Skip to main content

Posts

Showing posts from December, 2018

सेमिफायनालचा अन्वयार्थ:

सेमिफायनालचा अन्वयार्थ: ११ डिसेंबर रोजी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यामधील निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेसने तीन चतुर्थांश जागासह छत्तीसगढ जिंकताना अपेक्षित राजस्थानसह मध्यप्रदेशचा गड ही  अटीतटीच्या लढतीत सर केला पण मिझोराम या पूर्वेकडील एकमेव राज्यातील सत्ता गमविली आणि येथे काँग्रेससह भाजपचा दारुण पराभव झाला. तीच गत या दोन्ही पक्षांची तेलंगणामध्ये झाली.  तेलंगणाव्यतिरिक्त इतर चारही राज्यात जनतेने प्रस्थापितांविरुद्ध  कौल दिला असला तरी या निकालाचा इतकाच मर्यादित अर्थ काढणे चुकीचे ठरेल.   राजस्थान, मध्यप्रदेश आणि गेल्या दशकात मध्यप्रदेशातूनच निर्माण झालेला छत्तीसगढ, बिहार, झारखंड, उत्तरप्रदेश आणि उत्तरांचल ही राज्ये प्रामुख्याने "काऊ बेल्ट" समजली जातात. म्हणजेच खऱ्या अर्थाने ही राज्ये हिंदी आणि हिंदूंच्या प्रभावाखालील राज्ये समजली जातात कारण या राज्यांमध्ये हिंदूंची संख्या ९०% च्या आसपास आहे. उत्तरप्रदेश आणि बिहार हे हिंदूंचे गड असले तरी या दोन राज्यात मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय आहे तर झारखंड आणि छत्तीसगढ ही आदिवासीबहुल ...

छिंदमच्या निमित्ताने.........!

छिंदमच्या निमित्ताने.........! 10 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्र आणि देशाच्या दृष्टीने खळबळजनक ठरला आहे. कारण आज बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि त्या सगळ्यामुळे देशातील तमाम लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या चिंता वाढविणाऱ्या आहेत.  या घटनेला मुळात सुरुवात झाली ती शिवाजी महाराजांना अपशब्द वापरणाऱ्या श्रीपाद छिंदम याच्या अहमदनगर महापालिकेतील एकतर्फी विजयाने, पाठोपाठ मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या गुणरत्न सदावर्ते या वकिलांना जालना येथील वैद्यनाथ पाटील या युवकाने न्यायालयाच्या आवारातच मारहाण केली. या दोन विरोधी घटनांचे धक्के पचवत असतानाच भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी राजीनामा दिलाचे खात्रीलायक वृत्त प्रसारमाध्यमात झळकले आणि पाठोपाठ उपगव्हर्नर विरल आचार्य यांनीही राजीनामा दिल्याचे बोलले गेले पण सरकारने त्यांच्या राजीनाम्यावर  अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही.  या चारही घटना गंभीर असल्याने मल्ल्याच्या प्रत्यर्पणाची समाधान वाटावी अशी बातमी पूर्णपणे झोकाळली गेली.  कोणी म्हणेल या सगळ्याचा काही संबंध तरी आहे का? वरवर पाहता अर्थाअर्थी त्...

Tujhya Raktamadhal Bhimrao Pahije

Tujhya Raktamadhal Bhimrao Pahije Anand Shinde ना भाला नां बरची ना घाव पाहिजे 2 पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे 2 नव्या भागीताचे स्वप्न ते हसुदे तुझी भीम शक्ती जगाला डिसुदे कुण्या गावकीचा दुआ साधला रे आहे भीम युगाचा नवा दाखला रे ना पाटील ना वाडा ना गाव पाहिजे 2 पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे प ण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे। असे कैक वैरी अचंबित केले रुढीच्या नातीला रे तूच चीत केले चाललो आम्ही पण शिखर वैभवाला गरज आज नाही कुणाची आम्हाला ना मंत्री श्रीमंती ना हाव पाहिजे 2 पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे तुझा तू जपावा नवा वारसा तू स्वतः ला स्वतः घडावं माणसा तू नको मेजवानी अशी दुर्जनाची भाकरी ती खाऊ आम्ही इमानाची ना रोटी ना मस्का ना पाव पाहिजे पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे उसळू दे त्या लाटा तुझ्या शिरा वरती आम्हाला मिळाली अशी ज्ञान भरती सोडला आम्ही तो वाळवंट सारा भीमाने दिला हा सुखाचा किनाराJ ना दरीया ना सागर ना नाव पाहिजे2 पण तुझ्या रक्ता मधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्ता OKअडलाअढळ

कथा ते पटकथा : एक प्रवास

कथा ते पटकथा : अघटित या कथेचा प्रवास प्रा.डॉ. राहूल सदाशिव खरात, वाणिज्य विभाग, मु. सा. का. महाविद्यालय, सॊमेश्वरनगर, पिनकोड-४१२३०६. Email- srass229@gmail.com प्रस्तावना: कलेच्या क्षेत्रात वावरत असताना ज्या कलेकडे आपल्या सर्वांचे सर्वात जास्त लक्ष असते ती कला म्हणजे चित्रपट कला होय. यासाठी चित्रपट क्षेत्रातील झगमगाट जितका कारणीभूत असतो तितकाच कारणीभूत असतो तो त्या कलेचा सशक्तपणा!  या सशक्तपणामुळेच आपल्याला त्याबद्दल आकर्षण आणि आवड निर्माण होते. हा सशक्तपणा येण्याला जे काही घटक कारणीभूत असतात त्यामधील प्रधान घटक म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो तो म्हणजे त्या चित्रपटाची कथा.  म्हणजे आपण एखाद्या दर्दी चित्रपट रसिकाला विचारले की, "तुला  हा का आवडला?" तर  तो सहज म्हणून जातो, "पिक्चरची स्टोरी खुप भन्नाट आहे राव!" म्हणजेच चित्रपटाचा पायाच कथा असते.  ही कथा चित्रपटाच्या अंगाने लिहीत असताना त्यावर जे काही संस्करण केले जाते त्याला पटकथा असे म्हणतात. हे संस्करण ही कथेइतकेच सशक्त असावे लागते.  तरच चित्रपट यशस्वी होतो. त्यामुळे कथा ते पटकथा असा एक मोठा प्रवास आपल्य...