Skip to main content

Posts

Showing posts from October, 2021

मी आस्तिक का नाही - नरहर कुरुंदकर

 मी आस्तिक का नाही  - नरहर कुरुंदकर मी ज्या घरात जन्माला आलो ते घर आस्तिकच आहे. माझे मामा आस्तिक, माझ्या भोवतालचे सर्व वातावरणच आस्तिक आहे. जन्मल्याबरोबर मी देखील आई, बाबा, आत्या, मावशी असेच शब्द शिकलो. मी काही असे एकदम म्हणालो नाही की, "या जगात ईश्वर नाही." माझ्या नास्तिक्याचा उदय मी जेव्हा विचार करू लागलो त्यावेळेस झालेला आहे. मी नास्तिक असलो तरी सामान्यपणे मी आस्तिकाच्या भावना दुखवीत नाही. जी वस्तू अस्तित्वातच नाही तिच्याविरुद्ध झगडण्यात मला स्वारस्य नाही. एखाद्या माणसाने जर सांगितले की, 'देव आहे' तर त्यामुळे माझे काही नुकसान होत नाही. त्यालाही इतकी बुद्धी असायला पाहिजे की 'देव नाही' म्हटल्याने त्याचेही काही नुकसान होत नाही. पण हे त्याच्या लक्षात येत नाही. 'देव आहे ' म्हटल्याने माझे काही नुकसान होत नाही.  "मी देवळात जातो, देवाच्या पाया पडतो, सर्व धार्मिक समारभांना हजर राहतो, धर्मगुरूंच्या पाया पडतो, माझ्या घरी होता होईतो धार्मिक समारंभ करीत नाही. जर बायको करायचेच म्हणाली तर करतो. कुठल्याही प्रकारे अभिनिवेश नावाची जी गोष्ट आहे, ती नाही. आता माझ्...

शूर्पणखा कोण होती?

*शूर्पणखा कोण होती?* महर्षी वाल्मिकी लिखित रामायणाच्या कथेला कलाटणी देणारे व्यक्तित्व म्हणजे *'शूर्पणखा!'*    आजपर्यंत आपल्यासमोर रामायणातला संघर्ष राम विरुद्ध रावण असा आणला गेला; पण वस्तुस्थिती अशी आहे, की रामायणातला मूळ संघर्ष राम विरुद्ध रावण असा नसून 'ब्राह्मणी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणारा पुरुषसत्ताक राम विरुद्ध अब्राह्मणी प्रवाहाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्त्रीसत्ताक गणराज्ञा' असा हा संघर्ष राहीला आहे. या गणराज्ञांत ताटका, अहल्या, परशु, सीता, शूर्पणखा, शबरी, मंदोदरी यांचा समावेश होतो. ही सारी स्त्रीराज्ये रामाने नष्ट केली व अशा स्त्रीसत्ताक राज्यातील तत्कालीन एकमेव उत्पादन साधन म्हणजे शेती ताब्यात घेऊन तिथे पुरुषसत्ताक राज्ये स्थापन केली.    अशीच एक स्त्री राज्यकर्ती अथवा गणराज्ञी होती शूर्पणखा! मी या ठिकाणी 'राज्ञी' असा शब्दप्रयोग केला आहे, 'राणी' हा शब्द मुद्दाम टाळला आहे; कारण, 'राज्ञी' या शब्दाचा अर्थ सर्वेसर्वा, स्वतंत्र, सार्वभौम असा होतो; तर 'राणी' या शब्दाचा अर्थ कोण्यातरी राजाची बायको असा होतो आणि बायको म्हणजे नवऱ्याची दासी...

हिंदुत्वाची लिटमस टेस्ट

    * हिंदुत्वाची लिटमस टेस्ट* भारतीय प्रसारमाध्यमांनी आणि समाजमाध्यमांनी गेले आठ दिवस सामान्य माणसाच्या जीवन-मरणाचे सगळे प्रश्न बाजूला ठेऊन शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानने ड्रग्ज सेवन केले आणि जवळ बाळगले म्हणून  त्याला अमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले या जणू काही सर्वात महत्वाच्या आणि आंतरराष्ट्रीय टीआरपी असलेल्या बातमीवर लक्ष केंद्रित केले आहे. शाहरूख खानचा हा ज्येष्ठ चिरंजीव मुंबईवरुन गोव्याला जाणा-या एका क्रुझवरील पार्टीत त्याच्या काही मिञमंडळींसह ड्रग्जचे सेवन करताना सापडला. त्याला अटक करताना त्याने आपण ड्रग्जचे सेवन केले आहे अशी कबुली दिल्याची आणि त्याने डोळयाच्या लेन्स कव्हरमध्ये लपिवलेले ड्रग्ज आपण हस्तगत केल्याचे पथकातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तर प्रसारमाध्यमात याबाबत रोज नवनवीन खुलासे होत आहेत. कारण ज्यांनी एन.सी.बी. (NCB) चे  अधिकारी म्हणून ही धाड टाकली ते आपले अधिकारी नाहीत असे NCB नेच स्पष्ट केले आहे. तर ही धाड टाकणारे मनीष भानुशाली आणि के.पी.गोसावी यांचे भाजपशी लागेबांधे आहेत. भानुशाली हा भाजपचा कार्यकर्ता आहे आणि त्याने स्वतः हे मान्य करताना यात भाजप...