एक तिसरा कोण जबाबदार असतो. म्हणजे व्यक्ती व्यक्तींमधील सहसंबंधावर परिणाम करणार आणि प्रभाव करणारा नेहमी एक त्रिकोण ठरलेला असतो. म्हणजे दोन व्यक्ती कोणत्याही जात, धर्म, प...