Skip to main content

Posts

Showing posts from September, 2018

भागवत पुराणाचा अन्वयार्थ :

भागवत पुराणाचा अन्वयार्थ : ढोबळ मानाने प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व  या तिन अवस्था असतात. यातिल मधल्या टप्प्यावर मानूस कसा वागतो यावर त्याचे वर्तमान ठरत असते. तारुण्यात खुप ऊतमात केला की म्हातारपण हलाखीचे जाते. बरेच जण या काळात एकटे पडून भ्रमिष्ट होतात किंवा  आपल्याला सहानुभुती मिळावी म्हनुन काहीही बरळत सुटतात. काहीजण जरा उपरती झाल्यावर  पुर्वी मी चुकीचा होतो पंण आता कसा मी बदललो आहे याचे दाखले देतात. आपल्या चुकिच्या वागन्याला अमुक एक मानूस जबाबदार होता पण आता त्याचे अनुकरण करने मी सोडले आहे. तेव्हा मला आधार ध्या असा या व्यक्तींचा कावा असतो. सामान्य माणसाच्या बाबतीत एकवेळ ही  बाब क्षम्य पण  माणुस खुप मोठ्या पदावरील आणि जबाबदार व्यक्ती असेल तर त्याच्या प्रत्येक वाक्याचा आणि त्यामागील हेतुचा परामर्श घेणे आवश्यक असते. आर. एस. एस. चे प्रमुख आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिल्लीत संघाने आयोजित केलेल्या तीन  दिवसीय व्याख्यानमालेला सम्बोधित करताना केलेले भाषण या वर उल्लेखिलेल्या माणसाच्या प्रवर्गात मोडनारे असुन  त्याचा राजकिय आ...

मूल्क: सामजिक अस्वस्थेचे विदारक चित्रण

मूल्क: सामजिक अस्वस्थेचे विदारक चित्रण गल्लाभरू आणि मसाला चित्रपटांच्या भाऊगर्दीत काही चांगल्या कलाकृती दर्जा असूनही दुर्लक्षित राहतात. बॉलीवूडमध्ये दरवर्षी 200 हून अधिक चित्रपट प्रदर्शित होतात त्यातील बहुतांशी चित्रपट हे याच पठडीतील असतात आपण गुंतवलेला पैसा वसूल झाला पाहिजे यासाठी निर्माते दिग्दर्शक आणि कलाकार अश्या चित्रपटांची निर्मिती आणि प्रदर्शन करतात. या चित्रपटांना प्रेक्षक वर्गही लाभतो कारण मुळात बहुतांश भारतीय प्रेक्षकच दर्जाहीन झाला असून चांगल्या कलाकृती कशाला म्हणायचे याचे त्यांना भान राहिलेले नाही. त्यामुळे  ज्या काही चांगल्या आणि मोजक्या कलाकृती तयार होतात त्याही या चित्रपटांच्या भाऊगर्दीत प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत. त्यातही आणखी तो चित्रपट समाजव्यवस्थेचे विदारक चित्रण करणारा असेल तर समाजातल्या बहुतांशी शासक  वर्गाला किंवा त्यांच्या प्रतिनिधीला ते नको असते कारण चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनाचे एक प्रभावी माध्यम आहे.  शिवाय चित्रपट जर राजकीय व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करणारा असेल तर त्याला खुद्द सरकारकडूनही लाल सिग्नल मिळतो आणि असा चित्रपट राखडवि...

"मूल्क" च्या निमित्ताने :

"मूल्क" च्या निमित्ताने : हिंदी चित्रपटसृष्टी ही मुळातच उचल्यांचा बाजार आहे.  येथे तयार होणारे बहुतांश चित्रपट हे Tollywood किंवा इतर भाषेतील चित्रपटांच्या कॉपी असतात. मुळात बहुतांश Tollywood चे चित्रपट हे हॉलिवुडच्या चित्रपटांची कॉपी असतात. अश्या या उचलाउचलीच्या धंद्यात ती संकल्पना हिंदीत येताना तंत्रज्ञान आणि सादरीकरण यातील त्रुटी आणि मागासापणामुळे अत्यंत सुमार चित्रपटांची निर्मिती होते.  एकूण प्रदर्शित चित्रपटांमध्ये या उचलाउचलीचे प्रमाण जवळपास ८०% टक्के आहे. सध्या हे प्रमाण आणखी वाढत चालले आहे कारण प्रेक्षकांचा दर्जाही तितकाच सुमार झाला आहे. अनेक दक्षिणी थाटाचे सुमार कथा आणि अभिनय असलेले चित्रपट 'दे मार' स्टाईल मुळे सहज १०० ते २०० कोटीचा व्यवसाय  करू लागले आहेत. व्यवसाय म्हणून हे ठीक असले तरी चित्रपट हे मनोरंजनाबरोबरच सामाजिक अभिसरण घडवून आणणारे एक प्रभावी माध्यम आहे त्यामुळे कशा प्रकारचे चित्रपट लोक बघतात त्यावरून त्यांचाही दर्जा आणि बौद्धिक कुवत ठरत असते आणि त्यातूनच एकूण समाजाचाही दर्जा लक्षात येतो. दुर्दैवाने भारतातील प्रेक्षकांचा दर्जा इतका घसरला आहे की, च...