Skip to main content

बिरबल कथा ५१

 बिरबल कथा: घोडचूक

रविवारचा दिवस म्हणजे राजदरबाराला सुट्टी होती. सकाळी सकाळी अकबर आणि बेगमसाहिबा बदामाचा शिरा खात बसले होते. दिवस कसा घालवावा या विवंचनेत असलेल्या अकबरला अचानक एक युक्ती सुचली. त्याने एका सैनिकाला फर्मान सोडले आणि "आताच्या आत्ता दरबारात हजर व्हा!" असे सांगून बिरबलाला घेऊन ये! सैनिक निघणार तेवढयात बिरबलच महाराजांच्या महालात हजर झाला. महाराजांना मुजरा करत म्हणाला, "महाराज, आदेश द्या आपला हा सेवक हजर आहे!" बदामाच्या शिऱ्याची एक प्लेट त्याच्याकडे सरकवत अकबर म्हणाला, "बिरबला आज तुला एक कथा सांगणार आहे. त्याचे तू बरोबर आणि समर्पक उत्तर दिले नाही तर तू शिक्षेला पात्र ठरशील".

महाराज मंजूर आहे.

मग ऐक, 'एक आटपाटनगर असते. तेथील जनता आपल्या राजावर अजिबात खुश नसते. राजा भ्रष्टाचारी आहे, त्याला विकास करता येत नाही. त्याच्याकडे निर्णय क्षमता नाही, तो आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाही. शिवाय तो दिर्घकाळ सत्तेत आहे म्हणून तो आता थकला आहे. आजूबाजूची अनेक राज्ये आपल्या पुढे निघून गेली तरी आपण मागेच आहोत, याला हा राजाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला बदलला पाहिजे आणि नवीन राजा आणला पाहिजे असा विचार करून तेथील जनता निवडणुकीत नवीन राजाकडे सत्ता सुपुर्द करते. नवा राजा आपल्याला नोकरी देईल, रोजगार निर्मिती करेल, अन्नधान्य स्वस्त करेल, उद्योगधंदे उभारेल, शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील, भ्रष्टाचार समूळ नष्ट करेल, राज्याची भरभराट होईल, राजाच्या भीतीने राज्याचे शत्रू स्वतःच आत्महत्या करतील, सामान्य जनतेचे राज्य येईल. राजाने  दिलेल्या मोठ्या अश्वासनांवर विश्वास ठेवून आशेने सर्वजण त्याला निवडून देतात. सत्ता हातात येताच नवा राजा आपल्या तिजोरीच्या चाव्या आपल्या राणीसाहेबांकडे सुपुर्द करतो. अर्थकारणात फारच सुमार असलेल्या आणि सतत देवधर्मात मग्न असलेल्या राणीसाहेब सगळा पैसा उधळपट्टी करून खर्चून टाकतात. राजाचे राणीवर आतोनात प्रेम असते. तिजोरी रिकामी झाल्यावर राजा राणीच्या प्रेमापोटी अगोदरच्या राजाने उभे केलेले उद्योग आणि संस्था विकायला काढतो. जनतेला सगळे कळत असते पण नवा राजा काहीतरी वेगळे करील, या आशेवर त्याकडे दुर्लक्ष करते. पण हळूूूहळू  राजा अगोदरच्या राजाने उभे केलेले सर्व उद्योग धंदे, कंपन्या आणि मालमत्ता विकून टाकतो. पण हा राजा एकदम भारी आहे आणि ही त्याच्या कामाची पद्धतच आहे असे समजून जनता गप्पच असते. 

एकेदिवशी सगळे पैसे संपल्यावर राजा विचारात पडतो. सगळे विकून झाले, आता विकायचे तरी काय? आणि पैसे जमवायचे तरी कसे? राजा या विवंचनेत असतानाच राणीसाहेब येतात आणि राजाच्या विवंचनेवर उपाय सुचवितात. त्यांचा उपाय ऐकून राजा खुश होतो. राणी किती हुशार आहे! या विचाराने  अभिमानाने त्याचा ऊर भरून येतो. राणीसाहेब आपला निर्णय जाहीर करून टाकतात. जनतेने राजाकडे आपल्या काबाडकष्टातून जमा केलेले किडुकमिडुक गरजेला उपयोगी पडेल, चोराचिलटापासून सुरक्षित राहिल शिवाय राजा त्यावर समाधानकारक परतावाही देईल म्हणून विश्वासाने आपली आयुष्यभराची पुंजी गरीब जनतेने राजाकडे ठेवायला दिलेली असते. राणीचा त्याच्यावरच डोळा आहे आणि राजाची त्याला मूक संमती आहे हे जनतेच्या लक्षात आल्यावर मात्र जनता चुळबूळ करायला लागते. राजाचे गुप्तहेर राजाला जनतेची अस्वस्थता सांगतात शिवाय त्याचा येणाऱ्या निवडणुकीत आपल्याला फटका बसू शकतो असा अहवाल देतात तेव्हा सत्ता गेली तर काय करणार? जनतेच्या ठेवी पुढच्या निवडणुकीनंतर लुबाडू असे म्हणून राणीला खोटेच दटावतो. राणीही 'नजरचुकीने झाले हो माझ्याकडून!' असे म्हणत आपला निर्णय मागे घेते. जनताही राजा आणि राणी आपली किती काळजी करतात म्हणून खुश होते'.

बिरबला आता जी गोष्ट सांगितली त्याचे तात्पर्य सांग. नाहीतर शिक्षेला तयार रहा. 

सोपं आहे महाराज जनतेने विश्वासाने राजाकडे सत्ता सोपविली ती चूक आणि राजाने राणीकडे तिजोरीच्या चाव्या दिल्या ही घोडचूक. 

बिरबलाचे उत्तर ऐकून 'सगळे पुरुष मेले एकजात सारखेच!' असे म्हणत बेगम फणका-याने आपल्या महालात निघून गेल्या आणि बादशहाने हसत हसत बिरबलाच्या प्लेटमध्ये अजून थोडा शिरा टाकला.

©के.राहुल, 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...