भागवत पुराणाचा अन्वयार्थ : ढोबळ मानाने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व या तिन अवस्था असतात. यातिल मधल्या टप्प्यावर मानूस कसा वागतो यावर त्याचे वर्तमान ठरत असते. तारुण्यात खुप ऊतमात केला की म्हातारपण हलाखीचे जाते. बरेच जण या काळात एकटे पडून भ्रमिष्ट होतात किंवा आपल्याला सहानुभुती मिळावी म्हनुन काहीही बरळत सुटतात. काहीजण जरा उपरती झाल्यावर पुर्वी मी चुकीचा होतो पंण आता कसा मी बदललो आहे याचे दाखले देतात. आपल्या चुकिच्या वागन्याला अमुक एक मानूस जबाबदार होता पण आता त्याचे अनुकरण करने मी सोडले आहे. तेव्हा मला आधार ध्या असा या व्यक्तींचा कावा असतो. सामान्य माणसाच्या बाबतीत एकवेळ ही बाब क्षम्य पण माणुस खुप मोठ्या पदावरील आणि जबाबदार व्यक्ती असेल तर त्याच्या प्रत्येक वाक्याचा आणि त्यामागील हेतुचा परामर्श घेणे आवश्यक असते. आर. एस. एस. चे प्रमुख आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत संघाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय व्याख्यानमालेला सम्बोधित करताना केलेले भाषण या वर उल्लेखिलेल्या माणसाच्या प्रवर्गात मोडनारे असुन त्याचा राजकिय आ...