कविता - चोरलेली तीन माकडं
बुध्दांची तीन माकडं गांधीजी तुम्ही चोरलीत,
माझी माझी म्हणत नेमकी तीच कशी हेरलीत.
धर्माच्या ओझ्याखाली तुम्ही सुद्धा वाकलात,
नाही नाही म्हणता तुम्ही सुद्धा झुकलात.
एकदा तरी सांगायचं जगाला की, मी बुद्धाकडे चाललोय.
बुद्धाने सांगितलेलेच तत्त्वज्ञान मी पुन्हा पुन्हा बोललोय.
करुणा, सत्य आणि अहिंसेच्या पुजाऱ्याला,
धर्म एवढा आवडे का?
तुमच्यासारख्या महात्म्याला,
बुद्धांचे एवढे वावडे का?
धर्मांधांच्या भाऊगर्दीत तुम्हीसुद्धा हरवला असता,
जर बुद्ध तुमच्या सोबतीला नसता.
म्हणून गांधीजी एकदा तरी तुम्ही,
जर जाहीर बुद्ध स्वीकारला असता.
तर भारत आज धर्माच्या आगीत होरपळला नसता.
Comments
Post a Comment