Skip to main content

कविता- बुद्ध एकदा समजून घे!

 तु राम होऊ नको

मला सीता होणं जमणार नाही

माझ्याच्यानं अग्निपरिक्षा देणं तर होणारच नाही

आणि तुझ्याविना तर सोडच

तुझ्यासोबतचाही वनवास जमणार नाही

लग्नात घेतलेल्या सप्तवचनातलं 'जन्मभर तुला साथ देईन' 

हे वचन पाळता न आलेल्या तुला 

माझ्याच्याने एकवचनी न्यायनिष्ठ म्हणणं होणारच नाही...


तु लक्ष्मणही होऊ नकोस

मला उर्मिला होणं जमणार नाही

राजवाड्यातली सुखं टोचतील मला

बंधुप्रेमाचं वचन पाळताना

सप्तपदीतलं तेच सात जन्माच्या सोबतीच वचन

तु ही तुझ्या भावासारखंच कोलून दिलंस

विरहात जळत तुला श्रेष्ठ बंधुप्रेमी म्हणणं मला जडच जाईल....


तु बुद्धही होऊ नकोस

मला यशोधरा होणं जमणार नाही

दुःखाचं मुळं शोधायला घर सोडणाऱ्या तुला ते भेटणार नाही

कारण तु ते माझ्या हृदयात घर सोडताक्षणी ठेऊन जाशील

शांततेच्या प्रेमात असणारा तु

माझ्या मनातला गोंधळ ऐकुही शकला नाहीस

ज्या गोष्टींच्या शोधार्थ तु गेलास 

त्याच गोष्टी माझ्याजवळ सोडून गेल्यानं

त्याचं ज्ञान तुला झालं हा दावा मी खोटा पाडीन

आणि सप्तपदीत तुला दिलेलं विश्वासार्हतेचं वचन

माझ्याकडुन मोडलं जाईल

तु तरी साथ देण्याचं कुठं पाळलंस


हां,व्हायचंच असेल तर तुकाराम हो तु

तुझ्या तोंडावर तुला कचाकचा भांडत 

तुझ्या काळ्या पांड्याला शिव्या देत का होईना

पण तुझी श्रद्धा आणि संसार तुझ्याचं साथीनं सांभाळणारी

तुझी आवली होणं मला जमेल 

खरंंतर मला ते जास्ती आवडेल....!!!


C/p

------------

कविता -  बुद्ध एकदा समजून घे!

राम लक्ष्मणाचे ठीक आहे,

पण बुद्धाबाबत बोलू नको.

पैलू पडलेल्या हिऱ्याला,

कोळश्याबरोबर तोलू नको.


यशोधरा खंबीर होती,

म्हणूनच गौतम मुक्त झाला.

ज्याला उमगला बुद्ध,

तोच त्याचा भक्त झाला.


तू सुद्धा तुझी चौकट मोड,

लागली जर का ठेच,

तर धाय मोकलून रड.

समतेची गाणी गाताना स्त्री वादाचा शंख करू नको, 

एकाच पारड्यात सर्वांना तोलून  उगीच डंख मारू नको.


सतत दुसऱ्याला दूषणं देणं ,

फार काही बरे नाही.

आपल्या अपयशाला दुसरा धनी,

हे काही खरे नाही.


जेव्हा तुला बुद्धासोबत  महामायासुद्धा समजेल,

आपल्याला अजून बुद्ध कळलाच नाही,

हे  तुला त्याच क्षणी उमजेल.

 

म्हणुनच वेडे बुद्ध एकदा समजून घे!

©के.राहुल, 9096242452


Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

संभाजी महाराज आणि भीमा कोरेगावचा इतिहास

*१ जानेवारी १८१८ ला* *स्वांतञ्याचे बंड का झाले?* #छत्रपती शिवाजी महाराजांच्या हत्तेच्या कटात जे ब्राह्मण मंत्री सामील होते त्या बारा ब्राह्मण  मंत्र्याना छत्रपती संभाजी महाराज यांनी हत्तीच्या पायी देवून ठार मारले आणि शिवाजी महाराजांच्या हत्तेचा बदला घेतला या गोष्टीमुळे ब्राह्मण वर्ग हादरून गेला व त्यांनि संभाजी महाराजांचा बदला घेण्याचा जणू विडाच उचलला असावा असे षडयंत्र  ब्राह्मण  रचत गेले याचाच एक भाग म्हणून रामदासाचा चा पट्टशिष्य रंगनाथ स्वामी याने षडयंत्र करून संभाजी महाराजांना औरंगजेबाला पकडून देण्यात  मदत केली. औरंगजेबाने संभाजी महाराजाना माने पासून पायापर्यंत त्यांच्या वजनापेक्षा जास्त वजनाच्या साखळदंडात जखडून ठेवले आणि संभाजी महाजांना औरंगजेबाने दोन प्रश्न  विचारले की, माझ्या सरदारापैकी तुला कोण फितूर झाल आणि तुझा खजिना कुठे आहे.परंतू सभाजी महाराजांनी या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत. मग औरंजेब संभाजी महाराजाला सोडून देण्याचे ठरविले परंतू नंतर ब्राह्मण  मंत्र्यांनी औरंजेबाला सांगितल की संभाजी आमच्या धर्माचा आहे तेंव्हा त्याला आमच्या हवाली करण्य...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...