Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

कविता - कोण आहेत ही लोकं!

कोण आहेत ही लोकं! त्यांनी सांगितले भोंगे काढा, त्यांनी सांगितले भोंगे लावा, आणि आम्ही नेहमीप्रमाणे पळत सुटलो. कोण आहेत ही लोकं याचा विचार न करता! हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी जाती आणि धर्म निर्माण केले, नंतर जातींची उतरंड लावली, कुणी कपाळी टिळा लावला, कुणी तराजू घेऊन व्यापारी झाले, कुणी हातात तलवार घेतली, आणि आपल्याच धर्मातील इतरांना शूद्र ठरविले. हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी धर्म निर्माण केले, कुणी आचार्य झाले, कुणी मुल्ला-मौलवी झाले, कुणी पाद्री झाले, आणि सगळ्यांनी  मिळून आपल्या अनुयायांमध्ये भांडणे लावून दिली. हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी सांगितले, शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊ नये, कुणब्यांनी फक्त शेती करावी, बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावे, ऋषींचे कुळ आणि मूळ विचारू नये, प्रश्न विचारू नयेत, जे आहे त्यातच समाधान मानावे, हे असेच पिढ्यानपिढ्या सांगत राहिले, आणि आपण ऐकत राहिलो. कधी जात श्रेष्ठत्वाच्या नावाखाली, तर कधी धर्म श्रेष्ठत्वाच्या नावाखाली. आणि हे असेच कुठपर्यंत चालू राहील? जो पर्यंत आपण विचार करत नाही, जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारत नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या अधिकार...

पंडिता रमाबाई

 अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘समाजस्वास्थ्य’कार रघुनाथ धोंडो कर्वे यांच्यावरच्या ‘ध्यासपर्व’ या चरित्रपटातला अगदी सुरुवातीचा प्रसंग. पांढरीशुभ्र साडी घातलेली आणि केशसंभार पूर्ण धवल असलेली उतारवयाची एक स्त्री केक कापत आहे, असे एक दृश्य आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी बालविधवा असलेल्या गोदूबाईंशी विवाह केला आहे आणि त्यांच्या पहिल्या बायकोपासून झालेला मुलगा रघुनाथ खिन्न मनाने हे सगळे पाहतो आहे.  यातली केक कापणारी महिला आहे पंडिता रमाबाई, कारण बालविधवा गोदूबाई ही त्यांच्याच अनाथाश्रमातली मुलगी आणि बालविधवेचा हा पहिला पुनर्विवाह ही भारतातली एक ‘सामाजिक क्रांती’च होती. या चरित्रपटात पंडिता रमाबाईंची भूमिका साकारली आहे विजयाबाई मेहता यांनी. प्रकांड पंडित, समाजसुधारक, साहित्यिक, ख्रिस्ती मिशनरी, भाषाकोविंद  असे व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या रमाबाईंचे  स्मृतिशताब्दी वर्ष  आज ५  एप्रिल २०२२ रोजी संपत आहे. मात्र गोदूबाईचे किरकोळ प्रकृतीच्या कर्वे यांच्याशी लग्न ठरवताना रमाबाईंनी अट घातली होती, आपल्या या ‘जावईबापूं’नी आधी स्वतःचा विमा उतरवून घ्यावा, ...

जलसा: माणुसकी आडच्या ढोंगांची गोष्ट

* जलसा: माणुसकी आडच्या ढोंगांची गोष्ट*  सार्वजनिक जीवनात वावरत असताना माणूस अनेक रूपे घेऊन वावरत असतो. माणूस जितका प्रसिद्ध, यशस्वी आणि महत्वकांक्षी असतो तितकी त्याची जास्त रूपे असू शकतात. काळ, वेळ आणि संधी अनुसार त्यात बदलही होत जातो. काही वेळा ही रूपे अत्यंत अविश्वसनिय आणि अचंभीत करणारी असतात. अश्या वागण्यामागे जसा वर्चस्ववाद असतो तसाच बऱ्याचवेळा आर्थिक गणिते, सामाजिक प्रतिष्ठा आणि प्रतिमा संवर्धन या गोष्टीही प्रकर्षाने जाणवतात. त्यामुळे ध्येयवादी माणसे आपल्या चुका किंवा गैरकृत्ये लपविताना आपला चांगुलपणाचा बुरखा वापरत राहतात. प्रसिद्ध स्विस मानसशास्त्रज्ञा मॉरीस लुईस वोन फ्रांझ यांनी परीकथांमागील मानसशास्त्राचे विश्लेषण करताना असताना हेच निष्कर्ष मांडले आहेत.  संबंधित लेखाचा विषय हा नसला तरी त्यातून अनुभवास येणाऱ्या सगळ्या मानवी वर्तणुकी मॉरीस लुईस यांच्या संशोधनाच्या जवळ जाणारे आहेत. म्हणून बॉलिवूडच्या चित्रपटनिर्मीतीमध्ये गेल्या पाच वर्षात झालेल्या बदलांमध्ये मानवी मनाची आणि वर्तणुकीची अत्यंत प्रामाणिक मांडणी काही निर्माता-दिग्दर्शक आणि पटकथा लेखकांनी केली आहे. सुरेश त्रिव...