कोण आहेत ही लोकं! त्यांनी सांगितले भोंगे काढा, त्यांनी सांगितले भोंगे लावा, आणि आम्ही नेहमीप्रमाणे पळत सुटलो. कोण आहेत ही लोकं याचा विचार न करता! हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी जाती आणि धर्म निर्माण केले, नंतर जातींची उतरंड लावली, कुणी कपाळी टिळा लावला, कुणी तराजू घेऊन व्यापारी झाले, कुणी हातात तलवार घेतली, आणि आपल्याच धर्मातील इतरांना शूद्र ठरविले. हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी धर्म निर्माण केले, कुणी आचार्य झाले, कुणी मुल्ला-मौलवी झाले, कुणी पाद्री झाले, आणि सगळ्यांनी मिळून आपल्या अनुयायांमध्ये भांडणे लावून दिली. हीच तीच लोकं आहेत, ज्यांनी सांगितले, शूद्र आणि स्त्रियांना शिक्षण देऊ नये, कुणब्यांनी फक्त शेती करावी, बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावे, ऋषींचे कुळ आणि मूळ विचारू नये, प्रश्न विचारू नयेत, जे आहे त्यातच समाधान मानावे, हे असेच पिढ्यानपिढ्या सांगत राहिले, आणि आपण ऐकत राहिलो. कधी जात श्रेष्ठत्वाच्या नावाखाली, तर कधी धर्म श्रेष्ठत्वाच्या नावाखाली. आणि हे असेच कुठपर्यंत चालू राहील? जो पर्यंत आपण विचार करत नाही, जोपर्यंत आपण त्यांना प्रश्न विचारत नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या अधिकार...