Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:

सुपर ३० आणि समाजव्यवस्था:               भारतीय चित्रपटसृष्टीचे आणि त्यातही बॉलीवूडचे एक वैशिष्ट्ये राहिलेले आहे. ते म्हणजे बॉलीवूडने नेहमीच आपल्या चित्रपटातून समाजमनाचा आरसा दाखविला आहे. तरीही काही अपवाद वगळता बॉलीवूडने तयार केलेल्या चित्रपटांवर नेहमीच टीका होत राहिली आणि त्यात तथ्यही आहे. बॉलीवूडने वेगवेगळ्या विषयाला हात घालून ते गंभीरपणे मांडले असले तरी त्याचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिलेले आहे कारण त्यामागे असलेली आर्थिक गणिते, बाजारपेठेची मागणी आणि वर्चस्वाचे राजकारण. परंतु इकडून तिकडून विषय उचलून त्याचा विचका करण्यात आघाडीचे निर्माते-दिग्दर्शक धन्यता मानत असतानाही काही निर्माते, दिग्दर्शक आणि कलावंत  आर्थिक गणिते आणि वर्चस्वाचे राजकारण याची तमा न बाळगता वेगळे आणि ज्वलंत विषय समर्थपणे हाताळत आहेत. विशेष म्हणजे आशय-विषय चांगला असलेल्या या चित्रपटांना वास्तवातील घटनांची जोड दिल्याने व्यावसायिक यशही मिळाले आहे. गेल्या महिन्यात आलेला "आर्टिकल १५" आणि नुकताच प्रदर्शित झालेला "सुपर ३०" हे दोन्ही चित्रपट ज्वलंत सामाजिक प्रश्न मांडणारे असूनही व्यावसाय...

आर्टिकल 15 आणि आपण

"आर्टिकल १५ आणि आपण" ©के.राहुल 9096242452 "आर्टिकल 15" या चित्रपटावर आतापर्यंत बऱ्याच जणांकडून बरेच काही बोलून आणि लिहून झाले आहे. इतके की चित्रपटगृहात चित्रपट पहायला जावे की नाही? (सगळी कथा आणि प्रसंग चर्चेतून समजल्याने) अश्या द्विधा मनस्थितीत असतानाच या चित्रपटाशी निगडित एक बातमी ऐकायला मिळाली ती म्हणजे ब्राह्मण महासंघाने चित्रपटाविरुद्ध टाकलेली आणि न्यायालयाने तितक्याच तातडीने फेटाळली याचिका. याचिकाकर्त्यांच्या मते चित्रपट सामाजिक सलोखा धोक्यात आणणारा आणि ब्राह्मणविरोधी आहे. सर्व देशभर सिनेमागृहात चित्रपट प्रसारण शांततेत सुरू आहे आणि त्याला प्रेक्षकांचा विशेषतः नव्या पिढीचा तितकाच चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे न्यायालयाने ही याचिका फेटाळून योग्य तीच भूमिका पार पाडली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचेही अभिनंदन! तसे पाहायला गेले तर उठसूट कशानेही आणि कोणाच्याही भावना दुखवण्याच्या काळात असल्या गोष्टी घडणे स्वाभाविकच! त्यामुळे हा चित्रपट आवर्जून पहायला हवा असे वाटले.  जाती आणि वर्णव्यवस्था ही आपल्या समाजव्यवस्थेची व्यवच्छेदक लक्षणे आहेत आणि त्यात काही विशिष्ट वर...

पावसाच्या कविता

एकटाच घरात मी असताना, भिंती विचित्र वागल्या. एकटाच पावसात भिजताना, तुझ्या आठवणी जागल्या. --------------------------- चिंब पावसात भिजताना, आठवणी जाग्या झाल्या. कंठ झाला अबोल, अन कडा पापण्यांच्याओल्या. -------------------------------- आठवणी झाल्या धूसर, तरी पाऊलखुणा गडद होतात . क्षण एकत्र घालवलेले, मातीमध्ये मुरत जातात. -----------------------------