Skip to main content

Posts

Showing posts from July, 2022

सरहद्द गांधी : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान

  सरहद्द गांधी : भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासातील सोनेरी पान  भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अहिंसात्मक लढ्याला अनन्यसाारण महत्व आहे. शस्त्राचा आणि बाळाचा वापर करून ज्या गोष्टी साध्य झाल्या नाहीत त्या भारतातील अहिंसात्मक लढ्याने जगाला साध्य करून दाखविल्या आणि गेल्या ७५ वर्षात अहिंसा हा एक विचार, तत्व आणि जीवनपद्धती बनून गेली. यथावकाश जगानेही अहिंसेचे हे तत्त्व आणि त्याचे महत्व अधोरेखित केले. या अहिंसक लढ्याचे श्रेय ज्या महान व्यक्तीला जाते ते म्हणजे मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांना! त्यांच्यासारखा अहिंसावादी जगाने पाहिला नाही असे अनेक विचारवंतांचे मत असले तरी महात्मा गांधीचे हे मोठेपण आबाधित ठेऊन अहिंसेच्या लढ्यातील आणखी एका महामानवाचे आपल्याला विस्मरण झाले आहे असे खेदाने म्हणावे लागेल. महात्मा गांधींच्या अहिंसात्मक लढ्याला पुढे घेऊन जाणाऱ्यांमध्ये ' सरहद्द गांधी ' म्हणजेच ' अब्दुल गफार खान ' यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे आपल्याला फार काही माहीत नसताना एखाद्याचे महत्व नाकरण्यापेक्षा त्यामाणसाचे मोठेपण स...

फुटीच्या उंबरठ्यावरील भाजप.

फुटीच्या उंबरठ्यावरील भाजप. इंग्लंडमध्ये १६ व्या शतकात थॉमस हॉब्स नावाचा राजकिय तत्वज्ञ आणि विचारवंत होऊन गेला. त्या काळात त्यांनी आपल्या देशातील आणि जगातील विविध देशातील राजकिय व्यवस्था, सत्ताधारी वर्गाची मानसिकता, त्यानुसार त्यांनी घेतलेले निर्णय आणि त्याचे त्या देशातील नागरिकांवर आणि व्यवस्थेवर झालेले चांगले वाईट परिणाम यांचा सखोल अभ्यास केला आणि आपला राजकीय सिद्धांत मांडला. त्यासाठी त्यांनी संकलित केलेली तथ्ये, त्यासाठी वापरलेली साधने आणि त्याआधारे केलेले विश्लेषण इतके अचूक होते की त्यांचा हा राजकीय सिद्धांत त्याकाळात संपूर्ण जगभर प्रसिद्ध पावला. कारण त्यांनी सिध्दांताअंती काढलेले निष्कर्ष आणि त्यानुसार केलेल्या सूचना आणि शिफारशी ६०० वर्षानंतरही तितक्याच उपयुक्त असून देशातील राजकिय परिस्थितीचे मोजमाप करताना आणि त्यावरून त्या सत्तेचे आणि देशाचे पुढे काय होईल यांचा अंदाज थॉमस हॉब्स यांचे तत्वज्ञान अभ्यासले की सहज लक्षात येते. हा सगळ्याचे पुन्हा एकदा स्मरण करण्याचे कारण म्हणजे देशातील सत्ताधारी पक्षाचा सद्या सुरू असलेला प्रवास! १९२५ साली स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात...